Thursday, December 31, 2009

राज ठाकरे 'मटा नायक'

मित्रानो, तुमच्या सोबत शेयर करीत आहे महाराष्ट्र टाइम्स मधील बातमी। राज साहेबाना म टा नायक निवड्ण्यात आले आहे। अर्थात त्यात नविन काहीच नाही, राज साहेब आहेतच महाराष्ट्राचे नायक। काय खरं की नाही?

तुम्हा सर्वानां नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा

विनोद

31 Dec 2009, 0145 hrs IST

- म. टा. खास प्रतिनिधी , मुंबई
'मराठीपणा'चा एल्गार करीत मुंबईसह महाराष्ट्रात तुफान उठवून पहिल्याच विधानसभा निवडणुकीत १३ आमदारांची फौज उभी करणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कामगिरीला 'महाराष्ट्र टाइम्स'च्या वाचकांनी मन:पूर्वक सलाम केला आहे. २००९चे 'मटा नायक' म्हणून राज ठाकरे यांची निवड झाली असून इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रातील यशस्वी उद्योजक व श्रीमंत भारतीयांच्या 'फोर्ब्स'च्या यादीत मराठी पताका फडकवणारे वीरेंद म्हैसकर यांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती मिळाली आहे. ...... नववर्षाच्या पूर्वसंध्येला घेतल्या जाणाऱ्या 'मटा नायक' एसएमएस कॉण्टेस्टला दरवषीर् वाढता प्रतिसाद मिळत असून यंदा त्यासाठी ४५ हजाराहून अधिक एसएमएस आले. एकाच मोबाइलवरून एकापेक्षा अधिक एसएमएस केल्यास ते ओळखण्याचे तंत्र उपलब्ध असल्याने काही मते बाद ठरली. वैध मतांमध्ये सर्वाधिक मते राज ठाकरे यांना मिळाली; तर दुसऱ्या क्रमांकावर वीरेंद म्हैसकर यांची निवड झाली. बंडाचा झेंडा फडकावीत शिवसेनेतून बाहेर पडलेले राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर हजारांेच्या उपस्थितीत ९ मार्च २००६ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. 'मनसे'ला राज्याच्या सर्व भागांतून आणि स्तरांमधून पाठिंबा मिळत होताच. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमधील मतदानाने त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केले. राज यांनी आतापर्यंत स्वत: कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. मात्र, 'मटा नायक' या एसएमएस कॉण्टेस्टच्या निमित्ताने मटाच्या वाचकांनी त्यांना भरभरून 'एसएमएस'मते दिली आणि त्यांच्या 'नायक'पणावर शिक्कामार्तब केले. 'मटा नायक'चे हे सहावे वर्ष. यंदाच्या कॉण्टेस्टमध्ये राज ठाकरे, उद्योजक वीरेंद म्हैसकर, 'एमएसआरडीसी'चे चीफ इंजिनीअर शरद सबनीस, सातही खंडांतील सवोर्च्च शिखरे सर करण्याची उमेद बाळगणारी कृष्णा पाटील, काँग्रेसला राज्यात यश मिळवून देणारे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, 'भाजप'चे महाराष्ट्रातील पहिले मराठी अध्यक्ष नितीन गडकरी, 'एमएमआरडीए'चे महानगर आयुक्त रत्नाकर गायकवाड, अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण, 'हरिश्चंदाची फॅक्टरी'चे दिग्दर्शक परेश मोकाशी, क्षयरोगासंदर्भात मूलभूत स्वरूपाचे संशोधन करणारे डॉ. राजेश गोखले आणि साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आलेले वसंत आबाजी डहाके अशी निरनिराळ्या क्षेत्रांत कर्तृत्वाची मोहोर उमटवणारी मंडळी होती. पहिल्या वषीर् तत्कालीन उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील, दुसऱ्या वषीर् अभिनेते अरुण नलावडे, तिसऱ्या वषीर् सरकारी वकील उज्ज्वल निकम, चौथ्या वषीर् शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांची 'मटा नायक' म्हणून निवड झाली होती. गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे आयुष्य उजळवण्यात मोलाची भूमिका बजावणारे, मॅगसेसे पुरस्कार विजेते डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटे दांपत्याची गतवषीर् 'मटा नायक' म्हणून वाचकांनी निवड केली होती.

Thursday, December 24, 2009

शिवसेनेच्या दबावापोटी भाजपने सोडली मनसेची साथ

मित्रानो, आज सकाळीच पुन्यनगरी मधे बातमी वाचली की मनसे विधानसभेत स्वताचा गट स्थापन करनार आहे। बरे झाले, जर शिवसेना आणि त्यांच्या दबावामुळे भाजपा मनसे ला कुठल्याही चर्चे करता बोलवत नसतील तर स्वताचा गट स्थापन करने गरजेचं होतं । जर सर्व विरोधी पक्ष एकत्र राहिले असले तर चांगलेच झाले असते पण काय करणार , शिवसेनेच्या आड्मुठ्या धोरनामुळे ते होणं शक्य नाही। मनसे ने स्वताचा गट स्थापन करून जनतेचे प्रश्न तडीस न्यावे हीच विनंती। तुमच्या सोबत शेयर करीत आहे ह्या संदर्भातील सकाळ मधील बातमी।

सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 24, 2009 AT 12:30 AM (IST)
Tags: maharashtra, politcs, vidhansabha
मंगेश इंदापवार नागपूर - हिवाळी अधिवेशनाच्या प्रारंभी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली सर्व विरोधी पक्ष एक असल्याचे चित्र निर्माण करण्यात आले होते. मात्र, मनसेची उपस्थिती शिवसेनेला खटकली आणि अधिवेशनाचे सूप वाजले तेव्हा मनसे एका कोपऱ्यात दिसली. विरोधी पक्षामधील पडलेली ही फूट आघाडी सरकारच्या पथ्यावर पडली.विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला घेतलेल्या पत्रपरिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते बाळ नांदगावकर उपस्थित होते. खडसे यांनीच नांदगावकर यांना विरोधी गटात आमंत्रित केले होते. परंतु, भाजपच्या या पुढाकारावर शिवसेनेच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला. बाळ नांदगावकरांना पत्रपरिषदेत बोलण्याची संधी देताच शिवसेना नेते दिवाकर रावते हे तेथून उठून गेले. तेव्हाच विरोधी पक्षात पडलेल्या फुटीचे संकेत मिळाले. भाजप शिवसेना युतीला प्रमुख विरोधी पक्ष मानण्यात येत असताना त्यात मनसे आणि शेकाप यांना स्थान नाही, अशी कठोर भूमिका शिवसेनेच्या नेत्यांनी घेतल्याचे अंतर्गत गोटातून सांगण्यात आले. तसेच मनसेच्या चार आमदारांचे निलंबन मागे घेण्याच्या मुद्‌द्‌यावरही शिवसेनेकडून असहकाराची भूमिका घेण्यात आली. त्यामुळेच अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांची ही एकजूट अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी दिसून आली नाही. विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी अखेरच्या दिवशी घेतलेल्या पत्रपरिषदेत मनसेचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते. तेव्हा शिवसेनेच्या दबावापुढे भाजप झुकली, अशीच चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. त्यासंदर्भात मनसेचे गटनेते बाळ नांदगावकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, विरोधी पक्ष म्हणून मनसेला भाजप व सेना युतीने विश्‍वासात घेतले नाही. संपूर्ण अधिवेशनात मनसे स्वतंत्र विरोधी पक्ष म्हणून वागला. प्रमुख विरोधी पक्षांनी सोबत घेतले नसले तरीही मनसेला आपली भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य आहे. आम्ही प्रमुख विरोधी पक्षामागे असेच फरपटत जाणार काय, असा सवाल त्यांनी केला. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी आम्हाला आमंत्रित केले होते. त्यामुळे तेथे गेलो होतो. परंतु, शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. त्यामुळे अखेरच्या दिवशी भाजपकडून कोणतेही निमंत्रण आले नाही. आम्ही विरोधी पक्षात आहोत, त्यामुळे आम्हालादेखील भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. तेव्हा सोबत घेतले नाही तरीही मनसे भूमिका मांडणार आहे, असे बाळ नांदगावकर यांनी स्पष्ट केले.

Wednesday, December 23, 2009

शिशिर शिंदे यांचे निलंबन शपथेपुरते रद्द

23 Dec 2009, 1119 hrs IST

म। टा. विशेष प्रतिनिधी ।

नागपूर मनसे नेते शिशिर शिंदे यांचे निलंबन शपथ घेण्यापुरते रद्द करण्यात आले आहे. बुधवारी विधानसभेत संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी एक निवेदन वाचून ही माहिती दिली. शिंदे विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सदस्यत्वाची शपथघेतील , त्यानंतर निलंबन पुन्हा लागू होणार आहे. विधानसभेच्या कारवाईमुळे आमदारकीचीनिवडणूक जिंकली असुनही निलंबन रद्द होईपर्यंत शिंदे यांना सभागृहात प्रवेश करता येणार नाही. समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ हिंदीतून घेत होते. त्यावेळी मराठीतूनच शपथ घ्या असा आग्रह करत , मनसेच्या चारआमदारांनी आझमी यांना शपथ घेण्यापासून अडवण्याचा प्रयत्न केला होता. या संपूर्णघटनेचा निषेध करत विधानसभेच्या शिस्तपालन समितीने शिशिर शिंदेसह मनसेच्या चार आमदारांवर निलंबनाची कारवाई केली होती. मात्र निलंबित झालेल्यांपैकी शिंदे यांनी आमदारकीची शपथ घेतली नसल्याचे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले होते. या पार्श्वभूमीवर फक्त शपथ घेण्यापुरती शिशिर शिंदे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्यात आली आहे. दरम्यान , शिस्तपालन समितीने केलेल्या कारवाईमुळे मनसेच्या निलंबित झालेल्या आमदारांना विधीमंडळाच्या परिसरात प्रवेश करण्यासच मनाई करण्यात आली आहे. फक्त शिंदे यांना शपथ घेण्यापुरती सूट देण्यात आली असून ते विधानसभाध्यक्षांच्या दालनात शपथ घेऊन लगेच विधीमंडळ परिसरातून बाहेर पडणार असल्याचे समजते.

