Wednesday, February 3, 2010

स्टार माझा वरील संदीप रामदासीचां ब्लॉग

मित्रानो , स्टार माझा वर संदीप रामादासीचां एक चांगला ब्लॉग वाचला त्याच नाव आहे "नशीबवान राहुल गांधी " । हा ब्लॉग खालील लिंक वर बघता येइल ।
http://www.starmajha.com/MajhaBlog.aspx?BlogID=1473

Tuesday, February 2, 2010

वा अशोकराव, चांगले पांग फेडलेत महाराष्ट्राचे ......

अशोकराव, फार चांगले पांग फेडत आहात तुम्ही आमचे, ह्याच करता तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मत्रीपद दिले गेले ? जर पर प्रातिंयानां सरक्षण देण्याकरता तुमच सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे तर मग सामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय? महागाई , सुरक्षा , रस्ते , इस्पितळ , मुलभुत सोई सुविधा , पानी प्रश्न ह्यांना कधी प्राधान्य देणार? एक लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मंत्रिपद दिलेले आहे ते इथील लोकांचे प्रश्न सोडवन्या करीता , ते काम तुम्ही कधी करणार आणि त्याला प्राधान्य कधी देणार? हा सर्व प्रकार अतिशय घ्रुनास्पद होत चालला आहे आणि तुम्ही लोक मराठी जनतेच्या सहनशिलतेचा अंत बघत आहात, हे नक्की।

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्रात येणा-या परप्रांतियांच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवारी) मुंबईत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मराठी अस्मितेचे राजकारण करणा-या शिवसेना-मनसेला आक्रमक होण्याची आणखी एक संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार दौ-यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी मिडियाशी बोलताना २६ / ११च्या हल्ल्यातून बिहारींनी मुंबईला वाचवले, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेना-मनसे या प्रादेशिक पक्षांकडून जाहीर विरोध करण्यात आला. सुरक्षा पथके देश रक्षणासाठी आहेत, त्यांचा प्रादेशिक अस्मितेशी संबंध जोडणे देशहिताचे नाही, असे म्हणणा-या शिवसेनेने बिहारींचे लांगुलचालन करणा-या राहुल गांधींवर टीका केली होती. राहुलने शहिदांचा अपमान केला असे सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या संरक्षणासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार परप्रांतियांच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देईल, असे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिडियाशी बोलताना ज्यांना मराठी लिहिता , बोलताआणि वाचता येते अशांना नवे टॅक्सी परवाने देण्याची घोषणा केली होती . त्यांच्या यावक्तव्याचा उत्तर भारतीय नेत्यांनी विरोध केला आणि २४ तासांच्या आतमुख्यमंत्र्यांनी घूमजाव केले होते . त्या पाठापोठ आता परप्रांतियांच्या रक्षणालाप्राधान्य देण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली आहे .

राहुल, हा तर महाराष्ट्राचा अपमान

काल रात्रीच्या बातम्या बघितल्या आणि नंतर आज सकाळचे वर्त्तमान पत्र वाचली आणि आमचं तर डोकच फ़िरलं। आम्हाला राहुल गांधीन बद्दल आणि त्यांच्या प्रगल्भते बद्दल आशा होती पण त्यानीं ती पर धुळीला मिळवली । त्यांच्या म्हणन्या प्रमाने मराठी माणुस मुंबई च रक्षण करू शकत नाही आणि आम्हाला यु पी , बिहारच्या लोकांची मदत घ्यावी लगते । हा तर २६/११ च्या लढ्यात शहीद झालेल्या लोकांचा अपमान आहे , ह्या लढ्यात असख्यं स्थानिक लोकानी प्रशासनास मदत केली त्यांचा अपमान आहे आणि हा उभय महाराष्ट्राचा अपमान आहे। त्यांनी जर इतिहास तपासून पहिला तर त्यांना कळेल की ह्या महाराष्ट्राने आणि सह्याद्रिने दिल्लीचे तख्त राखले आहे आणि परकीय आक्रमनाला आपल्या पराक्रमाने परतवून लावले आहे । जर NSG कमांडो चा बेसच दिल्लीला आहे आणि राज्य स्तरावर जर अशी यंत्रणा नाही तर महाराष्ट्रातील पोलिसानां किवां राज्य शासनाला दिल्लीची मदत घ्यावीच लागणार त्यात प्रांतवाद आला कुठे? हे तर केंद्र शासनाचा अपयश आहे की त्यानी राज्य स्तरावर अशी यंत्रणा उभी नाही केली आणि केंद्रात , राज्यात तर ह्यांचच सरकार आहे । राहुल गांधीनी उभ्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे हे निच्छित आणि हे आम्ही विसरणार नाही ।

म टा च्या सौजन्याने
2 Feb 2010, 0115 hrs IST
२६/११च्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, यूपीच्या एनएसजी कमांडोंनी! - राहुल

शिवसेना व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील वादाने 'मराठी मुंबई'चा मुद्दा नव्याने ऐरणीवर आला असताना काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधी यांनी त्यात उडी घेतली। '२६/११ रोजी मुंबईवर भीषण हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान कुणी घातले? बिहार, उत्तर प्रदेशच्या एनएसजी कमांडोंनी. त्यामुळे दहशतवाद्यांशी लढायचे तर बिहारींना मुंबईतच राहू दे' असे धक्कादायक उद्गार राहुल यांनी बिहारमध्ये काढले.

