Tuesday, July 13, 2010

अखेर बेस्ट फाइव्ह लागू

म टा च्या सौजन्याने


सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारलादिलासा देत यंदाच्या वर्षासाठीकॉलेजची अकरावीची अॅडमिशनसुरू करण्याचा आणि बेस्टफाइव्ह लागू करण्याचा अंतरिमआदेश दिला आहे . तसेच मुंबईहायकोर्टाच्या आदेशाला स्थगितीदेत बेस्ट फाइव्ह प्रकरणाचीपुढील सुनावणी याचवर्षीऑक्टोबर महिन्यात घेण्याचानिर्णय जाहीर केला आहे .

या आदेशामुळे महाराष्ट्र राज्यमाध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या SSS च्या विद्यार्थ्यांना बेस्ट फाइव्हसूत्राने मिळालेल्या गुणांआधारे कॉलेजमध्ये अॅडमिशन घेण्यासाठी प्रवेश अर्ज भरतायेणार आहे . तर ICSE या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ग्रुप एकमधले चार आणि ग्रुप दोन मधला एक विषय घेतला असल्यास बेस्ट फाइव्ह सूत्राचा फायदा घेऊन अॅडमिशनघेण्यासाठी प्रवेश अर्ज भरता येईल . अन्यथा त्यांना ग्रुप तीन प्रमाणे म्हणजे सगळ्या विषयांमध्ये मिळालेल्या गुणांच्याआधारे अॅडमिशनसाठी प्रवेश अर्ज भरता येईल.

न्या . शिरपूरकर आणि न्या . जोजफ सिरीयाक यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला .बोर्डातर्फे ज्येष्ठ अॅड . हरीश साळवे यांनी ' एसएससी ' ' सीबीएसई ', ' आयसीएसई 'या तिन्ही बोर्डांचा अभ्यासक्रम त्यांची मार्क देण्याची पद्धती कशी भिन्न आहे त्याचीमाहिती दिली . तसेच एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्याला सहा विषयात पास व्हावेलागते , मात्र ' आयसीएसई ' चा विद्यार्थी एका विषयात नापास असला तरी त्यालाअकरावीत प्रवेश मिळू शकतो , हे दाखवून दिले . अखेर सुप्रीम कोर्टाने शैक्षणिक वेळापत्रकाचा विचार करुन अंतिम निकाल येण्यास लागणार असलेला विलंब लक्षात घेऊन अंतरिम आदेश दिला आहे.

महाराष्ट्र सरकारच्यावतीने ज्येष्ठ अॅड . पी . पी . राव , भारतीय विद्यार्थी सेनेतर्फे अॅड .राहुल नार्वेकर आणि सिद्धार्थ शिंदे तसेच ' आयसीएसई ' विद्यार्थ्यांच्या पालकांसाठीज्येष्ठ अॅड . सोली सोराबजी , मुकुल रोहटगी यांनी काम पाहिले .

No comments:

Post a Comment