Monday, July 18, 2011

उस्मानीच्या चौकशीत गैर काय? - राज ठाकरे

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..........................


फैज उस्मानी जेलमध्ये असलेल्या एका दहशतवाद्याला सातत्याने भेटत होता. अशा परिस्थितीत मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी संशयावरुन फैजची चौकशी केली तर त्यात गैर काय? ... या फैजचा अबू आझमी यांना एवढा कळवळा का ?गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचीच अबू आझमी यांना एवढी सहानूभूती का वाटते ?, असे सवाल आज (सोमवारी) राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

मुंबईत घडणा-या गुन्ह्यांमध्ये ७० ते ८० लोकं उत्तर प्रदेश आणि बिहार पट्ट्यातील असतात. तिथून दररोज ४८ गाड्या मुंबईत येतात. अशा परिस्थिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येणा-या लोंढ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचे राज यांनी सांगितले.

दहशतवादी कारवाया रोखायच्या असतील तर मुंबईत बाहेरुन कोण येतं ? , का येतं ?हे बघायलाच पाहिजे. दहशतवाद्याच्या संपर्कात असलेल्या फैज सारख्याची बाजू घेणा-या अबू आझमीचीच चौकशी व्हायला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

दहशतवाद रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम हवीच. ही यंत्रणा सक्षम करण्याची जबाबदारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीच आहे. जर ते आपलं काम योग्य प्रकारे करत नसतील तर त्यात लक्ष घालण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे.

मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कमी आहेत. त्यांच मनुष्यबळ वाढवायला हवं हे गृहमंत्र्यांना माहिती आहे. मग एवढे दिवस ते काय करत होते ? ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडे बॉम्ब शोधक पथक नाही. समुद्रात गस्त घालायला स्पीड बोट आहेत पण पेट्रोल नाही. ही अशी परिस्थिती निर्माण होईपर्यत गृहखातं काय करत होतं ? , अशा शब्दात राज यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

गृहखातं कोणाकडे आहे यापेक्षा ते कशा प्रकारे काम करतं हे महत्त्वाचं आहे. गृहमंत्री राष्ट्रवादी ऐवजी काँग्रेसचा असता तर काय दहशतवादी घाबरणार होते ? साखर कारखाने आणि सूत गिरण्या चालवणे, एकमेकांची उणीदुणी काढणे हे असलं राजकारण करण्यापेक्षा सुरक्षा यंत्रणा मजबूत करा. दहशतवादाशी लढायच असेल, देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारायची असेल तर आधी अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा करा, असे राज यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment