Thursday, November 24, 2011

राजकीय ‘परीक्षानीती’ची प्रचारतंत्रात सरशी!

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ............

मुंबई, २३ नोव्हेंबर/ विशेष प्रतिनिधी
altमहापालिका निवडणुकीच्या उमेदवारीसाठी लेखी परीक्षा घेण्याच्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचे सर्व थरातून स्वागत होत असून सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष मनसेच्या परीक्षेकडे लागल्याने निवडणूक प्रचारतंत्राच्या पहिल्या परीक्षेत राज ठाकरे उत्तीर्ण झाले आहेत. मनसे उमेदवारांना परीक्षेसाठी देण्यात आलेल्या संदर्भ पुस्तकात महाराष्ट्र, महापालिका, पालिकेची कर्तव्ये, कामकाजाची पद्धत, आयुक्तांचे अधिकार, नगरसेवकांचे अधिकार यासह नागरी कामांसदर्भात उपयुक्त माहिती असल्याने ते संग्राह्य़ ठरणार आहे. मनसेच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना पालिका कार्यपद्धतीची माहिती असावी या उद्देश्याने येत्या चार डिसेंबर रोजी पन्नास गुणांची ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
यासाठी तयार केलेल्या संदर्भ पुस्तिकेत महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यातील जिल्हे, तालुके व खेडय़ांची माहिती, लोकसंख्या, मुंबई महापालिकेची माहिती यात पालिका कोणत्या कायद्यानुसार काम करते,महापालिकेचे प्रभाग, पालिकेतील वैधानिक समित्या, विशेष समित्या, पालिकेची अत्यावश्यक कर्तव्ये व स्वेच्छाधीन कर्तव्ये, वैधानिक समित्यांचे कामकाज, विविध समित्यांची रचना व कामे, महापौर,नगरसेवक व आयुक्ताचे अधिकार, पाणी पुरवठा, स्वच्छता, घनकचरा, अग्निशमन दल, आरोग्य, उद्याने व मैदाने, बाजार खाते आदी पालिकेच्या विविध विभागांची थोडक्यात माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. मुंबईचा पाणीपुरवठा व त्यासाठी पालिकेकडून आकारण्यात येणारे दर, मुंबईमध्ये दररोज निर्माण होणारा कचरा व त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका नेमके काय करते, विविध योजनांची माहिती, आरोग्य व्यवस्था व रुग्णालयांची माहिती, पाणी टंचाई असल्यास, नळदुरुस्ती आदी कामांसाठी कशाप्रकारे व कोणाला पत्र लिहायचे याची माहिती देण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या मदतीने मुंबईत कोणत्या योजना चालू आहेत तसेच झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचा उहापोह करण्यात आला आहे.
मनसेच्या या पुस्तिकेतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे नगरसेवक अथवा लोकप्रतिनिधींनी आपल्या विभागातील प्रश्नांसदर्भात संवाद कसा साधायचा व तो साधताना कोण कोणत्या घटकांचा विचार करायचा याचे विस्तृत विवेचन. थोडक्यात एखाद्या समस्येची चिकिस्ता करण्यापासून त्यामागची प्रशासनाची भूमिका, नागरिकांना येणाऱ्या अडचणी व समस्येचे समाधान करताना विचारात घ्यायच्या गोष्टी यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. लोकप्रतिनिधींनी नेमके कसे वागावे याचेही मार्गदर्शन करण्यात आले आहे. आदर्श नगरसेवक बनण्यासाठी पालिका कायदा १८८८ समजून घ्या, विभागात अनधिकृत झोपडय़ा उभ्या राहत असतील तर तात्काळ त्याची तक्रार संबधित अधिकाऱ्यांकडे करा, पालिकेशी संबंधित तसेच अन्य महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे पत्ते व दूरध्वनी जवळ बाळगण्याचा आग्रह या पुस्तिकेत करण्यात आला आहे.
मनसेच्या स्थापनेपासून परप्रांतीचे लोंढे रोखण्याची भूमिका राज ठाकरे यांनी सातत्याने मांडली असून मुंबईत येणारे लोंढे रोखण्यासाठी कोणती काळजी घ्यावी याची विशेष माहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ७४ व्या घटनादुरुस्तीसह पालिकेच्या प्रत्येक प्रभागातील नागरी कामांची माहितीही देण्यात आली असून ही पुस्तिका सर्वसामान्य नागरिकांसाठीही उपयुक्त ठरणारी आहे.

