Monday, June 20, 2011

जनाची नाही निदान मनाची तर लाज बाळगा

शुक्रवारी कल्याणच्या महापौरांनी आयत्या वेळी लाचखोर अभियंता सुनील जोशी ह्याला परत कामावर रुजू करण्याबाबत ठराव घेतला आणि विरोधकाना न जुमानता शिवसेना / बी जे पी च्या नगरसेवकांनी तो मंजूर करून घेतला. विरोधकांनी गोंधळ घालू नये म्हणून काम काज संपायच्या ५ मिनिट आधी हा प्रस्ताव आणण्यात आला व घाई घाई ने मंजूर करून घेतला व लगेच राष्ट्रगीत वाजवून महासभा संपवण्यात आली ... हा चक्क निर्लज्ज पणाचा कळस आहे .... सभागृहात हा प्रस्ताव मांडणारा नगरसेवक मोहन उगले हे शिवसैनिक आहेत आणि त्यांचा वार्ड बी जे पी लं गेला म्हणून त्यांनी बी जे पी च्या विरुद्ध अपक्ष निवडणूक लढवली आणि शिवसेनेने संपूर्ण रसद त्यांना पुरवली....... काल शिवसेना कार्य प्रमुखांनी हा प्रस्ताव मागे घेतला जाईल असं सांगितलं पण "बुंद से गइ वो हौद से थोडी आयेंगी" ...............................

वाचा म टा ची बातमी ........

'लाचखोर' जोशीला युतीचे अभय

लाचखोरीच्या प्रकरणातमहापालिकेच्या सेवेतून निलंबितझालेला एग्झिक्युटिव्ह इंजिनीअरसुनील जोशी याला कल्याण -डोंबिवलीतील शिवसेना - भाजपयुतीने ' अभय ' दिले असूनजोशीला पालिकेच्या सेवेत पुन्हारुजू करून घेण्याचा प्रस्तावकेडीएमसीच्या महासभेतशनिवारी प्रचंड गदारोळात मंजूरकरवून घेण्यात आला .

केडीएमसीचा एग्झिक्युटिव्ह इंजिनीअर तत्कालीन नगररचनाकार सुनील जोशीयाला अँटी करप्शन ब्युरोने मार्च २००९ मध्ये लाच स्वीकारताना अटक केली होती .त्याला पालिकेच्या सेवेतून निलंबित करण्यात आले होते . नंतर पोलीस चौकशीतजोशीकडे तब्बल तीन कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता सापडली होती .

शनिवारच्या महासभेच्या विषयपत्रिकेवर सुनील जोशीला सेवेत रुजू करूनघेण्यासंदर्भात कोणताच प्रस्ताव नव्हता . परंतु अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांनी 'जोशींना कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून पालिकेच्या सेवेत रुजू करून घ्यावे ', असाआयत्या वेळचा विषय ठेवला . हा विषय महापौर वैजयंती गुजर यांनी दाखल करूनघेताच सत्ताधारी सेना - भाजपच्या सदस्यांनी ' मंजूर ' म्हणत गोंधळ सुरू केला .काँग्रेस मनसेच्या नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध करण्याचा प्रयत्न केला . परंतुमहापौरांनी राष्ट्रगीत गायनाचा आदेश दिला प्रचंड गदारोळात जोशीला सेवेत रुजूकरून घेण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला .

आयत्या वेळचा विषय घेऊन त्यावर चर्चादेखील करता राष्ट्रगीताचा वापर करून हाप्रस्ताव मंजूर केल्याचा विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर काँग्रेसचे गटनेते सचिन पोटेयांनी निषेध केला . हा ठराव विखंडीत करण्याच्या मागणीसाठी विरोधक सोमवारीमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले .

याबाबत महापौर वैजयंती गुजर यांना विचारणा केली असता ठराव उचितकार्यवाहीसाठी प्रशासनाकडे पाठवल्याचे सांगितले . दरम्यान , या ठरावाचीअंमजबजावणी करणार नाही , असे केडीएमसीचे आयुक्त रामनाथ सोनावणे यांनीएका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले .
काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय दत्त यांनी सेना - भाजपचा खरा चेहरा जनतेसमोरआल्याचा आरोप केला . शिवसेना भाजपने नऊ जून रोजी भ्रष्टाचाराविरोधातमुंबईत मोर्चा काढला होता . मात्र याच पक्षांनी भ्रष्ट अधिकाऱ्याला पाठीशी घालूनआपला खरा चेहरा जनतेसमोर आणल्याचे ते म्हणाले .

Thursday, June 16, 2011

निगमानंद यांचे गुन्हेगार!

पार्टी विथ डीफरन्स म्हणणारी भारतीय जनता पार्टी रामदेव बाबाच्या आंदोलनाला नको तेवढा पाठींबा देते आणि त्यांच्याच राज्यात चाललेल्या गंगा बचाव आंदोलनाकडे ढुंकून बघत देखील नाही ... हा दुटप्पी पणा नाही का? वाचा म टा चा अग्रलेख ....................

