Wednesday, February 16, 2011

'युती'च्या भांडणात 'मनसे'ला कशाला ओढता? - राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने .......................


मुंडे काहीतरी बोलतात, त्यावर बाळासाहेब उत्तर देतात, यात आमचा काय संबंध ? आम्ही गेलोय का सेना-भाजपला सांगायला की आम्हाला घ्या म्हणून ... तुम्हा दोघांच्या भांडणात आम्हाला का ओढता ?अशा शब्दात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेले दोन दिवस चाललेल्या ' राज ' कारणावरून आपले हात झटकले.

मनसेशी युतीचा विचार होऊ शकतो या गोपीनाथ मुंडे यांच्या विधानाचे सर्वत्र पडसाद उमटले. शिवसेना-भाजप युतीत 'तिसरा' कुणीही येऊ शकतो, चमत्कार घडू शकतो, असे मुंडे म्हणाले होते. त्यावर बाळासाहेबांनी मुंडे आणि राज या दोघांचाही चांगलाच समाचार घेतला होता.

मुंडे यांनी या आधीही अशा प्रकारची विधाने केली होती. पण आम्हाला याची आवश्यकता नाही. लोक मनसेच्या पाठीशी आहेत. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसह मागील अनेक निवडणुकीत हे सिद्ध झालेय. त्यामुळे आम्ही कशाला कोणाकडे जाऊ ? आमचे ' एकला चलो रे ' सुरूच राहील, असे राज यांनी ठणकावून सांगितले.

मंगळवारी शिवसेनेच्या मुखपत्रात बाळासाहेबांनी महाराष्ट्रातील प्रश्नांवर शिवसेना-भाजप युती हाच रामबाण उपाय असून दुस-या कुठल्याही उपायाची गरज नाही, असे बजावले होते. उगाच तिसरा 'झंडू बाम'ही खिशात ठेवून फिरण्याची गरज नाही. ही तिस-या 'बाम'ची बाटली सध्या तुम्ही तुमच्या खिशातच ठेवा, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

त्या संदर्भात राज यांनी ठाकरे शैलीत पलटवार केला असून ते म्हणाले की, हे पाहा ती त्यांची डोकेदुखी आहे. त्यांचे डोके दुखतंय तर कोणी कोणाच्या डोक्याला बाम चोळायचा ते त्यांनी ठरवावे.

No comments:

Post a Comment