Tuesday, July 26, 2011

पाहुण्याची वाट कशाला पाहता?- राज

खालील लेख म टा च्या सौजन्याने ........................



नागरिकांसाठी उभारण्यात आलेल्या सोयी-सुविधांचे उद्घाटन करण्यासाठी प्रमुख पाहुण्याची वाट पाहात थांबू नका, काम पूर्ण झाल्यावर त्याचे उद्घाटन करा आणि मोकळे व्हा, असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला.

पुणे महापालिकेतर्फे प्रभाग क्र. ६३ वनाज कंपनी भागात नव्याने विकसित करण्यात आलेल्या कै. सचिन बाळासाहेब आंग्रे उद्यानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला महापौर मोहनसिंग राजपाल, मनसेचे पालिकेतील गटनेते रवींद्र धंगेकर, नगरसेवक किशोर शिंदे, मनसेचे शहराध्यक्ष प्रकाश ढोरे आदी उपस्थित होते.

' पुणे शहराच्या गरजा वाढत आहेत. याचे भान सर्व पक्षांनी ठेवायला हवे. शहरातील नागरिकांना मैदाने, बागा आदी सुविधा मिळाल्या नाहीत तर वाढत्या लोकसंख्येबरोबर येथील रोगराईही वाढेल. त्यामुळे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्याची जबाबदारी नगरसेवकांची आहे. पालिकेकडून नागरिकांसाठी उभारण्यात येणा-या सुविधांच्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुण्याची प्रतीक्षा न करता त्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करा,' असे ठाकरे यावेळी म्हणाले.

' महापालिकेच्या राखीव असणाऱ्या जागांवर बागा, मैदाने करा. नागरिक सर्व प्रकारचे कर भरता आहेत, त्यांच्या मोबदल्यात त्यांना शुल्लक गोष्टी मिळत नसतील तर ती सत्ता चाटायची आहे का? निवडणूक लढवून उपयोग काय?,'असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

पुण्या-मुंबईत बिल्डर मोठ्या सोसायट्या उभ्या करताना त्याठिकाणी बाग, स्विमिंग पूल, जॉगिंग टॅक या सुविधा देऊ असे सांगतात. वास्तविक पाहाता या सुविधा महापालिकेने द्यायला हव्यात मात्र, ते बिल्डरला विकावे लागत आहे. पुणे आता मोठे शहर होत आहे. अनेक भागातले लोक पुण्यात राहायला येत आहेत. लोकसंख्या आणि वाढत्या रोगराईमुळे हॉस्पिटल हा धंदा म्हणून पुढे येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

मराठी मातीत मिसळा....

महापौरासारखी मराठी मातीत मिसळणारी माणसे हवीत. जी माणसे मराठी संस्कृती समजून घेत नाहीत त्या माणसांना कुठे लाथ मारायची हे माहीत असल्याचे राज ठाकरे यावेळी म्हणाले.

Friday, July 22, 2011

मनसे आमदार दालनाबाहेरच!

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


गिरणी कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा करण्यासाठी गेले महिनाभर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे वेळ मागत होतो. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने शेवटी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट मागितली व ती त्यांनी तातडीने दिली. मात्र त्याचवेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात त्याच विषयावर चर्चा असल्याने पवार यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्र्यांकडे चचेर्साठी गेलो. मुख्यमंत्र्यांनी भेट सोडाच, उलट दालनात बसवून ठेवले, असा आरोप मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी केला. तर आपण चचेर्साठी बोलविले होते. पण ते निघून गेले, असा खुलासा मुख्यमंत्री चव्हाण यांनी केला.

पाचवेळा मी गिरणगावातून निवडून येत असल्याने आम्हाला गिरणी कामगारांच्या प्रश्ानंची जाण आहे. त्यामुळे त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी गेले महिनाभर आम्ही मुख्यमंत्र्यांची वेळ मागत होतो. परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याने उपमुख्यमंत्र्यांची वेळ मागितली. त्यांनी चचेर्ची वेळ दिली. त्यानंतर गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे वेळ नसल्याने त्यांचे गिरणी कामगारांच्यावतीने आभार मांडण्यासाठी बुधवारी मी मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात गेलो, असे मनसेचे गटनेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.

गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे कळताच मुख्यमंत्री कार्यालयाने तातडीने गुरुवारी गिरणी कामगारांच्या घरासंदर्भात बैठक लावली, गुरुवारी उपमुख्यमंत्री पवार यांचा आम्हाला फोन आला, मी मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे, तुम्ही प्रथम त्यांच्यापुढे गिरणी कामगारांचे प्रश्न मांडा, असे त्यांनी सांगितल्यानेच तेथे गेलो, असे नांदगावकर म्हणाले.

..........................................

मुख्यमंत्री काय चेस खेळतात?

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना गिरण्यांच्या प्रश्नांवर मनसेच्या आमदारांना चर्चा करण्यासाठी वेळ नाही. आमदारांचा अवमान करतात. परंतु त्यांचा अवमान करण्याची संधीही आम्हाला मिळेल, असा टोला मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी लगावला. मुख्यमंत्री जनतेच्या प्रश्नासाठी वेळ देत नाहीत तर ते काय वर्षा बंगल्यावर चेस खेळत असतात की काय, अशी खोचक टीका राज यांनी केली.



खड्ड्यांचा वाद रस्त्यावर!

मुजोर महापौर आणि उदासीन प्रशासनाचा धिक्कार असो .........


खालील लेख म टा च्या सौजन्याने ....


कल्याण - डोंबिवलीतील रस्त्यांनापडलेल्या खड्ड्यांच्यामुद्द्यांवरून गुरुवारी मनसे आणिशिवसेनेच्या कार्यकर्त्यांत तुंबळजुंपली . खड्ड्यांविरोधातआंदोलन पुकारणाऱ्यामनसैनिकांनी महापौरांविरोधातघोषणाबाजी केल्याने त्यांनीपालिकाविरोधात शहरभरझळकवलेले बॅनर काढूनटाकण्याचे आदेश दिले .

त्यामुळे संतापलेल्या मनसैनिकांनी महापौरांना अडविल्याने दोन्ही सेना एकमेकांसमोरउभ्या ठाकल्या . धक्काबुक्कीनंतर प्रकरण पोलिसांपर्यंत गेल्यानंतर एकमेकांविरोधातगुन्हा दाखल करण्याचा निर्णय झाल्याने अखेर दोन्ही सेना माघारी फिरल्या .

शहरातील रस्ते मृतवत झाल्याचा आरोप करीत मनसेच्या रस्ते आस्थापनाविभागातर्फे गुरुवारी डोंबिवलीत रस्त्यांचे श्राद्ध घालण्याचे आंदोलन करण्यात आले .आंदोलनादरम्यान मनसैनिकांनी महापौर वैजयंती गुजर पालिका प्रशासनाविरोधातजोरदार घोषणाबाजी केली . याबाबत माहिती मिळताच महापौर डोंबिवलीत दाखलझाल्या , मात्र तोपर्यंत मनसैनिकांचे आंदोलन संपुष्टात आले होते . त्यामुळेमनसैनिकांनी रस्त्यांच्या दुर्दशेबद्दल महापालिकेविरोधात शहरभर झळकवलेले बॅनर होर्डिंग तातडीने काढून टाकण्याचा आदेश प्रशासनाला दिला .

महापौरांच्या आदेशामुळे पालिका कर्मचाऱ्यांनी लगेचच मनसेची होर्डिंग उतरविली .ही माहिती मिळताच संतापलेल्या मनसैनिकांनी शहराध्यक्ष राजेश कदम यांच्यानेतृत्वाखाली इंदिरा गांधी चौकात महापौरांना अडविले . तिथे महापौर मनसैनिकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली . ' आंदोलन करतानामहापौरांविरोधात घोषणाबाजी करण्याची गरज काय ?', असा संतप्त सवाल वैजयंतीगुजर यांनी केला . तर ' दीड महिन्यांपूर्वी खड्ड्यांच्या मुद्द्यावर मनसैनिकांनी पालिकाअधिकाऱ्यांविरोधात आंदोलन केले , त्यावेळी तुम्हीच प्रशासनाला पाठीशी घालतमनसैनिकांवर गुन्हे दाखल करणे भाग का पाडले ?', असा सवाल राजेश कदम यांनीकेला .

या चकमकीची बातमी डोंबिवलीत वेगाने पसरली त्यामुळे दोन्ही सेनांचे पदाधिकारीघटनास्थळी जमा झाले . शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे , माजी शहरप्रमुखसदानंद थरवळ , आमदार रवींद्र चव्हाण , महिला आघाडीप्रमुख स्मिता बाबर तरमनसेकडून आमदार रमेश पाटील , विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर , राहुल कामतआदी समोरासमोर उभे ठाकल्याने वातावरण तंग झाले होते . हा जमाव पाहून इंदिरागांधी चौक परिसरातील दुकानदारांनी दुकाने बंद केली . तोपर्यंत रामनगर पोलीसहीघटनास्थळी दाखल झाले .

पोलिसांच्या उपस्थितीतच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत धक्काबुक्की सुरू झाली . प्रकरणहाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सर्वांना पोलीस स्टेशनला आणले. तिथेही घोषणाबाजी सुरू झाल्याने परिस्थिती चिघळण्याची चिन्हे दिसू लागली .परंतु मनसेचे आमदार रमेश पाटील यांनी मध्यस्थी करत दोन्ही पक्षांच्यापदाधिकाऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले तणाव निवळला .

महापौरांच्या राजीनाम्याची मागणी

मनसेचे शहर अध्यक्ष राजेश कदम यांनी महापौर वैजयंती गुजर यांचा राजीनाम्याचीमागणी केली असून मनसेचे नगरसेवक सभागृहात शिवसेनेला सहकार्य करणार नाहीत, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे . तर मनसैनिकांनी अकारण आंदोलने करू नयेत ,असे गुजर यांनी म्हटले आहे.

Wednesday, July 20, 2011

विभाग अधिकाऱ्याला मनसे नगरसेवकांनी नाल्यात बुचकळले

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ....



कल्याण परिसरातील नालेसफाईच्या पहाणीसाठी निघालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांनी आज उद्धट वर्तन करणारे महापालिकेचे विभाग अधिकारी काशीनाथ पडवळ यांना थेट नाल्यातील सांडपाण्यात बुचकळून बाहेर काढल्याने महापालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली. ‘माझी आता बदली झाली आहे, त्यामुळे एक पेग मारुन येतो’, असे उद्गार काढल्यानेच पडवळ यांना नाल्यात ढकलल्याची सारवासारव या घटनेनंतर मनसेच्या नगरसेवकांना करावी लागली. दरम्यान, महापालिका वतुळात मात्र या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विशेष म्हणजे, यावेळी संतापलेल्या मनसे नगरसेवकांनी आरोग्य निरीक्षक प्रशांत पुरी यांच्यावरही दांडगाई करत त्यांनाही गटाराच्या चेंबरमध्ये फावडे घेउन गाळ साफ करण्यासाठी उतरवून दांडगाईचे प्रदर्शन घडविले.
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर-राणे, मनसेचे गटनेते नरेंद्र गुप्ते व महापालिकेतील पक्षाचे अन्य नगरसेवक ‘ब’ प्रभागात सकाळपासून नाले सफाईची पाहणी करीत होते. ‘ब’ प्रभागात अनेक ठिकाणी नाले, गटारे तुंबले असल्याचे व जागोजागी पाणी साचल्याचे पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संतापलेल्या दरेकर आणि गुप्ते यांनी मोबाईल करून प्रभाग अधिकारी पडवळ यांना घटनास्थळी बोलविले. पाऊण तासानंतर पडवळ व त्यांचे साथीदार घटनास्थळी आले. नालेसफाई झाली नाही, सर्वत्र पाणी तुंबले आहे, तुम्ही काय करता अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पडवळ यांच्यावर केली. मात्र, पडवळ यांनी तो विषय हसण्यावारी नेऊन ‘आता कुठे पाऊस पडतो आहे. माझी बदली झाली आहे. एक पेक मारून आता झोपणार अशी’ असे वक्तव्य केल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे होते. या वक्तव्यामुळे संतापलेल्या मनसे नगरसेवकांनी पडवळ यांना थेट नाल्यातच ढकलले. नाल्यातील सांडपाण्यात बुचकळून पडवळ यांना बाहेर काढले.
पडवळ यांना हिसका दाखविल्यानंतर सहाय्यक आरोग्य निरीक्षक पुरी याला गटारातील चेंबरमध्ये उतरविण्यात आले. तेथील गाळ उपसण्यास पुरी यांना भाग पाडण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी वैशाली दरेकर यांच्याशी संपर्क साधला असता पडवळ यांना नाल्यात बुचकळून बाहेर काढण्यात आलेले नाही, अशी माहिती दिली. लहानसे गटार होते, त्यात त्यांना ढकलण्यात आले. या गटारात त्यांचा पाय अडकला, असे दरेकर म्हणाल्या. पडवळ यांनीही नाल्यात बुचकळल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे.

Monday, July 18, 2011

बातमी लिहिण्याचे धडे देणार राज ठाकरे

खालील लेख स्टार माझा च्या सौजन्याने ......



मुंबईत बॉम्ब स्फोट झाल्यावरही परप्रांतीयांवर आसूड उगारणाऱ्या ‘संपादक’ राज ठाकरे यांनी बातमी कशी लिहावी, कशी समजून घ्यावी याचे धडे आज पत्रकार परिषदेत दिले. मुंबईतील बॉम्ब स्फोट हे परप्रांतीयामुळेच होतात, असा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला.
raj thackeray
raj thackeray
मुंबईत १३ जुलैला झालेल्या बॉम्ब स्फोटानंतर हे बॉम्ब स्फोट परप्रांतीयांमुळेच झाले असल्याचे राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले होते. या वृत्ताचा मीडियाने विशेषतः हिंदी चॅनल्सने कसा विपर्यास केला या संदर्भात स्पष्टीकरण राज ठाकरे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत दिले.
मुंबईत झालेले बॉम्ब स्फोट हे उत्तर भारतीयांमुळे नाही तर त्या येणाऱ्या लोंढ्यामुळे झाले असल्याचे त्यांनी सांगितले. यात सर्व उत्तर भारतीयांना मी दोषी धरत नाही. परंतु आज उत्तर भारतातून ४८ रेल्वे मुंबईत येतात. कोण येतो, कुठं जातोय. कोणाचा कोणाला थांगपत्ताच नाही. त्यात दहशतवादीही आले असतील, याचा कोणी विचार केलायं का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
मी प्रतिक्रिया दिल्यानंतर यांचं टायमिंग चुकलंय. आता लोंढ्याचं राजकारण करण्याची गरज आहे का, अशा बातम्या छापून आल्या. मी काय म्हटलो, हे नीट समजून न घेता विनाकारण बातम्या ट्विस्ट करून दिल्या जातात. बातमी नीट समजून घ्या, असाही संपादकीय सल्ला राज ठाकरे यांनी यावेळी दिला.

अबू आझमीची चौकशी करा
बॉम्ब स्फोटांच्या वेळीच या अबू आझमीला उत्तर भारतीयांचा का कळवळा येतो. त्याच वेळी तो प्रतिक्रिया द्यायला येतो. पोलिसांच्या तपासला वेगळे वळण देण्यासाठी अबू आझमी हे उद्योग करतो. पहिले त्याची चौकशी करा. यापूर्वीही बॉम्ब स्फोटाप्रकरणी त्याची चौकशी झाली आहे. सरकारने अशा गोष्टीकडे लक्ष न देता पोलिसांना तपासाचे स्वातंत्र्य द्यावे, अशीही सूचनाही त्यांनी यावेळी केली.

गृह खाते काँग्रेसकडे असते तर दहशतवादी घाबरले असते
गृहखाते राष्ट्रवादीला देणे घोडचूक होती, या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत राज ठाकरे म्हटले. गृहखाते काँग्रेसकडे असते तर काय दहशतवादी घाबरले असते. नको नको बाबा, गृहखाते काँग्रेसकडे आहे. असे म्हटले असते. स्वतःच्या अपयशाचे बोट दुसऱ्याकडे दाखवण्याचा प्रकार आहे. सत्ता तुमची आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही सत्तेत आहेत, असे दुसऱ्याकडे बोट दाखवणे योग्य नाही.

कामतांना नंतर सुचलेले शहाणपण
माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री गुरूदास कामत यांच्यावरही टीकेची झोड उठवत राज ठाकरे म्हणाले, कामत यांचं मंत्रीपद गेल्यामुळे त्यांना आता राज्य सरकारचं अपयश दिसत आहे. त्यांना नंतर सुचलेले शहाणपण आहे.