खालील लेख म टा च्या सौजन्याने


दगड आणि वाळूच्या उत्खननामुळे गंगा नदी आणि परिसराचे पर्यावरण धोक्यात येत असल्यामुळे, या पात्रालगतचे हे व्यवसाय बंद करावेत, या मागणीसाठी तीन महिन्यांहून अधिक काळ उपोषण करणाऱ्या स्वामी निगमानंद सरस्वती यांच्या निधनाने राजकीय व्यवस्थेचीच नव्हे, तर प्रसार माध्यमांची दिवाळखोरीही वेशीवर टांगली आहे. निगमानंद यांच्या निधनानंतरही त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांपेक्षा, उत्तराखंडमध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाचा दुटप्पी दांभिकपणा लोकांसमोर आणण्याला काँग्रेसचे प्राधान्य दिसते आहे. माध्यमांचा भरही रामदेव बाबांच्या उपोषणाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री रमेश पोखरीयाल निशांक यांनी या काळात चालवलेली धडपड आणि वारंवार घेतलेल्या वार्ताहर बैठका यावर आहे. रामदेव यांना ज्या 'हिमालयन इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस'च्या हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते, तेथेच स्वामी निगमानंदही कोमात, अत्यवस्थ अवस्थेत होते. मात्र मुख्यमंत्र्यांना त्यांची कोणतीही दखल घ्यावीशी वाटली नाही, हा माध्यमांनी टीकेचा विषय केला आहे. तो योग्यच आहे, मात्र हीच चूक माध्यमांनीही केली आहे, याचा विसर त्यांना पडला आहे. निगमानंद यांचे आंदोलन आणि उपोषणाची उपेक्षा झाल्यामुळे त्यांची झालेली मरणासन्न अवस्था याची कल्पना माध्यमांनाही असू नये, हा त्यांच्याही चुकीच्या प्राधान्यक्रमांचाच परिणाम आहे. राजधानी दिल्लीतील मोक्याची जागा, केंदातील सरकारला अडचणीत आणण्याची आंदोलनातील राजकीय क्षमता, पंथअनुयायांच्या हमखास गदीर्ची हमी, पंचतारांकित थाट या सर्वच बाबी माध्यमांसाठी सोईच्या होत्या. निगमानंदांच्या उपोषण आंदोलनात यापैकी काहीच नव्हते. काळ्या पैशासारखा सबगोलंकारी मुद्दा घेऊन ते उपोषण करीत नव्हते, तर त्यांची मागणी ठोस होती. गंगा नदीच्या सुमारे ८० कि. मी. लांबीच्या पात्रालगत चालणारे खाणकाम बंद करावे, यासाठी त्यांचे उपोषण होते. या खाणकामात कोट्यवधी रुपयांचे व्यावसायिक हितसंबंध आहेत आणि या व्यावसायिकांना राजकीय संरक्षण आहे. उत्तराखंडमधील भाजपचे सरकार या व्यावसायिकांचे बांधील गडी आहे, असे आरोप हे आंदोलन हाती घेणाऱ्या मातृ सदनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहेत. त्यात तथ्य असावे, असे या आंदोलनाचा गेल्या दोन वर्षांतील इतिहास पाहता म्हणता येते. मात्र हे उद्योग दहा वर्षांहून अधिक काळ चालू आहेत; गंगेचे प्रदूषण हा केवळ धामिर्क नव्हे, तर गंगेलगतच्या परिसरासाठी अस्तित्वाचा प्रश्न असूनही कोणत्याही राजकीय पक्षाने या आंदोलनामागे बळ उभे केले नाही, त्याअथीर् या उद्योगात सर्वच राजकीय नेत्यांचा वाटा असणार हे उघड आहे. निगमानंद यांनीच जानेवारी २००८ मध्ये दीर्घकाळ उपोषण केले होते. त्यानंतर दगडांच्या खाणींना बंदी घालण्यात आली होती. पण ती काही काळच पाळली गेली. मार्च २००९ मध्ये अन्य एक स्वामी दयानंद यांनी तीस दिवसांचे उपोषण केले होते. पुन्हा काही काळ हे उत्खनन बंद झाले, पण ऑक्टोबर २००९ मध्ये पुन्हा हा व्यवसाय सुरू झाल्यानंतर दयानंद यांनी सुमारे पाच महिने सत्याग्रह केला होता. परंतु बऱ्याच प्रमाणात हे आंदोलन एकांडेच राहिले. स्थानिक जनता मोठ्या प्रमाणात त्यामागे उभी राहिली नाही. कोर्टाकडून बंदीवर स्थगिती मिळवण्यातही व्यावसायिकांना यश येत असे. अशा सर्व बाजूंनी प्रतिकूल परिस्थितीत, केवळ गंगेच्या शुद्धीकरणाच्या ध्येयावरील निष्ठेपायी निगमानंद यांनी यावषीर् फेब्रुवारीत उपोषण सुरू करून आपला जीव पणाला लावला. माध्यमांना एका यशस्वी 'सोहळ्या'साठी आवश्यक त्या सर्व बाबी रामदेव यांच्या उपोषण आंदोलनात होत्या, मात्र त्यापैकी एकही स्वामी निगमानंद यांच्या उपोषणात नव्हती! निगमानंद यांचा मृत्यूही एरवी उपेक्षितच राहिला असता, पण बाबा रामदेव यांना त्याच हॉस्पिटलात दाखल केल्यानंतर, या दोन उपोषणांना भाजप नेत्यांनी दिलेल्या प्रतिसादात असलेला जमीन-अस्मानाचा फरक, हा 'बातमी'चा विषय ठरला. त्यामुळे का होईना, निगमानंदांनी ज्यासाठी जीव पणाला लावला, तो विषय दखलपात्र ठरला! कोट्यवधींची मालमत्ता आणि अनुयायांची फौज पाठीशी असलेले बाबा रामदेव उत्तराखंडमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांना जवळचे वाटले, पण गंगेच्या प्रदूषणाचा प्रश्न आणि एका 'संता'चे उपोषण त्यांना दखल घेण्याच्या लायकीचे वाटले नाही, हा भाजपच्या ढोंगबाजीचाच पुरावा आहे. पण त्यामुळे केंद सरकार या जबाबदारीतून सुटू शकत नाही. सन २००९ डिसेंबरमध्ये केंदाने एक पथक या खाणींच्या पाहणीसाठी पाठवले होते. या पथकाचा अहवाल कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता. शिवाय गेल्या वर्षी ६ जानेवारीला मुख्यमंत्र्यांना पर्यावरण मंत्रालयाने पत्रही लिहिले होते, हा जयराम रमेश यांचा खुलासा अपुरा आहे. पर्यावरण संरक्षण कायद्याने दिलेल्या ज्या अधिकारात आता केंदीय कारवाईचे आश्वासन रमेश देत आहेत, ती कृती आधीच केली असती, तर निगमानंद यांचे जीवन ३५व्या वर्षीच संपले नसते.

