Tuesday, May 11, 2010

मुंबईच्या पाण्यात राज ठाकरे यांची उडी

म टा च्या सौजन्याने ......


11 May 2010, 1142 hrs IST

कुणाचे रक्त काढून घेण्यापेक्षा पाणीप्रश्नासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर लक्ष द्या.. असा उपदेश करण-या राज ठाकरे यांनी आज मुंबईच्या पाणीप्रश्नामध्ये थेट लक्ष घातले. महापालिका आयुक्तांची भेट घेऊन हा प्रश्न कसा सोडवता येईल यावर सविस्तर चर्चा केली.

काही दिवसांपूर्वी नवी मुंबईला जाताना राज ठाकरे यांनी वाटेत पाणीचोरी पकडून दिली होती. त्यादिवसानंतर राज यांनी पाणीप्रश्नावर आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली असून आज त्यांनी या आंदोलनाबद्दल आयुक्तांना भेटून आपली भूमिका स्पष्ट केली. मंगळवारी सकाळी राज यांनी मुंबई महापालिकेत येऊन आयुक्त स्वाधीन क्षत्रीय यांना मनसेतर्फे प्रस्ताव सादर केला.

या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना राज म्हणाले, की दिवसेंदिवस मुंबईचा पाणीप्रश्न बिकट होत चालला आहे. शहराला पाणीपुरवठा करणा-या तलावांमध्ये असलेला पाणीसाठा कमी होत चालला आहे. जर पावसाळा लांबला तर पाणीटंचाई जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे याबाबत आत्ताच काहीतरी करणे आवश्यक असल्याने आम्ही ही भेट घेतली.

मुंबईत जा पाऊस पडतो ते पाणी अक्षरशः गटारामध्ये वाया जाते. हे पाणी आपण वाचवू शकलो तर मुंबईच्या पाणीटंचाईवर निश्चित स्वरुपात मात करता येईल. ' रेन वॉटर होर्वेस्टिंग ' हा अत्यंत सोपा आणि परिणामकारक उपाय प्रत्येकाने राबवण्याचा आग्रह महापालिकेने धरावा अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आल्याची माहिती यावेळी राज यांनी दिली.

शहारातील प्रत्येक इमारतीमध्ये ही यंत्रणा अमलात आणायला हवी. महापालिकेच्या मैदानांमध्येही ही योजना अत्यंत प्रभावीपणे राबविता येईल. त्यासाठी मनसे पक्ष म्हणून जे जे काही करता येईल. सध्या मुंबईत टँकरमाफियांचे राज्य सुरू असून विहिरीतल्य पाण्यासाठी लोकांची लूट केली जात आहे. ती रोखण्यासाठी पाण्याचा नियमित पुरवणा हेच उत्तर ठरेल असे राज यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment