Tuesday, February 15, 2011

मनसेचा ठाणे मनपावर धडक मोर्चा

प्रशासनाने परिवहन सेवेतील चोऱ्या थांबवाव्या मग गरज पडेल तर भाववाढ करावी ..... सरळ भाववाढ म्हणजे "जखम डोक्याला आणि औषध पायाला" असा प्रकार आहे ......

खालील बातमी म टा च्या सौजन्याने .......



ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाने प्रवासी भाड्यात केलेल्या प्रस्तावित भाडेवाढीला विरोध दर्शवत मनसेच्या रस्ते आस्थापना विभागातफेर् सोमवारी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. भाडेवाढ रद्द न झाल्यास कोर्टात जाण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला. परिवहन उपक्रमातील भ्रष्ट व गैर कारभारामुळे महापालिकेने वारंवार अनुदान दिल्यानंतरही उपक्रमाला भाडेवाढीची आवश्यकता भासत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

ठाणे महापालिकेच्या परिवहन उपक्रमात किमान १ रुपयापासून ते किमान साडेचार रुपये भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव सन २०११-१२ साठीच्या बजेटमध्ये ठेवण्यात आला आहे. या भाडेवाढीला विरोध दर्शविण्यासाठी मनसेच्या रस्ते व आस्थापना विभागातफेर् सोमवारी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मनसेचे रस्ते आस्थापना विभागाचे उपजिल्हा संघटक अॅड. समीर देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली ठाणे पूवेर्कडील कोपरी बसस्थानक येथून जांभळी नाका, दगडी शाळामागेर् महापालिका मुख्यालयावर हा मोर्चा धडकला.

परिवहन उपक्रमातील गैर व्यवस्थापनामुळे आतापर्यंत ५८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. तो वर्षागणिक वाढत आहे. उपक्रमाचा कारभार सुरळीत रहावा यासाठी पालिकेकडे ११ कोटी रुपयांचे अनुदान मागण्यात आले आहे. त्यानंतरही तोटा भरून निघावा यासाठी परिवहन सेवेत भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. या भाडेवाढीतून अंदाजे २६ कोटींचे उत्पन्न अपेक्षित असून वाढ न झाल्यास उपक्रमाचा डोलारा कोसळण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या भाडेवाढीला विरोध करताना मनसेच्या शिष्टमंडळाने परिवहन सेवेच्या बसेस पूर्ण क्षमतेने चालविल्या जात नसल्याचा आरोप केला. लोकप्रतिनिधींच्या दबावाखाली नवे बसमार्ग सुरू करून ते तोट्यात चालविण्यापेक्षा प्रवाशांच्या गरजेनुसार फायद्यात चालणाऱ्या मार्गांवरच सेवा द्यावी, अशी मागणी अॅड. देशपांडे यांनी पालिका आयुक्त आर. राजीव यांच्याकडे केली. तसेच, अनेक बसेसवरचा इलेक्ट्रॉनिक फलक बंद पडल्याने प्रवाशांना बस नेमकी कोठे जाणार आहे, हे समजत नाही याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. पालिकेने कारभारात सुधारणा न केल्यास भाडेवाढीची गरजच भासणार नाही, असा दावा या वेळी आंदोलकांनी केला.

आयुक्तांचे आव्हान

भाडेवाढीची आवश्यकता नाही, असा मनसेचा दावा असला तरी तो पालिका आयुक्तांना मान्य नाही. त्यामुळे मनसेच्या शिष्टमंडळाने भाडेवाढ न करता उपक्रमाचा गाडा चालू शकेल, असे बजेट सादर करावे असे आव्हान आयुक्तांनी दिल्याचे अॅड. देशपांडे यांनी सांगितले. आयुक्तांचे आव्हान आपण स्वीकारल्याचे त्यांनी आंदोलनानंतर जाहीर केले. मात्र त्याआधी परिवहन उपक्रमातील गळती रोखण्यासाठी त्यांनी पावले उचलावीत, असा आग्रह मनसेतफेर् धरण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment