Thursday, August 11, 2011

आ. प्रकाश भोईर ह्यांचे कल्याण मधील प्रकल्प (रमाबाई आंबेडकर उद्यान)

कल्याण पश्चिम येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार श्री प्रकाश भोईर ह्यांच्या प्रयत्नातून कल्याण खडकपाडा येथे रमाबाई आंबेडकर नगर जवळ २.५ एकर क्षेत्रात एक सुंदर उद्यान साकार होत आहे .... त्याचे काही फोटो











शिवसेनेला घोर लावणारे राजकारण!

प्रताप आसबे चां म टा मधील लेख

दिनांक - ९ ऑगस्ट २०११

भाजपमध्ये आजवर अध्यक्ष नितीन गडकरी हेच प्रामुख्याने मनसेला जवळ करणारे होते. आता नरेंद्र मोदींची त्यात भर पडल्याने भाजपमध्ये मनसेचा पाठिंबा वाढणार. आता भाजपमध्ये मनसेची स्वीकारार्हता वाढलीय हे निर्विवाद. राजकारणात ती वाढणे, अन्य पक्ष व शक्तिशाली नेत्यांशी मैत्री होणे, हे भविष्यात लाभदायक असते. कारण वेळ येते तेव्हा राजकारणात नवी समीकरणे मांडता येतात. राज ठाकरे यांच्या गुजरात दौऱ्याचे हे असे अनेक अर्थ आहेत...

.......................

मुंबई महापालिकेच्या निवडणुका सात-आठ महिन्यांवर आल्या असताना खड्ड्यांमुळे शिवसेनेच्या मार्गात बरेच खाचखळगे निर्माण झाले आहेत. रोज टीकेचा भडीमार चालला आहे. अब्रूचे पंचनामे चालू आहेत. महापालिकेच्या कारभाराचे धिंडवडे निघत असताना परवा तर धारावीजवळ आख्खा ट्रक आणि त्याच्या पाठोपाठ टेम्पो खड्ड्यात अक्षरश: उताणा झाला. दोन-तीन वर्षांपूर्वी महालक्ष्मीच्या सातरस्ता चौकात पसरलेल्या ट्रकची पुनरावृत्ती धारावीत पाहायला मिळाली. तेव्हा फाटलेल्या आकाशाला कुठे कुठे ठिगळ लावायचे या चिंतेने सेनानेते कावरेबावरे झाले आहेत. तशात नालेसफाईची सीआरडी चौकशी करण्याचे आश्वासन सरकारने विधिमंडळात दिले. त्यामुळे तर सेनेची आणखीच पंचाईत झाली. हीच शिवसेना अवघ्या काही महिन्यांपूवीर् वाघासारख्या डरकाळ्या फोडताना सरकारला कापरे भरत होते. मग तो जैतापूरच्या अणुऊर्जा प्रकल्पाचा प्रश्न असो की इतर कोणता. सेना दिवसेंदिवस आक्रमक होताना दिसत होती. पण त्याच सेनेला आता मुंबई महापालिकेतील गलथान कारभारामुळे हुडहुडी भरायला लागली आहे. ऐन मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर ही हुडहुडी महागात पडू शकते.

