Monday, November 29, 2010

सिंधुताईंच्या कार्याला मनसेचा हातभार

म टा च्या सौजन्याने



महिलांना प्रेरणा देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व मनसे चित्रपट कर्मचारी सेनेने 'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. सिंधुताईंच्या संघर्षाने प्रेरीत झालेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या 'मानव बाल सदन'ला चार लाख रुपयांची मदत दिली.

वांदे येथील गेईटी चित्रपटगृहात खास महिला कार्यर्कत्यांसाठी हा शो आयोजित केला होता. खुद्द सिंधुताई यावेळी उपस्थित होत्या. गोवा फिल्म फेस्टीवलवरून थेट सिंधुताई या शोसाठी आल्या. यावेळी शमिर्ला ठाकरे, रिटा गुप्ता, शालिनी ठाकरे, शिल्पा सरपोतदार आदी उपस्थित होत्या.

सिंधुताईनी त्यांच्या 'मानव बाल सदन' संस्थेची यावेळी माहिती दिली. संस्था चालवण्यासाठी येणाऱ्या अडचणी सिंधुताईंना मांडल्या, त्यावेळी मनसेसेतर्फे मदतीचे हात पुढे आले. शमिर्ला ठाकरे यांनी ५० हजार रु., चित्रपट शाखेतफेर् अमेय खोपकर यांनी ५१ हजार रु., बाळा चव्हाण यांनी २५ हजार रु, शिरिष पारकर, यश नितीन सरदेसाई व वैष्णवी घाग यांनी प्रत्येकी दहा हजार रु आणि मनिष धुरी, दिपक देसाई, अरुण सुवेर् व चंदू मोरे यांनी मिळून अडीच लाख रुपयांची मदत केली.

सिंधुताईंसाठी थिएटर

मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटाच्या शोसाठी चित्रपटगृह मिळत नसल्याची खंत सिंधुताईंनी मनसे चित्रपट विभागाचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याकडे व्यक्त केली. खोपकर यांनी फोन करताच सिनेमॅक्स, फेम अॅडलॅबने चित्रपटगृह उपलब्ध करून दिले.

लाचखोर सुहास गुप्तेला पोलीस कोठडी

लोकसत्ता च्या सौजन्याने ....

अजून एका लाचखोर प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याला अटक ....



कल्याण, २७ नोव्हेंबर/प्रतिनिधी
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील ‘क’ प्रभाग अधिकारी सुहास गुप्ते याला शनिवारी कल्याण सत्र न्यायालयाचे न्यायदंडाधिकारी एस. बी. म्हस्के यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शुक्रवारी एका भाडेकरूकडून १५ हजार रुपये लाच घेताना गुप्तेला कार्यालयातच लाचलुचपतप्रतिबंधक अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. गेल्या दोन वर्षांत लाचखोरीत अडकलेला गुप्ते हा चौथा अधिकारी आहे.
अहिल्याबाई चौकातील माणिक चाळीवरील कारवाईसाठी गुप्ते हा दोन दिवसांपूर्वी पथकासह गेला होता. त्यावेळी एक रहिवासी आजारी असल्याने तेथे कारवाई झाली नव्हती. नंतर चाळीतील भाडेकरू गुप्तेला भेटायला पालिकेत आले होते. यावेळी अनिल सोनार या भाडेकरूकडे गुप्तेने बांधकाम तोडण्याची कारवाई टाळण्यासाठी ३५ हजार रुपयांची मागणी केली होती. सोनार यांनी ही माहिती ‘एसीबी’ अधिकाऱ्यांना दिली.
या लाचेतील १५ हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना गुप्ते याला ‘एसीबी’च्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी नवनीत पाटील या शिपायालाही अटक करण्यात आली आहे. या निमित्ताने कल्याण-डोंबिवली पालिकेतील अधिकारी गैरव्यवहार, हप्तेबाजीच्या दलदलीत किती रुतले आहेत, याचा आणखी एक पुरावा पुढे आला आहे.

केडीएमटीमधील ‘साफसफाई’ला सुरुवात

लोकसत्ता च्या सौजन्याने ....................