एनएसयूआयच्या सदस्यांशी राहुल यांनी सोमवारी येथे संवाद साधला। त्यादरम्यान मुंबई व मराठीचा मुद्दा उपस्थित झाला असता राहुल गांधींची गाडी अचानक २६/११वर घसरली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सातत्याने बिहारींना मुंबईतून हाकलून द्या, अशी भाषा करीत असतात. मुंबईवरील हल्ल्याचेवेळी छातीचा कोट करून बिहार, उत्तर प्रदेश व देशाच्या इतर राज्यांतील एनएसजी कमांडोंनी मुंबईला, मुंबईकरांना वाचवले. त्यावेळी 'बिहारींना हाकला' अशी मागणी राज यांनी केली नाही, असे उद्गार राहुल यांनी काढले. बिहारमध्ये या वषीर् विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या डोळ्यांसमोर ठेवून राहुल यांनी हे वक्तव्य केल्याचे मानले जात असले तरी मुंबई-महाराष्ट्रात त्याचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत......... ......

आथिर्क राजधानी कुणाची? उत्तरांना जोर

मराठी मुंबईच्या मुद्द्यावर सोमवारी राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत होत्या। 'मुंबई सगळ्यांची आहे. मुंबईतील उत्तर प्रदेशींना संघाचे स्वयंसेवक संरक्षण देतील' या संघाच्या पवित्र्याचा शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'संघाने मुंबईची उठाठेव करू नये' असे सांगत चांगलाच समाचार घेतला; तर 'जन्माने मराठी असलेल्यांनाच महाराष्ट्रात नोकऱ्यांमध्ये प्राधान्य मिळाले पाहिजे' असे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बजावले. भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी, देशाच्या कोनाकोपऱ्यात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय नागरिकाला देशभरात कोठेही जाण्याची मुभा आहे. भाजप आणि शिवसेनेत काही मुद्द्यांवर मतभेद असू शकतात, अशी भूमिका घेतली. समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी संघाच्या या मुद्द्यावरील भूमिकेला मात्र पाठिंबा दिला. मुंबईत राहण्याचा, काम करण्याचा प्रत्येक भारतीयाला अधिकार आहे, अशी भूमिका गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडली. तर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेना आणि मनसेने कायदा हातात घेऊ नये, असा इशारा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिला.

Wednesday, January 27, 2010

हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा नाही

म टा च्या सौजन्याने

26 Jan 2010, 0413 hrs IST
अहमदाबाद :

हिंदी ही राष्ट्रभाषा आहे, असा भारतातील बहुतांश लोकांचा समज असला, तरी घटनेत अथवा कोणत्याही सरकारी कागदपत्रांत हिंदीचा राष्ट्रभाषा म्हणून उल्लेख नाही। हिंदी ही फक्त अधिकृत भाषा आहे, असे सांगत गुजरात हायकोर्टाने याबाबत दाखल केलेली जनहित याचिका फेटाळून लावली आहे.

वस्तूंची किंमत, त्यात समाविष्ट असलेले घटक, उत्पादनाची तारीख हिंदीत छापणे राज्य सरकारने अनिवार्य करावे, यासाठी सुरेश कच्छाडिया यांनी गेल्या वषीर् हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती।

त्यावर निर्णय देताना न्यायाधीश एस। जे. मुखोपाध्याय आणि न्यायाधीश ए. एस. दवे यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला. सरकारी कागदपत्रांत, वटहुकुमात अथवा घटनेत हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख नसल्याने उत्पादकांवर अशी सक्ती करता येणार नाही, असे या निर्णयात म्हटले आहे.

भारतातील बहुतांश लोकांना हिंदी लिहिता-वाचता येत असल्याने वस्तूंवरील माहिती या भाषेत असावी, असे याचिकेत म्हटले होते। मात्र राज्य सरकारचे प्रतिनिधित्त्व करणाऱ्या मंडळाने वस्तूंचे वजन आणि मोजमाप यांबाबतीतील १९७७च्या कायद्याचा आधार घेतला.

