Thursday, July 1, 2010

भिवंडी-ठाणे महामार्गावर कृत्रिम वाहतूक कोंडी

बऱ्याच दिवसापासून प्रवास करताना विचार करत होतो कि अंजूर फाट्याला ही अचानक वाहतूक कोंडी का व्हायला लागली आणि आज ठाणे वृतांत मधून त्याचे उत्तर मिळाले ........ जर तुम्ही कल्याण - ठाणे असा किवां आग्रा हाय वे वर ठाण्य पासून प्रवास करत असाल तर तुम्हाला हि वाहतूक कोंडी अंजूर फाट्याजवळ मिळेल .... आता २ आठवड्या पासून अचानक कोंडी बंद झाली आहे .....

तुमच्या साठी सादर करीत आहे ठाणे वृतांत मधील लेख .......

खालील लेख लोकसत्ता च्या सौजन्याने

विनोद


अलीकडे रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या वाढत असल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होते, परंतु टोल ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग (राष्ट्रीय महामार्ग विभाग), वाहतूक शाखेचे पोलीस यांच्या संगनमताने कोंडी होत असते, हे सांगितल्यास कुणाचा विश्वास बसणार नाही. परंतु हा प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे-भिवंडी महामार्गावर (मुंबई-नाशिक-आग्रा महामार्ग) या तिघांच्या संगनमतामुळे वाहतूक कोंडी होत आहे. हे अनेकांच्या लक्षातही येत नाही.
मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावरील ठाणे ते वडपा (भिवंडीजवळ) पर्यंत टोल ठेकेदाराने ‘बांधा-वापरा, हस्तांतर करा’ या तत्त्वावर खासगीकरणातून ठेका घेतलेला आहे. हा रस्ता चौपदरी आहे. हा रस्ता आठ पदरी करण्याचा ठेका आपल्यालाच मिळावा व टोलनाक्याचे दर दुपटीने वाढवून मिळावे म्हणून संबंधित टोल ठेकेदाराने व सदर रोडची देखभाल करणारे सार्वजनिक बांधकाम (राष्ट्रीय महामार्ग) विभागाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख व शाखा अभियंता किरण पाटील, बम्हाणी, दरेकर तसेच भिवंडी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पठाण यांच्या संगनमताने सध्या अंजूर-दिवे टोलनाका, मानकोली नाका ते राजनोलीपर्यंत मुंबईकडे जाणारी वाहने वळविली जातात. अहमदाबाद-मुंबई महामार्गाने मुंबईकडे सरळ मार्गाने जायला हवीत, ती वाहने मनोर- वाडा- भिवंडी- वडपा- रजनोली- मानकोली या मार्गे ठाण्याच्या दिशेने पाठविली जातात. दररोज नाशिकहून निघणारी सर्व वाहने व भिवंडी शहरातून निघणारी सर्व वाहने याच महामार्गावरून मुंबईकडे जात असतात. या वाहनांमध्ये अहमदाबादकडून येणारी वाहने वळवून या प्रचंड प्रमाणात वाहनांची गर्दी होते. त्यामुळे २४ तास ठाणे ते अंजूर-दिवे टोलनाका ते मानकोली नाक्यापर्यंत अशा पद्धतीने कृत्रिम वाहतूक कोंडी होत असते. दररोज भिवंडी- ठाणे- मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना याचा भयंकर त्रास होत आहे. ही कृत्रिम वाहतूक कोंडी दूर केली नाही तर मोठे आंदोलन करण्याचा निर्धार पंचक्रोशीतील नागरिकांनी केला आहे.
या महामार्गावरून एखादा मंत्री जाणार असला तर अहमदाबादकडून येणारी सर्व वाहने अहमदाबाद- मनोर- मुंबई मार्गाने सरळ पाठविली जातात. या वाहनांचा लोंढा कमी होताच वाहतूक कोंडी आपोआप दूर होते. गेल्याच आठवडय़ात राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील हे एका कार्यक्रमासाठी मुंबई-ठाणे मार्गाने कल्याणला आले होते. खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा याच कार्यक्रमाला आल्या होत्या. त्या दिवशी पूर्ण दिवस ठाणे ते भिवंडी बायपास महामार्ग मोकळा होता. त्या दिवशी संपूर्ण दिवसभर वाहतूक कोंडी झाली नव्हती.

No comments:

Post a Comment