सेनेची अशी अवस्था झालेली असताना मनसेवाले रोज काही ना काही कुरापती काढत आहेत. तशात सेनेचे जानी दुष्मन राज ठाकरे सेनेच्याच सोयऱ्यांकडे गुजरातेत यथेच्छ पाहुणचार झोडत आहेत. 'विकासाचे मॉडेल' म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या गुजरातची पाहणी करण्यासाठी कुठल्यातरी मागासलेल्या नव्हे तर विकसित महाराष्ट्रातील 'ग्लॅमरस' नेता येतोय आणि आपल्याला तो 'रोल मॉडेल' म्हणून पाहतोय म्हटल्यानंतर मुख्यमंत्री नरेंद मोदी यांच्या अंगावर नक्कीच मूठभर मांस चढले तर नवल नाही! त्यामुळे मोदी यांनी राज यांना 'स्टेट गेस्ट'चा दर्जा देऊन त्यांच्या स्वागतासाठी लाल गालिचाही अंथरला. शाही पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी स्वत: जातीने उपस्थित राहिले. मग काय? त्यांचे ते पंचतारांकित आगतस्वागत. उभयतांनी केलेली परस्परांची कोडकौतुकं. त्याची रसभरित वर्णनं छायाचित्रांसह दिमाखात छापून येत आहेत. मागेपुढे अधिकाऱ्यांच्या ताफ्यात गॉगलधारी राज एकापाठोपाठ एक विकासकामांना भेटी देऊन माहिती घेत आहेत. मुक्तकंठाने मोदी आणि गुजरातचे कौतुक करत आहेत. त्यात पुन्हा गेल्या काही वर्षांतल्या राज्यर्कत्यांनी वाट लावली असली तरी अजून महाराष्ट्र पहिल्याच क्रमांकावर असल्याचा 'मराठी बाणा'ही न विसरता दाखवत आहेत. त्यामुळे मीडियाने त्यांची तोंडफाट स्तुती चालविली आहे. जाताना आठवणीने मीडियातील मराठी टक्का बरोबर नेलेला असावा. किंवा कदाचित छत्रपती शिवरायांच्या सुरतेच्या मोहिमेनंतर प्रथमच कुणी मराठी नेता गुजरातवर चाल करून जातोय, असा साक्षात्कार झाल्याने आख्खा मीडियाच त्यांच्यामागे धावत सुटला असेल.

राज यांना महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर न्यायचे आहे. त्याची ब्लू प्रिंट ते देणार आहेत. त्यासाठी त्यांनी थेट गुजरातकडे धाव घेतली. कदाचित् त्यांच्या मते इथे काहीच घडत नसावे. त्यामुळे महाराष्ट्रात काय आहे, हे पाहण्याची त्यांनी तसदी घेतली नसावी. देशाच्या उत्पादनापैकी एक तृतिआंश साखरेचे उत्पादन इथे होत असले तरी साखर कारखाने हे मुळी पैसे खाण्यासाठीच काढलेले आहेत. राज्यातल्या दोन जिल्ह्यातला कांदा देशभर आणि परदेशातही जातो. इथल्या माळावरची दाक्षे, डाळिंब, सीताफळे युरोपाच्या बाजारात जातात. कोकणातील हापूस जगभरातील आंब्यांचा शहेनशाह झाला आहे. टेबल ग्रेपऐवजी वाईन फायद्याची ठरते म्हणून वायनरी सुरू झाल्यात. पण गुजरातच्या वाळवंटात इराकच्या जगप्रसिद्ध 'हनी बॉल' खजुराचे आणि युरोपातल्या ऑलिव्हचे उत्पादन व्हायला लागले, याचे अप्रूप असू शकते. खरे म्हणजे, नितीशकुमारांनी बिहारमध्ये विकासाची अशीच घोडदौड चालविली आहे. पण राज यांना तिथे जाणे कठीण आहे. काही का असेना पण विकासाचा ध्यास घेऊन कुणी कुठे पाहणीसाठी जात असेल तर स्वागतच करायला हवे.

गुजरात दौऱ्यामुळे आपण भाषेच्या पलीकडे जाऊन विकासाला प्राधान्य देऊ पाहतो, असा एक संदेश त्यांनी महाराष्ट्रातील मतदारांनाही दिला आहे. त्यातून आपण सबंध राज्याच्या हिताचा विचार करतो, असे ते म्हणू शकतील. उद्या सत्तेवर आल्यानंतर ते काय वेगळे करणार, हा प्रश्नच आहे. पण आज सत्तेत नसल्यामुळे मोठ्यामोठ्या गोष्टी करता येतात. लोकही हुरळून जातात. केवळ भाषेचा विचार करणारा पक्ष आता विकासाचा विचार करायला लागला, याचेही अप्रूप वाटू शकते. अशा आशाळभूतांच्या दृष्टिकोनाचा लाभ मनसेला मिळू शकतो.

