Wednesday, October 27, 2010

स्वीमिंग पूल कोरडाच!

म टा च्या सौजन्याने

वाचा कल्याण डोंबिवलीतील रखडलेली कामं ......................................


आशिष पाठक

कल्याण-डोंबिवलीकरांचा विचार करून पालिकेने कल्याणमध्ये हाती घेतलेल्या स्वीमिंग पूलचे काम गेल्या १४ वर्षांपासून रखडले असून दुसरा पूलही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अर्धवट स्वीमिंग पूलसाठी लोकप्रतिनिधींना महापालिकेत पाठवले होते का, असा सवाल रहिवासी करीत आहेत.

पायाभूत सुविधा देत असताना पालिकेने रहिवाशांच्या मनोरंजनाची साधनेही उभारली पाहिजेत, अशी दूरदृष्टी असणारे टी. चंदशेखर प्रशासक असताना त्यांनी आधारवाडी येथे एक सुसज्ज पार्क उभारण्याचा निर्णय घेतला. यामध्ये स्वीमिंग पूल, वॉटर पार्क आणि गोल्फ क्लबचा समावेश होता. त्या दरम्यान पालिकेची निवडणूक जाहीर झाली होती. प्रकल्पाचे श्रेय राजकीय नेत्यांना मिळावे यासाठी चंदशेखर यांनी प्रकल्पाच्या मंजुरीचा विषय एक महिन्यासाठी प्रलंबित ठेवला.

लोकप्रतिनिधींची राजवट आल्यावर पहिल्याच सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी हे श्रीमंतांचे खेळ कोणाला परवडणार?, असा सवाल करत हा प्रस्ताव फेटाळून लावला. हा प्रकल्प झाला असता तर १९९६ मध्येच मुंबईच्या तोडीस तोड पार्क कल्याणमध्ये उभे राहिले असते. परंतु व्हिजन नसलेल्या लोकप्रतिनिधींमुळे हा प्रकल्प बारगळला. सन १९९९ मध्ये पालिकेने डावजे तलावाचे सुशोभिकरण व स्वीमिंग पूलचा प्रकल्प खासगीकरणातून हाती घेतला. तत्कालीन मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते वाजतगाजत या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. पण आजदेखील स्वीमिंग पूल व तलाव सुशोभिकरण निम्मेदेखील झालेले नाही. आश्चर्य म्हणजे महापालिका सहकार्य करत नसल्याने प्रकल्पाच्या कॉण्ट्रॅक्टरने पालिकेविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली. पण तरीसुध्दा हा प्रकल्प मागीर् लागावा म्हणून एकाही नगरसेवकाने गेल्या १५ वर्षांत प्रयत्न केला नाही.

दुसरा स्वीमिंग पूल पालिकेने आधारवाडी येथील कल्याण स्पोर्ट्स क्लब येथे हाती घेतला. ४ वर्षांपूवीर् टेण्डर झाल्यावर कॉण्ट्रॅक्टरला 'वर्क ऑर्डर' देण्यात आली. पण प्रकल्पाचा आराखडा मंजूर करण्यास पालिकेने साडेतीन वषेर् घालविली. इतकी वर्ष प्रकल्पाचा आराखडा मंजूर का होत नाही याकडे एकाही पालिका पदाधिकाऱ्याने लक्ष दिले नाही. कामाला प्रारंभ होण्याआधीच कॉण्ट्रॅक्टरला प्रकल्प २० ऐवजी ६० वर्षांसाठी देण्याचा ठराव करून नगरसेवक मोकळे झाले. या मेहेरनजरीचे कारण सर्वसामान्य मतदार आता समजून चुकले आहेत.

नार्कत्या सत्ताधाऱ्यांमुळे कल्याण-डोंबिवलीचा विकास खुंटल्याचे दिसून येते. जी महापालिका रस्ते, पाणी आणि स्वच्छता देऊ शकत नाही, ती स्वबळावर स्वीमिंग पूल उभारेल यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. पण हा समज खोटा ठरवत पालिकेने स्वत:च्या निधीतून डोंबिवलीत आंतरराष्ट्रीय दर्जाचा पूल उभारला. पण कल्याणमध्ये खासगीकरणातून तसे करणे पालिकेला जमले नाही. यासाठी प्रशासनासह निष्क्रीय लोकप्रतिनिधीदेखील तितकेच जबाबदार आहेत.

No comments:

Post a Comment