चला सुरवात तर चांगली झाली ......................... प्रभाग क्षेत्र अधिकारी सुहास गुप्ते ला अटक आणि संदीप भोसले बडतर्फ .... के डी एम सी मधला कचरा साफ झालाच पाहिजे.



पूर्ण ‘डबडा’ झालेल्या कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाचे गणेशघाट येथील प्रभारी आगार व्यवस्थापक संदीप भोसले यांना आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी उपक्रमातील बेशिस्त कारभारावरून दोन दिवसापूर्वी निलंबित केले. या घटनेने परिवहन उपक्रमात खळबळ उडाली आहे. गेली अनेक वर्षे दांडय़ा मारून फुकटचा पगार घेणाऱ्या, उपक्रमात राहून चोरून भंगार विकणाऱ्या, अन्यत्र नोकरी करून परिवहन उपक्रमाचा पगार घेणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
आयुक्त सोनवणे यांनी सांगितले, परिवहन उपक्रमाच्या बस वेळेवर सुटत नाहीत, म्हणून प्रवाशांकडून अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे आपण शनिवारी अचानक गणेशघाट येथील परिवहन आगाराला भेट दिली. तेथील भांडार विभाग, कार्यशाळा, लेखा विभाग यांची तपासणी केली. त्यावेळी मोठय़ा प्रमाणात कर्मचारी गैरहजर असल्याचे निदर्शनास आले. चालक, वाहक नाहीत म्हणून बस बंद राहत असल्याचे निदर्शनास आले. परिवहन उपक्रमात सद्यपरिस्थितीत डिझेल, टायर घेण्यास पैसे नाहीत. परिवहन उपक्रम नफ्यात नसला तरी किमान या उपक्रमाने स्वत:च्या आस्थापनामधील कर्मचाऱ्यांचा पगार देणे, इंधन आणि सुटे भाग खरेदी करण्याएवढे उत्पन्न मिळविणे अपेक्षित आहे. उपक्रमाला दर दिवसाला सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न आणि महिन्याला किमान अडीच कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. हे उत्पन्न सध्या फक्त महिन्याला दीड कोटी येत आहे. उपक्रमाच्या मालकीच्या ११५ बसपैकी फक्त ६० बस सुरू आहेत. ५५ बस विविध कारणांनी बंद आहेत. १२ बस टायर नाहीत म्हणून बंद आहेत.
या व्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी भोसले यांच्यावर कारवाईचे पहिले पाऊल उचलण्यात आले आहे. सतत गैरहजर, टंगळमंगळ करणाऱ्या २५ कंत्राटी कामगारांना सेवेतून कमी करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. अशा एकूण ४५ चालक-वाहक कामगारांना सेवेतून कमी करण्यात येणार आहे, असे आयुक्त सोनवणे यांनी सांगितले. संदीप भोसले यांनी निलंबनाच्या वृत्ताला दुजोरा दिला.

कांजूर डम्पिंग ग्राऊंडवर मनसेचा छापा!

लोकसत्ता च्या सौजन्याने



९६ ट्रक पकडले
मुंबई, २७ नोव्हेंबर / प्रतिनिधी

कन्नमवार नगरजवळील कांजूर डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाळ आणि चिखल टाकणाऱ्या अ‍ॅन्थोनी वेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीविरुद्ध मनसेने आंदोलन केले. नगरसेवक-आमदार मंगेश सांगळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाळ आणि चिखल टाकणारे ९६ ट्रक पकडून दिले.
आंदोलनात चार ट्रकची तोडफोड झाली असून चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी अ‍ॅन्थोनी वेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कांजूर डंपिंग ग्राऊंडमध्ये काँक्रीट, डेब्री टाकण्यात येते. परंतु अ‍ॅन्थोनी वेस्ट मॅनेजमेन्ट कंपनीकडून येथे गाळ आणि चिखल टाकण्यात येत असल्याने दरुगधी पसरली होती. तसेच रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली होती. परवाना नसतानाही ही कंपनी या डम्पिंग ग्राऊंडमध्ये गाळ आणि चिखल टाकत होती. त्यामुळे या कंपनीविरुद्ध विक्रोळी पोलीस ठाण्यात ४२० कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मानवी वस्ती नसलेल्या ठिकाणी डम्पिंग ग्राऊंड उभारावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही महापालिकेने कन्नमवार नगराला खेटून कांजूर डम्पिंग ग्राऊंड उभारले आहे. त्यामुळे ते त्वरित बंद करावे, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे मंगेश सांगणे यांनी सांगितले.

    लोकशाहीर विठ्ठल उमप ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

    लोकशाहीर विठ्ठल उमप ह्यांना "मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा" तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .....

    काल जांभूळ आख्यानाचे काही भाग स्टार माझा वर पहिले आणि एक चांगली कलाकृती प्रत्यक्षात नाही बघू शकलो ह्याची हळहळ वाटली.

    उल्हासनगर महापालिकेतील हिरवा भ्रष्टाचार

    मी स्वतः उल्हासनगर मध्ये लावलेली हि झाडं बघितली आहेत, तुमचं विश्वास बसणार नाही पण दीड फुटाच्या डीवायडर मध्ये नारळाची मोठी झाडं लावली आहेत. आता हि झाडं मोठी झाल्यावर त्या जागेत कशी वाढतील हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात अशिक्षित लोकांच्या हातात सत्ता दिल्यानंतर अजून काय होणार? शिवसेना कार्याध्यक्ष ह्या प्रकरणात लक्ष घालतील अशी आशा बाळगूया. (सत्ता शिवसेना व लोकं भारती ह्या पक्षाची आहे)

    खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने



    वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, असं संत तुकाराम महाराजांनी १६ व्या शतकात सांगितलं होतं. पण उल्हासनगरमध्ये मात्र वृक्षरोपाणाच्याच नावाखाली हिरवा भ्रष्टाचार केल्याचे उघडकीस आले आहे.

    गेल्या वर्षी महापालिकेने शहरात, ७८ लक्ष रुपये खर्च करून १०,००० वृक्ष लावण्याची मोहीम हाती घेतली होती, पण प्रत्यक्षात मात्र कमी झाडे लावून या मोहिमेचा पुरता फज्जा उडाला आहे. अर्धी अधिक झाडे सुकली असून काही झाडे लावलेल्या ठिकाणहूनच नाहीशी झाली आहेत. यात कळस म्हणजे सिमेंटचा रोडमध्ये वृक्षारोपण करून महापालिकेने आपल्या अक्क्लेचे दिवे पाजवळवलयाचे दिसत आहे.

    उल्हासनगर हे १३ किलोमीटरचं शहर, महापालिकेने सुंदर व हरित शहर करण्यासाठी वृक्षारोपांचा कार्यक्रम हाती घेतला होता. यासाठी पालिकेने शहरातील दुभाजकामध्ये आणि परिसरात १०,००० झाडे लावली. यामध्ये पाम, शोभेची तसंच सावलीच्या झाडांचा समावेश होता. यासाठी थेट हैदराबादहून झाडे मागवण्यात आली. एका झाडला २२,०० रुपये मोजण्यात आले. पण परिसरात चौकशी केली असतात ही झाडे मुंबई ठाणे येथील कोणत्याही नर्सरी मध्ये ४०० ते ५०० रुपयांना मिळतात. पण ही झाडे लावताना कोणतीही काळजी न घेता चक्क सिमेंटमध्ये लावण्यात आली आहेत. त्यामुळे एवढी महागडी झाडे पाणी आणि जमीन न मिळाल्याने सुकून गेली आहेत. तर दुसरीकडे ज्यांच्या दुकान आणि घरासमोरही झाडे लावली त्यांनी ती अडचण होते म्हणून तोडून टाकली आहेत.

    ही योजना राबवत असताना महापालिकने, आपल्या स्वतःच्या जेएनएनएमआरयू योजने अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम हाती घेतले आहेत यामुळे या कामात होणाऱ्या खोदकामात अनेक झाडे काढून टाकण्यात आली आहेत. त्यामुळे पैशाचा अपव्यय झाला असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

    या बाबत नवीन आयुक्तांनी आपल्याकडे अनेक तक्रारी असल्याची कबुली दिली असून, याप्रकरणात आपण प्रशासकीय चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याचे सांगून याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असं सांगितले.