Tuesday, December 15, 2009

रक्त पुरवठा नाही म्हणून मुंडकं छाटायचं? : राज

मित्रानो, महाराष्ट्रा पासून विदर्भ वेगळा करण्यास आमचा विरोध आहे। मान्य आहे की आपल्या सर्व राजकार्न्यानीं स्वता च्या भागाचा विकास केला आणि विदर्भ , मराठ्वाड्या सारखा भाग दुर्लक्षित ठेवला, पण त्याचा अर्थ असा नाही की आपण आपला भूभाग तोडून नवं राज्य स्थापन कराव । हा सत्ताधारी पक्षाचा इच्छा शक्तीचा प्रश्न आहे, जर त्यान्च्या मनात विदार्भाचा विकास करायचे असेल तर तो होणार पण त्याना जर काहीच करायचे नसेल तर मग मात्र तुम्ही त्याना सत्तेतुन खाली खेचन्या शिवाय कही करू शकत नाही। महाराष्ट्रा नव निर्माण सेनेने आपले मत ह्या बाबतीत आधीच नक्की केलेले आहे की ते सर्व महाराष्ट्राच विकास करू इछितात आणि राज साहेबांचे खालील मत हे त्यावर शिक्का मोर्तबच करतं ।

15 Dec 2009, 1728 hrs IST
मटा ऑनलाइन वृत्त ।

नागपूर मेंदूला रक्त पुरवठा होत नसेल तर काही धडापासून मुंडकं छाटले जात नाही, असाच प्रकार स्वतंत्र विदर्भाची मागणी करून केला जात आहे। त्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला पन्नास वर्षे पूर्ण होत असताना महाराष्ट्राच्या विभाजनाची गोष्ट उभी राहते, ही दुदैवी बाब असल्याचे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्र विदर्भाला विरोध केला आहे।

महाराष्ट्रापासून विदर्भ स्वतंत्र झाला तर विदर्भाचे प्रश्न सुटणार नाही. विदर्भासाठी काँक्रिट प्लॅन आखला पाहिजे. त्यानंतर विदर्भाचा खरा विकास होई शकेल. विदर्भातील खासदार विलास मुत्तेमवार यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली. या राज्यात गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसचे राज्य होते. त्यांनीच विदर्भावर अन्याय केला. मुत्तेमवार हे आपल्या पक्षातील नेत्यांना सवाल का विचारत नाही. त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून स्वतंत्र विदर्भाची मागणी करावी, अशी खोचक सूचना राज ठाकरे यांनी केली. विदर्भातील नेत्यांशी आणि विविध क्षेत्रातील लोकांशी चर्चा केली. त्यांचा राग मी समजू शकतो. परंतु, काँग्रेसच्या नेत्यांचा हेतु बद्दल मला शंका वाटते. रागावर उपाय असतो हेतूवर उपाय नसतो, असेही त्यांनी यावेळी सांगितले. विदर्भातील ५० आमदार आणि ७ खासदारांनी वेगळ्या विदर्भाची मागणी केली असली तरी हा खूप संवेदनशील विषय आहे. यासाठी मग सार्वत्रिक जनमत चाचणी घ्यावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. महाराष्ट्र हा माझा मतदारसंघ आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा विकास हे माझे स्वप्न आहे. शरद पवार हे चार वेळा मुख्यमंत्री झाले. त्यांनी केवळ बारामतीचा केला. त्यांनी इतर महाराष्ट्राकडे दुर्लक्ष केले. बारामतीसारखा विकास हा संपूर्ण महाराष्ट्राचा व्हावा, असे कधी शरद पवारांना वाटले नाही. आता विदर्भाचा विकास व्हावयाचा असेल तर डॉक्टर बदलायला हवे, असेही त्यांनी सांगितले.

‘आपल्या’ कंत्राटदारांना दहा हजार कोटींची खिरापत

मित्रानो, पहा आपले राजकारणी नेते आपल्याला कसं वापरून घेत आहेत। हजारो कोटीची कामं कशी एका झटक्यात कन्त्राट्दारानां दिली जात आहेत आणि हयात सर्वच जन सामिल झाल्याचा चित्र आहे। विरोधी पक्ष सरकारी पक्षाबरोबर राहून आपले इस्पित कशे साध्य करतो त्याचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे। काय, तुमचे काय मत आहे?

हा लेख लोकसत्ता ह्या वृत्त पत्रातून घेतला आहे

निशांत सरवणकर ,मुंबई, १४

डिसेंबरविदर्भातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना आळा घालण्याच्या हेतूने केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांची पॅकेजेस् जाहीर केली जात असतानाच ही आर्थिक मदत योग्य त्या कामांसाठी वापरण्याची जबाबदारी असलेल्या विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांकडून कंत्राटदारांना कोटय़वधी रुपयांची खिरापत वाटून अधिकाऱ्यांनी स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले आहे. विदर्भातील विविध पाटबंधारे योजनांसाठी पुरविण्यात आलेल्या निधीपैकी सुमारे दहा हजार कोटी रुपयांचा निधी मर्जीतील कंत्राटदारांना वितरीत करण्यात आला आहे. काम सुरू होण्याआधीच या कंत्राटदारांच्या पदरी आगाऊ रक्कम पडावी म्हणून जलसंपदा मंत्री अजितदादा पवार यांनी परिपत्रकेच रद्द केल्याचे उघडकीस आले आहे.पाटबंधारे विभागाच्या सचिवांना डावलून कार्यकारी संचालकाला सर्वाधिकार बहाल करून कोटय़वधी रुपये कंत्राटदारांना बहाल केल्याचे दिसून येत आहे. जलसिंचनाच्या कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव कार्यकारी संचालकांकडून थेट मंत्र्यांनाच पाठविण्यात आले. अशा प्रकारच्या फायली या सचिवांमार्फतच मंत्र्यांकडे पाठविण्याची नियमात तरतूद आहे. मात्र तीही डावलण्यात आली आहे. किंबहुना सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याकडून त्यात कुठेही खो घातला जाऊ नये यासाठी ही पुरेपूर काळजी घेतली गेली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ‘लोकसत्ता’कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, कार्यकारी संचालक देवेंद्र शिर्के यांच्या सहीनिशी कोटय़वधी रुपयांचे प्रस्ताव पाटबंधारे सचिवांना डावलून या विभागाचे मंत्री अजित पवार यांना पाठविण्यात आले असून पवारांनी शिर्के यांच्या शिफारशी कुठलेही आक्षेप न घेता मंजूर केल्या आहेत. वास्तविक पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या कामासाठी आगाऊ रक्कम देण्याची तरतूद नाही. तशी परिपत्रके २००० तसेच १९९८ पासून अस्तित्वात आहेत. इतकेच नव्हे तर १६ एप्रिल व २५ एप्रिल २००८ रोजी पाटबंधारे विभागाच्या सचिवांनी पुन्हा जारी केलेल्या परिपत्रकात तर कंत्राटदारांना आगाऊ रक्कम देण्यावर निर्बंध घालण्यात आले होते तसेच कंत्राटाची सुधारीत रक्कम निश्चित केल्यानंतर ती जर संबंधित अधिकाऱ्याच्या अधिकार कक्षेत बसत नसेल तर निविदा समितीकडे मंजुरीसाठी पाठवावी, अशी तरतूद होती. परंतु तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी ही दोन्ही परिपत्रके रद्द करून कंत्राटदारांना अनुकूल भूमिका घेतल्याचे स्पष्ट होते. कोटय़वधी रुपयांच्या जलसिंचनाच्या कामासाठी निविदा मागवितानाही केंद्रीय जलआयोग, नियोजन विभाग, जलस्रोत विभागांनी केलेल्या शिफारशीही डावलण्यात आल्या आहेत. अर्थात राजकीय पाठबळाशिवाय कार्यकारी संचालकदर्जाचा अधिकारी इतक्या मोठय़ा प्रमाणात पदाचा दुरुपयोग करू शकत नाही, हेही यावरून प्रकरणी स्पष्ट होते. या प्रकरणी शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गंभीर यांनी सुरुवातीला तक्रारी करून चौकशीची मागणी केली होती. परंतु नंतर अचानक त्यांना या तक्रारींमध्ये तथ्य नसल्याचा साक्षात्कार झाला. ‘मातोश्री’वरून दबाव आल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची बाब म्हणजे या लाभार्थी कंत्राटदारांपैकी एक असलेल्या अविनाश भोसले यांच्या महाबळेश्वर येथील फार्म हाऊसवर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि कार्यकारी अध्यक्ष उद्धव ठाकरे विश्रांती घेत होते, हा निव्वळ योगायोगच म्हटला पाहिजे, असे सूत्रांनी सांगितले.

पाणीपट्टी वसुलीतील ४५ लाखांचा अपहार - ठाण्यात समांतर पाणीपुरवठा योजना

मित्रानो, लोकसत्तेत काल खालील लेख वाचला आणि म्हटलं तुमच्या बरोबर शेयर करुया। ठाण्यात म्हणे समान्तर पाणी पुरवठा योजना चालू होती ज्यामधे कही राजकर्न्यांचा समावेश आहे। असल्या राजकीय नेत्यानां कड़क शिक्षा झाली पाहिजे, नाही काय? तुमचे काय मत आहे ?

हा लेख लोकसत्ता ह्या वृत्त पत्रातून घेतला आहे

दिलीप शिंदे , ठाणे, १४ डिसेंबर/प्रतिनिधी
पाणी टंचाई निर्माण झाली असतानाही ठाण्यातील रुपादेवी उत्कर्ष मंडळाने गेली सहा वर्षे चक्क 'समांतर पाणीपुरवठा योजना' राबवून ठाणे महापालिकेच्या नावे पाणी देयकापोटी वसूल केलेल्या सुमारे ४५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. या घोटाळ्यातील रक्कमेचा भरणा शिवसेनासंबंधीत असलेल्या मॉ रुपादेवी नागरी सहकारी पतसंस्थेत झाल्यामुळे संबंधीत दोषींवर कारवाई करण्यास पालिका प्रशासन टाळाटाळ करीत आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी टंचाई असताना ‘निर्मल जल अभियान’ या नावाखाली समांतर पाणीपुरवठा योजना राबवून इंदिरानगरच्या रुपादेवी टेकडीवरील ५०० कुटुंबियांना महिनाला ७.२९ दशलक्ष लिटर पाणी पुरविला जातो. रुपादेवी पाडा येथील जलकुंभाखालील पंपातून हा अनधिकृतरित्या पाणी पुरवठा होतो. महापालिकेच्या मालकीची असलेली कुपनलिका, इलेक्ट्रिक पंप व पंपाची टाकी, सिन्टेक्सची टाकी यांचा वापर करून रुपादेवी उत्कर्ष मंडळ समांतर पाणीपुरवठा योजना राबविली आहे. प्रत्येक झोपडीधारकाला नळजोडणी देताना त्यांच्याकडून अनामत रक्कमेपोटी प्रत्येकी दीड हजार रुपये वसूल केले आहे. अशा एकूण ५०० नळजोडण्या करण्यात आलेल्या आहेत. हे पाणी मात्र पालिकेने टाकलेल्या जलवाहिनीतून देण्यात आलेले आहे. मुबलक पाणी मिळत असल्याने दरमहा ५० रुपयांची पाणीपट्टी त्यांच्याकडून वसूल करण्यात आलेली आहे. ही सर्व वसुली मॉ रुपादेवी नागरी सहकारी पतसंस्थेतून होत असून त्याची रितसर पावती देखील ग्राहकांना देण्यात आलेल्या आहेत. त्या पावत्यांवर बिल क्रमांक, ग्राहक क्रमांक टाकण्यात आल्याने नागरिकांना या फसवणुकीची भणकदेखील लागली नाही. अशी ही समांतर पाणी पुरवठा योजना २००४ पासून कार्यान्वित असून महापालिकेच्या नावाखाली या मंडळाने आतापर्यंत ४५ लाख रुपये वसूल केलेले आहे.
दुदैवाने मंडळाच्या एका नोटिसीनंतर हा घोटाळा उजेडात आला. मंडळाची ‘कुपनलिका पाणीपुरवठा योजना’ ही ठाणे महापालिकेला हस्तांतरित करण्यासंबंधी रुपादेवी उत्कर्ष मंडळाने ग्राहकांना नोटीस बजावली आणि नळजोडण्या अधिकृत करण्यासंबंधी दोन हजार रुपयांची मागणी केली. प्रथम दीड हजार रुपये मोजल्यानंतर पुन्हा दोन हजार रुपये कशासाठी याबाबत ग्राहकांनी चौकशी सुरू केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विश्र्वास भसे यांनी केलेल्या चौकशीत समांतर पाणीपुरवठा योजनेचा घोटाळ्याची तीव्रता लक्षात आली. पाणी, वीजपुरवठा, जलवाहिनी आदी सर्व महापालिकेचे असताना रुपादेवी मंडळाने अनधिकृतरीत्या नळजोडण्या देऊन त्यांच्याकडून वसूल केलेली ४५ लाख रुपयांची पाणीपट्टी गिळंकृत केल्याचे स्पष्ट झाले आहे. या आर्थिक गुन्ह्याबाबत प्रशासनाकडून तात्काळ पोलीस तक्रार होणे अपेक्षित असताना पालिकेने वेळकाढूपणाचे धोरण स्वीकारले आहे. वास्तविक या प्रकरणाची चौकशी पोलिसांकडून करण्याची सूचना भिसे यांनी आयुक्तांना सादर केलेल्या अहवालात केलेली आहे. मात्र हा घोटाळा करणारे मंडळ शिवसेना नगरसेविकेशी संबंधिगत असून तिचे पती हे सेनेचे पदाधिकारी होते. त्यामुळे कारवाई झाल्यास नगरसेविकादेखील अडचणीत येण्याची शक्यता असल्याने कारवाई होत नसल्याची चर्चा रुपादेवी पाडय़ातील फसवणूक झालेल्या ग्राहकांमध्ये सुरू आहे.