आर. आर. आबा लक्ष कुठेयं
काल एका वर्तमान पत्रात पोलिसांची उलटी पडलेली स्पीड बोट पाहिली. तसेच ठाण्याच्या पोलिसांकडे बॉम्बचा सूट नाही. हे आर. आर. पाटील करतायं काय त्याचं कुठे लक्ष आहे. पक्षाच्या अंतर्गत राजकारणातचं त्यांचं लक्ष दिसतयं, असा टोलाही त्यांना लगावला.

पोलिस भरती करतायं का कपडे शिवताहेत

पोलिसांची संख्या कमी आहे. दरवेळा ओरड असते. पोलिसांची भरती होते, तेव्हा छाती फुगवलेल्या तरुणाचे फोटो छापून येता. कुठे गेल्या त्या छात्या. असा सवाल उपस्थित करून राज ठाकरे म्हणाले, पोलिस भरती करताहेत का छात्यांची मापं घेऊन कपडे शिवताहेत. पोलिसांमध्ये माणसं भरू शकत नसाल, तर काय करताहेत तुम्ही. याचं लक्ष फक्त सूत गिरण्या, साखर कारखान्यांमध्ये आहे. बाकीकडे लक्ष द्यायला यांना वेळ नाही.

मायवती आपल्या घराकडे लक्ष द्या

मायवतींना आपले राज्याकडे लक्ष द्यावे, त्यांना बोलायला काय जातं आहे. माझ्या टीका करण्यापेक्षा आपल्या राज्याकडे लक्ष द्या. मायावती म्हणतात, मुंबईत उत्तर भारतीयांना लोकांना घरं दिले पाहिजे, मग तुम्ही द्या घरं. स्वतः सत्तेवर बसायचं आणि दुसऱ्याला बोलायचं.

नीतिश कुमारांच कौतुक
नीतीश कुमार यांनी केला ना बिहारचा विकास. बिहारमधून बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. औद्योगिक विकास केला, असे कौतुक राज ठाकरे यांनी केले आहे.

उस्मानीच्या चौकशीत गैर काय? - राज ठाकरे

खालील बातमी म टा च्या सौजन्याने ..........................


फैज उस्मानी जेलमध्ये असलेल्या एका दहशतवाद्याला सातत्याने भेटत होता. अशा परिस्थितीत मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात पोलिसांनी संशयावरुन फैजची चौकशी केली तर त्यात गैर काय? ... या फैजचा अबू आझमी यांना एवढा कळवळा का ?गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचीच अबू आझमी यांना एवढी सहानूभूती का वाटते ?, असे सवाल आज (सोमवारी) राज ठाकरे यांनी उपस्थित केले.

मुंबईत घडणा-या गुन्ह्यांमध्ये ७० ते ८० लोकं उत्तर प्रदेश आणि बिहार पट्ट्यातील असतात. तिथून दररोज ४८ गाड्या मुंबईत येतात. अशा परिस्थिती सुरक्षेच्या दृष्टीकोनातून येणा-या लोंढ्यावर लक्ष ठेवणं आवश्यक असल्याचे राज यांनी सांगितले.

दहशतवादी कारवाया रोखायच्या असतील तर मुंबईत बाहेरुन कोण येतं ? , का येतं ?हे बघायलाच पाहिजे. दहशतवाद्याच्या संपर्कात असलेल्या फैज सारख्याची बाजू घेणा-या अबू आझमीचीच चौकशी व्हायला पाहिजे, असेही राज ठाकरे म्हणाले.

दहशतवाद रोखण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम हवीच. ही यंत्रणा सक्षम करण्याची जबाबदारी गृहमंत्री आर. आर. पाटील यांचीच आहे. जर ते आपलं काम योग्य प्रकारे करत नसतील तर त्यात लक्ष घालण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांकडे आहे.

मुंबईच्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलीस कमी आहेत. त्यांच मनुष्यबळ वाढवायला हवं हे गृहमंत्र्यांना माहिती आहे. मग एवढे दिवस ते काय करत होते ? ठाणे जिल्ह्यात पोलिसांकडे बॉम्ब शोधक पथक नाही. समुद्रात गस्त घालायला स्पीड बोट आहेत पण पेट्रोल नाही. ही अशी परिस्थिती निर्माण होईपर्यत गृहखातं काय करत होतं ? , अशा शब्दात राज यांनी गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्न उपस्थित केले.

गृहखातं कोणाकडे आहे यापेक्षा ते कशा प्रकारे काम करतं हे महत्त्वाचं आहे. गृहमंत्री राष्ट्रवादी ऐवजी काँग्रेसचा असता तर काय दहशतवादी घाबरणार होते ? साखर कारखाने आणि सूत गिरण्या चालवणे, एकमेकांची उणीदुणी काढणे हे असलं राजकारण करण्यापेक्षा सुरक्षा यंत्रणा मजबूत करा. दहशतवादाशी लढायच असेल, देशाची आंतरराष्ट्रीय प्रतिमा सुधारायची असेल तर आधी अंतर्गत व्यवस्थेत सुधारणा करा, असे राज यांनी सांगितले.

Wednesday, July 13, 2011

कल्याण-डोंबिवलीचा पुरस्कार 'खड्ड्यांत' पाठवा!

चला खासदार साहेबांना उशिरा का होईना जाग आली .....

खालील लेख म टा च्या सौजन्याने ....................


कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची खडड्यांमुळे पुरती चाळण झाली असताना , कल्याण-डोंबिवली महापालिकेला उत्कृष्ट रस्त्यांचा पुरस्कार मिळतो
हा येथील नागरिकांचा अपमान आहे. शिवसेनेकडे महापालिका असताना सेनेचेच खासदार सांगताहेत
, की हा पुरस्कार परत करा. तुम्हीही पुढे या आणि या पुरस्काराला ' खड्ड्यांत ' पाठवा...

अखिल भारतीय स्थानिक स्वराज्यसंस्थेने उत्कृष्ट रस्त्यांसाठीचा हा राष्ट्रीय पुरस्कार कल्याण-डोंबिवली महापालिकेला का दिला ? हे न उमगणारे कोडे आहे. प्रत्यक्षात निकृष्ट रस्त्यांवरूनपालिकेच्या तीन वरिष्ठ अधिका-यांना आयुक्तांनी ' कारणे दाखवा ' नोटीस बजावलीआहे . तरीदेखील पालिकेला हा पुरस्कार मिळाल्याने स्थानिकांमध्ये आपली क्रूर थट्टाझाल्याची भावना बळावली आहे .

शिवसेनेचे खासदार आनंद परांजपे यांनीही हा पुरस्कार स्वीकारल्याबद्दल सेनेचीच सत्ता असलेल्या महापालिकेचे कान उपटले आहेत. रस्त्यांची झालेली दुरावस्था आणि नागरिकांमध्ये उमटलेली तीव्र प्रतिक्रिया पाहता केडीएमसीने उत्कृष्ट रस्त्यांसाठीचा हा नगररत्न पुरस्कार स्वतःहून परत करावा असे , परांजपे यांनी सांगितले आहे.

नागरिकांची ही चेष्टा थांबायला हवी असे वाटत असेल , तर तुम्हीही पुढे व्हा. ज्या राष्ट्रीय संस्थेने हा पुरस्कार दिला , त्यांना कळू दे की येथील रस्त्यांची अवस्था काय आहे ते ? त्यासाठी एवढेच करा की कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवरील खड्ड्यांचे ,तेथील अतिक्रमाणांचे , दुरावस्थेचे फोटो या अखिल भारतीय स्थानिक स्वराज्यसंस्थेला खालील पत्त्यावर पाठवा. फोटो शक्य नसेल तर किमान चार ओळींचे पत्र लिहून आपल्या भावना कळवा.... (त्याची एक क़ॉपी आम्हालाहीteammtonline@gmail.com या पत्यावर पाठवा)

अशी आहे कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची अवस्था (फोटोफीचर)

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट
एम. एन. रॉय ह्युमन डेव्हलपमेंट कॅम्पस ,
प्लॉट नं. ६ , एफ-ब्लॉक , वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स ,
टीपीएस मार्ग क्र. १२ , टिचर्स कॉलनीच्या मागे ,
वांद्रे (पूर्व) , मुंबई- ४०००५१
ई-मेल- dgaiilsg@gmail.com