Tuesday, February 2, 2010

वा अशोकराव, चांगले पांग फेडलेत महाराष्ट्राचे ......

अशोकराव, फार चांगले पांग फेडत आहात तुम्ही आमचे, ह्याच करता तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मत्रीपद दिले गेले ? जर पर प्रातिंयानां सरक्षण देण्याकरता तुमच सरकार सर्वोच्च प्राधान्य देणार आहे तर मग सामान्य लोकांच्या प्रश्नाचं काय? महागाई , सुरक्षा , रस्ते , इस्पितळ , मुलभुत सोई सुविधा , पानी प्रश्न ह्यांना कधी प्राधान्य देणार? एक लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचे मुख्य मंत्रिपद दिलेले आहे ते इथील लोकांचे प्रश्न सोडवन्या करीता , ते काम तुम्ही कधी करणार आणि त्याला प्राधान्य कधी देणार? हा सर्व प्रकार अतिशय घ्रुनास्पद होत चालला आहे आणि तुम्ही लोक मराठी जनतेच्या सहनशिलतेचा अंत बघत आहात, हे नक्की।

मटा ऑनलाइन वृत्त । मुंबई
महाराष्ट्रात येणा-या परप्रांतियांच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (मंगळवारी) मुंबईत केली. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेमुळे मराठी अस्मितेचे राजकारण करणा-या शिवसेना-मनसेला आक्रमक होण्याची आणखी एक संधी मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सोमवारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहार दौ-यावर गेलेल्या राहुल गांधी यांनी मिडियाशी बोलताना २६ / ११च्या हल्ल्यातून बिहारींनी मुंबईला वाचवले, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा शिवसेना-मनसे या प्रादेशिक पक्षांकडून जाहीर विरोध करण्यात आला. सुरक्षा पथके देश रक्षणासाठी आहेत, त्यांचा प्रादेशिक अस्मितेशी संबंध जोडणे देशहिताचे नाही, असे म्हणणा-या शिवसेनेने बिहारींचे लांगुलचालन करणा-या राहुल गांधींवर टीका केली होती. राहुलने शहिदांचा अपमान केला असे सेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आज (मंगळवारी) मुंबईत मुख्यमंत्र्यांना राज्यातल्या उत्तर भारतीयांच्या संरक्षणासंदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकार परप्रांतियांच्या रक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देईल, असे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मिडियाशी बोलताना ज्यांना मराठी लिहिता , बोलताआणि वाचता येते अशांना नवे टॅक्सी परवाने देण्याची घोषणा केली होती . त्यांच्या यावक्तव्याचा उत्तर भारतीय नेत्यांनी विरोध केला आणि २४ तासांच्या आतमुख्यमंत्र्यांनी घूमजाव केले होते . त्या पाठापोठ आता परप्रांतियांच्या रक्षणालाप्राधान्य देण्याची भाषा मुख्यमंत्र्यांनी केली आहे .

No comments:

Post a Comment