या दौऱ्याचे राजकीय परिणाम यथावकाश स्पष्ट होतील. परराज्यातील नेता गुजरातकडे विकसित राज्य म्हणून पाहतो. आपल्या राज्याचा तसाच विकास करू इच्छितो. यामुळे गुजराती भाषिकांचा अहंभाव सुखावला असणार. यातून मुंबई, महाराष्ट्रातील गुजराती भाषिकांची सहानुभूती राज आणि मनसेला मिळेल. भाषिक अस्मितेचे राजकारण करून उत्तर भारतीयांच्या विरोधात रान पेटवणारा नेता गुजरात आणि गुजराती समाजाला शत्रू तर सोडाच पण मित्र समजतो. यामुळे गुजराती भाषिकांना आनंदाचे भरते आले नसेल तरच आश्वर्य. मुंबई-महाराष्ट्रातील गुजराती समाज प्रामुख्याने भाजपबरोबर आणि युतीसोबत आहे. सेनेतून फुटून राज यांनी मनसे काढल्याने तसेच त्यांनी परप्रांतियांना लक्ष्य केल्याने हा समाज त्यांच्याकडे थोडा संशयानेच पाहात होता. पण तो संशयही आता दूर होईल. थोडक्यात, भाजपनंतर केवळ सेनेवर विश्वास ठेवणारा हा समाज मनसेशी संबंध ठेवू लागेल. कालांतराने उभयतांतील संबंध अधिक जिवंत होऊ शकतील. युतीची मोठी मतपेढी मराठी आणि गुजराथी भाषिकांमध्ये आहे. मनसेने मराठीत घुसखोरी करून आपला वाटा घेतला. आता ते गुजराती भाषिकांमध्येही घुसखोरी करू लागतील. उद्या मनसे आणि सेना यांच्या निवडणूक संघर्षात मनसेच्या उमेदवाराचे पारडे जड तुलेनेने जड असेल तर सेनेलाच मत दिले पाहिजे, असे दडपण गुजराथी समाजावर राहणार नाही. हा समाज व्यापारी वृत्तीचा असून आजवर त्याला जसे सेनेचे संरक्षण मिळाले तसे उद्या मनसेचे मिळू लागेल. मराठी आणि गुजराती समाजात स्वतंत्र मतपेढी तयार केल्यानंतर हिंदुत्वाची मतपेढी तेवढी मनसेपासून दूर असेल, असा त्याचा अर्थ आहे. अर्थात, राज व मनसे यांचे राजकारण धर्मनिरपेक्षतेचे नाही. हिंदुत्व जाहीर स्वीकारले नसले तरी त्यांचे कूळ त्याच प्रवाहातले आहे. त्यामुळे जेव्हा वेळ येईल तेव्हा ते जहाल हिंदुत्वाची भूमिकाही घेताना दिसतील. थोडक्यात, जिथे जिथे तुम्ही, तिथे आम्ही, अशी मनसेची पावलं पडत राहणार. आख्ख्या हिंदुत्वाच्या व्होटबँकेत ते सराईतपणे वावरणार. साहजिकच मनसेला कशाला बाजूला ठेवता, असे सेनेवरील दडपण वाढत जाणार.

भाजपमध्ये आजवर गडकरी हेच प्रामुख्याने मनसेला जवळ करणारे होते. आता मोदींची त्यात भर पडल्याने भाजपमध्ये मनसेचा पाठिंबा वाढणार. पण आजचा विचार केला तर पक्ष म्हणून भाजपमध्ये मनसेची 'अॅक्सेप्टिबिलिटी' वाढलीय हे निविर्वाद. राजकारणात अशी स्वीकारार्हता वाढणे, अन्य पक्ष व शक्तिशाली नेत्यांशी मैत्री होणे, हे भविष्यात लाभदायक असते. कारण वेळ येते तेव्हा राजकारणात नवी समीकरणे मांडता येतात. भाजपचा फायदा असा की, सेना आणि मनसे हे दोन्ही पर्याय त्यांच्यापुढे असणार. वेळ येईल तेव्हा कोणता पाठिंबा स्वीकारायचा हे ते ठरवू शकतील. दरम्यान पडद्यामागे समझोते करायला तर कसलीच अडचण नसेल. या सगळ्याचा परिणाम म्हणजे सेनेचा दबाव, दडपण आणि मित्रपक्षाशी सौदा करण्याची क्षमता कमी होणार. किमान आम्ही म्हणू तीच पूर्वदिशा, हे सेनेचे सध्याचे स्थान राहणार नाही, यात शंका नाही.