Sunday, December 13, 2009

महाराष्ट्र तीन वर्षांमध्ये भारनियमनमुक्त करणार - मुख्यमंत्री

मित्रानो, कालच सकाळ मधे खालील लेख वाचला आणि त्यानुसार आपले आदरणीय मुख्यमंत्री म्हणे तीन वर्षात महाराष्ट्र भारनियमन मुक्त करण्याकरिता प्रयत्न्य करणार आहेत। एके काळी क्रमांक एक वर असणार्या महाराष्ट्रा साठी ही शरमेची गोष्ट आहे की त्यांच्या महत्वाच्या शहरान्मधे सहा सहा तासाचा लोड शेडिंग कराव लागतय । कांग्रेस च सरकार गेले १० वर्ष महाराष्ट्रावर राज्य करत आहेत मग त्यानीँ इतका वेळ काय झोपा काढल्या? लाज वाटली पाहिजे सरकारला की ते लोकांचे साधे प्रश्न सोडवू शकत नाही । मान्य आहे की विज निर्मिती करण्यासाठी कॅपीटल लागते पण ती गोळा करण्याची जबाबदारी सरकारची आहे। महाराष्ट्राला लोड शेडिंग मुक्त करने हे गरजेचं आहे नाहीतर आपल्या राज्यातील सर्व उद्योग धंधे शेजारच्या राज्यात जातील आणि मग आपल्या सगळ्याना बोबंलत बसावं लागेल। आता विरोधी पक्षाने ह्या प्रश्नावर सरकार काय करते ह्यावर बारीक़ लक्ष ठेवाव लागेल अन्यथा तीन वर्षानंतर परत आपला "ये रे माझ्या मागल्या" असं नको व्हायला। काय तुमचं काय मत आहे?


सकाळ वृत्तसेवा
Sunday, December 13, 2009 AT 02:27 AM (IST)

चाकण - विजेच्या भारनियमनाचा प्रश्‍न सर्वांनाच भेडसावत असून, पुढील तीन वर्षांत महाराष्ट्र भारनियमनमुक्त करणार असून, उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्याकडे विशेष लक्ष दिले जाईल,असे आश्‍वासन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिले.

निघोजे (ता. खेड) येथील चाकण औद्योगिक वसाहतीतील व्होक्‍सवॅगन इंडिया प्रा. ली. कंपनीच्या पोलो कारच्या स्टार्ट प्रॉडक्‍शन कार्यक्रमात ते बोलत होते.

श्री. चव्हाण म्हणाले, भारतात मोठ्या प्रमाणात बहुराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक होत असून, सर्वांत अधिक गुंतवणूक राज्यात होत आहे. उद्योगधंद्यांना पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यातील त्रुटी दूर केल्या जातील. कंपन्यांना प्रशिक्षित तरुण स्थानिक भागात मिळण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, तंत्रशिक्षण केंद्र, अभियांत्रिकी विद्यालय काढण्यात येईल. स्थानिकांना कंपनीतच रोजगार उपलब्ध होणार आहे. बहुतांश तरुण रोजगारासाठी मुंबईला जातात. मुंबईप्रमाणे पुणे राज्यात औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर ठरत आहे. विदर्भ, कोकण, मराठवाडा या विकासाच्या दृष्टीने मागास असलेल्या भागात उद्योगांनी गेले पाहिजे. राज्य सरकार पूर्णपणे सहकार्य करील.

उद्योगमंत्री राजेंद्र दर्डा यांनी राज्यात अनेक कंपन्या गुंतवणुकीसाठी आकर्षित होत असल्याचे सांगितले.

कंपनीचे संचालक डॉ. जोकेम हाईजमन म्हणाले, भारतातील ग्राहकाला परवडेल असा उत्तम दर्जा व रास्त किंमत असलेल्या पोलो कारची निर्मिती केली आहे. दर वर्षी सुमारे एक लाख दहा हजार कारचे उत्पादन करण्याची कंपनीची क्षमता आहे. वाहनक्षेत्रातील आठ ते दहा टक्के वाहनविक्रीचा हिस्सा कंपनीचा राहील. जर्मन कंपनीसाठी भारत एक महत्त्वाचा देश आहे.या वेळी व्यवस्थापकीय संचालक जॉर्ज म्युलर यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री श्री. चव्हाण यांनी सुमारे एक तास कंपनीत फिरून उत्पादनप्रक्रियेची व विविध विभागांची माहिती घेतली. आमदार दिलीप मोहिते, आमदार विलास लांडे, जिल्हाधिकारी चंद्रकांत दळवी, उद्योजक बाबा कल्याणी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी नीलेश गटणे, गजानन पाटील, प्रांताधिकारी डॉ. किरण महाजन आदी या वेळी उपस्थित होते.

स्थानिकांना रोजगार द्या
आमदार दिलीप मोहिते यांनी व्होक्‍सवॅगन ही कंपनी स्थानिक तरुण व ज्यांच्या जमिनी उद्योगांसाठी गेल्या आहेत अशा भूमिपुत्रांना रोजगार देत नाही, या कंपनीचे अधिकारीही दुर्लक्ष करतात, अशी तक्रार मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली. या वेळी पत्रकारांनीही स्थानिक तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही, अशी तक्रार असल्याचे निदर्शनास आणले. यावर श्री. चव्हाण यांनी कंपन्यांनी स्थानिक तरुणांना प्रथम रोजगार दिला पाहिजे, असे सांगितले.

Sunday, December 6, 2009

म. टा. लेख : मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर

मित्रानो आज महाराष्ट्र टाइम्स मधे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर आधारित "मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर" हा लेख प्रसिद्ध झाला आहे। हा लेख खालील पत्त्यावर देखिल मिळू शकतो http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5306204.cms

माझ्या मते मुंबई ह्या शहराची खरी हद्द ही कर्जत कसार्या पर्यन्त आहे कारन आज ह्या शहरात खरं काम करणारा मानुस सुबर्बन शहरातून येतो। मला कळत नाही की आपण कल्याण आणि डोम्बिवली सारखी शहर मुंबई मधे नाही असं कसं म्हनू शकतो ? जर आपण मुंबई ची सीमा वाढवली तर हा प्रश्न आपोआप निकाली निघेल, असं माझं स्पष्ट मत आहे। मुंबई हा महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक आहे आणि राहणार। त्याकडे जर कोणी वाकड्या नजरेने पाहिले तर महाराष्ट्रातला एकून एक तरुण पेटून उठल्याशीवाय राहणार नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे।

जय हिंद जय महाराष्ट्र
म। टा। (दिनांक ०६/११/२००९ )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या 'थॉट्स ऑन लिंग्विस्टिक्स स्टेट' या पुस्तकात महाराष्ट्राच्या चार मराठी भाषक राज्यांची मांडणी केली होती। त्यांचे निकटचे सहकारी वि.तु. जाधव यांनी या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रसिद्ध केला. डॉ. बाबासाहेबांनी २३ डिसेंबर १९५५ रोजी औरंगाबादमध्ये लिहिलेली प्रस्तावना त्यात समाविष्ट होती. हे पुस्तक नंतर दुर्मीळ झाल्याने मोठ्या परिश्रमाने संजय कोचरेकर यांनी ते पुनर्मुद्रित केले. पँथर प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकातील हा काही अंश. .......

मुंबई शहराच्या लोकसंख्येमध्ये महाराष्ट्रीय बहुसंख्य नाहीत असा एक युक्तीवाद नेहमी पुढे केला जातो। खरे पाहता मुंबई शहरातील महाराष्ट्रीय संख्या पुरेशी बहुसंख्य आहे. मराठी लोकसंख्या चांगली ४८ टक्के आहे.

१९४१च्या खानेसुमारीप्रमाणे मुंबई शहाराचे क्षेत्र ३० चौरस मैल आहे. मुंबई शहरामध्ये मराठी भाषिकांची संख्या ५० टक्क्यांहून कमी आहे हे खरे, पण ही एकच गोष्ट काही निर्णायक नाही. याखेरीज आणखी दोन महत्त्वाच्या बाबींचा विचार झाला पाहिजे. त्यातील एक बाब अशी की, मुंबई शहरामध्ये महाराष्ट्रीय जरी अल्पसंख्याक आहेत तरी त्यामुळे मुंबईवरील महाराष्ट्राचा हक्क कोणीही नाकबूल करणार नाही। इतकेच नव्हे तर गुजरात प्रदेश कॉंग्रेस समितीच्या एका भाषणात प्रत्यक्ष मुरारजी देसाई यांनी मुंबई महाराष्ट्राचाच भाग आहे ही वस्तुस्थिती कबूल केली आहे. दुसरी बाब ही की, भारताच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या लोकांची रीघ लागली आहे. कोणी रोजगारासाठी आले आहेत. तर कोणी व्यापारात फायदा मिळविण्यासाठी आले आहेत. अशा लोकांचा मुंबईतील लोकसंख्येत समावेश करणे अनिष्टच ! अशा लोकांना मुंबई हे काही आपले घर आहे असे वाटत नाही. ते मुंबई शहराचे कायमचे नागरिक नव्हेत. रोजगार करतात, काही दिवस येथे राहतात आणि इतरत्र आपल्या प्रांतात जातात. मुंबई हे महाराष्ट्रीयांचेच घर आहे आणि इतर कुणाचेही नाही. मुंबई शहरात बहुसंख्य कोण आहेत हा निर्णय घेताना महाराष्ट्रीयेतरांना जमेस धरणे तर्कदुष्ट आणि अन्यायकारक आहे.

मुंबई शहरामध्ये परप्रांतांतून येणा-या लोकांच्या आयातीवर निर्बंध टाकणारा कोणताही स्थानिक कायदा नसल्याने महाराष्ट्रीयेतरांची संख्या येथे वाढली हे यांनी लक्षात घेतलेले दिसत नाही। मुंबई राज्यात अशा त-हेचा निर्बंधक कायदा असता तर परप्रांतीयांना मुंबईचा दरवाजा बंद झाला असता. साहजिक मुंबई शहरात महाराष्ट्रीयच बहुसंख्यांक राहिले असते. दुसरी एक गोष्ट यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की, परप्रांतीयांचा आणि परदेशीयांचा लोंढा लागला याचे मुख्य कारण म्हणजे मुंबई शहर हे पश्चिम किनाऱ्यावरील अत्यंत महत्त्वाचे बंदर होय. युरोपला मदास कलकत्यापेक्षा मुंबईच अधिक जवळची आणि याच कारणामुळे हिंदुस्थानातील कुठल्याही भागात राहणारे लोक आपली घरे सोडून मुंबईत येतात. मुंबईत नोकऱ्या मिळणेही सोपे जाते. दुसरीकडे ते शक्य नाही.

खरे पाहू गेले असता मुंबईच्या प्रश्नाकडे याहून भिन्न दृष्टीने पाहिले पाहिजे। गेली दोन शतके बाहेरून मुंबईत लोक येऊ लागले आहेत. इतके असूनही मुंबई शहरातील महाराष्ट्रीय लोकसंख्या ४८ टक्क्यांहून कमी झालेली नाही. दोनशे वर्षांच्या एवढ्या कालावधीत महाराष्ट्रीय लोकसंख्या एकंदर लोकसंख्येच्या मानाने अविच्छिन्न राहिली आहे.

