Wednesday, January 27, 2010

हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही

म टा च्या सौजन्याने

26 Jan 2010, 0413 hrs IST
अहमदाबाद :

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, असा भारतातील बहुतांश लोकांचा समज असला, तरी घटनेत अथवा कोणत्याही सरकारी कागदपत्रांत हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उल्लेख नाही। हिंदी ही फक्त अधिकृत भाषा आहे, असे सांगत गुजरात हायकोर्टाने याबाबत दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

वस्तूंची किंमत, त्यात समाविष्ट असलेले घटक, उत्पादनाची तारीख हिंदीत छापणे राज्य सरकारने अनिवार्य करावे, यासाठी सुरेश कच्छाडिया यांनी गेल्या वषीर् हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती।

त्यावर निर्णय देताना न्यायाधीश एस। जे. मुखोपाध्याय आणि न्यायाधीश ए. एस. दवे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सरकारी कागदपत्रांत, वटहुकुमात अथवा घटनेत हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख नसल्याने उत्पादकांवर अशी सक्ती करता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.

भारतातील बहुतांश लोकांना हिंदी लिहिता-वाचता येत असल्याने वस्तूंवरील माहिती या भाषेत असावी, असे याचिकेत म्हटले होते। मात्र राज्य सरकारचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या मंडळाने वस्तूंचे वजन आणि मोजमाप यांबाबतीतील १९७७च्या कायद्याचा आधार घेतला.

या कायद्यानुसार ही माहिती देवनागरी किंवा इंग्रजीत असणे आवश्यक आहे। तसेच घटनेतील १७व्या भागात भारताच्या अधिकृत भाषांबाबत उल्लेख आहे. या ३४३व्या कलमानुसार देवनागरी लिपीतील हिंदी आणि इंग्रजी भारतात अधिकृत भाषा म्हणून ओळखल्या जातात. मात्र यात हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख नसल्याने हिंदीची सक्ती कोणावरही करता येणार नाही, असे गुजरात हायकोर्टाने सांगितले आहे.

मराठी सिनेमाचा झेंडा

म टा च्या सौजन्याने

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा झेंडा मानाने लहरत असतानाच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतही मराठी
चित्रपटांना मानाचा मुजरा मिळावा हा केवळ योगायोग नाही। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमाने कात टाकली आहे. चाकोरीबाहेर जाऊन वेगळे विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न मराठी सिनेमाने सुरू केला आहे. त्याचेच फळ म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांत जोगवा आणि गंध या मराठी चित्रपटांनी मानाचे स्थान पटकावले आहे. उपेन्द लिमये यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने अभिनयाच्या क्षेत्रात मराठी कलावंतांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अजय-अतुल हे आज भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात गाजणारे नाव आहे. मराठीच नव्हे तर अन्य भाषांतील चित्रपटही त्यांच्या संगीताने गाजत आहेत. त्यांना सवोर्त्कृष्ट संगीतकार म्हणून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतही दखल घेतली जाईल यात काही शंका नाही. हरिहरन हे हिंदी चित्रसृष्टीतले नामवंत गायक पण यावेळचा सवोर्त्कृष्ट गायकाचा पुरस्कार त्यांना जोगवा या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी मिळावा हे संगीत क्षेत्रावर मराठीचे सध्या असलेले वर्चस्व स्पष्ट करणारे आहे. यावषीर् मराठीत अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे, पेक्षकांना विचार करायला लावणारे अनेक चित्रपट निघाले. त्यामुळे मराठीत मोठ्या ताकदीेचे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार आहेत हे दिसून आले आहे. यातल्या काही मंडळींना हिंदी चित्रपटसृष्टीही खुणावू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा झेंडा मानाने लहरत असतानाच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतही मराठी
चित्रपटांना मानाचा मुजरा मिळावा हा केवळ योगायोग नाही। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमाने कात टाकली आहे. चाकोरीबाहेर जाऊन वेगळे विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न मराठी सिनेमाने सुरू केला आहे. त्याचेच फळ म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांत जोगवा आणि गंध या मराठी चित्रपटांनी मानाचे स्थान पटकावले आहे. उपेन्द लिमये यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने अभिनयाच्या क्षेत्रात मराठी कलावंतांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अजय-अतुल हे आज भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात गाजणारे नाव आहे. मराठीच नव्हे तर अन्य भाषांतील चित्रपटही त्यांच्या संगीताने गाजत आहेत. त्यांना सवोर्त्कृष्ट संगीतकार म्हणून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतही दखल घेतली जाईल यात काही शंका नाही. हरिहरन हे हिंदी चित्रसृष्टीतले नामवंत गायक पण यावेळचा सवोर्त्कृष्ट गायकाचा पुरस्कार त्यांना जोगवा या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी मिळावा हे संगीत क्षेत्रावर मराठीचे सध्या असलेले वर्चस्व स्पष्ट करणारे आहे. यावषीर् मराठीत अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे, पेक्षकांना विचार करायला लावणारे अनेक चित्रपट निघाले. त्यामुळे मराठीत मोठ्या ताकदीेचे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार आहेत हे दिसून आले आहे. यातल्या काही मंडळींना हिंदी चित्रपटसृष्टीही खुणावू लागली आहे.

Friday, January 22, 2010

ठाण्यात मनसेने बंद पाडला ‘झेंडा’

अवधूत गुप्ते नी "कोणाच्या" तरी सांगण्या वरून हात दाखवून अवलक्षण केले आहे । त्याला कोणाचा उद्धार करायचा आहे ते सर्व श्रुत आहे । आम्ही काय ह्याला दूध खुळे वाट्लो की काय ? आणि हो पिक्चर काढून जर लोक मागे येत असतील तर मग संपलच सगळं , काय?


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
राज ठाकरे यांनी ' झेंडा 'सिनेमाच्या प्रदर्शनाला कोणताही विरोध केला नसतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना थिएटरमध्ये झेंडा सिनेमाचा विरोध सुरू केला आहे। सिनेमाचा पहिला शो संपण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी थिएटर बाहेर आंदोलन सुरू केले.

सिनेमात शेवटच्या दृश्यात एका नेत्याला अटक करण्याचा आदेश दिल्याचे दाखवण्यात आले आहे। या दृश्याबाबत मनसेच्या चित्रपट विभागाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. सिनेमा काल्पनिक कथेवर आधारित असल्याचा बनाव रचून राज ठाकरे यांच्यासारख्या दिसणा-या कलाकाराला व्हिलन करण्यात आले आहे. शेवटच्या दृश्यात या नेत्याला अटक करण्याचा आदेश देत अप्रत्यक्षपणे राज यांचीच बदनामी करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ‘ झेंडा ’ तील दृश्यांमुळे भावना दुखावल्याने कार्यकर्त्यांनी सिनेमाला विरोध सुरू केल्याचे सांगितले।

Thursday, January 21, 2010

अमराठी टॅक्सीवाल्यांना राजची 'धमकी'

आमच्या मनातले बोललात राज साहेब, ह्या कच खाऊ मुख्यमत्र्यांना महाराष्ट्राची आणि पर्यायाने मराठी माणसांची ताकत दाखवायलाच हवी । अशोक रावन वर कोणाचं दडपण आले जेणे करून त्यानीं हा निर्णय चोवीस तासात फिरवला ? आम्हाला कळाले पाहिजे


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई व उपनगरात नव्याने देण्यात येणारे टॅक्सी परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत। नाहीतर एकही नवी टॅक्सी रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी स्पष्ट ' धमकी ' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राज्य सरकारला दिली.

मुंबई व उपनगरात दरवर्षी ४५०० नवे टॅक्सी परवाने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला। १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य आणि मराठी लिहिता, वाचता व बोलता येणा-यांनाच टॅक्सी परवाने दिले जातील, असे सरकारने स्पष्ट केले होते. परंतु २४ तास उलटण्याच्या आतच मुख्यमंत्री चव्हाण यांनी पलटी मारली. मराठीसोबतच हिंदी किंवा गुजरातीपैकी एक भाषा येणे पुरेशी असल्याची सारवासारव मुख्यमंत्र्यांनी आज केली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून दट्ट्या आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी टॅक्सीवाल्यांचा निर्णय फिरवल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या ‘ घूमजाव ’ मुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आयताच मुद्दा सापडला असून, त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले। बुळचट व लाचार अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांची संभावना करत राज ठाकरे म्हणाले की, स्वकर्तृत्वाने अशोक चव्हाण मुख्यमंत्री झालेले नाहीत. कुणीतरी बसवलेले हे मुख्यमंत्री आहेत. एकतर निर्णय घेण्याची यांची क्षमता नाही. आणि घेतलाच निर्णय तर त्यांची अमलबजावणी करण्याची यांची हिंमत नाही. दिल्लीवरून दट्ट्या आल्यानंतर लाचार मुख्यमंत्र्यांनी लगेचच मराठी मुलांना टॅक्सी परवाने देण्याचा निर्णय बदलला. संपूर्ण कॅबिनेटने घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्री एकट्याने कसा फिरवू शकतात ? स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही ? याबाबत इतर मंत्र्यांची काय मते आहेत, हे जरा समजून घ्या. असली लाचारी करण्यापेक्षा दक्षिणेतल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे पार्ट टाइम जॉब करा... स्वाभिमान, भाषा, प्रदेश काय असते ते त्यांना समजेल, असा टोला राज यांनी हाणला.

सरकारचा काय निर्णय व्हायचा तो होईल। परंतु आमचा निर्णय झालेला आहे. ४५०० नवे परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत. नाहीतर एकही नवी टॅक्सी रस्त्यावर फिरू देणार नाही... ज्यांना ही धमकी समजायची असेल त्यांनी ती खुशाल धमकी समजावी, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. एवढेच नाही, तर याआधी दिलेले टॅक्सी-रिक्षा परवानेही तपासून बघावे लागतील. यांना भाषा, शहर, पत्ता काहीही माहिती नसताता टॅक्सी-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळतेच कशी ? असा सवाल ठाकरे यांनी केला.

सरकारचे मराठी पाऊल पडले मागे

अशोकराव, जर तुम्हाला एखादा निर्णय घेउन त्याला अमलात आणता येत नाही तर मग तुम्ही निर्णय तरी कशा करता घेतात । उगाचच पब्लिसिटी साठी अशे निर्णय घ्यायचे आणि नंतर शेपुट आत घालायचे, हीच का तुमची ओळख? लाज वाटते आम्हाला तुमच्या सारख्या कच खाऊ नेत्यांची.....


मटा ऑनलाइन वृत्त ।
मुंबई मुंबईत नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या वास्तव्याची अट घालणार आणि मराठी भा
षा लिहिता ,वाचता आणि बोलता येणे सक्तीचे करणार ; असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या २४ तासात घुमजाव केले आहे। मराठी सोबतच हिंदी किंवा गुजराती यापैकी किमान एक भाषा येणे पुरेशी असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवारी) सांगितले.

मुंबईमध्ये टॅक्सीच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नुतनीकरणकरण्यासाठी तसेच नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या राज्यातील वास्तव्यासोबतच मराठी भाषा लिहिता , वाचता आणि बोलता येणे आवश्यक असल्याचे सरकारने जाहीर केले होते। मात्र या आदेशाला टॅक्सी चालक संघटनांचा विरोध होता. काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांकडून आम्हाला मराठी समजते आणि तोडके-मोडके बोलता येते मग हीलिहिण्याची अट कशाला ?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

मुंबईमध्ये टॅक्सीच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नुतनीकरणकरण्यासाठी तसेच नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या राज्यातील वास्तव्यासोबतच मराठी भाषा लिहिता , वाचता आणि बोलता येणे आवश्यक असल्याचे सरकारने जाहीर केले होते। मात्र या आदेशाला टॅक्सी चालक संघटनांचा विरोध होता. काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांकडून आम्हाला मराठी समजते आणि तोडके-मोडके बोलता येते मग हीलिहिण्याची अट कशाला ?, असा प्रश्न उपस्थित केला होता.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घुमजावमागे उत्तर भारतीय राजकारण्यांची लॉबी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान , मुख्यमंत्र्यांनी अद्याप निर्णयात केलेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.

Wednesday, January 20, 2010

जनतेच्या अपेक्षांचे दडपण येते - राज

म टा च्या सौजन्याने ......


20 Jan 2010, 0149 hrs ईस्ट
- म। टा. प्रतिनिधी
'मी जिथे जातो तिथे लोकांचा गराडा माझ्याभोवती जमतो। शिट्या वाजतात. टाळ्यांचा कडकडाट होतो. माझ्या सह्या घेण्यासाठी लोकांची झुंबड उडते. लाखो लोक माझ्याकडे अपेक्षेने बघत असतात. हे सारे बघितल्यानंतर जनतेच्या आपल्याकडून प्रचंड अपेक्षा आहेत, हे जाणवते. त्यांच्याच अपेक्षांचे प्रचंड दडपण माझ्यावर येते. दुसऱ्या क्षणाला माझी खरोखरच तेवढी लायकी आहे का, असा प्रश्न मनात निर्माण होतो...' हे शब्द आहेत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे!

नवनिर्माण करीअर अकादमीच्यावतीने ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे आयोजित केलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। डॉ। संदीप केळकर, ठाण्यातले दक्ष नागरिक प्रदीप इंदुलकर, जिज्ञासा ट्रस्टचे सुरेंद दिघे, वेटलिफ्टर संदीप आवारी आणि पत्रकार श्रीकांत बोजेवार यांना नवनिर्माण गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकार राजू परुळेकर, संदीप आचार्य आणि कवी अशोक नायगावकर यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. त्यावेळी राज यांनी आपले मन मोकळे केले.

'लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला भरपूर काम करायचे आहे। त्यासाठी माझे पाय जमिनीवरच राहिले पाहिजे. दहा वषेर् फिरूनही पक्षाच्या प्रसाराचे जेवढे काम करता आले नसते तेवढे काम काही महिन्यांत प्रसिद्धीमाध्यमांमुळे झाले. त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना विचार करून टाकावे लागते. कुठलेही आंदोलन करताना ते फार काळ रेंगाळत ठेवायचे नसते. 'ओव्हर एक्स्पोजर' मोठे घातक असते. १३ आमदार निवडून आल्यानंतर मी शिवतिर्थावर विजयी मेळावा घेऊ शकलो असतो. परंतु, तसे केले असते तर कार्यर्कत्यांमध्ये उन्माद निर्माण झाला असता. उद्धट झाले असते. त्यामुळे काही काळ शांत बसणेच इष्ट असते. कायद्याचे कुणालाही भर राहिले नसल्यामुळे आंदोलने करताना कायदा हातात घ्यावा लागतो. परंतु, त्यातून अनेक कार्यर्कत्यांवर गुन्हे दाखल होतात. त्यामुळे कायदा हातात तरी किती वेळा घ्यायचा? मला कार्यर्कत्यांचाही विचार करावा लागतो', असेही राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. 'लोकांच्या मनात जो राग आहे. तोच माझ्या मनातही आहे. परंतु, थोडी सबुरी ठेवा. आजवर जे पाहिले नाही ते यापुढे पहाल, असे सांगत आपली भावी वाटचाल अधिक आक्रमक असेल', असेही ठाकरे यांनी स्पष्ट केले.

रिक्षावाल्यांशी मराठीतच बोला
महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सीचे परवाने मिळवायचे असतील तर मराठी भाषा बोलता आली पाहिजे, हा नियम आहे। त्यामुळे या रिक्षा आणि टॅक्सीचालकांशी मराठीतच बोला, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. दक्षिणेतल्या लोकांनी आपल्या भाषेची जशी भिंत उभी करून ठेवली आहे, तशीच भिंत महाराष्ट्रातही उभी राहिली पाहिजे. तसे झाले तरच इथली संस्कृती आणि भाषा टिकेल', असे राज यांनी सांगितले.

Tuesday, January 19, 2010

पाण्याशी 'खेळ' नको!

