Wednesday, January 6, 2010

रणजीमध्ये मुंबई अंतिम फेरीत

Wednesday, January 06, 2010 AT 05:54 AM (IST)

मुंबई - मुंबई आणि दिल्ली यांच्यात ब्रॅबोर्न स्टेडिअमवर सुरु असलेल्या रणजी स्पर्धेतील उपांत्य सामन्यात पहिल्या डावाच्या अधिक्‍यावर विजय मिळवित मुंबई संघाने अंतिम फेरीत स्थान मिळविले.मुंबईने पहिल्या डावात अभिषेक नायरच्या दिडशतकाच्या जोरावर पाचशे धावांचा डोंगर उभारला होता. यापुढे दिल्लीचा डाव रमेश पोवारने मिळविलेल्या पाच बळींमुळे अवघ्या २११ धावांत आटोपला. यामुळे मुंबईने पहिल्या डावात २८९ धावांची आघाडी मिळविली. दुसऱ्या डावात मुंबईला मोठी धावसंख्या उभारता आली नाही व त्यांच्या डाव १८७ धावांत संपुष्टात आला. यामुळे दिल्लीला विजयासाठी ४७६ धावांचे कठीण आव्हान होते. आज शेवटच्या दिवशी दिल्लीने ४ गडी गमावत १६० धावा करत सामना अनिर्णित राखला. मात्र, पहिल्या डावाच्या अधिक्‍यावर मुंबईने अंतिम फेरीत स्थान मिळविले

No comments:

Post a Comment