मुंबईच काही बहुरंगी शहर नाही। कलकत्ता आणि मद्रास ही देखील मुंबईप्रमाणेच बहुरंगी आहेत. जर कलकत्ता पश्चिम बंगालमध्ये राहू शकते आणि मद्रास मद्रास राज्यातून काढून टाकता येत नाही तर मग महाराष्ट्रातच मुंबई रहायला एवढे आकांडतांडव का? प्रत्येक महाराष्ट्रीय हाच प्रश्न विचारत आहे. या प्रश्नाला माझ्याकडे तरी काही उत्तर नाही. मात्र या समस्येमुळे एक शंका मनात उद्भवते ती ही की, महाराष्ट्रीय राज्य करण्यास असमर्थ आहोत असे कॉंग्रेस श्रेष्ठींना वाटत असावे. मराठी बाण्याचा हा अपमान आहे. आणि हा अपमान हे कधीही सहन करणार नाहीत.

महाराष्ट्रीयेतरांच्या भांडवलावर मुंबई शहर उभारले गले असे म्हटले जाते. असेलही कदाचित! परंतु मद्रास हे काय मद्रासी भांडवलाने बांधले गेले आहे? आणि निव्वळ बंगाली भांडवलावर कलकत्ता निर्माण झाले? युरोपियन देशांचे भांडवल येथे गुंतवले गेले नसते तर ही शहरे स्मशानावत् राहिली असती. पण जेव्हा महाराष्ट्रीय मुंबईवर हक्क सांगतात तेव्हा हा भांडवलशाही युक्तीवाद पुढे का केला जातो? मुंबई शहरासाठी जर महाराष्ट्रीयांनी श्रम केले नसते मुंबई वैभवशाली दिसली नसती. मुंबईची नाडी महाराष्ट्रात आहे हे लक्षात ठेवले पाहिजे. मुंबईस लागणारी वीज महाराष्ट्रातून निर्माण होते. पाण्याचा पुरवठाही महाराष्ट्रातून होतो. उद्योगधंद्यासाठी कामगारांचा पुरवठा महाराष्ट्र करतो. महाराष्ट्राच्या मनात आले तर मुंबई शहराचे मोहेंजोदारो उर्फ मृतनगरी व्हायला क्षणाचाही विलंब लागणार नाही.

Friday, December 4, 2009

लोकप्रभे मधील अबू आझमी वर लिहिलेला लेख

मित्रानो, सादर करीत आहे मला एक आवडलेला लोकप्रभे मधील लिहिलेला लेख। फुल्या फुल्या डॉट कॉम च्या सदरामधे आलेला हा लेख ह्या पत्त्यावर देखिल वाचता येइल http://www.loksatta.com/lokprabha/20091127/fulya.htm

हा लेख लोकप्रभा ह्या अंकातून घेतला आहे (दिनांक २७/११/२००९)


राष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा आपल्या देशात रिवाज आहे। त्यात मरहट्टय़ांची बोली याने की मराठी ही एक भंकस बोली आहे। आजतलक ती बोली शिकून घेण्याची काही वजह नव्हती. काय गरज पडते? लेकिन चुनून आल्यानंतर ती बोली मी शिकून घेईन असे तुम्ही जाहीर केले होते.
जनाबेआलम अबु असीम आजमी यांस कृतानेक कुर्निसात.दोन ब दोन हप्त्यांपूर्वी आपल्याशी महाराष्ट्राच्या भर विधानसभेत काही मराठी नतद्रष्टांनी बदसलुकी केली, त्याबद्दल मुआफी मागण्यासाठी हे खत आपल्याला दरोबस्त रवाना करीत आहोत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावाच्या मरगट्टय़ा काफरांच्या एका पक्षाने आपल्याशी असे वागायला नको होते. नको होते! नको होते!!हा वाकई जुलुम झाला. भर सभागृहात ‘फाऽऽड’ असा आवाज घुमला आणि महाराष्ट्राचा नक्शा आपल्या गाल-ए-आजमवर उमटला, असे अखबारवाले आणि खबरवाले यांनी जाहीर करून टाकले. राष्ट्रभाषेचा मुखभंग

झाल्याची आवई आपल्या समाजवादी पार्टीचे मुल्लायम सिंग यांनी उठवली. हे सरासर झूठ आहे. आम्ही खुदबखुद दोनशे तीस वेळा तोच नजारा वेगवेगळ्या च्यानलांवर पाहिला. वेगवेगळ्या कोनातून पाहिला. कधी खडे होऊन पाहिला. कधी कूदकर पाहिला. कधी गडबडा लोळत पाहिला. कधी खटियावर लेटून पाहिला. कधी पेट धरधरुन पाहिला. कधी कधी तर आंखे मिटूनदेखील पाहिला. पण या सगळय़ा नजाऱ्यांमध्ये आम्हाला ‘फाऽऽड’ असा आवाज काही ऐकू आला नाही. आमचे कान कमालीचे तेजतर्रार आणि गध्यासारखे लंबेदेखील आहेत. कुठे खाटखुट झाले तरी बराबर ऐकू येते. तरीही आम्ही तो आवाज सुनण्यात कमी पडलो, हे मात्र खरे आहे. शायद असेही घडले असेल, की कुणी तुमच्या कानफटात मारलीच नसेल, आणि नुसतीच आवई उठवली असेल!.. खुदा खर करे आजमीसाहब, आपके कान और कान के नीचे का मैदान हमेशा सलामत रहे! पण इथेच आपल्याला होशियार राहण्याची गरज आहे. ही मराठी माणसे न केलेल्या कामगिरीचे श्रेय उपटण्यात माहीर आहेत, हे आपण ध्यानात ठेवावे. न मारलेल्या कानफटीच्या जोरावर ही मंडळी सॉलीड टीआरपी मिळवतात, आजमीसाहेब. सारा प्रसंग आमच्या नजर-ए-नाचीजसमोर तरळतो आहे.. आपण आपली तश्रीफ उचललीत आणि आस्ते कदम निघालात, जसा जंगलात शेर आपल्या गुहेकडे जातो. जसा आलमगीर आपल्या तख्ताकडे जातो. जसा र्टेबाज मुर्गा आपल्या आवडत्या मुर्गीच्या खुराडय़ाकडे तुरा वळवतो.. इर्दगिर्द बाकडय़ांवर बसलेल्या नामुरादांचे नाकुर्निसात स्वीकारल्यासारखे करत तुमची सफेदपोश मूरत जणू ‘सिटीवॉक’ करीत जात होती. तो नजारा पाहून आमच्यासारख्या हितचिंतकांची, सच सच सांगतो, नींद उड गई! आजमीसाहब, या काफरांच्या मुंबईत राहून, त्यांच्या नाकावर टिच्चून टगेगिरी करणे, सगळ्यांनाच जमते असे नाही. आपण तर इथे येऊन थेट शिवसेनेच्या वाघावरच असे काही डरकाळलात, की बस. मरहट्टय़ांच्या मुलखात येऊन बेदर्कार सियासती मामल्यात त्यांचा सफाया करणे, बाकायदा पोलिटिकल पार्टी चालवणे, ही सीधीसाधी चीज नाही.नुकतीच तुम्ही चुनावमधली जीत हासिल केली होतीत. एका नाही तर दोन ठिकाणी तुम्ही चुनून आलात. (चुनचुन के बदला लूंगा.. असा डायलॉग पिच्चरमध्ये आपण ऐकत आलो, त्यापैकीच तर हे चुनून येणे नाही ना?) महाराष्ट्राच्या विधानसभेत राष्ट्रभाषा, याने की हिंदुस्थानी जबानमध्येच कसम खाण्याची आपण कसम खाल्ली होतीत. त्याप्रमाणे आपण कसम खाण्यास सुरुवात केलीत, आणि एक दढियल काफिर उटला. प्रथम आम्हाला वाटले की कुणी मौलवीच आपल्याला कसम देण्यासाठी बोलावण्यात आला आहे. पण त्या दढियल इसमाने तुमच्यासमोरचे मेज-ए-कसम याने की पोडियम उभ्याचे आडवे केले. तेव्हा मोठय़ा मनाने तुम्ही ते पोडियम हलकेच ढकलून त्याला दयाळू मनाने मदद केलीत, हेदेखील आमच्या नजरेतून सुटले नाही! आपला दिल दरिया आणि गाल समुंदर आहे जनाब आजमीसाहेब! (हा मुहावरा थोडा वेगळा आहे, पण इथे आम्ही तो वेगळा इस्तेमाल करत आहोत !) त्यानंतर आपल्याला मनसेच्या गनिमांनी घेराव केला. बहुत गुस्ताख घोषणाबाजी केली. ललकाऱ्या दिल्या. पण आपण शेरदिल आहात. त्या साऱ्या दमबाजीला आपण धीराने तोंड दिले. पण ‘तोंड दिले’ म्हणजे अक्षरश: तोंड द्यायचे का आजमीसाहेब? मुलुंड नावाच्या एका बेकार उपनगरातून चुनून आलेल्या शिशिर शिंदे, राम कदम, वगैरे काफरांनी आपल्याशी हुज्जत घातली, तेव्हा ते कोणत्या जुबानमध्ये बोलत होते? ‘ऐसा नै चलेगा, आपनेको मराठीमेच शप्पत लेना पडेंगा बोलेगा तो पडेंगाच..’ अशा भयानक बम्बैय्या हिंदीत आपल्याशी कोणी बोलले का? आजमीसाहेब, इतकी वर्षे हे मरगट्टे मुंबईत राहाताहेत, पण हिंदीच्या यांच्याइतक्या चिंध्या कोणी केल्या नसतील. काहीही करा, यांना हिंदी जबान येत नाही, म्हणजे नाहीच. इस मुंबईमें सब के लिए जगह है, सिवाय हिंदी के! आपल्या उत्तर भारतातून येणारे आणि आलेले बांधव (त्यांना भय्या म्हणतात!) तेदेखील मराठी शिकून घेतात, पण यांना कोणी समझावे? या मनसेच्या लोकांना तर जमूरियत कशाशी खातात हेसुद्धा ठाऊक नाही. हेच शिशिर शिंदे मागे एकदा आम्हाला जमूरियतचा अर्थ विचारत होते. जमूरियत हे एक बादशहा कोल्ड्रिंकमध्ये मिळणारे फालुदासारखे पेय आहे, अशी त्यांची धारणा होती. आम्ही त्यांना त्याचा अर्थ सांगितला. बहुत साल पहले एका फादरच्या कानाखाली या शिंदेसाहेबांनी करकरीत ओढली होती. क्रिकेटच्या पिचवर क्रूड ऑइल ओतण्याचा कल्पक प्रकार यांनी केला होता. त्यांनी तुमची गचांडी धरली, यात नवल ते काय? राम कदम, वसंत गिते, रमेश वांजळे यांचीही थोडय़ाफार फरकाने हीच ष्टोरी आहे, साहेब! गाल दिसला की फाऽऽड आणि काच दिसली की खऽऽळ्ळ्ळ्!!कुलाब्याला तुमचे ‘सिटीवॉक’ नावाचे चपलाबुटांचे दुकान आहे. तेथील जोडा चांगला टिकाऊ आणि टणक आहे. ‘तिथून घ्या, मी सांगून ठेवतो, चाळीस टक्के सहुलियत मिळेल,’ असे आपण भर सभागृहात मोठय़ा मनाने यांना सांगत होता, ते प्रत्यक्ष आम्ही पाहिले. पण यांनी त्याचा अर्थ काय काढावा? आजमीने आम्हाला जोडा दाखवला, म्हणून आम्ही पेटून उठलो आणिनंतर पुढचा प्रकार घडला, असे हे सांगू लागले. हे त्यांना शोभते का! वस्तुत: तुम्ही त्यांना जोडे दाखवून मोठी दोस्ती निभावत होता, पण यांनी पराचा कौव्वा केला. आजमीसाहेब, झूट बोले, कौव्वा काटे!राष्ट्रभाषा यानेकी हिंदुस्थानी बोलीत कसम खाण्याचा आपल्या देशात रिवाज आहे. त्यात मरहट्टय़ांची बोली याने की मराठी ही एक भंकस बोली आहे. आजतलक ती बोली शिकून घेण्याची काही वजह नव्हती. काय गरज पडते? लेकिन चुनून आल्यानंतर ती बोली मी शिकून घेईन असे तुम्ही जाहीर केले होते. आता खरे तर तुमचा एवढा शब्द पुरेसा होता. ज्या बोलीशी आपला काडीचा रिश्ता नाही, ठेवण्याची मनशा नाही, ती बोली केवळ अवामसाठी शिकून घेण्याची तयारी तुम्ही दाखवलीत, यातच सारे आले! पण या नामुरादांना त्याचे काय?लेकिन आजमीसाहब, संभालके रहना. आपल्याकडे ईदला महागामोलाचा बकरा हलाल करायचा रिवाज आहे. कुणी अमीरजादा दोन पाच लाखांचा खुर्दा उधळून तो बकरा बादामपिश्त्यांचा खुराक देऊन पाळतो आणि शेवटी त्या बकऱ्याला हलाल व्हावे लागते आणि सागुती बनून तो घराघरात वाटला जातो. या मनसेवाल्यांनी तुमचा बकरा तर नाही ना केला? तुमचा बळी देऊन यांची ईद तर साजरी होणार नाही ना? हा सगळा त्या मरगट्टय़ांचा गनिमी कावा आहे. त्याची इत्तला देण्यासाठीच खरे तर आम्ही हे खत लिखण्यास प्रवृत्त झालो आहोत.आजमीसाहेब, ही मरगट्टी जात मोठी हरामी आहे. ऐसी झगडेल, उखडेल आणि बिगडेल कौम दुसरी कुठेही नसेल! स्वत: कामधाम करत नाहीत. दुसरा करू लागला, तर त्याच्याशी हुज्जत घालतात. त्यात हे मनसेवाले अभी अभी काही ज्यादाच बेमुर्वतपणा करू लागले आहेत. राज ठाकरे नावाचा एक बहुत गुस्ताख लडम्का त्यांचा मुखिया आहे, आणि त्याला मदरशात दुरुस्त बर्ताव कसा करतात याची तालीम मिळालेली नाही. त्याच्या छावणीतल्या काही पुंडांनी हा बनाव घडवून आणला असावा, असा शक आमच्या मनी येतो. कानफटात खाल्ल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावतो. कानफटात काय कोणीही खाते. खरे सांगायचे तर दोन्ही हात गालांवर ठेवूनच आम्ही आमचे बचपन गुजरले. कोण कधी वाजवेल काय भरोसा? जवानीत दोनचारदा लेडीज सँडल खाता खाताबचलो. आजमीसाहब, कानफटात खाल्ल्याचे दु:ख नसते, कानफटात खाताना कुणीतरी बघणे असह्य वाटते. सच बोलतो की झूट ते तुम्हीच सांगा! त्या राम कदम नावाच्या नाचीज इसमाने तुमच्या खूबसूरत मुखडय़ावरून आपला राकट तळहात घुमवला, तेव्हा आसपास केवढी भीड होती. टीव्हीवाल्यांचे भोचक कॅमेरेदेख़ील होते. रोना इसी बात का आता है. गुपचूप गल्लीत हात धुऊन घेतले तर फार इज्जतचा फालुदा होत नाही. पण अशी जाहीर रिअॅलिटी शोसारखी वाजवणे, फारच कमीनापन आहे. पण आजमीसाहब, तुम्हालाही हेच हवे होते ना! राज ठाकरेने मराठीत शपथ घेण्याचा इशारा दिला तेव्हाच तुम्ही हिंदी जबानमध्ये कसम खाण्याचा इरादा जाहीर केला होतात. यावर बव्हाल होणार हे तर साऱ्यांनाचा मालूम होते. कारण मुद्दा मराठी शपथ की हिंदी हा कधी नव्हताच! कारण मराठीत कसम खाल्ली काय आणि हिंदुस्थानी बोलीत खाल्ली काय, की फर्क पैंदा? मराठीत कसम खाणारे ती पाळतात, आणि हिंदीत ईश्वर को साक्षी रखकर शपथ लेता हूं म्हणणारे झूटे असतात, असे थोडीच आहे!गंमत म्हणजे आजमीसाहब, ही कसम अशी आहे की ती कोणीच कधीही पाळत नाही. असल्या कसमा खाऊन उटपटांग धंदे करणारे सियासती चूहे आम्ही पाहिले नाहीत का? असल्या कसमा या फक्त रिवाज असतो. इसीलिए मराठीवालेही नाही, हिंदी वा संस्कृत वा अंग्रेजीवालेही बेधडक ही कसम खाऊन टाकतात. लेकिन आप का इरादा अलग था. मनसेवाल्यांना ललकारने के वास्ते आपण ही कसम हिंदीत खाल्लीत. त्याचा सभागृहाशी इमानदार राहण्याशी काहीही संबंध नव्हता. खास बात तो ये है साहब, की तुमचा इरादा आणि त्यांचा इरादा सगळय़ांना मालूम होता. अगदी अवाम म्हणजे पब्लिकलासुद्धा! तरीही हा मसला झाला. मनसेचे चार आमदार चार साल के लिए बाहर हो गए. आपल्याला मुलायम सिंग यादव यांनी शाब्बाशी दिली. लालू प्रसाद यादवांनी पाठ थोपटली. आपला सत्कार होणार असेही ऐकतो आहोत. बधाई हो! राष्ट्रभाषेसाठी एक काय शंभर कानफटात खायची तुमची तय्यारी असेल, याबद्दल आमच्या मनात बिलकुल शंका नाही. हा महात्मा गांधींचा देश आहे. कुणी एका गालावर मारली, तर दुसरा गाल पुढे करावा, असे संस्कार आहेत इथे. पण आजमीसाहब, आता जमाना बदलला आहे. दोन्ही गाल पुढे करायची वेळ फक्त आरशासमोर सलूनमध्ये येते. अगले टाइम काळजी घ्या.आजमीसाहब, आपल्याला मराठी बोलता येत नाही, लेकिन तुम्ही या बोलीची इज्जत करता. ती तुम्ही आता शिकूनदेखील घेणार आहात. पण मनसेवाल्यांना हे कधी कळणार नाही. मराठीत न बोलूनच तुम्ही मराठीचा सन्मान केला आहे, हे समझून घेण्याची कुवत त्यांच्यात नाही. अन्य कुणात असेल असे वाटत नाही....अमृताते पैजा जिंकणारी मराठी भाषा आखिर पैजारांच्या भाषेवर आली, याचे मात्र दु:ख जरूर आहे. त्याला निमित्त तुम्ही ठरलात इतकेच. आजमीसाहब आपल्या गालावर सूज असेल, पण आमच्या गालावर आसू आहेत.. कसम से!