मित्रानो, आजच सकाळी म टा मधे प्रताप आसबेचां एक चांगला लेख वाचला तो तुमच्या सोबत शेयर करीत आहे। मुंबई तील पाणी टंचाई किती भीषण आहे ह्याची कल्पना ह्या लेखातून येते आणि हे सर्व भ्रष्ट राज कारनी आपापला फायदा करण्याकरिता आपल्या शहराचा बट्या बोळ करत आहेत। ह्यानां आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे । मुंबई महानगर पालिकेच्या निवडनुका जवळ येउन ठेपल्या आहेत आणि सुज्ञ जनता ह्या सत्ताधार्याना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही । तुर्तास एवढेच ......


19 Jan 2010, 0049 hrs IST
प्रताप आसबे

मुंबईतील पाण्याचा प्रश्ान् वाटतो तितका सोपा नाही। परंतु या समस्येचे गांभीर्य समजून घेण्याचीच कुणाची तयारी नाही, हे दुदैर्व आहे... ..........

यंदाचा पावसाळा संपल्या-पासून मुंबई महापालिकेची घालमेल सुरू आहे। मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या परिसरात यंदा कमी पाऊस झाल्याने दीड कोटी लोकसंख्येच्या मुंबई शहराला पुढच्या पावसाळ्यापर्यंत पाणी कसे पुरवायचे, असा प्रश्न पडला आहे. या शहराला दररोज किमान ३६४८ दशलक्ष लिटर पाणी लागते. राज्य सरकारच्या भातसा, अप्पर वैतरणा या धरणातून रोज २६६४ दशलक्ष लिटर, तर महापालिकेच्या मोडकसागर, तानसा, विहार, तुळशी या तलावातून ९८४ दशलक्ष लिटर पाणी पुरविले जाते. पाऊस कमी झाल्याने या धरण आणि तलावांमध्ये मागच्या तुलनेत सुमारे दोन लाख १० हजार दशलक्ष लिटर पाणी कमी आहे, असे म्हणतात. त्यामुळे १५ जुलैपर्यंत कशी कळ काढायची, असा प्रश्न आहे.

पाण्याच्या तुटवड्यामुळे महापालिकेने सुरुवातीपासूनच रोजच्या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली आहे। या कपातीनंतरही पावसाळ्याच्या आधीच २५ ते ३० दिवस पाणी संपण्याची शक्यता आहे. म्हणजे साधारणत: १५ मेपासून पाणीपुरवठाच करता येणार नाही इतका तुटवडा आहे. सलग महिनाभर या शहराला पाणीच देता येणार नाही, अशी स्थिती दिसू लागली तेव्हा महापालिकेचे धाबे पुरते दणाणले. बैठकामागून बैठका सुरू झाल्या. त्यातून आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्यालाच सुटी द्यायची 'शक्कल' महापालिकेने काढली. हा काही उपाय नाही; पण काही ना काही केेले पाहिजे, म्हणून आठवड्यातून एक दिवस सुटीचा उपाय काढला होता.

मुंबई हे जागतिक कीतीर्चे शहर। तिथे आठवड्यातून एकदा पाणी नाही, ही नामुष्कीची बाब. त्यामुळे जलसंपदा मंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन महापालिकेच्या आणि राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मुंबईला दररोज साधारणत: १२९ दशलक्ष लिटर जास्तीचे पाणी देण्याचा निर्णय त्यांनी आपल्या अधिकारात घेतला. या दिलाशामुळे आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्याला सुटी देण्याचा महापालिकेचा विचार बारगळला.

आता अजित पवार तरी कोठून पाणी देणार, असा प्रश्नच आहे। त्यांनी भातसा-अप्पर वैतरणा या धरणांच्या राखीव साठ्यातून पाणी द्यायचा मार्ग काढला. पवार यांनी काही प्रमाणात जोखीम घेतली; कारण १५ जुलैनंतर पाऊस पडला नाही तर नंतरचे सलग ९५ दिवस पाणीपुरवठा करता यावा, यासाठी पाण्याचा साठा राखून ठेवला जातो. त्यातील ४५ दिवसांचा साठा शिल्लक ठेवून साधारणत: ५० दिवसांचा साठा मुंबईला देण्यात आला आहे. दुदैर्वाने उद्या पाऊसच पडला नाही, तर ४५ दिवसांचा साठा भातसा -अप्पर वैतरणात असेल. त्यामुळे सुरुवातीच्या ४५ दिवसांनंतरही पाऊस पडला नाही तर आणीबाणीची स्थिती निर्माण होईल. तेव्हा लोक व राजकारणी अजित पवार यांच्या नावाने खडे फोडायला मागेपुढे पाहणार नाहीत. आज या प्रश्नावर मिठाची गुळणी धरलीय, ते महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनावाले सगळ्यात पुढे असतील, यात शंका नाही. मात्र अजित पवार यांनी काही प्रमाणात धोका पत्करलेला असल्याने मुंबई महापालिकेचा जीव भांड्यात पडला आहे.

मुंबईसाठी जास्तीचे पाणी देण्याचा निर्णय घेताना अजित पवार यांनी आठवड्यातून एक दिवस पाणीपुरवठ्याला सुटी द्यायची नाही, मुंबईतील पाणीपुरवठ्याचे ऑडिट केेले पाहिजे, अशा अटी महापालिकेला घातल्या आहेत। यातील दुसऱ्या अटीचे पालन महापालिका कितपत करेल याची शंकाच आहे. मुंबईच्या वॉर्डावॉर्डात किती लोकसंख्या आहे, कोणत्या वॉर्डाला किती पाणी देतो, लोकसंख्येच्या घनतेचे आणि पाणीपुरवठ्याचे काही प्रमाण आहे का, दरमाणशी पुरवठा जास्त आहे की कमी आहे, कुणाला पाणी किती मिळते, याचा तपशील महापालिकेकडे नाही. काही ठिकाणी पाण्याच्या मोजमापासाठी मीटर बसविली; पण त्यातील ५० टक्के निकामी आहेत. मुंबई महापालिका रोज ३६४८ दशलक्ष लिटर पाणी पुरवते. त्यातील सुमारे २८ टक्के म्हणजे १०२१ दशलक्ष लिटर पाण्याचा हिशेबच नाही.

दुदैर्वाने मुंबई महापालिकेला, तेथील सत्ताधाऱ्यांना या गलथान-पणाची पर्वा नाही। मुंबईकरांनाही व्यवस्थित पाणी मिळते म्हणून पाण्याची किंमत नाही. ठाणे, नाशिक या आदिवासी भागातून पाणी आणले जाते. या शहरासाठी साधारत: ५३ टीएमसी पाणी विविध धरणांत अडविण्यात आले आहे. त्यातील बहुतेक सगळे पाणी शहराकडे वळवून किरकोळ असा वाटा शेतीला दिला जातो, याची थोडीतरी जाण पाहिजे. साधारणत: एक टीएमसी पाण्यात १५४५ हेक्टर जमिनीत भाताचे पीक घेता येते. हे सगळे पाणी शेतीला वापरले असते तर किमान ८१ हजार हेक्टर जमीन भाताच्या पिकासाठी पाण्याखाली आली असती. पण पाणी शहराकडे वळविल्याने आदिवासी ग्रामीण भागातील प्रगतीच्या वाटाच बंद झालेल्या आहेत. याची कसलीही जाण न ठेवता आमच्यासारखे मुंबईकर वाट्टेल तसे पाणी वापरतात.

मुंबई महापालिका १९८५ पासून शिवसेना-भाजप युतीच्या ताब्यात आहे। पाण्याच्या टंचाईला गैरव्यवस्थापन हे प्रमुख कारण असून त्या गैरव्यवस्थापनाला प्रामुख्याने तेच जबाबदार आहेत. महापालिकेने थोडीबहुत विकासाची कामे केली की त्याची इतकी टामटूम केली जाते की विचारायला नको. रस्तोरस्ती झेंडे काय. बॅनर काय. पुलेक्स काय. जणू चंदावर गेल्याचा देखावा केला जातो. पण तेच नेते पाणी प्रश्नावर अवाक्षर काढायला तयार नाहीत. मुंबईत रोजच्या रोज अनधिकृत बांधकामे होत आहेत. रोज नवनव्या झोपड्या उभ्या राहात आहेत. काही महाभाग यांना प्रोत्साहन देऊन गबर झाले आहेत. साफसफाई आणि कचऱ्याच्या नावाखालीही कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होतो, असे म्हणतात. ज्यांच्या हातात शहराची सूत्रे आहेत, त्यांचे सगळे लक्ष टेंडरवर खिळलेले असते. महापालिकेने मंजूर केलेल्या काही मोजक्या टेंडरची जरी चौकशी झाली तरी भ्रष्टाचाराचे प्रमाण किती भयावह आहे, याची कल्पना येईल. महापालिकेत प्रामुख्याने मराठी कर्मचारी आहेत. ती ताब्यातही मराठी लोकांच्याच आहे. मराठीसह कोणीही जावो, त्याला नागवल्याशिवाय कोणी सोडत नाही. पावलापावलावर भ्रष्टाचार आहे. याची कधीतरी झाडाझडती व्हायला पाहिजे. नाहीतर महापालिकेच्या कारभारात कधीच सुधारणा होणार नाही. पाण्याच्या टंचाईची झळ लागली असती तर साचलेल्या विहिरीतून गाळ उचमळून यावा तसे हे प्रश्न पुढे आले असते.

पण आता पाण्याची टंचाईच जाणवणार नाही, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे मुंबईतील उच्चभ्रू लोकांना पाण्याचे महत्त्व कळेल, याची शक्यता नाही. मुंबई महापालिकेतील गैरव्यवस्थापन आणि भ्रष्टाचारही सुशेगात चालत राहील, यातही शंका नाही. कळावे, जय महाराष्ट्र !

Thursday, January 14, 2010

तिळगुळ घ्या, गोड बोला..

सकाळ च्या सौजन्याने .....
मकर संक्रांति ची वेब साईट ह्या पत्त्यावर मिलु शकेल http://www.esakal.in/makarsankranti/makarsankrati.aspx


सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 14, 2010 AT 08:57 AM (IST)

मकर संक्रांतीच्या निमित्तानं सर्वजण एकमेकांचं तोंड गोड करतात. त्याप्रमाण ई- सकाळनंही समस्त वाचकांचं तोंड गोड करायचं ठरवलंय. कसं? अहो प्रश्‍न काय विचारताय? तुम्हाला ते थेट अनुभवायलाच मिळणार आहे. या संक्रांतीच्या निमितानं ई- सकाळ मकर संक्रांत ही मायक्रो साइट घेऊन आलीय. या साइटमधून संक्रांतीविषयक विविध लेख देऊ करत आहोत. केवळ लेखांवर येऊन आम्ही थांबलेलो नाही. तर, व्हिडिओंचाही त्यात समावेश आहे. पतंग, आणि काटेरी हलवा बनविण्याचे धडे या व्हिडीओच्या माध्यमातून तुम्हाला घेता येणार आहे.

Tuesday, January 12, 2010

रोजगारप्राप्तीसाठी "मनसे'ची पाठशाळा

सकाळ ह्या वृत्तपत्राच्या सौजन्याने .....

सकाळ न्यूज नेटवर्क
Tuesday, January 12, 2010 AT 12:15 AM (IST)

मृणालिनी नानिवडेकर मुंबई -
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने परिसरात निर्माण होणारे रोजगार परप्रांतीयांच्या हाती न जाता मराठी माणसाच्या ताब्यातच ठेवण्याची शिकवणी सुरू केली आहे। मात्र, ही शिकवण "मनसे स्टाइल' दणके-राड्यांची नसून नोकरी-रोजगार मिळविण्यासाठी आवश्‍यक कौशल्ये अंगी बाणवण्याबद्दलची आहे.

राज्यातील सर्व जिल्हे आणि तालुक्‍यांत "मनसे'ने रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाची स्थापना केली आहे। अलीकडेच नाशिकजवळ या विभागातील पदाधिकाऱ्यांचे दोन दिवसांचे शिबिर आयोजित करण्यात आले होते। शिवसेनेत असताना राज ठाकरे शिवउद्योग सेना, बेरोजगारांचा विधानसभेवरील मोर्चा अशा तरुणांच्या जिव्हाळ्याच्या विषयांना हात घालतच प्रकाशात आले होते.

मराठी तरुणांच्या हाताला काम हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी आता "मनसे'चा रोजगार-स्वयंरोजगार विभाग काम करेल, असे पक्षाचे प्रवक्‍ते शिरीष पारकर यांनी स्पष्ट केले। निवडणुकीची दगदग संपल्यानंतर आता या कामाला नियोजनबद्ध प्रारंभ झाला असून, ताज्या शिबिरात भविष्यातील योजनांविषयी चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रात उभ्या राहणाऱ्या प्रत्येक उद्योगात उपलब्ध रोजगारातील 80 टक्‍के नोकऱ्या स्थानिकांना दिल्या पाहिजेत, असा शासनाचा कायदा असून, शासनाचे ते परिपत्रक लागू करणे उद्योजकांना बंधनकारक करण्याचे मार्ग कोणते, याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. राज्याच्या विविध भागांत उभ्या राहणाऱ्या प्रकल्पांची यादी "मनसे'कडे असून, ती त्या-त्या विभागातील प्रमुखांना देण्यात आली आहे. भूमिपुत्रांना रोजगार देण्यासाठी सक्‍तीचा बडगा उभारतानाच मराठी माणसाने नव्या स्वरूपातले रोजगार व नोकऱ्या मिळविण्याच्या कौशल्यांचा अभ्यासक्रमही "मनसे'ने तयार केला आहे. रोजगार व स्वयंरोजगार विभागाचे प्रमुख सुनील बसाखेत्रे हे स्वत: कामगार कायद्यातले तज्ज्ञ असून, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांचा लौकिक आहे. मराठी मुले सेवाक्षेत्रातील नव्या संधी मिळवायला बिचकतात हे लक्षात घेत "मनसे'च्या माध्यमातून लवकरच ठिकठिकाणी व्यक्तिमत्त्व विकास, इंग्रजी संभाषण, संगणकीय कौशल्य, वेळेचे व्यवस्थापन याविषयीची शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. या शिबिरात होतकरू तरुणांना प्रशिक्षण दिले जाईल.

मुंबईत रिटेल सेवांना आवश्‍यक असणारे तज्ज्ञ मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्‍यक मार्गदर्शन पक्षाने यापूर्वीच सुरू केले असून, चार तासांच्या या शिकवणी वर्गाला हजर राहणाऱ्या तरुणांना नोकऱ्याही मिळाल्या आहेत. आता हा कार्यक्रम राज्याच्या सर्व भागांत मोठ्या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. मुंबईतील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रोजगार-स्वयंरोजगार विभागाचा संघटक नेमण्यात आला आहे. ठाणे आणि पुणे येथे 15-20 जणांचा चमू सक्रिय आहे. पुणे येथील 80 टक्‍के नियुक्‍त्या पूर्ण झाल्या आहेत. नाशिक या "मनसे'च्या बालेकिल्ल्यातही विभागाचे काम सुरू झाले आहे. अमरावती, अकोला, नगर, जळगाव येथेही काम सुरू झाले असून, युवकांची मते मिळवायची असतील तर त्यांच्या सर्वाधिक जिव्हाळ्याच्या नोकरीधंद्याबाबतच काहीतरी ठोस करणे राज ठाकरे यांना आवश्‍यक वाटत असल्याचे सांगण्यात येते.

राज ठाकरे ठरले 'युथ आयकॉन'

बातमी सकाळ च्या सौजन्याने ....

'ई सकाळ' आणि '५४३२१ एसएमएस सेवा' यांनी घेतलेल्या 'सांगा तुमच्या मनातील युथ आयकॉन' उपक्रमात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सर्वाधिक ५६ टक्के लोकांनी पसंती दिली आहे। त्याखालोखाल २६/११ च्या मुंबई हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी विश्‍वास नांगरे-पाटील यांचे नाव 'युथ आयकॉन' म्हणून ऑनलाईन वाचकांनी आणि तरूणाईने 'एसएमएस'द्वारे सुचविले आहे. आज (१२ जानेवारी) युवा दिन. त्यानिमित्त आपल्या मनातील युथ आयकॉन कळविण्याचे आवाहन गेल्या आठवड्यात 'ई सकाळ'ने वाचकांना केले होते.'

ई सकाळ'वरील आवाहनाला जगभरातून वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला। कोणतेही विशिष्ट नाव समोर न ठेवता ऑनलाईन वाचकांना त्यांच्या दृष्टिने कोण 'युथ आयकॉन' वाटतो, हे सांगण्यास सुचविले होते. त्यातून या आवाहनावर जगभरातून सुमारे दीड हजार प्रतिक्रिया वाचकांनी 'ई सकाळ'वर पोस्ट केल्या. या प्रतिक्रियांमधून वाचकांनी सर्वाधिक संख्येने निवडलेल्या नावांवर '५४३२१ एसएमएस' सेवेमार्फत मतचाचणी घेण्यात आली. या दोन्ही प्रक्रियांमधून तरूणाईने त्यांच्या मनातील 'युथ आयकॉन'वर शिक्कामोर्तब केले. ठाकरे, नांगरे पाटील यांच्यासह क्रिकेटचा बादशाह सचिन तेंडूलकर, अभिनेता अमीर खान, माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, कॉंग्रेसचे युवा नेते राहूल गांधी, समाजसेवक प्रकाश आमटे, 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी अशी एकूण दहा नावे 'युथ आयकॉन' म्हणून वाचकांनी सुचविली होती.

विश्वास नांगरे पाटील दुसऱया स्थानावर
राज ठाकरे यांनी एकूण ऑनलाईन आणि एसएमएसवर ५४ टक्के लोकांची पसंती मिळवित युथ आयकॉन असल्याचे सिद्ध केले। महाराष्ट्रात मराठी तरुणांसाठी व मराठी भाषा टिकावी यासाठी आंदोलन करणाऱ्या राज यांनी जगभरातील मराठी माणसाला आकृष्ट केले असल्याचे यातून पुढे आले आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यावेळी शौर्य बजावणारे पोलीस अधिकारी नांगरे पाटील यांचेही नाव या यादीत सचिन तेंडूलकरच्या आधी, दुसऱ्या क्रमांकावर आहे.

संपूर्णपणे वाचकांचा प्रतिसाद
या संपूर्ण प्रक्रियेमध्ये यामध्ये कोणतीही यादी निश्‍चित नसताना, सुमारे तीन हजार वाचकांनी स्वतः यादी बनविली। युथ आयकॉन म्हणून आपण कोणाचा आदर्श समोर ठेवतो, हे कळविले. त्यामधून समान नावे पुढे आली आणि त्या नावांचा क्रमही एसएमएसद्वारे ठरविण्यात आला. त्यामुळेच यादीमध्ये एकाचवेळी 'इन्फोसिस'चे संस्थापक नारायण मूर्ती यांचे नाव आहे, तसेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी यांचेही नाव आले आहे. आदर्श वाटणाऱ्या, भावलेल्या व्यक्तींची नावे वाचकांनी 'ई सकाळ'वर मांडली होती. राजकारण, क्रीडा क्षेत्रापासून मनोरंजन, संगीत, विज्ञान आदी विविध क्षेत्रातील व्यक्तींची नावे यामध्ये होती. 'ई सकाळ'वर 'युथ आयकॉन'साठी आलेल्या नावांमधून दहा नावांची निवड करण्यात आली। त्यावर 'एसएमएस'द्वारे मते मागविण्यात आली.
युथ आयकॉन्स् आणि टक्केवारी
राज ठाकरे (५६।१५ टक्के) ठाकरे घराण्याचा वारसा असलेले राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून २००६ मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली। राज ठाकरेंनी आजपर्यंत मराठी भाषेसाठी अनेक आंदोलने करीत महाराष्ट्रातील तरूणाईच्या मनात स्थान मिळविले आहे।
विश्वास नांगरे पाटील - (१०।६२ टक्के)एका सामान्य कुटुंबातील तरूणाची पोलिस अधिकारी पदापर्यंतची वाटचाल नांगरे पाटील यांच्या रुपाने मराठी युवा मनासमोर आहे। पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण, मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी केलेली कामगिरी तरूणाईच्या मनावर विशेष ठसली आहे. सचिन तेंडुलकर - (९.५७ टक्के)वयाच्या सोळाव्या वर्षीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट अवकाशावर चमकू लागलेला हा सुपरस्टार. सचिनने आज अनेक विक्रम प्रस्थापित करीत आपणच क्रिकेटचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे. सचिनच्या याच कामगिरीमुळे तो आजही करोडो भारतीयांच्या गळ्यातील ताईत आहे.अमीर खान - (५.७८ टक्के)आपल्या अभिनयाने जगाला वेड लावणारा अभिनेता अमिर खान आज वयाच्या ४४ व्या वर्षीही तरुणाईमध्ये प्रसिद्ध आहे. 'यादों की बारात' ते 'थ्री इडियट्‌स' पर्यंतचा अमिरचा प्रवास उल्लेखनीय आहे.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - (४.६२ टक्के )भारताचे माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून ओळख असणारे अब्दुल कलाम यांनी व्हिजन '२०२०' मधून भारताला नवी दिशा दाखविली आहे. 'विंग्ज ऑफ फायर' हे त्यांचे पुस्तक सर्वाधिक लोकप्रिय आहे. राहुल गांधी - (३.८९ टक्के )कॉंग्रेसचे युवा खासदार राहुल गांधी वयाच्या चाळीशीत तरुणांचे रोल मॉडेल म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. भारताचे भविष्यातील पंतप्रधान म्हणूनही त्यांच्याकडे पाहिले जात आहे.डॉ. प्रकाश आमटे - (३.२६ टक्के)आशियातील नोबेल मानल्या गेलेल्या रॅमन मॅगसेसे पुरस्कार प्रकाश आमटे यांचे सामाजिक कार्यातील योगदान मोठे आहे. गडचिरोली जिल्ह्यातील 'हेमलकसा' या प्रकल्पात कुष्टरोग्यांसाठी ते उल्लेखनीय काम करीत आहेत.नारायण मूर्ति - (२.२० टक्के)पद्‌मविभूषण पुरस्कार विजेते नारायण मूर्ति यांचा इन्फोसिस टेक्‍नॉलॉजिस या कंपनीच्या स्थापनेत मोलाचा वाटा आहे. भारतातील आयटी क्षेत्रात या कंपनीच्या स्थापनेमुळ एक प्रकारची क्रांतीच आली.उद्धव ठाकरे - (२.१० टक्के)शिवसेनेचे कार्याध्यक्ष म्हणून काम करत असलेल्या उद्धव ठाकरे यांनी कमी वेळात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवसेना पक्षाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचविण्यात यांची मोलाची भूमिका आहे.नितीन गडकरी - (१.७८ टक्के)भारतीय जनता पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून राष्ट्रीय अध्यक्ष हा नितीन गडकरी यांचा प्रवास उल्लेखनीय आहे. भाजपच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचे नाव आता राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आहे.

Monday, January 11, 2010

ओरियन्टल इन्शुरन्सचा निर्लज्जपणा

मित्रानो, स्टार माझा वर कालच एक बातमी बघितली आणि ती तुमच्या सोबत शेयर करीत आहे। ह्या ओरिएंटल इन्शुरसं कंपनी चा आपण निषेध केला पाहिजे, पण कसा? मी त्यांचा कस्टमर केयर चा ईमेल ID शोधुन काढला आहे आणि तो आहे csd@orientalinsurance.org.in . मी त्यानां आजच ईमेल पाठवत आहे, जमल्यास तुम्ही देखिल करा
ही बातमी स्टार माझा वर ह्या पत्त्यावर देखिल मिलु शकेल http://www.starmajha.com/TopStoryLanding.aspx?NewsID=9076













रेल्वे ट्रॅकवर चोराचा पाठलाग करताना शहीद झालेल्या रेल्वे पोलीस कॉन्स्टेबलला इन्शुरन्स कंपनीनं विम्याची रक्कम देण्यास नकार दिलाय. प्रवाशाचा मोबाईल चोरून पळणाऱ्या एका चोराचा पाठलाग करताना लक्ष्मण अहिवने यांना रेल्वेची धडक बसल्यानं ते मरण पावले होते.
बांद्रा आणि माहीम स्टेशनवरच्या रेल्वे ट्रॅकदरम्यान हा प्रकार घडला होता. कर्तव्य बजावताना मृत्यू आलेला असतानाही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं मात्र त्यांच्या कुटुंबियांना जीवन विम्याची 2.5 लाख रक्कम नाकारली आहे.
रेल्वे ट्रॅकच्या दरम्यान बेकायदेशीरपणे पहारा देत असताना हा मृत्यू झाल्यानं विमा नाकारत असल्याचं कंपनीनं आपल्या पत्रात म्हटलंय. लक्ष्मण यांच्या विधवा पत्नी अलका यांना चरितार्थ चालवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय.
अवघ्या सहा हजार रुपयांच्या पेन्शनमध्ये त्यांना दोन मुलींच्या आणि एका मुलाच्या शिक्षणाचा खर्च भागवावा लागतोय. त्यामुळं त्यांच्यासाठी ही रक्कम मिळणं गरजेचं बनलंय.दरम्यान जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही ओरिएंटलशी पत्रव्यवहार करुन अहिवणे कुटुंबियांना न्याय देण्याची विनंती केली आहे.