    उल्हासनगर महापालिका यापूर्वीच विविध कारणांनी बदनाम असून आता झाडंदेखील भ्रष्टाचारामधून वाचलेली नाहीत हे यावरून सिद्ध होते


    Friday, November 26, 2010

    नालायक सरकार ...............

    खालील बातमी स्टार माझा च्या सौजन्याने ..................

    २६/११ ला आज दोन वर्ष पूर्ण झाली तरी देखील त्यात जखमी झालेल्या महादेव पेटकर ला अजून मदतीचे पैसे मिळाले नाही .... ह्या नालायक निर्लज्ज सरकारला जोड्याने मारले पाहिजे

    वाचा ......

    सरकारचा अजब न्याय

    २६/११ चा हल्ला हा देश कधीही विसरू शकणार नाही.हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे राहणाऱ्या महादेव पेटकरसाठी ही जीवन बदलून देणारी घटना झाली. पोटातून गोळी आर पार गेली.

    २६/११ चा हल्ला हा प्रत्येक भारतीयांच्या मनात भीती आणि राग भरणारा हल्ला आहे. भारतीयांच्या अस्मितेवरच्या हल्ल्यात शेकडो जण म्रृत्यूमूखी पडले तर हजारो जण मृत्यूसमान जीवन जगत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड शहरापासून हाकेच्या अंतरावर हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील महादेव पेटकर हा त्यापैकी एक.पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला आपल्या मामीसोबत गेलेला महादेव २६/११ रोजी वसमतला परतीच्या मार्गावर सी एस टी रेल्वे स्थानकावर देवगिरी रेल्वेची वाट पाहत आपली मामी गयाबाई धुळेसोबत होता. अचानक गोळीबार सुरु झाला महादेव पेटकर यांना वाटले कि येथे चित्रपटाची शुटींग होत आहे मात्र काही क्षणातच पेटकर यांच्या पोटातून अतिरेक्यांची गोळी आर पार झाली. या गंभीर परिस्थितीत त्यांनी एका चिमुलीचे प्राण वाचवले आणि ते बेशुद्ध झाले. शुद्धीवर आले तेव्हा ते जे जे रुग्णालयात होते. त्यांच्यावर शस्त्र क्रिया झाली. त्यावेळी त्यांना शासनाकडून अत्यंत तोकडी मदत मिळाली ती त्यांच्या उपचारातच खर्च झाली.

    अतिरेकी हल्ल्यातील जखमीला पंतप्रधान सहायता निधीतून एक लाख रुपये मंजूर करण्यात आले होते. महादेव ने आपली सर्व कागद पत्रे जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली आणि पंतप्रधान कार्यालयाला पाठवली. या घटनेला आज २ वर्षे पूर्ण झाली मात्र
    पंतप्रधान निधी या पिडीत परिवारपर्यंत पोहोचलाच नाही. पेटकर हे अनेक नेत्यांना आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना भेटून आपली व्यथा मांडली. मात्र त्यांच्या पदरी फक्त आश्वासनंच पडली.

    पेटकर हे ८ वर्षाचे असतांना त्यांचे आई वडील मरण पावले तेव्हा पासून ते मामा आणि मामीकडेच राहतात. त्यांना गोळी लागल्यापासून कोणतेही काम करता येत नाहीत. काम करताना ते अनेकदा बेशुद्ध होतात. वयस्कर मामा मामी यांच्या आधारावर जीवन जगणारे महादेव पेटकर त्यांची व्यथा सांगताना त्यांचे डोळे पाणावले. आज २६/११ चा हल्ला होऊन २ वर्षे उलटली तरीही महादेवचे जीवन अंधारात आहे, खायला भाकरी नाही तर कसाबला चिकन बिर्याणीची मेजवानी दिली जात आहे.


    श्रद्धांजली .....




    आम्हा सर्वांच्या जीवनाच्या सुरक्षेसाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावणाऱ्या शहीद बांधवाना मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली .....