या कायद्यानुसार ही माहिती देवनागरी किंवा इंग्रजीत असणे आवश्यक आहे। तसेच घटनेतील १७व्या भागात भारताच्या अधिकृत भाषांबाबत उल्लेख आहे. या ३४३व्या कलमानुसार देवनागरी लिपीतील हिंदी आणि इंग्रजी भारतात अधिकृत भाषा म्हणून ओळखल्या जातात. मात्र यात हिंदीचा राष्ट्रभाषा असा उल्लेख नसल्याने हिंदीची सक्ती कोणावरही करता येणार नाही, असे गुजरात हायकोर्टाने सांगितले आहे.

मराठी सिनेमाचा झेंडा

म टा च्या सौजन्याने

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा झेंडा मानाने लहरत असतानाच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतही मराठी
चित्रपटांना मानाचा मुजरा मिळावा हा केवळ योगायोग नाही। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमाने कात टाकली आहे. चाकोरीबाहेर जाऊन वेगळे विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न मराठी सिनेमाने सुरू केला आहे. त्याचेच फळ म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांत जोगवा आणि गंध या मराठी चित्रपटांनी मानाचे स्थान पटकावले आहे. उपेन्द लिमये यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने अभिनयाच्या क्षेत्रात मराठी कलावंतांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अजय-अतुल हे आज भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात गाजणारे नाव आहे. मराठीच नव्हे तर अन्य भाषांतील चित्रपटही त्यांच्या संगीताने गाजत आहेत. त्यांना सवोर्त्कृष्ट संगीतकार म्हणून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतही दखल घेतली जाईल यात काही शंका नाही. हरिहरन हे हिंदी चित्रसृष्टीतले नामवंत गायक पण यावेळचा सवोर्त्कृष्ट गायकाचा पुरस्कार त्यांना जोगवा या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी मिळावा हे संगीत क्षेत्रावर मराठीचे सध्या असलेले वर्चस्व स्पष्ट करणारे आहे. यावषीर् मराठीत अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे, पेक्षकांना विचार करायला लावणारे अनेक चित्रपट निघाले. त्यामुळे मराठीत मोठ्या ताकदीेचे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार आहेत हे दिसून आले आहे. यातल्या काही मंडळींना हिंदी चित्रपटसृष्टीही खुणावू लागली आहे.

गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठी चित्रपटांचा झेंडा मानाने लहरत असतानाच राष्ट्रीय पुरस्कारांच्या यादीतही मराठी
चित्रपटांना मानाचा मुजरा मिळावा हा केवळ योगायोग नाही। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेमाने कात टाकली आहे. चाकोरीबाहेर जाऊन वेगळे विषय वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न मराठी सिनेमाने सुरू केला आहे. त्याचेच फळ म्हणून राष्ट्रीय पुरस्कारांत जोगवा आणि गंध या मराठी चित्रपटांनी मानाचे स्थान पटकावले आहे. उपेन्द लिमये यांना उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्याने अभिनयाच्या क्षेत्रात मराठी कलावंतांचे श्रेष्ठत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. अजय-अतुल हे आज भारतीय चित्रपट संगीताच्या क्षेत्रात गाजणारे नाव आहे. मराठीच नव्हे तर अन्य भाषांतील चित्रपटही त्यांच्या संगीताने गाजत आहेत. त्यांना सवोर्त्कृष्ट संगीतकार म्हणून मिळालेल्या पुरस्कारामुळे आता त्यांची हिंदी चित्रपटसृष्टीतही दखल घेतली जाईल यात काही शंका नाही. हरिहरन हे हिंदी चित्रसृष्टीतले नामवंत गायक पण यावेळचा सवोर्त्कृष्ट गायकाचा पुरस्कार त्यांना जोगवा या मराठी चित्रपटातील गाण्यासाठी मिळावा हे संगीत क्षेत्रावर मराठीचे सध्या असलेले वर्चस्व स्पष्ट करणारे आहे. यावषीर् मराठीत अत्यंत वेगवेगळ्या विषयांवरचे, पेक्षकांना विचार करायला लावणारे अनेक चित्रपट निघाले. त्यामुळे मराठीत मोठ्या ताकदीेचे अभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक, संगीतकार आहेत हे दिसून आले आहे. यातल्या काही मंडळींना हिंदी चित्रपटसृष्टीही खुणावू लागली आहे.

Friday, January 22, 2010

ठाण्यात मनसेने बंद पाडला ‘झेंडा’

अवधूत गुप्ते नी "कोणाच्या" तरी सांगण्या वरून हात दाखवून अवलक्षण केले आहे । त्याला कोणाचा उद्धार करायचा आहे ते सर्व श्रुत आहे । आम्ही काय ह्याला दूध खुळे वाट्लो की काय ? आणि हो पिक्चर काढून जर लोक मागे येत असतील तर मग संपलच सगळं , काय?