Thursday, January 7, 2010

‘मटा’नायक जनतेला समर्पितः राज


म टा च्या सौजन्याने

7 Jan 2010, 1912 hrs ईस्ट

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
पक्षाच्या रुपाने मी मतदानाला सामोरे गेलो आहे, पण माझ्या बाबतीत मतदानाची ही पहिलीच वेळ आहे. महाराष्ट्राच्या जनतेने मला नायक बनवले, त्यामुळे मी जनतेचे आभार मानतो. पण कुठलाही पुरस्कार घेणार नसल्याचे मी यापूर्वीच ठरवत असल्याने ‘ मटा ’ नायक हा पुरस्कार मी पुन्हा जनतेला समर्पित करतो, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज ‘ मटा नायक ’पुरस्कार प्रदान समारंभात सांगितले.
गेल्या सात वर्षांपासून ‘ महाराष्ट्र टाइम्स ’ तर्फे जनतेचा कौल घेऊन ‘ मटा ’ नायक ठरविण्यात येतो. यंदा एकूण मतदानाच्या ५५ टक्के मते मिळवून म्हणजे ४५ हजार मते मिळून राज ठाकरे यांनी निर्वीवाद पुरस्कारावर आपले नावं कोरले. यावेळी महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर यांनी पुष्पगुच्छ आणि ‘ मटा ’ नायकचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना, राज ठाकरे म्हणाले, कुठलाही पुरस्कार न घेण्याचे मी ठरवले आहे. पण हा पुरस्कार कोणत्याही संस्थेने दिला नसून जनतेने दिला आहे. त्यामुळे मी त्याचा स्वीकार करतो. परंतु, पुरस्कार स्वीकारून मी कुठेही समाधानाची पावती घेऊ इच्छित नाही. त्यामुळे हा पुरस्कार स्वीकारण्या पेक्षा मी तो जनतेलाच अर्पण करतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
पुरस्कार वितरणानंतर राज ठाकरे यांनी ‘ मटा ’ ऑनलाइनच्या ऑफिसला भेट दिली. मटा ऑनलाइनचे प्रमुख सुहास फडके यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले


मनसेच्या तोफेचे बार

म टा च्या सौजन्याने

7 Jan 2010, 0116 hrs IST
आशिष पाठक

विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बाजी मारत कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण अशा दोन जागा अगदी सहज काबीज केल्या. त्यामुळे आता महापालिकेवर मनसेचा झेंडा फडकवायचाच या बुलंद इराद्याने मैदानात उतरलेल्या मनसैनिकांना थेट राज ठाकरे यांची जाहीर सभा होत असल्याने आणखी बळ मिळाले आहे. विशेष म्हणजे या सभेने मनसेच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याने मनसैनिक जोमाने कामाला लागले आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीचे वेध लागत असताना, आयाराम गयारामच्या चचेर्ला सुरूवात झाली आहे. दीड महिन्यापूवीर् भाजपचे कल्याण मतदारसंघाचे माजी आमदार हरिश्चंद पाटील यांनी पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते लगेचच समर्थकांसह दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात प्रवेश करतील अशी अटकळ होती. पक्षाचे राष्ट्रीय नेते गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक असलेल्या आमदारकीची उमेदवारी मिळवण्यात अपयश आले असले, तरी शहरातील राजकीय वाऱ्याची दिशा पाटील यांनी ओळखली आहे. यापुढील निवडणुकीत मनसे कल्याण-डोंबिवलीत जोरदार मुसंडी मारणार हे पाहून त्यांनी या पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत कल्याणचे जिल्हाध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक दिनेश तावडे व अन्य काही महत्त्वाचे कार्यकतेर् होते. माजी आमदार पक्षात येत असल्याने त्यांना तातडीने पक्षात प्रवेश दिला जाण्याची अपेक्षा असताना प्रत्यक्षात तसे घडले नाही. प्रवेश देताना राज ठाकरे यांनी डोंबिवलीत यावे आणि जाहीरपणे प्रवेश द्यावा अशी गळ या कार्यर्कत्यांकडून घालण्यात आली. त्यामुळे प्रवेश रखडला. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच आटोपल्याने राज ठाकरे यांनी कोठेही जाहीर सभा न घेण्याचे ठरवले. जानेवारी महिन्यात ते राज्याच्या दैाऱ्यावर निघाले असून, फेब्रुवारी महिन्यात पहिल्या आठवड्यात डोंबिवलीत जाहीर सभा घेणार आहेत. त्यामुळे या सभेत भाजपमधून येणाऱ्यांना मनसेत प्रवेश दिला जाईल अशी शक्यता आहे. डोंबिवलीत रवींद चव्हाण यांनी मनसेचे कडवे आव्हान मोडून काढले असले, तरी त्यांना भाजपच्या छुप्या विरोधाला तोंड द्यावे लागले. भाजपच्या विचारसरणीवर दृढ विश्वास असणाऱ्या सामान्य डोंबिवलीकरांमुळे ते विधानसभेवर निवडून येऊ शकले. परंतु, महापालिका निवडणुकीत पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ शकेल याची खात्री कोणीच देऊ शकत नाही. डोंबिवलीत भाजपची लोकप्रियता घसरणीला लागली आहे हे निविर्वाद सत्य आहे. पक्षाचे नगरसेवक खाजगीत उघडपणे त्याची कबुलीही देतात. एकमेकांचे पाय खेचण्यात या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मनोवृत्तीमुळे कार्यकतेर् मात्र सैरभैर आहेत. त्यांना निश्चित अशी दिशा देऊ शकणारा एकही नेता नाही. एकीकडे भाजपची प्रकृती खालावत असताना मनसे मात्र तगडा पक्ष म्हणून उदयाला येत आहे. त्यात दोन आमदार प्रचारात उतरणार असल्याचा फायदा मनसैनिकांना मिळेलच. मागील निवडणुकीच्या निकालावर नजर फिरवली तरी हे सहज लक्षात येते की डोंबिवलीकरांनी वर्षांनुवर्ष राजकारणात असणाऱ्या बड्या नेत्यांऐवजी तरुण चेहऱ्यांना निवडून दिले. त्यामुळे यंदाही तेच घडणार हे स्पष्ट आहे. भाजपसारखीच परिस्थिती शिवसेनेची आहे. सेनेचे डोंबिवलीतील नगरसेवक राजेश चूडनाईक यांनी मनसेत प्रवेश करण्याचे आधीच जाहीर केले आहे. ते राज ठाकरे यांच्या सभेत शिवसेनेला सोडचिठ्ठी देतील. त्यांच्यासह डोंबिवलीतील सेनेचे २ नगरसेवक मनसेच्या संपर्कात आहेत. महापालिका निवडणूक नऊ महिन्यांवर आली असताना राजीनामा देऊन पोटनिवडणूक लढवण्याऐवजी कागदावर सेनेतच पण मनाने मनसेत राहणे ते पसंत करतील हे उघड आहे. खिंडार फक्त डोंबिवलीतच नाही तर कल्याण, अंबरनाथ व उल्हासनगरातही पडू शकते. कल्याणात प्रकाश भोईर यांच्यासारखा फारसा परिचित नसलेला पण धडाडीचा कार्यकर्ता सहज आमदार झाला. भोईर यांच्या यशामुळे इतर पक्षांचे कार्यकतेर् मनसेकडे आकषिर्त झाले असून या पक्षाच्या लाटेवर स्वार होत आपण नगरसेवक होऊ शकतो असे त्यांना वाटू लागले आहे. त्यामुळे कार्यकतेर् मोठ्या प्रमाणावर मनसेत प्रवेश करतीलच शिवाय कल्याणातील काही नगरसेवकही मनसेच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. केडीएमसीच्या निवडणुकीआधी अंबरनाथ नगरपरिषदेची निवडणूक होत आहे. त्यासाठीची आचारसंहिता कदाचित फेबुवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जारी होईल. हातात फारसा वेळ नसल्याने मनसेचा झेंडा हातात घेण्यासाठी इच्छुक असलेले नगरसेवक डोंबिवलीतील सभेत काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकांनी २००९ मध्ये बरीच धामधूम होती. २०१० मध्ये नवी मुंबई व कल्याण डोंबिवली या महापालिका आणि अंबरनाथ व बदलापूर या नगरपरिषदांच्या निवडणूका होत आहेत. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे या मनसेच्या तोफेच्या बारांमुळे येथील राजकीय वातावरण खऱ्या अर्थाने तापू लागणार हे निश्चित.

