Friday, July 22, 2011

मनसे आमदार दालनाबाहेरच!

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले महिनाभर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वेळ मागत होतो. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट मागितली व ती त्यांनी तातडीने दिली. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्याच विषयावर चर्चा असल्याने पवार यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांकडे चचेर्साठी गेलो. मुख्यमंत्र्यांनी भेट सोडाच, उलट दालनात बसवून ठेवले, असा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला. तर आपण चचेर्साठी बोलविले होते. पण ते निघून गेले, असा खुलासा मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.

पाचवेळा मी गिरणगावातून निवडून येत असल्याने आम्हाला गिरणी कामगारांच्या प्रश्ानंची जाण आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेले महिनाभर आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागत होतो. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. त्यांनी चचेर्ची वेळ दिली. त्यानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याने त्यांचे गिरणी कामगारांच्यावतीने आभार मांडण्यासाठी बुधवारी मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे कळताच मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने गुरुवारी गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात बैठक लावली, गुरुवारी उपमुख्यमंत्री पवार यांचा आम्हाला फोन आला, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, तुम्ही प्रथम त्यांच्यापुढे गिरणी कामगारांचे प्रश्न मांडा, असे त्यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो, असे नांदगावकर म्हणाले.

..........................................

मुख्यमंत्री काय चेस खेळतात?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गिरण्यांच्या प्रश्नांवर मनसेच्या आमदारांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही. आमदारांचा अवमान करतात. परंतु त्यांचा अवमान करण्याची संधीही आम्हाला मिळेल, असा टोला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला. मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नासाठी वेळ देत नाहीत तर ते काय वर्षा बंगल्यावर चेस खेळत असतात की काय, अशी खोचक टीका राज यांनी केली.



No comments:

Post a Comment