Wednesday, September 7, 2011

सीटीपार्कच्या जागेवर आयटीपार्क?

कल्याण मध्ये आय टी पार्क असणं ही काळाची गरज आहे ..................... कल्याण , डोम्बिवली , अंबरनाथ व बदलापूर येथून सर्वात जास्त आय टी चे लोकं मुंबई अथवा नवी मुंबई इथे जातात त्यांना जर कल्याण मधेच संधी उपलब्ध झाली तर कल्याण / डोम्बिवली शहराचे रूप पालटेल ह्यात काही शंका नाही .... ह्या ब्लॉग द्वारे आम्ही कल्याण डोम्बिवली करांना आवाहन करतो की त्यांनी आमदार प्रकाश भोईर ह्यांच्या ह्या मागणीला पाठींबा द्यावा.

आपला

विनोद शिरसाठ


खालील बातमी म टा च्या सौजन्याने ......


कल्याणच्या गौरीपाडा येथीलजागेवर तब्बल १०० कोटी रुपयेखर्चाच्या प्रस्तावित सीटीपार्कप्रकल्पाच्या जागेवर आयटीपार्कउभारावे , अशी मागणी मनसेचेआमदार प्रकाश भोईर यांनी केलीआहे . सीटीपार्कची निम्मी जागाताब्यात नाही त्यासाठीचाकोट्यवधींचा निधी पालिकाउभारू शकत नाही . त्यामुळे हीजागा आयटीपार्कसाठी द्यावी ,अशी मागणी त्यांनी केली आहे .याबाबतचा निर्णय सोमवारी पालिकेत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता आहे .

कल्याण परिसर एकेकाळी राज्याच्या औद्योगिक नकाशावर ठळकपणे उमटला होता .पण जागेला आलेले सोन्याचे भाव इतर राज्यांनी पोषक औद्योगिक धोरणस्वीकारल्याने निर्माण झालेली स्पर्धा यामुळे या भागातील उद्योजकांनी कंपन्या बंदकेल्या . त्यामुळे कल्याण पट्ट्यातील सुमारे २० कंपन्या १९९० ते २००० या दशकातबंद होऊन किमान २५ हजार कामगारांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली .

नोकऱ्या उपलब्ध नसल्याने या भागातील तरुणांना मुंबई किंवा पुणे गाठण्याशिवायअन्य पर्याय नाही . दररोज ये - जा करण्यात किमान ते तासांचा अवधी जातअसल्याने त्याचा परिणाम कार्यक्षमतेवरही होतो . या परिसरात पुन्हा रोजगाराच्यासंधी निर्माण करायच्या असतील तर उद्योग स्थापन होणे आवश्यक आहे . हे ओळखूनकल्याण पश्चिमेचे आमदार प्रकाश भोईर यांनी बड्या कार्पोरेट कंपन्यांना त्यासाठीआवतण दिले .

या भागात उपलब्ध असलेले कुशल तंत्रज्ञ तसेच जागेचे तुलनेने कमी भाव , पाण्याचीमुबलकता आदी कारणामुळे कल्याण पट्ट्यात उद्योग सुरू करणे शक्य असल्याचे भोईरयांचे म्हणणे आहे . विशेष म्हणजे त्यांच्या आवाहनाला बड्या कार्पोरेट कंपन्यांनीप्रतिसाद दिला असून आयटी पार्कसारखा प्रकल्प सुरू करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यावर होणारा कोट्यवधी रुपयांचा खर्च उचलण्याची त्यांची तयारी आहे .
पालिकेने या उद्योगांसाठी जागा दिली तर रोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवरनिर्माण होतीलच ; शिवाय येथील अर्थव्यवस्थेलाच चालना मिळणार आहे . त्यामुळेपालिकेने गौरीपाडा परिसरातील सीटीपार्क प्रकल्पाची ताब्यात असलेली १६ एकरजागा आयटीपार्कसाठी द्यावी , अशी मागणी त्यांनी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणेयांच्याकडे केली आहे . सीटीपार्क हा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी प्रतिष्ठेचाकेलेला प्रकल्प असला तरी गेल्या महिन्यात पालिका प्रशासन त्या प्रकल्पाची एकइंचही जागा ताब्यात घेऊ शकलेली नाही . तसेच प्रकल्पावर १०० कोटी रुपयांचा खर्चपालिकेला पुढील दशकभरात तरी झेपणारा नाही . त्यामुळे ही जागा आयटीपार्कसाठीद्यावी , असा त्यांचा आग्रह आहे .

दरम्यान , याबाबत महापौर वैजयंती गुजर आयुक्त सोनवणे यांची संयुक्त भेटसोमवारी घेणार असल्याचे आमदार भोईर यांनी सांगितले . या बैठकीत नगररचनाविभागाचे अधिकारीही उपस्थित असतील . सीटीपार्कची जागा आयटीपार्कसाठीदेण्याची तयारी पालिका दाखवते की नाही , याबाबत या बैठकीतच निर्णय होईल .

No comments:

Post a Comment