Thursday, December 3, 2009

लढाई जिंकली; युद्धाचं काय?

मित्रानो, महाराष्ट्र टाइम्स मधे प्रकाश अकोलकारांचा एक चांगला लेख आला आहे वाचून कसा वाटला ते सांगा ?

मुंबई महापालिकेत बहुमत असताना महापौर पदावर जर शिवसेनेची नगरसेविका निवडून आली तर त्यात एवढं आनंदित व्हायला काय झालं? कळत नाही ? तुमचं काय मत आहे?


3 Dec 2009, 0425 hrs IST

म. टा.

प्रकाश अकोलकर

महापौरपदाची लढाई शिवसेने जिंकली खरी; पण पुढचे युद्ध हे अधिक घमासान असणार। त्यामुळेच गेले काही दिवस पॅव्हेलियनमध्ये असलेल्या बाळासाहेबांनी पुन्हा पॅड्स बांधून मैदानात उतरायचं ठरवलं असेल का?

मुंबई महानगरीचे महापौरपद हासील करून शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतरची एक प्रतिष्ठेची लढत जिंकली आहे। महापौरपदी शिवसेनेच्या श्रद्धा जाधव निवडून येत असल्याची चिन्हे दिसू लागताच, बोरीबंदर येथील महापालिका मुख्यालयाच्या परिसरात शिवसैनिकांनी जो काही जल्लोष सुरू केला, त्यास तोड नव्हती! त्याचे कारणही स्वाभाविक होते. दोनच महिन्यांपूवीर् पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत 'आता सत्ता आलीच!' असे वातावरण शिवसेनेने उभे केले होते. शिवसेना हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येईल आणि युतीची सत्ता येईल, असा अर्थ त्यात अनुस्युत होता. मतमोजणीच्या पूर्वसंध्येला तर म्हणे शिवसेनेत मंत्रिमंडळाची यादी करण्याचे काम सुरू होते. आत्मविश्वास इतक्या टोकाला गेला होता. प्रत्यक्षात शिवसेनेच्या पदरी फार मोठा पराभव आला. शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली आणि आमदारही जेमतेम ४४ निवडून आले होतेे.

त्यापाठोपाठ मुंबईचे महापौरपदही हातातून गेले असते, तर संघटनेची पारच रया गेली असती। खांब आधीच कलथून गेला होता आणि अभेद्य, अभेद्य म्हणून डंका वाजवलेली भिंतही खचत चालली होती। त्या पार्श्वभूमीवर महापौरपदाची निवडणूक भलतीच प्रतिष्ठेची करण्यात आली होती. शिवाय, खचलेलं मन इतकं संशयग्रस्त झालं होतं की खरं म्हणजे विजय फारसा दुर्लभ नसतानाही नगरसेवकांना डांबून ठेवण्यापर्यंत मजल गेली होती. आपल्याच संघटनेतील कोणता नगरसेवक ऐनवेळी काय करेल, या भीतीपोटी पोटात गोळा आला होता. पण मुळात हात वर करून नव्हे तर चक्क हातात माईक घेऊन नाव सांगण्याची पद्धत मतदानाच्या वेळी अंमलात आली, तेव्हाच निकाल स्पष्ट झाला होता. शिवाय, समाजवादी पाटीर् आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही शिवसेनेला काँगेसला इतक्या उघडपणे मतदान करू शकणार नव्हतीच. तरीही आपल्याच कार्यर्कत्यांवर विश्वास उडून गेल्यामुळे कमालीची खबरदारी घेण्यात आली होती. त्याचे फळ पदरात पडलेही; पण त्यामुळेच आताही विश्वास ठेवावा की ठेवू नये असे वाटत असलेल्या कार्यर्कत्यांना सोबत घेऊन मोठे युद्ध लढायचे आहे. त्यात काय होणार, हा खरा प्रश्ान् आहे.

हे युद्ध आणखी अडीच वर्षांनी रंगणार आहे आणि त्याचे कुरुक्षेत्रही मुंबई हेच आहे। शिवसेनेसाठी राज्याच्या सत्तेपेक्षाही महत्त्वाची आणि अर्थपूर्ण असलेली मुंबई महापालिका हे या युद्धातील प्रमुख लक्ष्य असणार आहे. मुंबई महापालिकेची सत्ता गेली की शिवसेना कशी सैरभैर होऊन जाते, हे गेल्या चार दशकांत अनेकदा बघायला मिळालं आहे. १९७८च्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा पुरा खातमा झाला, तेव्हा तर दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच भर शिवाजी पार्कवर आपल्या पदाचा राजीनामा कसा देऊ केला, ते जुने निष्ठावंत अजूनही सांगतात. त्यामुळेच शिवसेनेचं आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे यांचंही राजकीय अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल, तर त्यासाठी मुंबई महापालिका नावाची सोन्याची कोंबडी हातातून जाता कामा नये, हे स्वत: बाळासाहेबही जाणून आहेत. दर पंधरा दिवसांनी शिवसेनाभवनात येऊन शिवसैनिकांशी संवाद साधण्याचा निर्णय त्यांनी त्यामुळेच तर घेतला नसेल ना?

पण ही लढाई सोपी नाही। लोकसभा निवडणुकीत मुंबईतली एकही जागा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांच्या युतीच्या हातात जाऊ नये, यासाठी 'मनसे'ने आखलेल्या राजकीय डावपेचांना १०० टक्के यश लाभलं आणि पाठोपाठच्या चार महिन्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईवर 'मनसे'चं अधिराज्य स्थापन झाल्याचं बघायला मिळालं. शिवसेनेपेक्षा 'मनसे'चे दोन का होईना अधिक आमदार निवडून आलेच; शिवाय सेनाभवनपासून टिळक ब्रिजमागेर् परळ, लालबाग, भायखळा, गिरगाव, वरळी, प्रभादेवी आणि परत सेनाभवन या हमखास हुकमी पट्ट्यात सेनेचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. शिवाय, 'मनसे'ला मुंबईत मतंही घसघशीत म्हणजे २३ टक्के मिळाली, तर शिवसेनेला मतदान झालं १८ टक्के. पण त्याहीपेक्षा आणखी एक तपशील हा सेनेच्या पोटात खरोखरच गोळा आणणारा आहे. मुंबईतील महापालिकेच्या थोड्याथोडक्या नव्हे तर ६८ मतदारसंघांत 'मनसे'नं आघाडी घेतली आहे.

खरं तर चित्र स्पष्ट आहे. महापौरपद कायम राखण्यात सेनेनं यश मिळवलं, तोच मुहूर्त साधून 'मनसे' अधिक आक्रमक झालीय. शिवाय, आपलं लक्ष्य आता शिवसेनेचे 'शेंबडे' आमदार असतील, हेही स्वत: राज यांनी आपल्या भाषणातून सांगून टाकलंय! आपला हाच बाणा 'मनसे'नं कायम राखला, तर पुढच्या दोन वर्षांनंतर 'मुंबई कोणाची?' हा प्रश्ान् खरं तर विचारायलाही लागू नये. महापौरपदाची एक लढाई जिंकली असली, तरी पुढचं युद्ध किती घमासान असणार आहे, त्याची चुणूक दाखवायला एवढा तपशील पुरेसा आहे. त्यामुळेच बाळासाहेबांनी वयाची ऐंशी ओलांडल्यावरही सेकंड इनिंग्जमधील फलंदाजीसाठी पुन्हा पॅड्स बांधले आहेत, हे सांगायचीही गरज नाही. मुळात राज यांच्या अतिआक्रमक बाण्याला आणि मुख्य म्हणजे त्यांच्या करिष्म्याला उद्धव तोंड देण्यास कमी पडत आहेत, हे लक्षात केव्हाच येऊन चुकलं होतं. त्यामुळेच विधानसभेच्या लढाईतच बाळासाहेब टीव्हीवरनं जास्तीतजास्त प्रमाणात बघायला मिळतील, यासाठी प्रयत्नांची शिकस्त करण्यात आली होती. बाळासाहेबांनीही होता होईल, तेवढी फटकेबाजी केलीच. पण त्यानं काम भागलं नाही. म्हणून आता बाळासाहेबांनीच टीव्हीवरून कॉमंेट्री करण्याऐवजी प्रत्यक्षात पॅड्स बांधून मैदानात उतरायचं ठरवलेलं दिसतंय. आता मधली काही वर्षं पॅड्स उतरवून पॅव्हेलियनमध्ये बसलेले बाळासाहेब या युद्धात काही अनोखे रंग कसे भरतात, ते बघायचं!

Wednesday, December 2, 2009

लोकल चे डबे वाढून म्हणे , गर्दी घटली

मित्रानो प्रहार मधे एक बातमी वाचली आणि मनात आले की ही बातमी तुमच्या बरोबर शेयर करायला हवी। ही बातमी ह्या पत्त्यावर देखिल मिळू शकेल http://epaper.prahaar.in/Details.aspx?id=16366&boxid=43217734

प्रहार मधली ही बातमी वाचली आणि हसू आलं, म्हणे ट्रेन मधील गर्दी कमी झाली। हा जावई शोध ज्यानी कोणी लावला असेल त्याला विरार च्या ट्रेन मधे सकाळच्या वेळेला विरार ते चर्चगेट प्रवास करायला लावला पाहिजे. तुमचे काय मत आहे?

माझ्या मते हे केन्द्र आणि राज्य सरकार मुंबई मधील जीवनाआवाश्यक गोष्टी कडे लक्षच देत नाही. अरे किती दिवस ही माणसे मेंढरासारखी गर्दीतून प्रवास करतील? आमच्या सहानशीलते ला देखी अन्त आहे की नाही? पुढच्या विधानसभेत दिसेलच मुंबई चा दणका. काय? खरं बोललो की नाही? तुम्हीच सांगा ?

ही बातमी प्रहार ह्या वृत्त पत्रातून घेतली आहे (दिनांक ०२/१२/२००९)


Tuesday, December 1, 2009

खासदारांच्या 'दांडी'मुळे लोकसभेचा तास रद्द!

मित्रानो बघा आपण निवडून दिलेले खासदार दिल्लीत काय काम करत आहेत। ह्या खासदारांची नाव कोणी जाहिर करू शकेल काय? ह्या दांडी बाज खासदारा ना परत बोलवायला नको का? तुमचे काय मत आहे?

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, December 01, 2009 AT 12:15 AM (IST)
Tags: natioal, new delhi, loksabha, mp, snn
नवी दिल्ली - जनतेचे प्रश्‍न मांडण्यासाठी संसदीय आयुध असलेला "प्रश्‍नोत्तराचा तास' अनेकदा गोंधळ घालून रद्द करण्याची मागणी होते. त्यामुळे "प्रश्‍नोत्तराच्या तासाच्या' अस्तित्वावरच प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र, आज प्रश्‍न विचारणाऱ्या बहुतांश खासदारांनीच दांडी मारल्यामुळे अवघ्या तीस मिनिटांतच हा तास आटोपता घेण्याची नामुष्की लोकसभेवर ओढवली. तब्बल अठरा वर्षांनी आज प्रश्‍नोत्तराचा तास स्थगित करावा लागला. तत्पूर्वी लोकसभेच्या अध्यक्षा मीराकुमार यांनी "प्रश्‍नोत्तर तासाची अवस्था शोचनीय आहे. यावर आधीच अनेक आघात झाले आहेत' असे सांगत "गोंधळी खासदारांना' शांत करण्याचा प्रयत्न केला होता. गैरहजर मंडळींत कॉंग्रेससह सर्वच प्रमुख पक्षांचे खासदार होते. त्या पार्श्‍वभूमीवर संसदीय कामकाजमंत्री पवनकुमार बन्सल यांनी "खासदारांनाच रस नसेल तर प्रश्‍नोत्तराचा तास रद्दच का करु नये', असा उद्विग्न सवाल केला. लोकसभेच्या कामकाजाची सुरवातच आज डाव्या पक्षाच्या खासदारांच्या गोंधळाने झाली. डाव्या खासदारांनी प्रश्‍नोत्तराचा तास रद्द करण्याची मागणी केली. त्यावर मीराकुमार यांनी "प्रश्‍नकाळाची दुरवस्था असून, यापूर्वीही त्यावर वारंवार आघात झाले आहेत. त्यामुळे तुम्ही शून्य काळात बोला. प्रश्‍नोत्तराचा तास सुरळीत चालू द्या', अशी विनंतीही केली. तरीही गोंधळ न थांबल्याने त्यांनी प्रश्‍न पुकारले. कार्यक्रमपत्रिकेवर असलेल्या प्रश्‍नांपैकी पहिला, दुसरा आणि चौथ्या प्रश्‍नावरच मंत्री उत्तर देऊ शकले. यातील दोन प्रश्‍न संरक्षण मंत्रालयाशी संबंधित असल्याने राज्यमंत्री पल्लम राजू यांनी, तर ग्रामविकास मंत्रालयाशी संबंधित प्रश्‍नाला केंद्रीय मंत्री सी. पी. जोशी यांनी उत्तर दिले. त्यानंतर मात्र मीराकुमार या प्रश्‍न क्रमांक व खासदारांची नावे आणि गैरहजर असल्याची घोषणा प्रश्‍नपुस्तिकेतील प्रश्‍न संपेपर्यंत होत राहिली. अखेर साडेअकराला सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. लोकसभेत तारांकित प्रश्‍नांच्या यादीत सुमारे वीस प्रश्‍न असतात. त्यासाठी मुख्य व पूरक प्रश्‍न विचारणाऱ्या दोन खासदारांची नावेही यादीत असतात. प्रत्यक्षात प्रश्‍नोत्तराच्या तासात पाच ते सातच प्रश्‍नांवर चर्चा होते. विचारणाऱ्या खासदारांचे प्रश्‍न, पुरवणी प्रश्‍न आणि त्यावर इतरही खासदारांचे बोलणे आणि मंत्र्यांचे उत्तर, यासाठी एका प्रश्‍नावर सरासरी सात ते दहा मिनिटे चर्चा होते. एखाद्या मुद्यावरून वाद निर्माण झाल्यास त्या प्रश्‍नाला लागणारा कालावधी कधी दहा ते बारा मिनिटांपर्यंत जातो. ज्यांचा प्रश्‍न सातव्या, आठव्या क्रमांकावर असेल, त्यांना अनेकदा बोलण्याची संधीच मिळत नाही. साहजिकच असे बरेचसे खासदार सभागृहात थांबण्याचे टाळतात. शिवाय, सुटीनंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवसावरही या खासदारांच्या दुर्लक्षाचा परिणाम दिसून येतो. लोकसभेला शुक्रवारी ईद तसेच शनिवारी आणि रविवारीही सुटी होती. लिबरहान आयोगावर उद्या (ता. 1)पासून चर्चा होणार असल्याने आज फारसे काहीही होणार नाही, अशा अपेक्षेने बऱ्याच खासदारांनी दांडी मारली. खासदारांच्या गैरहजेरीमुळे बन्सल यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, खासदारांनाच प्रश्‍न विचारण्यात आणि उपस्थित राहण्यात रस नसेल तर हा तास रद्द का केला जाऊ नये. या हक्काच्या तासात सदस्य सरकारकडून माहिती घेतात. या सर्व प्रक्रियेत करदात्यांचा पैसा खर्च होतो. त्यामुळे या प्रश्‍नावर गांभीर्याने तोडगा शोधणे गरजेचे आहे. सदस्यांकडून प्रश्‍नोत्तराचा तास रद्द करण्याच्या वारंवार होणाऱ्या मागणीवरही नाराजी व्यक्त करताना बन्सल यांनी "रोज कोणीतरी हा तास रद्द करण्याची मागणी करतो. यात माहिती घेण्याऐवजी सदस्यांचे तास बंद कसा करता येईल, याकडेच अधिक लक्ष असल्याचे आढळले आहे''. खासदारांच्या दांड्यांमुळे लोकसभेत यापूर्वी स्थगित झालेला प्रश्‍नोत्तराचा तास -1) 1883 ---- दोनवेळा 2) 1985 ---- पाचवेळा 3) 1988 ---- तीनवेळा4) 1989 ---- दोनवेळा 5) 1991 ---- एकवेळ32 खासदार गैरहजरप्रश्‍न विचारून गैरहजर राहणारे 32 खासदार होते. त्यात महाराष्ट्रातील खासदारांचाही समावेश होता.त्यांची नावे अशी संजय धोत्रे (भाजप), एकनाथ गायकवाड (कॉंग्रेस), आनंदराव अडसूळ ,भाऊसाहेब वाकचौरे, शिवाजीराव अढळराव पाटील (सर्व शिवसेना)

Monday, November 30, 2009

महाराष्ट्र गीत

मित्रहो सदर करीत आहे महाराष्ट्र गीत
हे गीत एकतानां अंगावर काटा उभा राहतो की नाही? तुमचे काय मत आहे?


जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...

भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्‍या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा

काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा

Sunday, November 29, 2009

निकृष्ट तूरडाळीच्या वाटपाविरोधात मनसेची गोदामावर धडक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, November 28, 2009 AT 11:45 PM (IST)

कल्याण - कल्याण परिसरातील शिधावाटप केंद्रातून निकृष्ट दर्जाच्या तूरडाळीचे वितरण केल्याच्या तक्रारी कल्याण (प.) मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांच्याकडे आल्या होत्या. आज सकाळी मनसे आमदार भोईर यांनी कल्याण आधारवाडी येथील फूड कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या अन्नधान्याच्या गोदामावर धडक देऊन तूरडाळीची पाहणी केली. त्यातून निकृष्ट तूरडाळ पुरविण्यात येत असल्याचे उघड झाले. आमदारांच्या पाहणी मोहिमेची पुरवठा उपसंचालकांना दखल घ्यावी लागली. कल्याण परिसरातील शिधावाटपाच्या दुकानात तूरडाळीचे वाटप केले जाते. एक किलोसाठी ५५ रुपये मोजावे लागतात. साखर घेतल्याशिवाय तूरडाळ दिली जाणार नाही, अशी सक्ती केली जाते. शिधावाटप दुकानातून दिली जाणारी तूरडाळ निकृष्ट दर्जाची असल्याच्या तक्रारी आमदार भोईर यांच्याकडे आल्या होत्या. डाळीचा पुरवठा नेमका कोठून केला जातो, याची माहिती घेऊन आमदारांनी आधारवाडी येथील फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया अन्नपुरवठा गोदामास मनसेच्या कार्यकर्त्यांसह धडक दिली. या वेळी गोदाम निरीक्षकाने गोदाम पाहण्यास मज्जाव केला. भोईर यांनी शिधावाटप अधिकारी सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्या वेळी आमदारांना तूरडाळीचा दर्जा पाहण्याचा अधिकार असल्याचे सावंत यांनी सांगितले. आमदारांनी तूरडाळीची पाहणी केल्यावर ती निकृष्ट दर्जाची आढळले. हा प्रकार सुरू असताना पुरवठा उप-संचालक घटनास्थळी पोहचले. त्यांनी अनेक गोण्यातील तूरडाळ आमदारांनी दाखविली. काही गोण्यांत चांगली; तर काहींमध्ये निकृष्ट दर्जाची तूरडाळ आढळली. गोदामात १६ गोण्या तूरडाळ शिल्लक आहे. पाच गाड्या गेल्यावर केवळ तीन गाड्यांची नोंद केली जाते, असा आरोप आमदार भोईर यांनी केला. तूरडाळीचा पुरवठा हा सरकारी कंत्राटदाराकडून केला जातो. चांगली डाळच वितरित केली जाईल. निकृष्ट दर्जाची वितरित केलेली डाळ परत घेतली जाईल, असे आश्‍वासन अधिकाऱ्यांनी दिले. मात्र यात सुधारणा दिसून आली नाही, तर सरकारी गोदामे फोडण्याचे आंदोलन करण्याचा इशाराही भोईर यांनी दिला आहे.

Friday, November 27, 2009

'२६/११'च्या आठवणीने गहिवरली

मुंबई

26 Nov 2009, 1554 hrs IST

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबईकरांच्या मनात ' २६ / ११ ' च्या काळ्याकुट्ट आठवणींनी घर केलंय... दहशतवादी हल्ल्यातील १६६ बळींच्या आठवणीने मुंबईकरांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या... शहीदांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मेणबत्ती पेटवताना गहिवरून आले ... परंतु मुंबईचं आणि मुंबईकरांचं स्पिरीट कायम असल्याचा प्रत्यय आज पावलापावलावर दिसला। २६ / ११ च्या आठवणींनी गहिवरलेली मुंबई त्याच निमित्ताने एकवटल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. २६ नोव्हेंबर २००८ च्या काळरात्री दहशतवादी हल्ल्याने हादरलेल्या मुंबईच्या काळजाचा ठोका चुकला... पण काही मिनिटांसाठीच ! तीन-चार तासातच मायानगरी मुंबई पुन्हा धावू लागली... घड्याळाच्या काट्यासारखी ! आज त्या दहशतवादी हल्ल्याला एक वर्ष पूर्ण होतेय. या हल्ल्यात बळी पडलेल्या १६६ मुंबईकरांना आदरांजली वाहण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर उतरले. ‘ हिंसाचार संपवा, कसाबला फाशी द्या॥ ’ असे फलक त्यांनी हातात धरले होते. दहशतवादाच्या निषेधार्थ आज एनसीपीए ते गिरगाव चौपाटी अशी परेड मुंबई पोलिसांनी काढली. पोलिस कमांडो, फोर्स वनचे कमांडो, त्यांची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, आधुनिक संपर्क यंत्रणांनी सुसज्ज वाहने अशी मुंबई पोलिसांची सज्जता या परेडमध्ये पाहायला मिळाली. दहशतवादाशी दोन हात करण्यास मुंबई सज्ज असल्याचा थेट उलटा मेसेज यानिमित्ताने दहशतवाद्यांना पाठवण्यात आला. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्टेशनमध्ये हजारो मध्य रेल्वे प्रवाशांनी २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यात बळी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. त्यांची आठवण म्हणून मध्य रेल्वेने स्मृती स्तंभच उभारला आहे. सेंट झेवियर्स कॉलेजच्या ज्या गल्लीत हेमंत करकरे, अशोक कामटे व विजय साळस्कर यांना वीरमरण आले, त्याठिकाणी अनेक मुंबईकरांनी मेणबत्त्या पेटवून व पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली. मनसेच्या वतीने याठिकाणी शहीद पोलिसांचे कटआऊटस लावण्यात आले आहेत. त्याशिवाय काँग्रेसच्या वतीने शहीदांना श्रद्धांजली वाहणारे बॅनर्सही उभारण्यात आले आहेत. हॉटेल ताज, हॉटेल ट्रायडंट व नरिमन हाऊस या दहशतवादी हल्ल्यांच्या ठिकाणीही अनेकांनी भेटी देऊन बळींच्या आठवणींना श्रद्धांजली वाहिली. संसदेच्या दोन्ही सभागृहात तसेच कानपूर येथे सुरू असलेल्या भारत-श्रीलंका टेस्ट सामन्याचा खेळ सुरू होण्यापूर्वी २६ नोव्हेंबर हल्ल्यातील बळींना आदरांजली अर्पण करण्यात आली.

Thursday, November 26, 2009

वेडात मराठे वीर दौडले सात


म्यानातून उसळे तलवारीची पात
वेडात मराठे वीर दौडले सात

ते फिरता बाजूस डोळे, किंचित ओले
सरदार सहा सरसावुनि उठले शेले
रिकबीत टाकले पाय, झेलले भाले
उसळले धुळीचे मेघ सात निमिषात

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना
अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना
छावणीत शिरले थेट भेट गनिमांना
कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

खालून आग, वर आग, आग बाजूंनी
समशेर उसळली सहस्त्र क्रुर इमानी
गदीर्त लोपले सात जीव ते मानी
खग सात जळाले अभिमानी वणव्यात

दगडावर दिसतील अजूनि तेथल्या टाचा
ओढयात तरंगे अजूनि रंग रक्ताचा
क्षितिजावर उठतो अजूनि मेघ मातीचा
अद्याप विराणी कुणी वार्‍यावर गात

कुसुमाग्रज

इंग्रजी भाषेत शिक्षण घेणं गैर आहे काय?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जेव्हापासून मराठी साठी आंदोलन छेड्ले आहे तेव्हापासून त्यांचे विरोधक हा मुद्दा नेहमीच पुढे आणतात की मनसे कार्यकर्त्यांचे मुले ही इंग्रजी माध्यमात शिकतात तर त्यानीं मराठीचा आग्रहा धरणे कितपत योग्या आहे?

सर्वप्रथम मी हे नमूद करू ईच्छितो की मनसे चा कुठल्याही भाषेला विरोध नाही तर मराठी भाषेसाठी आग्रहा आहे। इंग्रजी ही जगात सर्वत्र वापरली जाणारी भाषा आहे आणि त्यावर आपण प्रभुत्व मिळवणे ही काळाची गरज आहे। आपल्याला जर जागतिक बाजारपेठेत वर्चस्व गाजवायच असेल तर इंग्रजी भाषा येण अत्यंत गरजेच आहे. माझ्या मते तुम्ही कुठल्या भाषेत शिक्षण घेता ते महत्वाचा नाही तर तुमची तुमच्या मातृ भाषे बद्दल असलेली तळमळ किवा आवड महत्वाची आहे. आमच्या घरात आम्ही जर आमच्या मुलांवर चांगले संस्कार केले तर त्यानीं कुठल्या भाषेत शिक्षण घेत्ल ते महत्वाचे नाही.

हा मुद्दा अयोग्य आहे आणि त्याला काही अर्थ नाही. तुमचे काय मत आहे?

Sunday, November 22, 2009

हल्ला आणि पराभव

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
22 Nov 2009, 0148 hrs IST
आयबीएनवरचा हल्ला हे शिवसेनेचं निव्वळ फ्रस्ट्रेशन आहे. राडेबाजी करून आपला गमावलेला केडर बेस गोळा करण्याचा हा प्रयत्न आहे. पण हा तितकाच वेगळ्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा पराभवही आहे. ................. सचिन परब