सगेसोयरे अस्वस्थ
मनसेच्या उमेदवारीसाठी नात्यागोत्यांचे राजकारण चालणार नाही, असे राज ठाकरे यांनी पक्षस्थापनेच्या वेळीच जाहीर केल्याने, आगामी महापालिका निवडणुकासाठी नातेवाईकांची मोर्चेबांधणी करणाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. आमदार शिशिर शिंदे यांची पत्नी निवडणूक लढविणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाल्याने, स्वत शिशिर शिंदे यांनी त्याचा इन्कार केला आहे. आपली पत्नी निवडणूक लढविणार नाही, असे त्यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.

Tuesday, November 22, 2011

पवारसाहेबांच्या कृपने मिळालेलं मंत्रिपद सांभाळा : राज ठाकरे

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने ...................


मुंबई : राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यातील वाकयुद्ध सुरूच आहे. "अजित पवार यांना शरद पवारसाहेबांच्या कृपेने मंत्रिपद मिळालंय, नामदारकी मिळालीय, त्यांनी ती नीट सांभाळावी, नको त्या भानगडी कशासाठी?", असा सवाल राज ठाकरेंनी केलाय.

"पवार साहेबांचे शिक्षक बोललेच आहेत ना, पवार साहेब निवृत्त झाले तर राष्ट्रवादी कुणी सांभाळणार नाही". "दुसऱ्याकडे बोटं दाखवण्यापेक्षा याचा जास्त विचार करावा", अशा शब्दात राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केलीय.

ठाकरे-पवार क्रिकेट वॉर
टेस्ट क्रिकेटर सदू शिंदे हे माझे आजोबा होते, असं उत्तर अजित पवारांनी राज ठाकरेंना दिलं होतं. यावर उत्तर देतांना राज ठाकरे म्हणाले, मला वाटतं कुणाचेही वडिल आपले आजोबा कसे मानावेत? सदू शिंदे शरद पवारांचे ते सासरे.

हे अजित पवारांचे आजोबा कसे झाले? हे अजूनपर्यंत मला कळलं नाही. हे कुठची नाती बघतात? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

माझ्या चुलत-चुलत भावाची आई, तिची जी सख्खी बहिण होती, त्यांचे मिस्टर हे व्ही.शांताराम होते. मग मी काय 'प्रभात'वर हक्क सांगू का? असा सवाल राज ठाकरे यांनी केलाय.

दारासिंह ही यांचे आजोबा असतील?

कदाचित मला माहित नाही, दारासिंहपण यांचे आजोबा असतील. कारण हे कोणत्यातरी कुस्ती संघटनेचे पण अध्यक्ष आहेत म्हणे, अशी बोचरी टीका राज ठाकरे यांनी अजित पवारांवर केलीय.

राज ठाकरे पुढे बोलतांना म्हणाले, 'प्रश्न शेतीचा आहे, अजित पवार शेतकरी आहेत ना, या गोष्टींची सुरूवात त्यांनीच करायची, आम्ही विचारलंय का यांना?, हजारो शेतकरी आत्महत्या करताहेत. तुम्ही कधी करणार म्हणून..'

Thursday, November 17, 2011

आयत्या बिळावर नागोबा ....

कल्याण येथे मनसे चे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या प्रयत्नातून एक सुंदर असे उद्यान साकार होत आहे. शिवसेनेचा ह्या उद्यानाशी काडीमात्र संबंध नसताना स्थानिक नगरसेवकांनी ह्या उद्यानाचे उद्घाटन कार्याध्याक्ष्य उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते करण्याचा डाव आखला तो मनसे च्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला ...... महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकार होत आहे आणि त्यांनी स्वता ह्या उद्यानासाठी अथक परिश्रम केले आहेत असे असताना शिवसेनेने ह्या उद्यानाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला तर मनसैनिक गप्पं कशे बसतील?