सेना, मनसे आणि भाजप यांची पावले उद्याच्या राजकारणात कशी आणि कोणत्या दिशेने पडणार, हे यातून स्पष्ट होते. पण राजनी गतिमान विकास हवा असेल तर आघाड्यांचे राजकारण हा त्यातला महत्त्वाचा अडसर असल्याचे म्हटले आहे. इतकेच नव्हे, तर आघाड्यांचे राजकारण अपरिहार्य आहे, ही मानसिकताच काढून टाकली पाहिजे, असे म्हटले आहे. गुजरातमध्ये मोदींचा शब्द चालतो, हे त्यांना दिसले असणार. महाराष्ट्रालाही विकासाच्या महामार्गावर भरधाव जायचे असेल तर मोदींप्रमाणे आपल्याकडे मतदारांनी सर्वंकष सत्ता सोपविली पाहिजे, असेही त्यांना सूचित करायचे असावे. राज यांना सध्या एकटेच जायचे आहे. राज्यातील दोन परस्परविरोधी आघाड्यांत त्यांना स्थान नाही. त्यामुळे ते आघाडीच्या राजकारणाच्या विरोधात हल्लाबोल करू शकतात. आघाड्यांच्या राजकारणामुळे महाराष्ट्र विकासाकडे न जाता मागासच राहील, अशी टीका करू शकतात. खरे म्हणजे, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या सगळ्यांनाच स्वबळावर सर्र्वंकष सत्ता हवी आहे. पण ती मिळत नसल्याने नाइलाजाने त्यांना आघाडी आणि युतीचे राजकारण करावे लागते. भविष्यात मनसेलाही तेच करावे लागेल. पण सध्या ती संधी नसल्याने आघाडीच्या राजकारणावर तुटून पडणे हे राजकीयदृष्ट्या त्यांच्या फायद्याचे आहे. त्यातून खरोखरच आघाडीचे पर्व नष्ट करण्यात यश आले तर त्यांना युगपुरुषच म्हणावे लागेल. सेनेवाले खाचखळग्यात ठेचकाळत असताना मनसेने मात्र एका वेगळ्या पातळीवर दमदार पावले टाकत सेनावाल्यांचा घोर आणखी वाढवला. राजकारण चुकीचे की बरोबर, ही चर्चा अनेकदा निरर्थक ठरते. मात्र, कोण किती सफाईदार राजकारण करतो, यावर यशापयश अवलंबून असते, हे सेनानेत्यांनीही कधीतरी समजून घेतले पाहिजे.

Tuesday, August 9, 2011

मोदी पंतप्रधानपदाला लायक – राज ठाकरे

खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने .......



गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे पंतपधान होण्यास लायक व्यक्ती असल्याचे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज येथे व्यक्त केले. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे गुजरातच्या दौऱ्यावर आहेत. सुरत मध्ये आज पत्रकारांशी बोलतना राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदीची स्तुती केलीय.
दरम्यान आरक्षण चित्रपटाला विरोध करणार नसल्याचंही राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. उत्पन्नानुसार आऱक्षण देण्यास काहीच हरकत नसल्याचं म्हटल आहे.

raj thackeray
raj thackeray
नरेंद्र मोदींसारखे पंतप्रधान देशाला मिळाले दर देशाचं भलं होईल. गेल्या काही वर्षांपूर्वी आपल्या मागे असलेल्या देशांनी केलेली प्रगती पाहून थक्क व्हायला होतं. आपल्याला टीव्हीवर जे एक्स्पोजर मिळते. ते रस्त्यावर मिळत नाही. सध्या राजकारणात व्यक्ती भ्रष्टाचारात इतके लिप्त आहेत. की त्यांनी देशाची काहीच पडलेली नाही. त्यामुळे मोदींसारखा व्यक्ती पंतप्रधान पदाला लायक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

गेल्या काही दिवसात आरक्षण या चित्रपटावरून राजकीय वातावरण तापले असताना राज ठाकरे यांनी मात्र, आरक्षण या चित्रपटाला मनसे विरोध करणार नसल्याचे म्हटले आहे. आरक्षण हे जातीनुसार नाही तर उत्पन्नानुसार देण्यात यावं, असंही मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.

Friday, August 5, 2011

महाराष्ट्राचे ग्रह फिरले आहेत! - राज ठाकरे

खालील बातमी म टा च्या सौजन्याने .......



टाटांच्या ' नॅनो ' प्रकल्पाच्यापाठीशी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी उभेराहिले , त्यासाठी तातडीनेपरवानगी दिली , असे योग जुळूनयावे लागतात . व्यवसायउद्योगांसाठी महाराष्ट्रातही यापूर्वीअसेच योग जुळून आले होते ,परंतु आता नेमके कोणते ग्रहफिरलेत तेच कळत नाही , अशीमल्लिनाथी गुजरात दौऱ्यावरअसलेले महाराष्ट्र नवनिर्माणसेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी येथील ' नॅनो ' प्रकल्पास भेट दिल्यावर केली .

' नॅनो ' प्रकल्प महाराष्ट्रात आला नाही , याचे दु : वाटते आणि त्याचवेळी ' बरे झाले, टाटा महाराष्ट्राच्या भानगडीत पडले नाहीत , असेही वाटते . तेथे त्यांना पैसेहीखायला घालावे लागले असते आणि परवानगीही ताबडतोब मिळाली नसती ' असाटोला लगावत , ' आमच्याकडे मुख्यमंत्री भेटत नाहीत ही वस्तुस्थिती आहेच ', अशीपुस्ती राज यांनी जोडली .

गुजरातमध्ये अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने काम सुरू आहे . खासगी कंपन्यांप्रमाणे हेसरकार नियोजनबद्ध काम करीत आहे . राजकारणी आणि प्रशासन एकमेकांत मिसळूनराज्याच्या हिताचा विचार करत आहेत . इतरत्र यापेक्षा विरुद्ध चित्र दिसते .राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती आणि त्यास प्रशासनाची साथ असल्यास राज्यात काय होऊशकते याचे गुजरात हे आदर्श उदाहरण ठरावे , असे राज म्हणाले .

गुजरात अभ्यास दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी , गुरुवारी राज यांनी साबरमती नदी विकासप्रकल्प , अहमदाबाद मधील ' जनमार्ग बीआरटीस ' आणि ' नॅनो ' प्रकल्पाची पाहणीकेली . तसेच साणंद तालुक्यातील वासणा गावास भेट देऊन सुरक्षित मातृत्वासाठीअसलेल्या चिरंजीवी योजनेचीही माहिती घेतली . अहमदाबाद मधील कांकरियातलावाच्या सुशोभिकरणाचे कामही त्यांनी पाहिले .

सीईओ नव्हे विश्वस्त !

मला महाराष्ट्रच प्रिय आहे ; पण गुजरात पुढे जात आहे हे वास्तवच आहे . गुजरातच्याविकासाचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी हे एखाद्याकंपनीच्या सीईओप्रमाणे नव्हे तर एखाद्या ट्रस्टच्या विश्वस्ताप्रमाणे काम करीत आहेत .हा मोठा फरक आहे . त्यास जनसहभागाची जोड आहेच , परंतु मुळात राज्यकर्त्यांनाहीहा आपला प्रदेश आहे , हे आपले राज्य आहे याची जाणीव आहे , असे निरीक्षण ठाकरेयांनी नोंदवले .

पुण्यात कुठे आहे कंट्रोल रुम ?

अहमदाबादमध्ये बीआरटीएस यशस्वी ठरली कारण त्याचे नियोजन त्या रीतीनेकरण्यात आले . केवळ रस्त्याच्या मध्यभागी बॅरिकेड्स टाकून , बसगाड्या खरेदी करूनउपयोग नाही . अहमदाबादप्रमाणे पुण्यात बीआरटीएसची कंट्रोल रूम कुठे आहे ? तेथेफक्त पैसे किती खाता येतील याचाच विचार दिसतो , अशी टिप्पणी राज यांनी केली .

