Thursday, April 14, 2011

पाणीपुरीवाल्यांना मनसेचा 'प्रसाद'

खालील लेख म टा च्या सौजन्याने .....


लोट्यामध्ये लघवी करून नंतर तोच लोटा पाणीपुरी बनवण्यासाठी वापरणा-या ठाण्यातील पाणीपुरीवाल्या भय्याचे किळसवाणे वर्तन उजेडात आल्यानंतर, मुंबई-ठाण्यातील तमाम पाणीपुरीवाल्या भय्यांवर आज मनसेचा कोप झाला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेत दादर, हुतात्मा चौक, ऑपेरा हाऊस भागात पाणीपुरीवाल्या भय्यांना बेदम मारहाण केली तसेच त्यांचे पाणीपुरीचे साहित्य भररस्त्यात फेकून दिले.

ठाण्यातील नौपाडा भागातील भास्कर कॉलनीत राजदेव लखन चौहान नावाचा भय्या पाणीपुरीचा स्टॉल लावत असे. आपल्याकडील लोट्यामध्येच तो उभ्या जागीच लघवी करत असे. नंतर त्याच लोट्यात पाणी घेऊन तो पाणीपुरी तयार करत असे. काही ग्राहक तर त्याच लोट्यातून पाणीही पित असत. शेजारच्या बिल्डिंगमध्ये राहणा-या अंकिता राणे नावाच्या १९ वर्षीय विद्यार्थिनीने भय्याचा हा किळसवाणा प्रकार घरातून पाहिला. तिने मोबाईलमधून या किळसवाण्या प्रकाराचे शुटिंग केले. टीव्ही वाहिन्या आणि वृत्तपत्रांमध्ये या स्टिंग ऑपरेशनचा पर्दाफाश झाल्यानंतर चौहानला पोलिसांनी अटक केली.

मात्र ठाण्यातील या एका भय्याच्या चुकीची शिक्षा मुंबई-ठाण्यातील तमाम पाणीपुरीवाल्या भय्यांना मिळत आहे. पाणीपुरीवाले भय्ये पुरीशी स्वच्छता बाळगत नसल्याचे कारण देत, राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आज दादर, हुतात्मा चौक, ऑपेरा हाऊस भागात भय्यांविरूद्ध मोहीमच सुरू केली. पाणीपुरीवाल्या भय्यांचे स्टॉल्स फेकून देण्यात आले. स्टॉल्समधील सामान रस्त्यावर फेकून देण्यात आले. एवढेच नव्हे तर पाणीपुरीवाल्या भय्यांना बेदम चोपही देण्यात आला. या प्रकारानंतर मुंबईच्या अनेक भागातील पाणीपुरीवाल्या भय्यांनी स्टॉल न लावताच पोबारा केला आहे.

1 comment:

  1. विनोद्जी अंकिताचे मना पासून अभिनंदन.खरे तर ह्या अगदी इतक्या टोकाच्या नसल्या तरी अश्या प्रकारच्या लोकांच्या अस्वच्छतेच्या गोष्टी ह्या, हि अगदी बातमी म्हणून लोकांपुढे यायच्या आधी सुद्धा सुरूच होत्या.जरा वेगळ्या प्रकारे सांगायचे तर, म्हणजे अमिताभच्या दीवार मधल्या डायलॉगच्या भाषेत "मेरा बाप तो बीस साल पहले हि मर चुका था आज तो सिर्फ उसकी लाश जलाई गयी!" असे नाही का? पण म्हणून अंकिताचे श्रेय कमी होत नाही.निदान सगळ्या लोकां समोर हा घृणास्पद ,किळसवाणा प्रकार तर आला ? बघुयात आपण मराठी लोक तो खरोखरचा किती सिरीयसली घेतो ते ? त्यांनी तो आता तरी सिरीयसली घ्यावा असे मना पासून वाटते. बहिष्काराच्या रूपाने.

    ReplyDelete