Wednesday, January 6, 2010

‘झेंडा’वर मनसेचा आक्षेप, तरीही फडकणार!

मित्रानो, आत्ताच म टा मधे ही बातमी वाचली आणि लगेचच ब्लॉग वर टाका वीशी वाटली। अवधूत गुप्ते ची शिवसेने शी असलेली ज़वळीक सगळ्याना ठाउकच आहे आणि आम्हाला नाही वाटत की तो मनसे ला ह्या चित्रपटातुन काही न्याय देइल । राज साहेबानी सांगितल्या प्रमाने जर त्यांच्या वर टिका करून कोणी मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर ठीक आहे आणि आम्हाला त्यावर आक्षेप नाही कारण प्रेक्षकच ठरवतील कोणाचा झेंडा खाद्यां वर घ्यायचा । काय बरोबर की नाही ?
विनोद शिरसाठ


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
ठाकरे घराण्याच्या राजकारणावर भाष्य करणारा आणि त्यांच्या व्यक्तीरेखांशी साम्य असणारा अवधूत गुप्तेचा ‘ झेंडा ’ या चित्रपटातील दोन दृश्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्षेप घेतला आहे. अवधूतच्या या चित्रपटाचे खास स्क्रिनिंग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी करण्यात आले होते. त्यावेळी मनसेच्या नेत्यांनी ‘ झेंडा ’ चे रंग तपासले. त्यात मनसेसाठी यातील काही रंग भडक असल्याचे त्यांच्या लक्षात आले. ‘ झेंडा ’ ला क्लीन चिट मिळण्यासाठी मुंबईच्या फेमस थिएटरमध्ये बुधवारी शो आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर, सरचिटणीस शालिनी ठाकरे, संदीप देशपांडे, गजानन राणे, शशांक नागणेकर, गिरीष धारकर उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर खोपकर यांनी राज ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. त्यावर माझी बदनामी करून जर मराठी दिग्दर्शकाचा चित्रपट चालत असेल तर मला आनंदच आहे, असे राज ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले. केवळ आक्षेप नोंदवून चित्रपट प्रदर्शनाला हिरवा कंदील दाखवला. मनसेने ज्या दोन सीन बद्दल आक्षेप घेतला आहे, त्यातील एका सीनमध्ये राज ठाकरेंच्या व्यक्तिरेखेशी साधर्म्य असलेला कलाकार गड्याला आपल्या कपातील उरलेला चहा देतो. तसेच दुस-या सीनमध्ये इफ्तार पार्टीत जाऊन तो कलाकार टोपी घातलो तसेच हुक्का पितो. हे दोन्ही चुकीचे सीन्स दाखवून राज ठाकरेंची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आहे. हा चित्रपट एकांगी आहे, एका पक्षाला झुकते माप दिले आहे, असे अमेय खोपकर यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या रुपाने महाराष्ट्राला महानायक मिळालेला आहे. महाराष्ट्र टाइम्सच्या सर्वेत हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एखादा चित्रपट राज ठाकरेंची प्रतिमा मलिन करू शकत नाही, असेही खोपकर यांनी स्पष्ट केले. या संदर्भातील आक्षेप आम्ही अवधूत गुप्ते याच्याकडे नोंदविला आहे. त्यांनी पुढील कारवाई करायची आहे. चित्रपटाचे प्रिन्ट सर्व थिएटरमध्ये पोहचले असल्याने राज ठाकरे मराठी माणसाला नुकसान होवू नये असे कोणतेही काम न करण्याचे आदेश दिले आहेत, असेही खोपकर यांनी सांगितले.

रणजीमध्ये मुंबई अंतिम फेरीत

Wednesday, January 06, 2010 AT 05:54 AM (IST)

मुंबई - मुंबई आणि दिल्ली यांच्यात ब्रॅबोर्न स्टेडिअमवर सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पहिल्या डावाच्या अधिक्‍यावर विजय मिळवित मुंबई संघाने अंतिम फेरीत स्थान मिळविले.मुंबईने पहिल्या डावात अभिषेक नायरच्या दिडशतकाच्या जोरावर पाचशे धावांचा डोंगर उभारला होता. यापुढे दिल्लीचा डाव रमेश पोवारने मिळविलेल्या पाच बळींमुळे अवघ्या २११ धावांत आटोपला. यामुळे मुंबईने पहिल्या डावात २८९ धावांची आघाडी मिळविली. दुसऱ्या डावात मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही व त्यांच्या डाव १८७ धावांत संपुष्टात आला. यामुळे दिल्लीला विजयासाठी ४७६ धावांचे कठीण आव्हान होते. आज शेवटच्या दिवशी दिल्लीने ४ गडी गमावत १६० धावा करत सामना अनिर्णित राखला. मात्र, पहिल्या डावाच्या अधिक्‍यावर मुंबईने अंतिम फेरीत स्थान मिळविले

कल्याण मधील ओसाड गणेश घाट .......

मित्रानो,
कल्याण मधील गणेश घाट म्हणजे आपण निवडून दिलेले लोक प्रतिनिधी आपल्या सुख सोयींची कशी वाट लावतात त्याचा एक उत्कृष्ट नमूना आहे। सादर करीत आहे तुमच्या साठी म टा मधील गणेश घाटावरील बातमी ... वाचा आणि पेटून उठा .... काय? आणि हो, काळ्या तलावाचे सुशोभिकरनाचे काय चालले आहे? सांगावे ...
विनोद शिरसाठ