गोदापार्क ते साबरमती

साबरमतीच्या तिरावर होत असलेले विकास प्रकल्पाचे काम पाहून ठाकरे यांना त्यांचेस्वप्न असलेल्या नाशिकमधील ' गोदा पार्क ' चे स्मरण झाले . त्याचवेळी या प्रकल्पाचेएम . डी . आणि अहमदाबाद पालिकेचे उपायुक्त कॅ . दिलीपकुमार महाजन यांनीसाबरमतीचे काम सुरू करण्यापूर्वी गोदा पार्कला भेट दिल्याचे सांगितले . आपण जेव्हाते काम करत होतो तेव्हा अनेकांना त्याचे गांभीर्य कळले नाही , कारण त्यात पैसेखायला वाव नव्हता . बरेच अडथळे आणले गेलेे . परंतु आता साबरमतीसाठी तेचकाम पाहिले याचा मला आनंद वाटतो , असे राज म्हणाले .

Thursday, August 4, 2011

भेटीचे 'राज'कारण नको!

खालील लेख म टा च्या सौजन्याने ..........................



एखादा नेता दहा दिवस परदेशात फिरायला गेला, तर त्याची बातमी होते. मग एखादा नेता विकासाच्या चांगल्या गोष्टी पाहण्यासाठी शेजारच्या राज्यात आला तर त्याची सकारात्मक बातमी करण्याऐवजी त्यात राजकारण का पाहता? असा सवाल करत गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजकीय विचारांची अस्पृश्यता सोडून राष्ट्रहित राजकारणापेक्षा जास्त महत्त्वाचे असल्याची भूमिका घेत मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या गुजरातभेटीचे समर्थन केले.

गुजरातमधील विकास-कामांच्या अभ्यासासाठी राज ठाकरे आणि त्यांची टीम गुजरात दौऱ्यावर असून त्याचा प्रारंभ बुधवारी झाला. सर्वप्रथम त्यांनी अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आश्रम आणि साबरमतीच्या गांधी आश्रमाला भेट दिली. प्रवीण दरेकर, मंगेश सांगळे, वसंत गिते आणि रमेश पाटील या चार आमदारांसह उदय निरगुडकर, राघव नरसाळे, जयराज साळगावकर, धनंजय मुंगळे, अतुल चांडक आदींचा राज यांच्या शिष्टमंडळात समावेश आहे.

शिष्टमंडळासाठी गुजरात सरकारच्या निरनिराळ्या विभागांनी केलेल्या कामाचे सादरीकरण दिवसभर करण्यात आल्यावर संध्याकाळी मुख्यमंत्री नरेंद मोदी यांनी शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यावेळी राज व शमिर्ला ठाकरे यांनी त्यांना अश्वारूढ शिवाजी महाराजांचे शिल्प आणि शिवस्तुती भेट दिली. तर मोदींनी 'वाचे गुजरात' या अभियानाच्या परंपरेप्रमाणे त्यांना सामाजिक समरसता हे पुस्तक भेट दिले.

तुम्ही राज यांना गुजरातभेटीचे निमंत्रण दिले, इतरांना का नाही? या प्रश्नाच्या उत्तरात मोदी यांनी राज यांच्या गुजरातभेटीची पार्श्वभूमी विशद केली. राज यांना आपण प्रथमच भेटतो आहोत. यापूवीर् कधी भेटलो नव्हतो. त्यांचा एप्रिल-मेच्या सुमारास फोन आला. गुजरातला भेट द्यायची आहे, असे ते म्हणाले. मला वाटले ते कुटुंबासोबत येतील आणि गीरला सिंह बघायला जातील. पण त्यांचा विचार वेगळाच होता. गुजरात आणि महाराष्ट्राचा जन्म एकाच वेळी झाला, आता गुजरातने काय प्रगती केली हे पाहायचे असल्याची इच्छा राज यांनी व्यक्त केली, असे मोदी यांनी सांगितले. या भेटीपूवीर् राज यांची एक टीम आली त्यांनी कोणत्या विषयावर चर्चा करायची याची रूपरेषा ठरवली. अमूक बघा, तमूक बघा असे आम्ही त्यांना सांगितले नाही. गुजरातची प्रगती पाहण्यासाठी युनिसेफ, डब्ल्यूएचओ, स्वयंसेवी संस्था, इतर राज्यांचे अघिकारी येतात. सरदार सरोवर प्रकल्प, फोरेन्सिक लॅब, सौर प्रकल्पांचा अभ्यास करण्यासाठी येतात. तशीच त्यांची भेट आहे, असे मोदी म्हणाले.