ऐन रणांगणात रथाचं चाक जमिनीत गेलेल्या कर्णाचं वर्णन 'हसवणूक'मधल्या एका लेखात करताना पुलंना हायवेवर गाडी पंक्चर झालेला ड्रायव्हर आठवला होता. आता पुलं असते तर त्यांना नक्कीच उद्धव ठाकरे आठवले असते. मोठ्या जोशात पाच वर्षं उंच झंेडा ठेवून दौडत आणलेल्या त्यांच्या रथाचं चाक ऐन निवडणुकीत जमिनीत जातंच जातं. गेल्या दोन विधानसभांच्या निवडणुकांत ते घडलंय. या विधानसभेला तर त्यांची धाव जोरदारच होती. उत्तम स्ट्रॅटेजी होती. प्रश्न घेऊन मैदानात उतरले होते. सरकारविरोधी असंतोष त्यांच्याकडे जमा होतोय असं वाटत होतं. लोकसभेत त्याची चुणूक दाखवूनही दिली होती. मैदानातला प्रचार चांगला होताच. इनकमिंग सुरू होतं. बाळासाहेबांची मुलाखत गाजत होती. पण युती आणि तिकिटवाटपावरून मिठाचा खडा पडला. त्याचवेळी राज ठाकरंेनी उसळी मारली. अचानक पहिल्या नंबरचा पक्ष बनण्याची इच्छा बाळगणारा हा पक्ष बावचळला. निकालाच्या सकाळपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या गोतावळ्यांना युतीची सत्ता येईल, याची खात्री होती. पण गलितगात्र भाजपपेक्षाही कमी जागा मिळाल्या. मुंबईतली दाणादाण अपेक्षितच होती. पण बाकीच्या महाराष्ट्रातही सुपडा साफ झाला. मुंबई-नाशिक पट्ट्यात मनसेने पाडलेल्या सीट जरी जिंकून आल्या असत्या तरी सत्ता येण्याची सुतराम शक्यता नव्हती. उद्धव यांच्यासाठी तो खूप मोठा धक्का होता. कालपरवापर्यंत विदर्भ मराठवाड्यात झालेल्या लाखांच्या सभांना अर्थ उरला नव्हता. शिवसंवादात हाकेला ओ देणाऱ्या शेतकऱ्यांनीच त्यांना उघडं पाडलं होतं. असं असलं तरीही या सगळ्यावरची त्यांची प्रतिक्रिया निव्वळ अगम्य होती. उघड मैदानात येऊन पराभव मान्य करण्यापेक्षा ते तांेड लपवत राहिले. पत्रकार परिषदेत फक्त गांेधळ आणि फ्रस्ट्रेशनच दिसलं. त्यात मराठी माणसाला दोष देण्याचा मूर्खपणा केला. निकालांमधल्या पॉझिटिव्ह गोष्टी शोधून नव्या लढ्याचं रणशिंग फुंकण्याची ती वेळ होती. पण राज यांच्या जयजयकाराने हिरमुसल्या 'मातोश्री'मध्ये काळोखातला प्रकाश पकडण्याची हिंमतच राहिली नव्हती. प्रचाराच्या शेवटी बाळासाहेबांची सभा न घेण्याची हिंमत उद्धव ठाकरंेनी दाखवली होती. पण पराभवाने ते स्पिरिट कुठच्या कुठे हवेत उडून गेलं. निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही होडिर्ंग लावून मतदारांचे आभार मानण्याचा नवीन ट्रेण्ड आहे. तो आता उपचार उरला असला तरी त्यामागची मूळ भावना चांगली आहे. उद्धव आपल्या वागण्यातून असं होडिर्ंग कधी उभारणार? उद्धव यांचं नेतृत्व मान्य करून लाखो मतदारांनी ४४ आमदार निवडून दिले. त्यांच्या अपेक्षांना वाऱ्यावर सोडण्यात कोणता शहाणपणा आहे ? खरं तर मुंबई, ठाण्यातल्या शिवसैनिकांनी पेटून उठून चांगली फाइट दिली. लोकसभेपेक्षा सेनेचा परफॉर्मन्स नक्कीच उजवा होता. माहीम, भांडूप, मागाठाणे अशा उमेदवार चुकलेल्या ठिकाणी फज्जा उडणं स्वाभाविक होतं. पण शिवडीसारख्या मतदारसंघात बाळा नांदगावकरांना दगडू सकपाळांनी फोडलेला घाम खूप काही सांगणारा होता. तिथे काँग्रेसचा उमेदवार कमजोर होता म्हणून, नाहीतर वेगळा निकाल दिसला असता. अनेक मतदारसंघात लोकसभेतली आघाडीची वीस पंचवीस हजारांची लीड सेनेने दहा हजारांच्या आत आणली, हे शिवसैनिकांचं श्रेय आहे. अंधेरीत सुरेश शेट्टी किंवा अणुशक्तीनगरमध्ये नवाब मलिक अशा बलदंड उमेदवारांना लोकांची कामं करणाऱ्या नगरसेवकांनी घाबरवून सोडलं. त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप कोण देणार? आणि उद्धव राहतात त्या वांदे पूर्व मतदारसंघात तर बाळा सावंत यांनी झगझगीत प्रकाश दाखवून दिलाय. आणखी काय हवं? शेतकऱ्यांच्या जिवावर उद्धव ठाकरंेनी यल्गार केला खरा. पण त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्यातली प्रस्थापितांना साथ देण्याची मानसिकता समजून घेतली होती का? इथे आणखी मशागत करण्याची आता त्यांची तयारी आहे का? गेल्या निवडणुकीत शून्य रुपये वीजबिलं पाठवून शिंदे सरकारनं लोडशेडिंगच्या मुद्यातली हवा काढून घेतली होती. यावेळी पीकविमा, कर्जमाफी, कापूस एकाधिकारातली बाकी आणि नुकसानभरपाई देऊन शेतकऱ्यांमधला असंतोष दूर करायचा अशोक चव्हाणांचा प्लॅनही यशस्वी झाला. एका शेतकऱ्याच्या खात्यावर एका वर्षात लाख रुपये जमा झाल्याचेही विक्रम घडले. पण शिवसंवाद साधणाऱ्या सेनेकडे त्याला प्रत्युत्तर नव्हतं. सेनेच्या आंदोलनांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून दिली. पण त्याचं श्रेय त्यांना घेता आलं नाही. ते कर्जमाफीतल्या त्रुटी सांगत राहिले. त्याऐवजी शिवाजी पार्कवर सेनेचा मोठा मेळावा भरला असता, तर चित्र वेगळं झालं असतं. तेव्हाचं वातावरण असं होतं की शिवाजी पार्क सहज भरलं असतं. उद्धव ठाकरेही एकहाती पार्क गाजवू शकतात, हे सिद्ध झालं असतं. पण असं घडलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाने आता खडे फोडण्यात अर्थ नाही. शिवाय नेते अँटिएस्टॅब्लिशमेण्टचे नारे देणारे आणि उमेदवार तीन चार टर्मचे एस्टॅब्लिश आमदार, असा आंतविर्रोध अनेक ठिकाणी होताच. त्यामुळे गुलाबराव पाटील किंवा गावंडे कोमेजले त्यात आश्चर्य नव्हतंच. सेना नेतृत्वाची यातून काही शिकण्याची तयारी आहे का? हा प्रश्न आहे. उद्धव यांनी द्वेषाच्या आधारावरच्या हुकुमशाही पक्षाची पुनर्रचना नव्या जमान्याला अनुसरून करण्याचा प्रयत्न केला होता. शिवशक्ती-भीमशक्तीने प्रबोधनकारांच्या वारशाची आठवण करून दिली होती. 'मी मुंबईकर' तर सेनेसाठी क्रांतीच होती. शेतकऱ्यांसाठी मुंबई ठाण्यातल्या शिवसैनिकांना कामाला लावण्यात मिळवलेलं यश हेदेखील तितकंच महत्त्वाचं. राज्याची सत्ता मिळवण्यात मराठी अस्मिता आणि हिंदुत्व पुरत नाही, हे वारंवार सिद्ध झालेलं असताना मुद्दे घेऊन बेरजेचं राजकारण करण्याला पर्याय नाही. हा नवा मार्ग उद्धव ठाकरे यांची नवी शिवसेना घडवत होता. पण त्या मार्गावर उद्धव ठाकरे यांचा विश्वास उरलेला नाही. बाळासाहेबांच्या सावलीतून स्वत:वर विश्वास उरलेला नाही. त्याहीपेक्षा वाईट म्हणजे ज्या लोकांसाठी त्यांना काम करायचंय त्या लोकांवर आणि साहेबांसाठी राबणाऱ्या शिवसैनिकांवर त्यांचा विश्वास उरलेला नाही. आयबीएन लोकमतवर झालेल्या हल्ल्याचा अर्थ तेवढाच आहे.

रेल्वे परीक्षा मराठीतही

रेल्वे परीक्षा मराठीतही

22 Nov 2009, 0216 hrs IST

म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
महाराष्ट्रात, विशेत: मुंबईत सध्या 'मराठी विरुद्ध हिंदी' वाद उफाळून आला असतानाच रेल्वेमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी मुंबईत 'जय महाराष्ट्र-जय मुंबई'चे नारे देत राज्यातील भूमिपुत्रांना दिलासा देणारे निर्णय जाहीर केले. 'परप्रांतियांचे लोंढे' धडकू नयेत यासाठी रल्वे भरती परीक्षा देशभरात एकाच वेळी घेण्यात येणार असून महाराष्ट्रात ही परीक्षा मराठीतूनही होईल, असे बॅनजीर् यांनी जाहीर केले. 'तमाम मुंबईकरांना माझा नमस्कार...' अशीच भाषणाची सुरुवात करत बॅनजीर् यांनी मुंबई व मराठी भाषेवरील 'ममते'ची प्रचिती दिली. मुंबईवर शेरोशायरी करत आणि 'ऐ मेरे वतन के लोगो'च्या ओळी गात, २६/११च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची कुर्बानी वाया जाऊ देऊ नका, असे आवाहन ममतांनी केले आणि उपस्थित मुंबईकरांची मने जिंकून घेतली. रेल्वेमंत्री झाल्यावर ममता बॅनजीर् प्रथमच मुंबई दौऱ्यावर आल्या होत्या. यानिमित्ताने अंधेरीत आयोजित केलेल्या एका सोहळ्यात मुंबई-नागपूर दूरांतो एक्स्प्रेस, मुंबई-कारवार सुपरफास्ट एक्सप्रेस आणि पुणे-सोलापूर सुपरफास्ट इंटरसिटी एक्स्प्रेस या तीन नव्या गाड्या तसेच पंधरा डब्यांच्या लोकलला त्यांनी हिरवा कंदिल दाखवला। मराठीत सुरुवात करून नंतर हिंदीत बोलणाऱ्या ममता बॅनजीर्ंच्या भाषणात मुंबई, महाराष्ट्र आणि मराठी भाषेवरील प्रेमाचा सातत्याने उल्लेख येत होता। 'मुंबईतील सर्व प्रश्नांची आपल्याला कल्पना आहे। मराठी चांगले समजते पण बोलू शकत नाही। जय हिंद, जय महाराष्ट्रही बोलू शकते. त्यात कमीपणा नाही,' असे सांगत भाषणाचा समारोप त्यांनी खरोखरीच 'जय महाराष्ट्र-जय मुंबई' अशा अभिवादनाने केला. मुंबईवरील प्रेम व्यक्त करताना 'रोशनी चांद से होती है सितारो से नही... मोहब्बत मुंबई से होती है हजारो से नही' हा शेरही ऐकवला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, खासदार अनंत गीते, संजय निरूपम, आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, आमदार राजहंससिंह आदी उपस्थित होते. अनाउन्समेंट्स... *आथिर्क दुर्बल परीक्षाथीर्ंना पोस्टल ऑर्डर माफ *२६/११ हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ मुंबईत म्युझियम *म्युझियममध्ये लाइट अँड साऊंड शो *प. रेल्वेवर लोकलच्या ३५ जादा फेऱ्या *चर्चगेट-सीएसटी जमीनवरील किंवा भूमिगत रेल्वेमार्गाची चाचपणी *दिल्ली-मुंबई राजधानी एक्स्प्रेस अंधेरीतही थांबणार *रेल्वेच्या जागेत मुंबई, पुण्यात ऑटोमोबाइल हब

मुंबई शेअर बाजाराची आता मराठी वेबसाईट

सकाळ वृत्तसेवा
Sunday, November 22, 2009 AT 12:00 AM (IST)
Tags: mumbai, share market, website
मुंबई - मुंबई शेअर बाजाराची वेबसाईट आठ दिवसांत मराठी भाषेतही देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दिला. त्यानंतर शेअर बाजाराच्या संचालकांनी ही वेबसाईट 15 दिवसांत मराठीतून करण्याचे आश्‍वासन दिले आहे.मुंबई शेअर बाजारने नुकतीच आपली वेबसाईट लॉंच केली. ही वेबसाईट इंग्रजी, गुजराती व हिंदी भाषांमध्ये आहे. मात्र मराठी भाषेला डावलण्यात आले आहे. यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष अरविंद गावडे यांनी आज सेबीचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आशिषकुमार चौहान यांची भेट घेतली आणि आठ दिवसांत शेअर बाजाराची वेबसाईट मराठीतून सुरू करण्याची आग्रही मागणी केली. वेबसाईट मराठीत सुरू न केल्यास मनसे आपला हिसका दाखविल, असा इशारा गावडे यांनी चौहान यांनी दिला. त्यावर चौहान यांनी मनसेच्या शिष्टमंडळाचे निवेदन स्वीकारीत त्यांची मागणी मान्य केली. येत्या 15 दिवसांत वेबसाईट मराठीतून सुरू करण्याचे आश्‍वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा

हा माझा पहिलाच प्रयत्न आहे ब्लॉग निर्माण करायचा आणि त्यावर स्वताचे मत माडंण्याचा