Monday, June 13, 2011

"भाऊ आपल्याला आमदार बनायचंय" (ब्लॉग)

खालील लेख स्टार माझा च्या सौजन्याने .........




शुक्रवारी दुपारी पुढच्या आठवड्यात कोणत्या स्टोरीज करता येतील याचा विचार करत होतो. पुण्यात पावसाळी वातावरणाची मजा घेण्यासाठी खड़कवासला धरणाच्या किनाऱ्यावर गेल्या काही दिवसांमध्ये गर्दी होत असल्याने खडकवासला धरणाच्या चौपाटीची आणि तीथे होणाऱ्या अपघातांची बातमी करावी असं ठरवलं. मोबाईल उचलला आणि रमेश भाऊंना फोन लावला. रविवारी खडकवासल्याला येत असल्याचं सांगून "चौपाटीचा विषय करायचा आहे" अस म्हटलं. वांजळे त्यांच्या नेहमीच्या शैलीत म्हणाले "भाऊ करुयात की ...लई महत्त्वाचा विषय आहे ... कधी येताय...." रविवारी सकाळी ११ वाजता येतो असं सांगत मी फोन ठेवला. काम संपवून संध्याकाळी घरी गेलो आणि आंघोळ करायला बाथरूममधे शिरलो. काही मिनीटं गेली आणि फोन एकसारखा खणखणायला सुरुवात झाली. एकामोगामाग एक कॉल येत होते. तशीच काही महत्त्वाची बातमी असेल अस समजून मी गडबडीत बाहेर आलो आणि फोन उचलला. पलीकडून पोलिस खात्यातील एक मित्र सांगत होता "तुला कळलं का वांजळे गेले ते.. हार्ट अटॅक आल्यावर जहांगीरमध्ये अॅडमिट केलं त्यांना पण ते गेलेत". दुसऱ्या क्षणी माझ्यातला रिपोर्टर आणि मित्र एकाचवेळी जगा झाला आणि कपडे घालून मी जहांगीरकडे धाव घेतली. कॅमेरामनलाही यायला सांगितलं. जहांगीरला पोचलो तेव्हा बातमी पसरुन हळूहळू गर्दी जमायला सुरुवात झाली होती. वांजळेंच्या कार्यकर्त्यांमध्ये एकाचवेळी चिंता आणि संताप पसरत होता. काही कार्यकर्त्यांनी न्यूज चॅनेलच्या काही पत्रकारांना बातम्या बंद करा असा दम भरण्याचाही प्रयत्न केला. एव्हाना बातमीसाठी माझा फोनो सुरु झाला आणि वांजळेंबाबत काय बोलायचं हे ठरवताना वांजळेंचा गेल्या दोन वर्षांतला स्वप्नवत वाटणारा प्रवास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला.

२००९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीपर्यंत वांजळेंना केवळ पोस्टरवरुनच ओळखत होतो. वांजळेंना पहिल्यांदा पहाणाऱ्याचं त्यांच्याबाबत जे मत व्हायचं ते माझंही झालं. वांजळे खडकवासल्यातून विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्यासाठी तयारीही जोरदार करतायत असं कळत होत. वांजळेंनी धायरीमधे रहाणाऱ्या माझ्या एका मित्राची माहिती काढून मला न सांगता मित्राला मला त्याच्या घरी जेवायला बोलवायला सांगितलं. गौरीचा सण असल्याने पुरणपोळी खायला मी मित्राच्या घरी पोचलो. काही वेळ गेला आणि वांजळेंची अचानक एंट्री झाली. वांजले बसले आणि म्हणाले "भाऊ आपल्याला आमदार बनायचंय". काँग्रेसकडून मला उमेदवारी मिळाली असती पण खडकवासल्याची जागा राष्ट्रवादीला सुटलीय आणि त्यांचा उमेदवार अगोदरच पक्का झालाय. शिवसेनेकडे मी प्रयत्न केला पण तेही ही जागा भाजपला जाणार असल्याच सांगतायत आणि भाजपवाले माझ्या अंगावरच्या सोन्यामुळे आणि माझ्या दिसण्यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर परिणाम होइल असं सांगत नाही म्हणतायत. त्यामुळे मी मनसेकडे उमेदवारी मागायचं ठरवलंय. मी म्हटलं ठीक आहे. मनसेची उमेदवारी तुम्हाला फायद्याची ठरेल. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. मी पुरणपोळी खाऊ लागलो. वांजळेंनी मात्र पुरणपोळी बाजूला काढून शिळ्या भाकरीची मागणी केली आणि कटाच्या आमटीसोबत भाकरी कुस्करून खायला लागले. वांजळेंसोबतची ही पहिली भेट...

त्यानंतर काही दिवसातच वांजळेंनी मनसेची उमेदवारी मिळवली आणि प्रचाराला सुरुवात झाली. विरोधी पक्षातील उमेदवार वांजळेंच्या अंगावरील सोन्यावरून त्यांच्यावर टीका करू लागले. वांजळे मात्र अंगावर सोनं कायम ठेऊन प्रचारसभांमधून सांगू लागले की "सोनं त्यांच्या स्वत:च्या कमाईचं आहे आणि कुठली चुकीची गोष्ट करत नसल्यामुळे त्यांना दागदागिने दडवायची गरज नाही". शरद पवारांनीही मनसेचा उमेदवार अंगावर दोन किलो सोनं घालतो अशी टीका केली. पवारांच्या टीकेनंतर मी वांजळेच्या अंगावरील दागिन्यांची बातमी करायचं ठरवंल. निवडणुकीच्या धामधूमीतही "मनसेचा सोनेरी उमेदवार" म्हणून वांजळेंची सर्वत्र चर्चा सुरु झाली आणि पुण्याबरोबराच इतरत्रही वांजळेंबद्दल कुतूहल निर्माण झालं. राज ठाकरेंचा करिष्मा, स्वत:ची जोरदार तयारी आणि सर्वच मिडीयाने 'गोल्डमॅन ' म्हणून दिलेली प्रसिद्धी यामुळे वांजळे पहिल्याच प्रयत्नात ३० हजारांहून अधिकच्या मताधिक्क्याने निवडून आले. निकाल्याच्या दिवशी मतदान केंद्रांवर विजयी उमेदवारांचा कार्यकर्त्यांसह जल्लोष सुरु झाला. मात्र धोतर आणि डोक्यावर राज ठाकरेंचा फोटो असलेला फेटा घातलेले वांजले त्या जल्लोषातही सर्वांच लक्ष वेधून घेत होते. न्यूज चॅनेल्सना बाईट देताना त्यांनी त्यांच्या बायकोला चक्क उचलून घेतलं. राज ठाकरे आणि मतदारांचे आमदार केल्याबद्दल आभार मानले आणि ख़ास विनोदी ढंगात म्हणाले "आणि हो माझ्याविरुद्ध निवडणूक लढवलेल्यांचेही धन्यवाद बरं का ...... ते पडले म्हणून तर मी निवडून आलो". वांजळेंना स्वत:कडे लक्ष वेधून घेण्याची कला जमली होती.

आमदार झाल्यावर त्यांची गाडी सुसाट सुटली. आमदार बनल्यावर ताठपणा येण्याऐवजी ते काय भाऊ म्हणून सर्वांशी थेट बोलू लागले. निवडणुकीवेळी मिळालेल्या प्रसिद्धीला त्यांनी त्यांना आधीपासूनच मुखोधगत असलेल्या तुकारामांच्या अभंगांची जोड दिली. वांजळेंना पाहण्यासाठी आणि ते भाषणामध्ये गात असलेले अभंग ऐकण्यासाठी गर्दी होऊ लागली. "मै दिखता व्हिलन जैसा हु लेकिन काम हीरो का करता हु" या त्यांच्या डायलॉगला सभांमध्ये टाळ्या पडू लागल्या. पुण्यातच नव्हे तर सर्व महाराष्ट्रातून वांजळेंना कार्यक्रमांसाठी मागणी येऊ लागली. शहरी तोंडावला असलेली मनसे वांजळेंमुळे ग्रामीण भागातही चर्चेला येऊ लागली. वांजळेंच्या बोलण्याच्या शैलीमुळे शहरांबरोबरच ग्रामीण भागात ही वांजळेंची क्रेझ वाढीस लागली. वांजळेंनीही ग्रामीण भागात कार्यक्रमाचा सपाटा लावला.

भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेंचं नाव घेतल्यावर वांजळे भाषणांमध्ये अभंग म्हणू लागले. स्वत:वरच विनोद करू लागले. वांजळेंचा फॅन क्लब यामुळे वेगान वाढायला लागला. आजच्या राजकारण्यांबाबत अतिशय दुर्मिळ दिसणार लोकांनी ऑटोग्राफ मागण्याचं आणि फोटोसाठी विनंती करण्याचं चित्र वांजळेंबाबत नेहमीचं झालं. मात्र मिळणाऱ्या या प्रसिद्धीमुळे वांजळे बदलले नाहीत. रोज दुपारी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेणं आणि शानिवारला फेऱ्या मारणं चुकलं नाही. बोलण्याच्या शैलीतून वांजळे ते गावंढळ आणि भोळे असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करत. मात्र ते जे बोलत त्यातून त्यांचं व्यवहारिक शहाणपण समोरच्याच्या लक्षात आल्यावाचून राहत नसे.

जमीन खरेदी विक्री आणि बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचा वांजळेंचा व्यवसाय होता. या व्यवसायातून आलेल्या कमाईतून मी सोनं घालतो आणि घातलेल्या सोन्याचं मी रक्षणही करू शकतो हे पहिलवानी छाप वांजळेंचं म्हणणं समोरच्याला पटत असे. एन.डी. ऐ. त ज्यूस सेंटर चालवण्यापासून ते अहिरे गावाचा सरपंच आणि पुढे आमदार बनण्यापर्यंतच्या वाटचालीत आलेल्या आत्मविश्वासाने आपलं म्हणणं दुसऱ्याच्या गळी उतरवण्याची हातोटी त्यांनी साध्य केली होती. राज ठाकरेंचा शब्द हा मनसेमध्ये अंतिम मानला जातो. आपला मुद्दा दुसऱ्यावर ठसवण्याबद्दल राज ठाकरे ओळखले जातात. मात्र आमदार झाल्यावर राज ठाकरेंनी अंगावरील दागिने काढायला सांगूनही वांजळेंनी ते काढले नाहीत. "उलट या दागिन्यांमुळेच मी ओळखला जातो", यामुळे पक्षाच्या प्रतिमेवर काहीही परिणाम होणार नाही" हे राज ठाकरेंना पटवून देण्यात वांजळे यशस्वी ठरले.

राज ठाकरेंनीही वांजळेंना समजून घेतलं. त्यामुळे शनिवारी प्रतिक्रिया देताना राज ठाकरे म्हणाले की "माझ्या या सहकार्याचा मला जेमतेम दोन वर्षांचा सहवास मिळाला पण आम्ही तीस वर्ष एकमेकांना ओळखत असल्यासारखी मैत्री आमच्यात निर्माण झाली". वांजळेंच्या अंत्यविधिला जी गर्दी झाली ती केवळ त्यांच्या अंगावरच्या दागिन्यांमुळे नव्हे तर त्याना मिळालेल्या प्रेमामुळे हे लोक जमा झालेत". राज ठाकरे वांजळेंबाबत लोकांना काय वाटतं ते नेमक बोलले. वडगाव धायरीहून वांजळेंची अंत्ययात्रा निघाल्यावर वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत येइपर्यंत अंत्ययात्रेत मनसे कार्यकर्त्यांबरोबर हजारो नागरिक भर पावसातही सामील झाले ते निव्वळ वांजळेंवरील प्रेमापोटी. कार्यकर्त्यांना हुंदका दाटून येत होता तर वुद्ध स्त्रिया आणि महिलांनी हंबरडा फोडला होता. रडणाऱ्यांपैकी कुणाला वांजळेंनी काशीयात्रा घडवली होती तर कुणाला अजमेर शरीफच्या ख्वाजा गरीब नवाजची यात्रा. सहाजिकच त्यामुळे वांजळेंबरोबर त्यांचे भावनिक बंध निर्माण झाले होते. नकळत डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रुंमधून कळत-नकळत निर्माण झालेले हे बंध उघड होत होते. नियतीपुढे कुणाचं काहीच चालत नाही असं म्हणणारा प्रत्येक जण तरीही उसासा टाकत हळहळ व्यक्त करत होता.

वांजळेंना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठामध्ये उसळलेली गर्दी न भूतो न भविष्यते होती. आतापर्यंत पुण्यात मोठमोठे साहित्यिक, राजकारणी, गायक, कलाकार, उद्योगपती यांच्या अंत्यविधीला झालेली गर्दी पुणेकरांनी पाहिली होती. मात्र वांजळेंसाठी उसळलेली गर्दी काही वेगळीच होती. आतापर्यंत वैकुंठात एवढी गर्दी पाहिली नव्हती याबद्दल सर्वच पत्रकारांचं एकमत होत होतं. माझं सकाळपासून अंत्याविधीची माहिती देणारे फोनो आणि लाइव्ह सुरु होतं. एव्हाना वांजळेंचं पार्थिव चितेपर्यंत पोहचलं होतं. मान्यवरांचं त्यांना श्रद्धांजली वाहणं सुरु होतं. आमदार रमेश वांजळे अमर रहे या दुमदुमणाऱ्या घोषणांच्या साक्षीने रमेशभाऊंच्या भावाने चितेला अग्नी दिला आणि दोन वर्षांची अतिशय अल्प पण तेवढीच लक्षवेधक कारकीर्द काळाच्या पडद्याआड गेली.

रमेश वांजळेंच्या आठवणींनी आणि त्यांच्या आतापर्यंत केलेल्या बातम्यांनी मनात गर्दी केली. एवढ्यात ऑफिसचा वांजलेंच्या बातमीसाठी फोन आला आणि फोनोसाठी सरळ एंकरशी जोडला गेला. एँकरन विचारलं "मंदार रमेश वांजळेंच्या अंत्यविधीबद्दल ताजी माहिती काय आहे"....... मी क्षणभर आवंढा गिळला आणि सुरु केलं......" मनसेचे खडकवासल्याचे आमदार रमेश भाऊ वांजळे अनंतात.....

हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा ........


आज शिवराज्याभिषेक , तमाम संकटांना सामोरे जात महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे तमाम महाराष्ट्रवासियांना शिवाराज्याभिषेकाच्या हार्दिक शुभेच्छा.

शिवरायांचे आठवावे स्वरूप| शिवरायांचा आठवावा साक्षेप| शिवरायांचा आठवावा प्रताप| भुमंडळी||
शिवरायांचे कैसे चालणे| शिवरायांचे कैसे बोलणे| शिवरायांची सलगी देणे| कैसे असे ||
सकळ सुखांचा त्याग| करुनी साधिजे तो योग| राज्यसाधनाची लगबग| ऐसी असे||
त्याहुनी करावे विशेष| तरीच म्हणावे पुरूष| या उपरी आता विशेष| काय लिहावे||

श्रद्धांजली



मनसेचे लोकप्रिय आमदार श्रीयुत रमेश वांजळे ह्यांचे हृदयविकाराने निधन झाले..... अतिशय धक्कादायक अशी ही घटना आहे आणि आम्ही एक खंबीर, लोकप्रिय, लढवय्या कार्यकर्ता गमावला. मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा व सर्व मित्र परिवारातर्फे वांजळे ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो ....

संपूर्ण महाराष्ट्राचा मन जिंकून गेला
साधू संतांची वाणी सांगून गेला
निधड्या छातीने अबू आझमीचे मुस्काट फोडून गेला
मराठीचा मान वाढवून गेला
वृद्धांचा श्रावण बाळ होऊन गेला
असा हा सिंहगढ चा पैलवान मनाला चटका लावून गेला

(सौजन्य - एस एम एस)


Wednesday, June 1, 2011

ठाकरेकाकांच्या बचावासाठी राजची उडी

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........



उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वय पाहता त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करण्याचे काही कारणच नव्हते. परंतु आपल्या हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणातून लोकांचे लक्ष वळवण्यासाठीच त्यांनी बाळासाहेबांवर टीका केली... अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपले काका बाळासाहेब ठाकरे यांचा बचाव केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी समाजासाठी काय केले ? असा सवाल उपस्थित करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर शिवसेनेतून प्रतिहल्ला चढवण्यात आला आहे. परंतु या आघाडीवर शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तोंड उघडण्याआधीच, पुतणे राज ठाकरे आपल्या काकांच्या बचावासाठी धावून आले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे राज पुन्हा शिवसेनेत आला तरी मी त्याला घेणार नाही, असे वक्तव्य अलिकडेच बाळासाहेब ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले होते. त्याबाबत मात्र आपण काहीही बोलणार नाही, असे सांगत राज ठाकरे यांनी तोंडावर बोट ठेवले.

शिवसेनाप्रमुखांवर टीका करणा-या अजितदादांवर हल्ला चढवताना राज ठाकरे म्हणाले की, खरे तर त्यांनी बाळासाहेबांवर टीका करण्याचे काही कारणच नव्हते. परंतु पवार परिवाराची रोज एक नवी भानगड बाहेर पडतेय. बँकांतील घोटाळे काय, कोट्यवधी रूपयांचे जमिनी लाटण्याचे व्यवहार काय, स्पेक्ट्रम घोटाळ्यात अडकलेल्या शाहीद बलवाशी संबंध काय, बेकायदेशीर बांधलेले फार्म हाऊस काय... हजारो कोटी रूपयांची भ्रष्टाचाराची प्रकरणी बाहेर पडतायत. त्यातून लक्ष वळवण्यासाठीच अजित पवारांचा हा खटाटोप आहे. अजित पवारांच्या वक्तव्यातून दुसरा कोणताच अर्थ काढता येत नाही.

राज ठाकरेंनी वेगळा पक्ष काढून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, या रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांच्या टीकेचाही राजने यावेळी खरपूस समाचार घेतला. आठवलेंकडे खंजिराची फॅक्टरी आहे काय, असा सवाल करून ते पुढे म्हणाले की, हा माणूस काय बोलतो काही खळत नाही. आता मातोश्रीच्या बाजूला चार मजली बंगला बांधला म्हणून शिवसेनेचा प्रवक्ता असल्यासारखा फिरत असावा. आता हा बंगला कसा बांधला, मला माहित नाही. की आरक्षणातून मिळवलाय ? आठवलेंनी कधी नोकरी वा व्यवसाय केल्याचे मला आठवत नाही. मग ही जागा त्यांना कशी मिळाली ? आता मिळाली शेजारी जागा, तर सुचत राहिते काहीच्या काही. आठवलेंच्या बोलण्याला महत्त्व द्यावे, असे मला वाटत नाही. कारण ते स्वतःच स्वतःचे महत्त्व शोधतायत. दादरच्या नामांतरात व्यक्तीला विरोध नाही, तर प्रवृत्तीला विरोध आहे. एवढं सोप्पं समजावूनही कळत नसेल तर प्राथमिक शिक्षणापासून सुरूवात करावी लागेल... आणि निळा झेंडा म्हणजे आठवलेंची खासगी प्रॉपर्टी नाही.

नामांतराबाबत इतरांनी काही बोलण्याचे कारण नाही, या अजित पवार यांच्या विधानाकडे लक्ष वेधले असता, इतरांनी म्हणजे ? मी काय मिझोरामला राहतो का ?महाराष्ट्रातच राहतो ना... असा उलट सवाल राज यांनी केला. दादरच्या नामांतराशी बाबासाहेबांचा संबंध नाही, तर यामागे घाणेरडे राजकारण आहे. कुरघोडी करण्याचे राजकारण. असे राजकारण मला कळत नसेल तर चांगलेच आहे, असे ते म्हणाले.