नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सोयी-सुविधांचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुण्याची वाट पाहात थांबू नका, काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करा आणि मोकळे व्हा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.
पुणे महापालिकेतर्फे प्रभाग क्र. ६३ वनाज कंपनी भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या कै. सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महापौर मोहनसिंग राजपाल, मनसेचे पालिकेतील गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक किशोर शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.
' पुणे शहराच्या गरजा वाढत आहेत. याचे भान सर्व पक्षांनी ठेवायला हवे. शहरातील नागरिकांना मैदाने, बागा आदी सुविधा मिळाल्या नाहीत तर वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील रोगराईही वाढेल. त्यामुळे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. पालिकेकडून नागरिकांसाठी उभारण्यात येणा-या सुविधांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्याची प्रतीक्षा न करता त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करा,' असे ठाकरे यावेळी म्हणाले.
' महापालिकेच्या राखीव असणाऱ्या जागांवर बागा, मैदाने करा. नागरिक सर्व प्रकारचे कर भरता आहेत, त्यांच्या मोबदल्यात त्यांना शुल्लक गोष्टी मिळत नसतील तर ती सत्ता चाटायची आहे का? निवडणूक लढवून उपयोग काय?,'असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुण्या-मुंबईत बिल्डर मोठ्या सोसायट्या उभ्या करताना त्याठिकाणी बाग, स्विमिंग पूल, जॉगिंग टॅक या सुविधा देऊ असे सांगतात. वास्तविक पाहाता या सुविधा महापालिकेने द्यायला हव्यात मात्र, ते बिल्डरला विकावे लागत आहे. पुणे आता मोठे शहर होत आहे. अनेक भागातले लोक पुण्यात राहायला येत आहेत. लोकसंख्या आणि वाढत्या रोगराईमुळे हॉस्पिटल हा धंदा म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी मातीत मिसळा....
महापौरासारखी मराठी मातीत मिसळणारी माणसे हवीत. जी माणसे मराठी संस्कृती समजून घेत नाहीत त्या माणसांना कुठे लाथ मारायची हे माहीत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.
पुणे महापालिकेतर्फे प्रभाग क्र. ६३ वनाज कंपनी भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या कै. सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महापौर मोहनसिंग राजपाल, मनसेचे पालिकेतील गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक किशोर शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.
' पुणे शहराच्या गरजा वाढत आहेत. याचे भान सर्व पक्षांनी ठेवायला हवे. शहरातील नागरिकांना मैदाने, बागा आदी सुविधा मिळाल्या नाहीत तर वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील रोगराईही वाढेल. त्यामुळे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. पालिकेकडून नागरिकांसाठी उभारण्यात येणा-या सुविधांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्याची प्रतीक्षा न करता त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करा,' असे ठाकरे यावेळी म्हणाले.
' महापालिकेच्या राखीव असणाऱ्या जागांवर बागा, मैदाने करा. नागरिक सर्व प्रकारचे कर भरता आहेत, त्यांच्या मोबदल्यात त्यांना शुल्लक गोष्टी मिळत नसतील तर ती सत्ता चाटायची आहे का? निवडणूक लढवून उपयोग काय?,'असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुण्या-मुंबईत बिल्डर मोठ्या सोसायट्या उभ्या करताना त्याठिकाणी बाग, स्विमिंग पूल, जॉगिंग टॅक या सुविधा देऊ असे सांगतात. वास्तविक पाहाता या सुविधा महापालिकेने द्यायला हव्यात मात्र, ते बिल्डरला विकावे लागत आहे. पुणे आता मोठे शहर होत आहे. अनेक भागातले लोक पुण्यात राहायला येत आहेत. लोकसंख्या आणि वाढत्या रोगराईमुळे हॉस्पिटल हा धंदा म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.
मराठी मातीत मिसळा....
महापौरासारखी मराठी मातीत मिसळणारी माणसे हवीत. जी माणसे मराठी संस्कृती समजून घेत नाहीत त्या माणसांना कुठे लाथ मारायची हे माहीत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.


कल्याण डोंबिवली पालिकेला राष्ट्रपतींच्या हस्ते एक पुरस्कार मिळणार असून तो पुरस्कार आपण स्वीकारणार आहोत एवढेच मला माहिती होती. पुरस्कार स्वीकारण्याच्या व्यासपीठावर जाईपर्यंत तो पुरस्कार कसला आहे. हे आपणास माहिती नव्हते. आताच्या रस्त्यांसाठी तो पुरस्कार असता तर आपण त्याचा विचार केला असता. शेवटी महामहिम राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार वितरण असल्याने आपण त्या पुरस्काराची विचारणा केली नाही, असे महापौर वैजयंती गुजर यांनी अहमदाबाद येथून ‘ठाणे वृत्तांत’शी मोबाईलवरून बोलताना सांगितले.
महापालिका निवडणुकांच्या तोंडावर कल्याण-डोंबिवली परिसरातील रस्त्यांना ‘सिंगापूर टच’ देण्याच्या वल्गना करत कोटय़वधी रुपयांचा खर्च करणाऱ्या महापालिकेतील अभियांत्रिकी विभागाचे पितळ आता उघडे पडू लागले असून अवघ्या दोन वर्षांपूर्वी तयार केलेले चकाचक रस्ते यावर्षी पहिल्याच पावसात शरपंजरी पडल्याचे चित्र दिसू लागले आहे. दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विकास योजनेच्या माध्यमातून साधारण दोन वर्षांपूर्वी महापालिकेने डोंबिवली स्थानक, मानपाडा, मुरबाड रोड भागांत रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न केला. याच रस्त्यांच्या जोरावर अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून थेट देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पुरस्कारही पदरात पाडून घेतला. प्रत्यक्षात जे रस्ते पाहून या पुरस्काराकरिता शिफारस करण्यात आली, त्यापैकी बहुतांश रस्त्यांची वर्षभरातच खराब अवस्था झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते मोठय़ा ऐटीत पुरस्कार स्वीकारणाऱ्या महापौर आणि आयुक्तांवर सध्या नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होऊ लागली आहे.
२००९-१० या काळात कल्याण-डोंबिवली पालिकेने चांगले रस्ते केल्याबद्दल पालिकेला अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा ‘नागररत्न’ पुरस्कार राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते नुकताच मिळाला. हा काळ साधारपणे महापालिका निवडणुकीचा होता. शहरातील रस्ते चहूबाजूंनी पोखरले गेल्याने सत्ताधारी चांगलेच अडचणीत सापडले होते. याच काळात जवाहरलाल नेहरू अभियानाचा ‘ताजा’ पैसा उपलब्ध होत असल्याने माजी आयुक्त गोविंद राठोड यांच्या पुढाकाराने शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांना नवा मुलामा चढविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या खाद्यांवर बंदुक ठेवण्यापेक्षा हिम्मत असेल तर मनसेने माझ्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढावीत असे प्रतिआव्हान देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज ठाकरे यांच्यासमोर शड्डू ठोकले. मात्र, अण्णांच्या खांद्यावर बंदुक ठेवण्याची गरज नाही, तुम्हाला पोहोचवायला आमचे खांदे भक्कम आहेत, असा टोला राज ठाकरे यांनी लगावल्याने, आता राज-दादा यांच्यात जुंपणार, अशी चिन्हे स्पष्ट झाली आहेत.