    १. श्री हेमंत करकरे
    २. श्री अशोक कामटे
    ३. श्री संदीप उन्नीकृष्णन
    ४. श्री विजय साळसकर
    ५. श्री शशांक शिंदे
    ६. श्री प्रकाश मोरे
    ७. श्री बापूसाहेब दुर्गडे
    ८. श्री तुकाराम ओंबळे
    ९. श्री बाळासाहेब भोसले
    १०. श्री एम सी चौधरी
    ११. श्री गजेंद्र सिंग
    १२. श्री जयवंत पाटील
    १३. श्री विजय खांडेकर
    १४. श्री अरुण चित्ते
    १५. श्री योगेश पाटील
    १६. श्री अंबादास पवार
    १७. श्री राहुल शिंदे
    १८. श्री मुकेश जाधव


    Thursday, November 25, 2010

    के उन्नीकृष्णन ह्यांना मानाचा मुजरा

    २६ - ११ च्या मुंबई हल्ल्यात अतिरेक्यांशी लढताना शहीद झालेल्या शूर वीरांना वंदन करण्यासाठी इंडिया गेट ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया पर्यंत सायकल यात्रा करण्याऱ्या शहीद संदीप उन्नीकृष्णन ह्यांचे वडील के उन्नीकृष्णन ह्यांना मानाचा मुजरा ........................



    Monday, November 22, 2010

    विक्रोळीतल्या पादचारी पुलाचं काम १५ जानेवारीपासून सुरु

    स्टार माझाच्या सौजन्याने


    विक्रोळीमधल्या पादचारी पुलाचं काम १५ जानेवारीला सुरु होणार असल्याची ग्वाही आज गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिली. काल नागरिकांनी आणि मनसेने झटका दिल्यानंतर आता प्रशासनाला आणि सरकारला जाग आली आहे. आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

    स्थानिक आमदार मंगेश सांगळे, मनसे आमदार राम कदम आणि नागरिकांनी छगन भुजबळ आणि आर आर पाटील यांची भेट घेतली. यावेळी मध्य रेल्वेचे आणि रेल्वे पोलिस फोर्सचे अधिकारी उपस्थित होते. दरम्यान सध्याचा रेल्वेचा पादचारी पूल पूर्व आणि पश्चिमेला राहणाऱया नागरिकांसाठी खुला करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला.


    मनसेच्या हिटलिस्टवर फेरीवाले

    म टा च्या सौजन्याने


    म. टा. प्रतिनिधी

    डोंबिवलीकरांनी दिलेल्या भक्कम पाठिंब्यामुळे उत्साह दुणावलेले मनसेचे शिलेदार सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कामाला लागले आहेत. डोंबिवली स्टेशन परिसराला वेढा घालणारे फेरीवाले मनसेच्या हिटलिस्टवर प्राधान्याने असून येत्या आठ दिवसांत या फेरीवाल्यांना न हटविल्यास मनसैनिकांना आंदोलन करावे लागेल, असा इशारा स्थानिक नेते शरद गंभीरराव यांनी कल्याण-डोंबिवलीच्या प्रशासनाला दिला आहे.

    डोंबिवलीतील असंख्य समस्यांवर राजकीय पक्षांनी पालिका निवडणुकीदरम्यान काथ्याकूट केला. यामध्ये फेरीवाल्यांची समस्या मोठ्या प्रमाणात चचेर्ला होती. सत्ताधारी व विरोधक हा प्रश्न सोडविण्यात कसे निष्प्रभ ठरले, हे मतदारांच्या मनावर ठसविण्यात मनसेला यश आले. मनसेला डोंबिवलीत घवघवीत मते पडली, त्यामागे हा मुद्दा महत्त्वाचा ठरला होता. तरीही सत्ता मिळाली नसल्याने मनसेच्या स्थानिक नेत्यांनी आता सामान्यांच्या मुद्द्यांवर आक्रमक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.

    डोंबिवली रेल्वे स्टेशन तसेच 'नो हॉकर्स झोन'मधील फूटपाथचा सातबारा महापालिकेने फेरीवाल्यांना दिला आहे की काय, असा प्रश्न फेरीवाल्यांचा सुळसुळाटामुळे पडतो. मध्यंतरी सॅटिसच्या उद्घाटनाच्या प्रसंगी पालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी यापुढे स्टेशन परिसरात फेरीवाले बसू दिले जाणार नाहीत, अशी गर्जना केली होती. पण ती हवेतच विरली. आता तर दीपक हॉटेल ते पुष्पराज हॉटेल रस्त्यावर जिकडेतिकडे फेरीवालेच दिसू लागले आहेत. यापेक्षा वेगळी स्थिती डोंबिवलीत नाही. त्याचा भयानक त्रास डोंबिवलीकरांना होत असून येत्या आठ दिवसांत फेरीवाले न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे स्थानिक नेते शरद गंभीरराव यांनी प्रभारी उपायुक्त सुभाष भुजबळ यांना दिला आहे.

    स्वीकृत नगरसेवकपद मिळणार ?

    विधानसभा निवडणुकीत कल्याण ग्रामीण मतदारसंघात मनसेच्या रमेश पाटील यांना विजय मिळवून देण्यात गंभीरराव यांनी मोलाची भूमिका बजावली. पालिका निवडणुकीत हमखास विजयाची संधी असतानाही ते रिंगणात उतरले नाहीत. शिवसेनेसारख्या आक्रमक सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गंभीरराव यांच्यासारख्या अनुभवी माजी नगरसेवकाची गरज पक्षाला आहे. त्यामुळे पक्षातफेर् स्वीकृत नगरसेवक म्हणून त्यांचीच वणीर् लागण्याची दाट शक्यता आहे. तसेच, कल्याण व डोंबिवली दोन्ही शहर अध्यक्षांची गच्छंती निश्चित असल्याने संघटनेतील एखाद्या मोठ्या पदासाठीदेखील त्यांचा विचार होऊ शकतो, असे समजते.

    Monday, November 15, 2010

    विकासाच्या त्रिशंकूवरील पारदर्शक चेहरे!

    खालील लेख लोकसत्ताच्या ठाणे वृतांत मधून घेतला आहे ......



    भगवान मंडलिक - रविवार, १४ नोव्हेंबर २०१०
    कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त रामनाथ सोनवणे, नवनिर्वाचित महापौर वैजयंती घोलप-गुजर आणि मनसेचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक, या तिन्हींचे चेहरे सरळमार्गी, प्रामाणिक, जनतेचा विश्वास असलेले आहेत. आयुक्त सोनवणे हे पालिकेत उपायुक्त असताना त्यांनी एक प्रशासक म्हणून बजावलेली भूमिका अद्याप कल्याण- डोंबिवलीतील जनतेच्या स्मरणात आहे.
    त्यावेळच्या पांढऱ्याशुभ्र सफारीप्रमाणे आयुक्त सोनवणे यांचे वागणे, बोलणे असे आणि आताही ते त्याच धर्तीचे आहे. त्यामुळे विकासाची किरणे जनतेला गेले दोन महिन्यांपासून दिसू लागली आहेत. आतापर्यंत शासनाकडून येणारा कोणताही प्रशासक हा तीन वर्षांंनंतर आपल्याला येथून बाजारबिस्तार गुंडाळून जायचे आहे, अशा विचाराने येऊन कारभार करीत असे. तशाच पद्धतीचा कारभार यू. पी. एस. मदान, टी. चंद्रशेखर, श्रीकांत सिंग वगळले तर आतापर्यंत कल्याण-डोंबिवली पालिकेच्या प्रशासनात झाला. शहराशी घट्ट नाळ असलेला, या शहराचे काही भले करावे असा विचार करून फार थोडय़ा आयुक्तांनी येथे कारभार केला, त्यामुळे पालिकेत आयुक्त कोणीही येवो, आमचे काय भले होणार आहे, अशीची भूमिका येथील १२ लाख जनतेने आतापर्यंत ठेवली.
    पण, रामनाथ सोनवणे यांनी पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार गेले दोन महिन्यांपूर्वी हाती घेतल्यानंतर मी प्रथम या शहराचा एक नागरिक आहे. नंतर आयुक्त अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यामुळे शहरातील प्रत्येक नागरिक आपल्या घरातला, गावातला माणूस आयुक्तपदी आला आहे म्हणून सोनवणे यांच्या कार्यपद्धतीकडे पाहू लागला आहे. आतापर्यंत डॉक्टर, वकील, ज्येष्ठ पत्रकार, शहरातील विविध स्तरांतील जाणकार शक्यतो आयुक्तांना भेटण्याच्या फंदात कधी पडत नसत. सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आपल्या व्यवसायातला वेळ काढून अनेक जाणकारांनी आयुक्तांच्या भेटी घेऊन तुमच्याकडून आम्हाला विकासाच्या अपेक्षा आहेत, असे सांगून त्यांना पुढील कारकीर्दीसाठी शुभेच्छा दिल्या, ही सोनवणे यांच्या उज्ज्वल कारकीर्दीची एक चमकती झालर आहे. पालिकेत आल्यानंतर ज्या नेटक्या पद्धतीने, तंत्रशुद्ध पद्धतीचा अवलंब करून सोनवणे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने पालिका निवडणूक शांततेत पार पाडली, त्याचेही कौतुक जनता तोंडभरून करीत आहे. निवडणूक आयोगाने सोनवणे यांना शाब्बासकीचे प्रमाणपत्रच दिलेच आहे.
    आतापर्यंत जनतेच्या मनात आयुक्तांना कसे भेटायचे, हा एक प्रश्न असायचा. कारण मधले चमचे या मार्गात अडथळे आणण्यात पटाईत असतात. साहेब मीटिंगमध्ये, साहेब मंत्रालयात गेले आहेत, असे सांगण्याची त्यांची खासियत असते. अर्थात आयुक्तांनी आपल्या हाताखालील कर्मचाऱ्यांना काय आदेश दिले आहेत, त्यावर त्या कार्यालयाची कामाची पद्धत ठरलेली असते. सोनवणे यांनी पदभार स्वीकारल्यापासून ते शहरातील प्रत्येक नागरिकाला भेट देत आहेत. मग ती नागरी समस्येची तक्रार असेल, प्रशासनाविषयी असेल, पण त्याचे निराकरण करण्याचा ते प्रयत्न करीत आहेत. मोबाइल चोवीस तास सुरू असतो, केव्हाही मोबाइल करा, त्याला ते प्रतिसाद देतात, हा सकारात्मक विचार शहर विकासातील एक मैलाचा दगड आहे.
