Tuesday, May 11, 2010

मनसेने राखला सेनेचा गड

आम्ही मनसे ने शिवसेनेला केलेल्या मतदानाचे समर्थनच करतो .... हाच अंकुश राजसाहेबांना हवा होता ... ह्या अंकुशाच्या सहायाने अंबरनाथ चा विकास व्हावा हीच इच्छा ...

आपला

विनोद


म टा च्या सौजन्याने ......


11 May 2010, 0333 hrs IST

मराठी अस्मितेच्या मुद्द्यासाठी एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकणाऱ्या शिवसेना आणि मनसेने अंबरनाथ नगरपरिषदेतील नगराध्यक्षाच्या निवडणुकीत एकमेकांच्या गळ्यात गळे घालून एक नवा अध्याय सुरू केला आहे. या निवडणुकीत मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली असली तरी त्यांचे नगरसेवक तटस्थ राहतील किंवा काँग्रेसच्या पारड्यात आपले मत टाकतील, असे दावे केले जात होते. मात्र, ते सारे दावे खोटे ठरवत मनसेच्या मदतीने शिवसेनेचे सुनील चौधरी नगराध्यक्ष झाले आहेत.

गेली १५ वषेर् अंबरनाथ नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता आहे. परंतु, गेल्या महिन्यात झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळविता आले नाही. शिवसेना-भाजप युतीपेक्षा (१६) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे (२०)जास्त उमेदवार निवडून आल्याने त्यांना सत्ता स्थापन करण्याची संधी जास्त होती. परंतु, निवडून आलेल्या सात अपक्षांपैकी एकालाही आपल्या बाजूने वळविण्यात काँग्रेस आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना यश आले नाही. त्याउलट शिवसेनेचे जिल्हा संपर्क नेते आ. एकनाथ शिंदे, नरेश म्हस्के, आनंद परांजपे यांनी रात्रंदिवस मेहनत घेऊन शिवसेना, मनसे आणि अपक्षांची मोट बांधून पुन्हा सत्ता प्रस्थापित करण्याचा चमत्कार करून दाखविला आहे. मनसेने मदत केली नाही तर राष्ट्रवादीच्या काही नगरसवेकांना मतदानास गैरहजर राहून शिवसेनेला सत्तास्थानी पोहोचवण्यात मदत करण्याचा प्लॅनही आखण्यात आला होता. मात्र, मनसेनेच मदत केल्याने शिवसेनेचे काम सोपे झाले. ५० नगरसेवकांच्या अंबरनाथ नगरपरिषदेवर सत्ता स्थापन करण्यासाठी २६ नगरसेवकांच्या पाठिंब्याची गरज आहे. शिवसेनेच्या चौधरी यांनी ३० मते मिळविली.

शिवसेना आणि मनसे यांचे संबंध विळ्या-भोपळ्याचे आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे वादही विकोपाला गेले आहेत. अशा परिस्थितीत मनसे शिवसेनेसोबत जाणे केवळ अशक्य असल्याचे दावे काँग्रेस आघाडीच्या नेत्यांकडून केले जात होते. मनसेची भूमिका अंबरनाथ नगराध्यक्षाच्या निवडणुकीत महत्त्वाची असली तरी त्यांना काँग्रेस आघाडीशिवाय पर्याय नाही, अशा भ्रमात आघाडीचे नेते होते. परंतु, सोमवारी मनसेने हा भ्रमाचा भोपळा फोडला. 'आम्ही काँग्रेसच्या मागे फरफटत जाऊ, असा त्यांचा समज होता. परंतु, आम्हाला कुणीही गृहित धरू नये, हे आम्ही दाखवून दिले आहे', असे मनोज चव्हाण यांनी सांगितले.

अंबरनाथचा विकास या एकमेव मुद्द्यावर मनसेने शिवसेनेच्या उमेदवाराला मतदान केल्याची माहिती मनसेचे नेते मनोज चव्हाण यांनी सांगितले. मनसेचे निवडणुकीपूवीर् शहराच्या विकासाचा एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यानुसार शहरात कामे करावीत, अशी अटही शिवसेनेला पाठिंबा देण्यापूवीर् मनसेने घातल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. अंबरनाथला नाट्यगृह, खेळासाठी मैदाने, बागा, अंबरनाथ पूवेर्ला स्मशानभूमी अशी मनसेने आश्वासन दिलेली अनेक कामे त्यामुळे मागीर् लागतील, असे चव्हाण यांनी सांगितले. मनसेने शिवसेनेला मतदान केले असले तरी मनसेचे नगरसेवक सत्तेतील कोणतेही पद घेणार नाहीत. आम्हाला दिलेल्या आश्वासनानुसार शिवसेनेने काम केले नाही तर त्यांचा पाठिंबा काढून घेण्याचा पर्याय आमच्याकडे आहे, असेही त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment