Tuesday, January 25, 2011

सत्कारात दंग! औचित्यभंग!! पंडितजींच्या अंत्यसंस्काराला पुण्याचे पालकमंत्री शक्य असून अनुपस्थित

राष्ट्रवादी ला सत्तेचा माज आला आहे, अजून काय?

खालील लेख लोकमत च्या सौजन्याने ........

पुणे, दि. २४ (प्रतिनिधी) : पंडित भीमसेन जोशी यांच्या निधनाचे वृत्त आज सकाळी साडेआठच्या सुमारास संपूर्ण देशभरात पसरले. त्यानंतर दिल्लीहून परराष्ट्रमंत्री एस. एम. कृष्णा, कर्नाटकाचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयूरप्पा, मुंबईतून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह राज्यातील दुरदूरच्या शहरांमधून भीमसेनजींच्या चाहत्यांनी पुण्याची वाट धरली....मात्र अवघ्या चार तासांच्या अंतरावर असलेल्या कोल्हापूरातून पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांना प्रसंगाचे गंभीर औचित्य लक्षात घेता आले नाही. त्यांना पुणे गाठता आले नाही. राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्याबद्दल पवार यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज दुपारी कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आले होते. वैयक्तिक सत्काराचा हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे प्रसंगावधान पवार दाखवू शकले नाहीत. अवघ्या संगीत विश्वाचे आदरस्थान आणि पुण्याचे नागरिक असलेल्या भीमसेनजींना पुण्याचे पालकमंत्री या नात्याने अखेरची मानवंदना देण्यास पवार अनुपस्थित होते. त्याऐवजी त्यांनी कोल्हापूरातून दुरचित्रवाहिन्यांच्या कॅमेरांसमोर लिखित संदेश 'वाचून' दाखवण्याची तसदी घेतली.
एरवी राज्यातील शासकीय बैठकांना उपस्थित राहण्यासाठीसुद्धा खासगी हेलिकॉप्टरचा वापर करणाऱ्या पवार यांना आज कोल्हापूर-पुणे
प्रवासासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध झाले नाही. पाणीपुरवठा मंत्री प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने वैकुंठात पंडितजींना श्रद्धांजली अर्पण केली.

No comments:

Post a Comment