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
राज ठाकरे यांनी ' झेंडा 'सिनेमाच्या प्रदर्शनाला कोणताही विरोध केला नसतानाही मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यात वंदना थिएटरमध्ये झेंडा सिनेमाचा विरोध सुरू केला आहे। सिनेमाचा पहिला शो संपण्याच्या सुमारास कार्यकर्त्यांनी थिएटर बाहेर आंदोलन सुरू केले.

सिनेमात शेवटच्या दृश्यात एका नेत्याला अटक करण्याचा आदेश दिल्याचे दाखवण्यात आले आहे। या दृश्याबाबत मनसेच्या चित्रपट विभागाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. सिनेमा काल्पनिक कथेवर आधारित असल्याचा बनाव रचून राज ठाकरे यांच्यासारख्या दिसणा-या कलाकाराला व्हिलन करण्यात आले आहे. शेवटच्या दृश्यात या नेत्याला अटक करण्याचा आदेश देत अप्रत्यक्षपणे राज यांचीच बदनामी करण्यात आल्याचा आरोप मनसेने केला आहे.

मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी ‘ झेंडा ’ तील दृश्यांमुळे भावना दुखावल्याने कार्यकर्त्यांनी सिनेमाला विरोध सुरू केल्याचे सांगितले।

Thursday, January 21, 2010

अमराठी टॅक्सीवाल्यांना राजची 'धमकी'

आमच्या मनातले बोललात राज साहेब, ह्या कच खाऊ मुख्यमत्र्यांना महाराष्ट्राची आणि पर्यायाने मराठी माणसांची ताकत दाखवायलाच हवी । अशोक रावन वर कोणाचं दडपण आले जेणे करून त्यानीं हा निर्णय चोवीस तासात फिरवला ? आम्हाला कळाले पाहिजे


मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
मुंबई व उपनगरात नव्याने देण्यात येणारे टॅक्सी परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत। नाहीतर एकही नवी टॅक्सी रस्त्यावर फिरू देणार नाही, अशी स्पष्ट ' धमकी ' महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री अशोक चव्हाण व राज्य सरकारला दिली.

मुंबई व उपनगरात दरवर्षी ४५०० नवे टॅक्सी परवाने देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला। १५ वर्षे महाराष्ट्रात वास्तव्य आणि मराठी लिहिता, वाचता व बोलता येणा-यांनाच टॅक्सी परवाने दिले जातील, असे सरकारने स्पष्ट केले होते. परंतु २४ तास उलटण्याच्या आतच मुख्यमंत्री चव्हाण यांनी पलटी मारली. मराठीसोबतच हिंदी किंवा गुजरातीपैकी एक भाषा येणे पुरेशी असल्याची सारवासारव मुख्यमंत्र्यांनी आज केली. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून दट्ट्या आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मराठी टॅक्सीवाल्यांचा निर्णय फिरवल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या ‘ घूमजाव ’ मुळे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आयताच मुद्दा सापडला असून, त्यांनी आज मुख्यमंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले। बुळचट व लाचार अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांची संभावना करत राज ठाकरे म्हणाले की, स्वकर्तृत्वाने अशोक चव्हाण मुख्यमंत्री झालेले नाहीत. कुणीतरी बसवलेले हे मुख्यमंत्री आहेत. एकतर निर्णय घेण्याची यांची क्षमता नाही. आणि घेतलाच निर्णय तर त्यांची अमलबजावणी करण्याची यांची हिंमत नाही. दिल्लीवरून दट्ट्या आल्यानंतर लाचार मुख्यमंत्र्यांनी लगेचच मराठी मुलांना टॅक्सी परवाने देण्याचा निर्णय बदलला. संपूर्ण कॅबिनेटने घेतलेला हा निर्णय मुख्यमंत्री एकट्याने कसा फिरवू शकतात ? स्वाभिमान नावाची काही गोष्ट आहे की नाही ? याबाबत इतर मंत्र्यांची काय मते आहेत, हे जरा समजून घ्या. असली लाचारी करण्यापेक्षा दक्षिणेतल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांकडे पार्ट टाइम जॉब करा... स्वाभिमान, भाषा, प्रदेश काय असते ते त्यांना समजेल, असा टोला राज यांनी हाणला.

सरकारचा काय निर्णय व्हायचा तो होईल। परंतु आमचा निर्णय झालेला आहे. ४५०० नवे परवाने मराठी मुलांनाच मिळायला हवेत. नाहीतर एकही नवी टॅक्सी रस्त्यावर फिरू देणार नाही... ज्यांना ही धमकी समजायची असेल त्यांनी ती खुशाल धमकी समजावी, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. एवढेच नाही, तर याआधी दिलेले टॅक्सी-रिक्षा परवानेही तपासून बघावे लागतील. यांना भाषा, शहर, पत्ता काहीही माहिती नसताता टॅक्सी-रिक्षा चालवण्याची परवानगी मिळतेच कशी ? असा सवाल ठाकरे यांनी केला.