Wednesday, May 5, 2010

शिवसेना, भाजपने बदलला ट्रॅक

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......

विनोद


म. टा. खास प्रतिनिधी मुंबई
5 May 2010, 0432 hrs IST

उपास... आधी पास, मग नापास

लक्षावधी मुंबईकरांना वेठीस धरणाऱ्या मोटरमेनचे उपास आंदोलन आधी 'पास' ठरवून नंतर 'नापास' ठरवण्याचा चमत्कार शिवसेना तसेच भारतीय जनता पक्षाने साधला असला तरी अचानक ट्रॅक बदलूनही प्रवाशांची टीकाच झेलण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

रेल्वे मोटरमेनचे आंदोलन मुळात सुरू झाले ते शिवसेच्या पुढाकाराने. नंतर त्यात भारतीय जनता पक्षानेही उडी घेतली. आंदोलनर्कत्या मोटरमेनना भेटून त्यांच्या मागण्यांचे समर्थन करण्याइतपत त्यांची गाडी पुढे गेली होती. मात्र या आंदोलनामुळे लक्षावधी मुंबईकरांचे शिव्याशाप मोटरमेनना मिळत असल्याचे चित्र सोमवारी रात्रीपासूनच दिसू लागले. त्याचे स्वच्छ प्रतिबिंब मंगळवारी मीडियात उमटले आणि सर्वप्रथम शिवसेनेने मोटरमेनच्या पाठिंब्याचा झेंडा खाली खेचला.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तसे निवेदनच जारी केले. मोटरमेननी संप तत्काळ मागे घ्यावा व रेल्वे गाड्या पूर्ववत रुळांवर आणून जनतेचे हाल थांबवावेत, असे आवाहन त्यांनी केले. आपण स्वत: जनतेच्या बाजूने असून मोटरमेनच्या संपाला शिवसेनेचा पाठिंबा नाही, असे त्यांनी स्पष्ट केलेे.

रेल्वे गाड्या म्हणजे मुंबईची लाइफलाइन. मोटरमेन संपामुळे ही लाइफलाइनच कोलमडली. मोटरमेनच्या मागण्या कितीही न्याय्य असल्या तरी जनता अफाट आहे, अथांग आहे. त्या जनतेचा विचार सर्वप्रथम करावा लागेल. जनता खवळल्यास संपूर्ण प्रकारास घाणेरडे वळण लागेल व महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल, असे शिवसेनाप्रमुखांचे निवेदन सांगते. मी फक्त जनतेच्याच बाजूचा असून मला सध्या सुरू असलेले जनतेचे हाल पाहवत नाहीत. खास करून जनतेसाठी व रेल्वे मोटरमेनना हवे असल्यास त्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी मी सरकारशीही दोन हात करीन, अशी ग्वाहीही शिवसेनाप्रमुखांनी त्यात दिली.

शिवसेनाप्रमुखांच्या या आदेशाची माहिती कळताच संसदेत शिवसेनेच्या खासदारांनी केंद सरकारवर तोंडसुख घेतले. याच आंदोलनर्कत्यांना पक्षाने केवळ काही तासांपूवीर् पाठिंबा दिला होता, या भावनेचा लवलेशही त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता!

महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी उपास आंदोलनाला पाठिंबा दिला असताना, संसदेतील या पक्षाचे उपनेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेमंत्री ममता बॅनजीर् याच जणू आंदोलनास जबाबदार असल्याच्या अविर्भावात त्यांच्यावर टीकास्त्र सोडले. नंतर संसदेबाहेरही युतीचे खासदार असाच सूर आळवीत होती.




No comments:

Post a Comment