अशोकराव, जर तुम्हाला एखादा निर्णय घेउन त्याला अमलात आणता येत नाही तर मग तुम्ही निर्णय तरी कशा करता घेतात । उगाचच पब्लिसिटी साठी अशे निर्णय घ्यायचे आणि नंतर शेपुट आत घालायचे, हीच का तुमची ओळख? लाज वाटते आम्हाला तुमच्या सारख्या कच खाऊ नेत्यांची.....
मटा ऑनलाइन वृत्त ।
मुंबई मुंबईत नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या वास्तव्याची अट घालणार आणि मराठी भा
षा लिहिता ,वाचता आणि बोलता येणे सक्तीचे करणार ; असे म्हणणा-या मुख्यमंत्र्यांनी अवघ्या २४ तासात घुमजाव केले आहे। मराठी सोबतच हिंदी किंवा गुजराती यापैकी किमान एक भाषा येणे पुरेशी असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज (गुरुवारी) सांगितले.
मुंबईमध्ये टॅक्सीच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नुतनीकरणकरण्यासाठी तसेच नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या राज्यातील वास्तव्यासोबतच मराठी भाषा लिहिता , वाचता आणि बोलता येणे आवश्यक असल्याचे सरकारने जाहीर केले होते। मात्र या आदेशाला टॅक्सी चालक संघटनांचा विरोध होता. काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांकडून आम्हाला मराठी समजते आणि तोडके-मोडके बोलता येते मग हीलिहिण्याची अट कशाला ?, असा प्रश्न उपस्थित केला होता.
मुंबईमध्ये टॅक्सीच्या रद्द झालेल्या परवान्यांचे नुतनीकरणकरण्यासाठी तसेच नव्या टॅक्सी परवान्यासाठी किमान १५ वर्षाच्या राज्यातील वास्तव्यासोबतच मराठी भाषा लिहिता , वाचता आणि बोलता येणे आवश्यक असल्याचे सरकारने जाहीर केले होते। मात्र या आदेशाला टॅक्सी चालक संघटनांचा विरोध होता. काही उत्तर भारतीय टॅक्सी चालकांकडून आम्हाला मराठी समजते आणि तोडके-मोडके बोलता येते मग हीलिहिण्याची अट कशाला ?, असा प्रश्न उपस्थित केला होता.
मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घुमजावमागे उत्तर भारतीय राजकारण्यांची लॉबी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे। दरम्यान , मुख्यमंत्र्यांनी अद्याप निर्णयात केलेल्या बदलाबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही.
No comments:
Post a Comment