Monday, July 18, 2011

बातमी लिहिण्याचे धडे देणार राज ठाकरे

खालील लेख स्टार माझा च्या सौजन्याने ......



मुंबईत बॉम्ब स्फोट झाल्यावरही परप्रांतीयांवर आसूड उगारणाऱ्या ‘संपादक’ राज ठाकरे यांनी बातमी कशी लिहावी, कशी समजून घ्यावी याचे धडे आज पत्रकार परिषदेत दिले. मुंबईतील बॉम्ब स्फोट हे परप्रांतीयामुळेच होतात, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.
raj thackeray
raj thackeray
मुंबईत १३ जुलैला झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर हे बॉम्ब स्फोट परप्रांतीयांमुळेच झाले असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. या वृत्ताचा मीडियाने विशेषतः हिंदी चॅनल्सने कसा विपर्यास केला या संदर्भात स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले.
मुंबईत झालेले बॉम्ब स्फोट हे उत्तर भारतीयांमुळे नाही तर त्या येणाऱ्या लोंढ्यामुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यात सर्व उत्तर भारतीयांना मी दोषी धरत नाही. परंतु आज उत्तर भारतातून ४८ रेल्वे मुंबईत येतात. कोण येतो, कुठं जातोय. कोणाचा कोणाला थांगपत्ताच नाही. त्यात दहशतवादीही आले असतील, याचा कोणी विचार केलायं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी प्रतिक्रिया दिल्यानंतर यांचं टायमिंग चुकलंय. आता लोंढ्याचं राजकारण करण्याची गरज आहे का, अशा बातम्या छापून आल्या. मी काय म्हटलो, हे नीट समजून न घेता विनाकारण बातम्या ट्विस्ट करून दिल्या जातात. बातमी नीट समजून घ्या, असाही संपादकीय सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

अबू आझमीची चौकशी करा
बॉम्ब स्फोटांच्या वेळीच या अबू आझमीला उत्तर भारतीयांचा का कळवळा येतो. त्याच वेळी तो प्रतिक्रिया द्यायला येतो. पोलिसांच्या तपासला वेगळे वळण देण्यासाठी अबू आझमी हे उद्योग करतो. पहिले त्याची चौकशी करा. यापूर्वीही बॉम्ब स्फोटाप्रकरणी त्याची चौकशी झाली आहे. सरकारने अशा गोष्टीकडे लक्ष न देता पोलिसांना तपासाचे स्वातंत्र्य द्यावे, अशीही सूचनाही त्यांनी यावेळी केली.

गृह खाते काँग्रेसकडे असते तर दहशतवादी घाबरले असते
गृहखाते राष्ट्रवादीला देणे घोडचूक होती, या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरे म्हटले. गृहखाते काँग्रेसकडे असते तर काय दहशतवादी घाबरले असते. नको नको बाबा, गृहखाते काँग्रेसकडे आहे. असे म्हटले असते. स्वतःच्या अपयशाचे बोट दुसऱ्याकडे दाखवण्याचा प्रकार आहे. सत्ता तुमची आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहेत, असे दुसऱ्याकडे बोट दाखवणे योग्य नाही.

कामतांना नंतर सुचलेले शहाणपण
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री गुरूदास कामत यांच्यावरही टीकेची झोड उठवत राज ठाकरे म्हणाले, कामत यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना आता राज्य सरकारचं अपयश दिसत आहे. त्यांना नंतर सुचलेले शहाणपण आहे.

आर. आर. आबा लक्ष कुठेयं
काल एका वर्तमान पत्रात पोलिसांची उलटी पडलेली स्पीड बोट पाहिली. तसेच ठाण्याच्या पोलिसांकडे बॉम्बचा सूट नाही. हे आर. आर. पाटील करतायं काय त्याचं कुठे लक्ष आहे. पक्षाच्या अंतर्गत राजकारणातचं त्यांचं लक्ष दिसतयं, असा टोलाही त्यांना लगावला.

पोलिस भरती करतायं का कपडे शिवताहेत

पोलिसांची संख्या कमी आहे. दरवेळा ओरड असते. पोलिसांची भरती होते, तेव्हा छाती फुगवलेल्या तरुणाचे फोटो छापून येता. कुठे गेल्या त्या छात्या. असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, पोलिस भरती करताहेत का छात्यांची मापं घेऊन कपडे शिवताहेत. पोलिसांमध्ये माणसं भरू शकत नसाल, तर काय करताहेत तुम्ही. याचं लक्ष फक्त सूत गिरण्या, साखर कारखान्यांमध्ये आहे. बाकीकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही.

मायवती आपल्या घराकडे लक्ष द्या

मायवतींना आपले राज्याकडे लक्ष द्यावे, त्यांना बोलायला काय जातं आहे. माझ्या टीका करण्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष द्या. मायावती म्हणतात, मुंबईत उत्तर भारतीयांना लोकांना घरं दिले पाहिजे, मग तुम्ही द्या घरं. स्वतः सत्तेवर बसायचं आणि दुसऱ्याला बोलायचं.

नीतिश कुमारांच कौतुक
नीतीश कुमार यांनी केला ना बिहारचा विकास. बिहारमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. औद्योगिक विकास केला, असे कौतुक राज ठाकरे यांनी केले आहे.

1 comment:

  1. मान्य. खूप योग्य मुद्दा होता. पण या मिडीयाने त्याची वाट लावली. राज ठाकरेंचे म्हणणे काय आहे, ते समजून न घेता, त्यातून स्वतःला वाटेल तो अर्थ काढला, आणि टिआरपी मिळवला.
    मी पण नेमका हाच मुद्दा मांडला आहे माझ्या ब्लॉग वर पण.

    ReplyDelete