राजकारणातही अभ्यासाची गरज असते. देश पूर्णपणे बुडाला आहे, आता त्याचे काही होऊ शकत नाही, यावर माझा विश्वास नाही. इच्छा असेल तर आपण सगळे बदलू शकतो. म्हणूनच राजकीय विचारांची अस्पृश्यता सोडून राजकारणापेक्षा राष्ट्रहिताचा विचार करायला हवा, असे मोदी म्हणाले.

..........................................

म्हणून बोलतो हिंदी

साबरमती आश्रमातून बाहेर पडण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना राज ठाकरे यांनी हिंदीतून उत्तरे दिली. त्याची जोरदार चर्चा वृत्तवाहिन्यांवर होत असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर काहीशा वैतागलेल्या राज यांनी 'ही चर्चा तुम्हीच करताय, लोकांचा त्याच्याशी संबंध नाही. सकाळी बोलतानाच आपण महाराष्ट्राबाहेर असल्याने हिंदीतून बोलत असल्याचे स्पष्ट केले आहे. गुजराती येत असती तर त्याही भाषेत बोललो असतो', असे उत्तर त्यांनी दिले.

महाराष्ट्रच नंबर वन

गुजरातच्या विकासाविषयी ऐकले होते. प. बंगालमधील नॅनोचा प्रकल्प येथे आला तेव्हा रतन टाटांसारख्यांनीही मोदींची स्तुती केली होती. त्यामुळे नक्की काय घडते आहे ते पाहण्याची इच्छा होती. मोदींबद्द्ल आदर आणि सन्मान वाटतो. राज्याची प्रगती आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे माझे पॅशन आहे. म्हणून गुजरातच्या अभ्यास दौऱ्यावर आलो आहे. त्यात राजकारण आणू नका, असे राज ठाकरे म्हणाले. उद्योग आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्याबाबतीत आजही महाराष्ट्रच नंबर वन आहे. परंतु भ्रष्टाचार आणि लोडशेडिंगसारख्या समस्या राज्याच्या प्रगतीच्या आड येत असल्याचेही ते म्हणाले.

Monday, August 1, 2011

राज ठाकरे जाणार गुजरात दौ-यावर

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


गुजराती जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करून सलग तिस-यांदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलेले नरेंद्र मोदी यांच्या मॅजिक ने भल्याभल्यांना भुरळ घातली असताना मनसे प्रमुख राज ठाकरे त्याला अपवाद कसे? मोदी मॅजिक नेमकी आहे तरी काय, ते तपशीलवार जाणून घेण्यासाठी राज ठाकरे येत्या ३ ते ११ ऑगस्टदरम्यान गुजरातभर फिरणार आहे.

राज यांच्या दौ-याची सुरुवात अहमदाबादजवळच्या महात्मा गांधींच्या साबरमती आश्रमात अभिवादन करुन होईल. त्यानतंर राजधानी गांधीनगर येथे गुजरात सरकारचे अधिकारी राज यांच्यासमोर एक प्रेझेंटेशन सादर करणार आहे. यात गुजरातचा झपाट्याने होत असलेला औद्योगिक विकास, सेझ प्रकल्प, पर्यटन विकास, झोपडपट्टी पुनर्वसन योजना, जल पुनर्प्रक्रिया, जलसंधारण, रस्ते विकास, सौर, औष्णिक व पवन ऊर्जा, मुलींसाठीचे शिक्षण, विमा योजना आदी विषयांवर हे सादरीकरण व त्यानंतर चर्चा करण्यात येणार आहे.