- म. टा. प्रतिनिधी
कल्याण शहराला विस्तीर्ण खाडीकिनारा लाभलेला असला तरी या किनाऱ्यालगत चौपाटी विकसित करण्यात पालिकेला अपयश आले आहे. त्यातच येथील दुर्गाडी गणेशघाटाची अवस्थाही ओसाड वाळवंटासारखी झाली आहे. तुटलेली खेळणी, बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नाही, पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची वानवा असलेला दुर्गाडी गणेशघाट आता फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे रमणीय गणेशघाट साकारून उत्तम दर्जाचे पर्यटनस्थळ बनवण्याच्या घोषणेचे काय झाले, अशी विचारणा विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी केली आहे. कल्याण शहरात मनोरंजनांच्या साधनांची कमतरता असताना केडीएमसीने उद्याने आणि मैदानांचाही बळी घेण्याचे सत्र सुरू केले आहे. त्यातच खाडीकिनारी असलेला गणेशघाटही ओसाड असल्याने कल्याणकरांनी चार घटका मौजमजा करण्यासाठी जायचे कोठे, असा प्रश्न निर्माण होतो. वास्तविक मागील महापालिका निवडणुकीआधी पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी महापालिकेत सेना-भाजपची सत्ता आली तर दुर्गाडी गणेशघाट रमणीय पर्यटनस्थळ म्हणून विकसित केला जाईल, असे आश्वासन दिले होते. या परिसराचे सध्याचे स्वरूप पाहता या आश्वासनाप्रमाणे काहीच झाल्याचे दिसत नाही. सोमवारी पालिकेतील विरोधी पक्षनेते सचिन पोटे यांनी गणेशघाट परिसराची पत्रकारांसोबत पाहणी केली. लहान मुलांना खेळता यावे, यासाठी तिथे बसवण्यात आलेली चार-दोन खेळणीही तुटली आहेत. तसेच, मुलांना खेळताना दुखापत होऊ नये यासाठी तिथे वाळू असावी लागते. पण वाळू तर सोडाच, तेथील पृष्ठभाग ओबडधोबड झाला असल्याने मुलांना दुखापत होण्याचे प्रमाण वाढले आहे. गणेशघाटावर कारंजे बसवण्यासाठी जागा सोडण्यात आली असली तरी कारंजे उभारण्यास केव्हा मुहूर्त सापडणार, हे अद्याप स्पष्ट नाही. तसेच, सुरक्षेसाठी बसवण्यात आलेला कठडा काही ठिकाणी तुटल्यामुळे धोका निर्माण झाला आहे. शेजारीच असलेल्या कचऱ्याच्या डोंगरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे गणेशघाटावर येणाऱ्या लोकांना धड बसता येत नाही. या परिसरात कोठेही साधी पिण्याच्या पाण्याची सोय नाही. लहान मुले व ज्येष्ठांसाठी प्रसाधनगृहाची सोय नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. अशा निसर्गत: सुंदर परिसराला आणखी शोभा येईल, असे दिवे बसवण्याऐवजी एरवी रस्त्यांवर दिसणारेच सरळधोपट दिवे बसवून पालिका मोकळी झाली आहे. हद्द म्हणजे तिथे होणाऱ्या बोटिंगसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही, शिवाय बोटिंग करताना एखादा अपघात झाला. तर रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात नाही. तरीही महापालिकेने याची दखल घेतलेली नाही. हे सगळे कमी आहे की काय, म्हणून फेरीवाल्यांनी या परिसराला विळखा घातला आहे. या दूरवस्थेकडे सचिन पोटे यांनी लक्ष वेधले आहे. पालिकेने या परिसराचे सुशोभिकरण करण्यासह शिव आरमार स्मारकाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. फेरीवाल्यांच्या हैदोसामुळे या परिसराला बकालपणा आला असून येत्या १० दिवसांत येथील फेरीवाले हटवण्यात आले नाहीत तर युथ काँगेसचे कार्यकतेर् रस्त्यावर उतरून फेरीवाले हटवतील, असा इशारा त्यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

भिवंडीत 'फूड माफियां'चे रॅकेट!

- म. टा. प्रतिनिधी
मॉलमधील 'एक्सपायरी डेट' उलटलेला माल कवडीमोलाने विकत घेऊन तो खुल्या बाजारात बिनबोभाटपणे विकणारे रॅकेट मनसेच्या कार्यर्कत्यांनी उघडकीस आणले आहे. भिवंडी येथील एका गोदामामध्ये हा माल ठेवल्याची खबर लागल्यानंतर मनसेच्या कार्यर्कत्यांनी तिथे छापा टाकला. सुरुवातीला नारपोली पोलिसांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करून मनसेच्याच कार्यर्कत्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल केले. परंतु, मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी दबाव आणल्यानंतर ही वादग्रस्त गोदामे सिल करण्यात आली आहेत. दापोड्यातील मे. युनिव्हर्सल प्रोजेक्ट्स ओधोकृपा या गोदामामध्ये मुदत संपलेल्या मालाची विक्री होत असल्याची माहिती मनसेचे कार्यकतेर् उदय पाटील, सचिन शेट्टी, किरण शेट्टी आणि मधुकर भोईर यांना मिळाली होती. त्या गोदामावर नारपोली पोलिसांनी छापा टाकून कारवाई करावी, अशी मागणी या कार्यर्कत्यांनी केली होती. परंतु, पोलिसांनी कारवाईस नकार दिल्यानंतर या कार्यर्कत्यांनीच त्या गोदामावर छापा टाकला. तिथे सॉस, चॉकलेट, ज्युस, लोणचे, पीठ, रवा, इडलीचे पीठ, साबण, शॅम्पू, दुधाची उत्पादने अशा खाण्यापिण्याच्या वस्तूंसह अन्य उत्पादानांचा प्रचंड मोठा साठा होता. हा सर्व माल 'एक्स्पायरी डेट' उलटलेला असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. हा प्रकार आमच्या अखत्यारीत येत नसल्याचे नारपोली पोलिस स्टेशनचे अधिकारी विलास सानप यांनी सांगितल्यानंतर तहसिलदार कार्यालयातील पुरवठा विभागाचे अधिकारी कारेकरे यांच्याकडे तक्रार करण्यात आली. परंतु, त्यांनीही अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्याची सूचना केली. या वादग्रस्त गोदामाचा मालक राजेश चंदकांत ठक्कर आणि नीलेश चंदकांत ठक्कर यांना वाचविण्यासाठी पोलीस जीवाचा अटापिटा करत होते, असा आरोप मनसेचे नेते राजन राजे यांनी केला आहे. त्याशिवाय नारपोली पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी गेलेल्या या मनसेच्या चार पदाधिकाऱ्यांनाच खंडणीच्या गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्नही पोलिसांनी केला. परंतु, हे प्रकरण नारपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील असतानाही या चार पदाधिकाऱ्यांना शांतीनगर पोलीस स्टेशनात बसवून ठेवण्यात आले होते. 'यावेळी पोलिसांनी आम्हाला धक्काबुक्की करून मोबाइल जप्त केले', असा आरोपही सचिन शेट्टी यांनी केला आहे. या प्रकारामुळे संतापलेल्या मनसेच्या कार्यर्कत्यांनी पोलिसांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. त्यानंतर या वादग्रस्त गोदामावरील कारवाई सुरू झाली आहे. या गोदामाला सील ठोकण्यात आले आहे. 'पोलिसांकडे आमचे हप्ते बांधलेले आहेत. त्यामुळे आमच्यावर कुणीही कारवाई करू शकत नाही, असे बिनधोकपणे सांगणाऱ्या ठक्कर बंधू यांनी मला मारण्याची धमकीही दिली', असे या प्रकरणाच्या पंचनाम्यातील साक्षीदार आणि मनसेचे पदाधिकारी विक्रांत कणिर्क यांनी सांगितले. तशी लेखी तक्रारही कणिर्क यांनी केली आहे. मुदत उलटलेला माल पुन्हा बाजारात विकून लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा प्रकार आहे. पोलिसांच्या संगनमताने हा सर्व प्रकार सुरू असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे मनसेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 'या प्रकरणातील दोषींवर कारवाई झाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', असा इशारा राजन राजे यांनी दिली आहे.

Tuesday, January 5, 2010

गूगल ची मोबाइल अप्लिकेशन

मित्रानो, मागच्या आठवड्यात गोव्याला गेलो होतो आणि जाताना ड्राइविंग साठी माझ्या मोबाइल फ़ोन वर गूगल चे मँप डाउन लोड केले होते। मी तसा गूगल माप अमेरिकेत ड्राइव करताना नेहमी वापरतो पण भारतात त्याचा काही उपयोग होइल का याबाबत शंका होती आणि नेहमी प्रमाणे गूगल ने नाव ठेवण्यास जागा ठेवली नाही। अतिशय सुन्दर अशी ही युटीलीटी भारतात देखिल मस्त पणे रस्ता दाखवत होती आणि मला जागा शोधायला जरा देखिल त्रास झाला नाही। म्हणून म्हटलं तुमच्या सोबत शेयर करावे हे मोबाइल अप्लिकेशन। तुम्ही मोबाइल साठी गूगल मँप डाउन लोड करू शकता http://www.google.co.in/mobile/blackberry/maps.html ह्या संकेत स्थळा वरून। गूगल मँप मधे बऱ्याच सुविधा आहेत ज्या मुळे तुम्ही तुमचं स्थान बघू शकता , कुठे जायचं आहे त्या ठिकानाचे डायरेक्शन बघू शकता आणि बरच काही .... वापरून तर बघा, मग कळेल आपोआप। पण हो, त्याकरता मात्र स्मार्ट फ़ोन असनं आवश्यक आहे ज्यामधे GPRS ची सुविधा असेल असा।

विनोद शिरसाठ