Wednesday, December 22, 2010

नीलम ताई, तोंडावर थोडा आवर घाला !

काल स्टार माझा वर विशेष बघत होतो त्यात नेहमीप्रमाणे शिवसेने तर्फे नीलम ताई उपस्थित होत्या. जेष्ठ पत्रकार असलेल्या प्रकाश अकोलकरांनी काही वक्तव्य केल्यानंतर नीलम ताई म्हणाल्या कि आम्हाला सल्ला दिला त्याबद्दल धन्यवाद आणि मी त्याबद्दल तुम्हाला १०१ रुपये दक्षणा देईन. एका जेष्ठ पत्रकाराला चर्चा चालू असतांना अश्या पद्धतीने बोलणे कितपत योग्य आहे?

परवा चहा पानावरून वाद झाल्यावर त्या कल्याण डोम्बिवली येथील निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज साहेबांना उद्देशून म्हणाल्या कि बेड्कीला बैल होता आले नाही .... त्याना कल्पना नसेल तर सांगतो आमचे २७ नगरसेवक निवडून आले आहेत आणि जवळ जवळ ३४ जागांवर आम्ही दुसऱ्या क्रमांकावर आहोत, त्यातील १० -१५ जागा अतिशय थोड्या फरकाने गेल्या आहेत आणि आम्हाला कल्याण डोम्बिवली मिळून १३०००० मते मिळाली आहेत. मनसे ला ह्या के डी एम सी निवडणुकीत मतदारांनी भरघोस मतदान केल्याचं हे उदाहरण आहे आणि आम्ही तटस्थ राहिल्या मुळेच तुमचा महापौर निवडून आला हे तुम्ही कसं काय विसरताय??

आमच्या नेत्यांबद्दल तारतम्य सोडून बोलायला तुम्ही आहातच कोण?... तुमच्या वर निवडणुकीच्या काळात कोल्हापूरची जबाबदारी होती (माझ्या माहितीप्रमाणे) तिथे तर तुमचे पूर्ण पानिपत झाले, मग त्याबद्दल तुम्ही काय बोलणार??? असली बेजबाबदार वक्तव्य करून तुम्ही तुमची स्वताची प्रतिमा खराब करत आहेत ह्याचे तरी भान ठेवा .... केवळ कार्याध्याक्ष्याना आवडेल म्हणून जर असली वक्तव्य केलीत तर ती तुम्हाला भविष्यकाळात फार महागात पडतील ह्यात शंका नाही.

आपला

विनोद शिरसाठ
प्रभाग क्रमांक २
कल्याण (प)

No comments:

Post a Comment