अधिका-यांसोबत ही चर्चा आटोपल्यानंतर ३ ऑगस्टच्या सायंकाळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज ठाकरे यांची विशेष चर्चा होईल. त्यानंतर ४ ऑगस्टपासून राज ठाकरे गुजरात दौ-यावर निघणार आहे. यात बडोदा, जामनगर, राजकोट, पोरबंदर, कच्छ, भरुच, आदी महत्त्वाच्या शहरांना भेट देऊन तेथील विविध विकास प्रकल्प पाहून त्याचे महत्त्व समजून घेणार आहे. यात गुजरातमधला सर्वात मोठा नर्मदा प्रकल्प, वनबंधू ग्राम योजना, राजकोट ऑटो इंजिनियरिंग, कंकरिया प्रकल्पाचा समावेश आहे.

नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये केलेल्या विकासाचे अवलोकन करून महाराष्ट्राच्या विकासासाठी ते येथे कसे राबवता येतील या हेतुने राज यांच्या गुजरात दौ-याची आखणी करण्यात आली असल्याचे मनसेकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, मुंबई शहरात गुजराती समाजाची मोठी संख्या आहे. राज ठाकरे यांच्या गुजरात दौ-यामुळे आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मनसेला राजकीय लाभ मिळू शकतो असे राजकीय निरिक्षकांचं मत आहे.

संतप्त आयुक्त-आक्रमक मनसे 'जाबसुनावणी'

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........



मुंबईतील खड्डे बुजवण्याच्या मुद्द्यावरून कायदा हातात घेऊ नका, तुम्ही मनसेवाले अशीच दादागिरी करता, अशा शब्दांत महापालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी शनिवारी मनसेच्या कार्यर्कत्यांना सुनावले. त्यावर आमच्या आंदोलनाची हीच स्टाईल आहे. केसेस अंगावर घेण्याची तयारी आहे. दादागिरी करायच्यावेळेस दादागिरीही करू, असे मनसेच्या कार्यर्कत्यांनी उत्तर देताच आयुक्त अधिकच संतप्त झाले. या घटनेनंतर आता पालिकेत मनसे विरुद्ध आयुक्त असा संघर्ष दिसणार आहे.

मुंबईतील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून शुक्रवारी सभागृहाच्या बैठकीत आयुक्त सुबोधकुमार यांनी कायदा हातात घ्याल तर केसेस टाकू, असा इशारा मनसेला दिला होता. त्यावर आयुक्तांना जाब विचारण्यासाठी मनसेचे तीस ते पस्तीस कार्यकतेर् दुपारी पालिका मुख्यालयात थडकले. विभाग अध्यक्ष अरविंद गावडे व संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यर्कत्यांनी आयुक्तांची भेट घेतली. आतापर्यंत किती कंत्राटदारांवर कारवाई केली, असा प्रश्न कार्यर्कत्यांनी करताच संतप्त झालेल्या आयुक्तांनी, मी तुम्हाला उत्तर देण्यास बांधिल नाही, असे सुनावले.

त्यावर, तुम्ही जनतेचे नोकर आहात, तुम्हाला उत्तर द्यावेच लागेल, असा टोला लगावताच आयुक्त लालबुंद झाले. आयुक्तांचाही आवाज चढला होता. वातावरण तंग होताच सुरक्षारक्षकांनी आयुक्तांच्या दालनात धाव घेतली. आयुक्तांचे सहाय्यक असलेले सुधीर नाईकही हा प्रकार पाहून अवाक झाले. तुम्ही मनसेवाले अशीच दादागिरी करता, तुमच्या नेत्यांशी मी बोलतो, कायदा हातात घेऊन नका तुमच्यावर केसेस दाखल होतील, अशी धमकी आयुक्तांनी दिली.

त्यावर कार्यर्कत्यांनी 'गो अहेड' असे सांगितले. मनसेची हीच स्टाईल आहे, आता आम्ही विनंती करायला आलो आहे, वेळ पडली तर दादागिरीही करू, कायदा राखण्याचे काम पोलिसांचे आहे, तुम्ही कंत्राटदारांवर कारवाई करा, वेळ पडली तर केस अंगावर घेण्याची तयारी असल्याचे मनसेच्या कार्यर्कत्यांनी सांगितले. खड्ड्याची अवस्था बघायची असले तर दादरच्या केशवसूत पुलावर येऊन बघा, असे आव्हान अखेर मनसेने दिले.