वाचा लोकसत्ता मधील बातमी

http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=194200:2011-11-16-18-37-13&catid=26:2009-07-09-02-01-20&Itemid=3


कल्याण, १६ नोव्हेंबर / प्रतिनिधी
altकल्याणमधील ठाणकरपाडा येथील माता रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी काही क्षण आलेल्या शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यासमोरच आज संध्याकाळी उद्यानाच्या विकासाचे श्रेय घेण्यावरून मनसे सैनिक आणि शिवसैनिक समोरासमोर भिडले. दोन्ही गटांत झालेल्या बाचाबाची आणि धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसेच्या नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांना अर्वाच्य शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याने वातावरण तप्त झाले.
आधारवाडी येथील सीमेंट रस्त्याच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उरकून उद्धव ठाकरे शिवसेनापुरस्कृत अपक्ष नगरसेवक मोहन उगले यांच्या ठाणकरपाडा प्रभागातील रमाबाई आंबेडकर उद्यानाची पाहणी करण्यासाठी आले; परंतु या उद्यानासाठी मनसेचे आमदार प्रकाश भोईर यांनी लाखो रुपयांचा निधी उभारला आहे. त्यांची कामे येथे सुरू आहेत. या उद्यानात ठाकरे येणार म्हणून मनसेचे जिल्हाध्यक्ष काका मांडले, सरचिटणीस इरफान शेख, विरोधी पक्षनेते मंदार हळबे, मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसैनिक मोठय़ा संख्येने उद्यानाच्या प्रवेशद्वारावर जमले होते.
गेल्या आठवडय़ात मोहन उगले यांनी उद्यानातील ध्यानधारणा केंद्राचे उद्घाटन केले होते. त्यामुळे शिवसैनिक आणि मनसे सैनिकांमध्ये धुसफूस सुरू होती. उद्यानाच्या ठिकाणी वातावरण तंग बनले होते. पोलीस बंदोबस्त येथे होता.
उद्धव ठाकरे येण्यापूर्वी आमदार एकनाथ शिंदे, महापौर वैजयंती गुजर, खासदार आनंद परांजपे, राजेंद्र देवळेकर हे उद्यानात प्रवेश करीत असताना शिवसैनिक मोठय़ा संख्येने घोषणाबाजी करीत उद्यानात घुसले. त्यापाठोपाठ मनसे कार्यकर्तेही घुसले. घोषणाबाजी सुरू झाली. उद्धव ठाकरे उद्यानाची पाहणी करीत असतानाच शिवसैनिक आणि मनसे सैनिक समोरासमोर भिडले. बाचाबाची, धक्काबुक्की झाली. या धक्काबुक्कीत एका शिवसैनिकाने मनसे नगरसेविका डोईफोडे यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. वातावरण अधिक चिघळू नये म्हणून उद्धव ठाकरे यांनी तेथून काढता पाय घेतला.
मनसेचे मंदार हळबे, इरफान शेख यांनी सांगितले, आमच्या नगरसेविकेला शिवसैनिकाने धक्काबुक्की करून तिला शिवीगाळ केली आहे. त्या शिवसैनिकाच्या विरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात अ‍ॅट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सुनील जोशींचे प्रकरण घडले त्या वेळी उद्धव ठाकरे यांनी उगले हे अपक्ष नगरसेवक आहेत असे जाहीर केले होते. मग आज एका अपक्ष नगरसेवकाच्या मागे फरफटत उद्धव हे उद्यानाचे काम पूर्ण झाले नसताना का फरफटत आले, असा प्रश्न हळबे यांनी केला.

Friday, November 4, 2011

पेट्रोल दरवाढ : ममतांकडून पाठिंबा काढण्याचा इशारा

चला ममता दीदी मुळे पेट्रोल दरवाढीतून सुटका होण्याची चिन्ह आहेत
अमेरिकेत पेट्रोल साठी एका लिटर ला ४५ रुपये पडतात मग भारतात पेट्रोल एवढं महाग का ?? हा मोठा गहन प्रश्न आहे .........

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने

नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी पेट्रोल दरवाढीचा विरोध केला असून, सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा इशारा दिला आहे. आपल्या मित्र पक्षांशी चर्चा न करता सरकारने ११ महिन्यात १२ वेळा पेट्रोलच्या किंमती वाढवणे आपल्याला मान्य नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

तृणमूल काँग्रेसच्या संसदीय दलाच्या बैठकीत सदस्यांनी यूपीए सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पण पंतप्रधान परदेश दौऱ्यावरून परतल्यानंतर चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी असंही म्हटलं की, आता युपीएमधून बाहेर पडल्यावर सरकार कोसळेल आणि आपल्याला तसं करायचं नाहीए म्हणून आपण पंतप्रधान कधी परतणार आहेत याची वाट पाहात असल्याचं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

राज, आझमी यांची वक्तव्ये तपासणार - आर आर आबा ...

