Friday, November 26, 2010

नालायक सरकार ...............

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने ..................

२६/११ ला आज दोन वर्ष पूर्ण झाली तरी देखील त्यात जखमी झालेल्या महादेव पेटकर ला अजून मदतीचे पैसे मिळाले नाही .... ह्या नालायक निर्लज्ज सरकारला जोड्याने मारले पाहिजे

वाचा ......

सरकारचा अजब न्याय

२६/११ चा हल्ला हा देश कधीही विसरू शकणार नाही.हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राहणाऱ्या महादेव पेटकरसाठी ही जीवन बदलून देणारी घटना झाली. पोटातून गोळी आर पार गेली.

२६/११ चा हल्ला हा प्रत्येक भारतीयांच्या मनात भीती आणि राग भरणारा हल्ला आहे. भारतीयांच्या अस्मितेवरच्या हल्ल्यात शेकडो जण म्रृत्यूमूखी पडले तर हजारो जण मृत्यूसमान जीवन जगत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड शहरापासून हाकेच्या अंतरावर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महादेव पेटकर हा त्यापैकी एक.पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला आपल्या मामीसोबत गेलेला महादेव २६/११ रोजी वसमतला परतीच्या मार्गावर सी एस टी रेल्वे स्थानकावर देवगिरी रेल्वेची वाट पाहत आपली मामी गयाबाई धुळेसोबत होता. अचानक गोळीबार सुरु झाला महादेव पेटकर यांना वाटले कि येथे चित्रपटाची शुटींग होत आहे मात्र काही क्षणातच पेटकर यांच्या पोटातून अतिरेक्यांची गोळी आर पार झाली. या गंभीर परिस्थितीत त्यांनी एका चिमुलीचे प्राण वाचवले आणि ते बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते जे जे रुग्णालयात होते. त्यांच्यावर शस्त्र क्रिया झाली. त्यावेळी त्यांना शासनाकडून अत्यंत तोकडी मदत मिळाली ती त्यांच्या उपचारातच खर्च झाली.

अतिरेकी हल्ल्यातील जखमीला पंतप्रधान सहायता निधीतून एक लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. महादेव ने आपली सर्व कागद पत्रे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवली. या घटनेला आज २ वर्षे पूर्ण झाली मात्र
पंतप्रधान निधी या पिडीत परिवारपर्यंत पोहोचलाच नाही. पेटकर हे अनेक नेत्यांना आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून आपली व्यथा मांडली. मात्र त्यांच्या पदरी फक्त आश्वासनंच पडली.

पेटकर हे ८ वर्षाचे असतांना त्यांचे आई वडील मरण पावले तेव्हा पासून ते मामा आणि मामीकडेच राहतात. त्यांना गोळी लागल्यापासून कोणतेही काम करता येत नाहीत. काम करताना ते अनेकदा बेशुद्ध होतात. वयस्कर मामा मामी यांच्या आधारावर जीवन जगणारे महादेव पेटकर त्यांची व्यथा सांगताना त्यांचे डोळे पाणावले. आज २६/११ चा हल्ला होऊन २ वर्षे उलटली तरीही महादेवचे जीवन अंधारात आहे, खायला भाकरी नाही तर कसाबला चिकन बिर्याणीची मेजवानी दिली जात आहे.


1 comment:

  1. आपला समाज बधीर व संवेदनाशुन्य बनला आहे आणि त्यात कुबडी न्यायव्यवस्था..आता लोकांची मानसिकताच अशी झालीय की २६/११ ला लोक २७/११ विसरून पण जातील.. :( :(

    ReplyDelete