आर आर आबांची ट्युब लाईट एवढ्या उशिरा का पेटते ??? जेव्हा निरुपम काही बोलला आणि नंतर कृपा शंकर जे काही बरळला तेव्हा त्यांची वक्तव्य त्यांनी तपासून का नाही बघितली ???? म्हणजे आम्ही त्यावर जर प्रतिक्रिया दिली तर लगेच आबा कामाला लागले ..... वा, आबा धन्य तुम्ही आणि तुमचे सरकार.

खालील बातमी म टा च्या सौजन्याने



छट पूजेच्या निमित्ताने आपल्या भाषण बाजीतून उत्तर भारतीय आणि मराठी अशा वादाला पुन्हा उकरून काढणा-या काँग्रेसचे संजय निरुपम, समाजवादी पक्षाचे अबू आझमी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणं तपासण्याचे आदेश राज्याचे गृहमंत्री आर. आर पाटील यांनी शुक्रवारी दिले. त्यामुळे या भाषणबाजी करणा-या नेत्यांसमोर आता अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

राजकीय स्वार्थासाठी भाषणबाजी करून समाजात फूट पाडणा-यांवर योग्य कारवाई केली जाईल, असे आश्वासन आर. आर. पाटील यांनी दिले. त्यासाठी पुढील दोन दिवसात अबू आझमी, निरुपम आणि राज ठाकरे या तिघांची भाषणे तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या तपासात कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाईचे आदेश देण्यात आहेत.

महापालिकेच्या निवडणूका समोर असल्याने महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. अशावेळी प्रत्येक राजकीय पक्ष व्होटबँकेचे गणित समोर ठेऊनच भाषणबाजी करताना दिसत आहे. या आठवडाभरात छटपूजेच्या निमित्ताने जमलेल्या उत्तर भारतीयांसमोर मुंबई बंद करण्याची भाषा केली होती. तर अबू आझमी यांनी उत्तर भारतीयांविरोधात बोलणा-या एकएकाला बघून घेईन अशी भाषा केली होती. प्रत्युत्तरा दाखल राज ठाकरे यांनी ही भाषणबाजी बंद झाली नाही तर दंगली भडकतील, असा इशारा दिला होता. त्यामुळे राज्यातील वातावर गढूळ होण्यास सुरुवात झाली आहे.


'आवरा' आता, राज ठाकरेंचा इशारा

राज साहेबांची पत्रकार परिषद .......




... तर, महाराष्ट्रात दंगली पेटतील!

खालील बातमी म टा च्या सौजन्याने



मराठी माणसाच्या विरोधात उत्तर भारतीयांचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांची आणखी विधाने येत राहिली तर माझा मराठी माणूस खवळेल आणि मग महाराष्ट्रात दंगली पेटतील. मात्र याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा इशारा महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला. आपण पोकळ धमक्या देत नसून मराठी माणसाला भडकाविणाऱ्या नेत्यांना बेडरूमच्या बाहेर पडणे मुश्किल करून टाकू, असेही ते म्हणाले.

काँग्रेसचे खा. संजय निरुपम, मुंबई काँग्रेस अध्यक्ष कृपाशंकर सिंह तसेच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा राज ठाकरे यांनी समाचार घेतला. या सर्व नेत्यांना मराठी नेत्यांनीच आश्रय दिला. निरुपम हा उद्धवच्या गळ्यातला ताईत होता. उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच छटपूजा गिरगाव चौपाटीवर नेऊन तिचे स्वरूप मोठे करण्यात आले. कृपाशंकरच्या घरी उद्धव ठाकरे जातात आणि छटपूजेचे स्वागत करणारे शिवसेनेचे होर्डिंगजही लागतात, असा टोलाही लगावला.

उत्तर भारतीय नेत्यांनी वेड्यावाकड्या गोष्टी करून दाखवाव्यात, असे माझे त्यांना आव्हान आहे, मग ते कसे घराबाहेर पडतात ते मी पाहीन, असा इशारा त्यांनी दिला. माझ्याविरोधात आग ओकणाऱ्या हिंदी चॅनेल्सवर माझी करडी नजर आहे. मी आग ओकतो आणि हे नेते काय मध ओकतात का? माझ्या वाक्यांचा हिंदी चॅनेल्सवाल्यांनी विपर्यास केल्यास त्यांचे कॅमेरे महाराष्ट्रात फिरणार नाहीत, याचाही बंदोबस्त मी करेन, असे ते म्हणाले.