    अर्थात सोनवणे हे प्रशासनाची आर्थिक बाजू पाहूनच शहर विकासासाठी प्रयत्नशील असणार आहेत. त्यांच्या मार्गात ज्या ‘काही’ नगरसेवकरूपी धोंड होत्या, त्या आता राजकारणातून कायमच्या बाद झाल्या आहेत. त्यामुळे तोही प्रश्न सुटला आहे. सोनवणे यांची ‘अ‍ॅलर्जी’ असलेली काही मंडळी आहेत ते येनकेनप्रकारेण त्यांना उपद्रव देण्याचा प्रयत्न करतील. या सर्व परिस्थितीत सर्वपक्षीय नगरसेवकांनी आपल्या शहराच्या विकासासाठी गावातल्या माणसाला कसे सहकार्य करायचे, हा विचार करून सोनवणे यांना सहकार्याचा हात दिला तर नक्कीच आतापर्यंत शहराची जी घाण यापूर्वीच्या काळात झाली, ती व्यवस्थित करून पुढील विकासाची कामे करण्यात सोनवणे नक्कीच यशस्वी होतील. फक्त त्यांना मिळणाऱ्या सहकार्याच्या हातावर हे सर्व अवलंबून आहे.
    नवनिर्वाचित महापौर वैजयंती घोलप-गुजर या शहराच्या प्रथम नागरिक झाल्या आहेत. सुसंस्कारित, शिस्तप्रिय, सरळमार्गी, प्रामाणिक, प्रसंगी आक्रमक-एक घाव दोन तुकडे. भावनिक वातावरणात वावरल्याने वैजयंती घोलप या नक्कीच आपल्या पदाला न्याय देतील, अशी १२ लाख जनतेची भावना झाली आहे. विशेष म्हणजे घरचे जेवण, घरचेच उकळलेले पाणी. बाहेरच्या सर्व खानपानावर बहिष्कार. त्यामुळे बाई कायद्याबाहेर जाऊन वागतील असे होणे शक्य नाही. आतापर्यंत झालेल्या महिला महापौरांमधील एक जाण असलेल्या नगरसेविका म्हणून वैजयंती यांची ओळख आहे. त्यांनी पालिकेत मानाची पदे उपभोगली आहेत, पण कधी त्यांनी मिळालेल्या पदाशी प्रतारणा केलेली नाही. स्थायी समिती संपली की सदस्यांचा ओढा स्थायी समितीच्या अ‍ॅन्टी चेंबरकडे असतो. वैजयंती या एकमेव सदस्या आहेत की आपली पर्स आणि पिशवी सावरत लिफ्ट असूनही पायऱ्या उतरत त्या घरचा रस्ता धरत. स्थायी समितीतील अ‍ॅन्टी चेंबरमधील बजबजाटात त्यांनी स्वत:ला कधी गोवले नाही. त्यामुळे त्यांची एक स्वच्छ प्रतिमेच्या म्हणून ख्याती आहे. महासभेत नागरी समस्या, विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्या एकटय़ा सगळ्यांना पुरून उरत असत. त्यांचे तोंडाचे तोफगोळे सुरू झाले की घंटय़ा वाजून महापौर हैराण होत, सर्व विरोधकांचे घसे कोरडे पडले तरी चालतील, पण त्या एकटय़ा समोरच्या व्यक्तीला खिंडीत गाठून सुपडासाफ करीत असत. पक्षीय गटातटाचा चांगल्या नगरसेवकांना नेहमीच त्रास होतो, तसा तो वैजयंती यांनाही झाला. पण स्वत:ची प्रतिमा स्वच्छ असल्याने त्या आलेल्या परिस्थितीवर मात करू शकल्या. स्वत:च्या प्रभागाला त्यांनी आदर्श केलेच आहे. नागरी विकासाची अनेक कामे त्यांनी केली आहेत. शहर विकासाच्या विषयावर त्या नेहमीच आक्रमक असत. पालिकेत विकासकामांची कोणी, कशी ऐशी की तैशी केली याची जाणीव महापौरांना आहे. त्यामुळे ठेकेदार, बिल्डर, आर्किटेक्ट लॉबीतील गैरकामे करण्यात अग्रेसर असलेल्यांना त्या पालिकेत किती थारा देतात, हाही प्रश्नच आहे. उद्धव ठाकरे यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, असे सांगून त्यांनी आपली विकासाची पायवाट मोकळी करून ठेवली आहे. या वाटेवर आता कोण किती काटे पेरतंय आणि त्या मार्गावरून वैजयंतीताई कशा माग काढत पुढे जातात ते पाहायचे आहे.
    पालिकेत प्रथमच आलेला एक नवखा चेहरा म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे २७ नगरसेवक. मिसरूट पण न फुटलेले, कोवळे, सुशिक्षित नवखे चेहरे मनसेतून निवडून आलेले आहेत. ही सगळी मंडळी उच्चशिक्षित आहेत. त्यामुळे शहर विकासाचा एक नवा दृष्टिकोन या मंडळींच्यासमोर आहे. आतापर्यंत सर्वपक्षीयांमधील रिकाम्या डोक्याचे तेच तेच आडदांड निवडून येत, त्यामुळे विकासापेक्षा तिजोरी ओरपणे हा एकमेव दृष्टिकोन या मंडळींसमोर असे. मनसेच्या पदार्पणामुळे या ओरपण्याला आवर बसण्याची शक्यता आहे. राज ठाकरे यांची प्रतिमा, शहर विकासाचा दृष्टिकोन समोर ठेवून जनतेने मनसेला भरभरून मतदान केले आहे, याची जाणीव मनसेच्या नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पालिकेतील कोणत्याही चिरीमिरीत सहभागी होणार नाहीत, अशी अपेक्षा जनतेला आहे. पालिकेतील आतापर्यंत चाललेल्या गैरप्रकारांची नरडी येथेच आवळली जाणार असल्याने विकासाची खरी गंगा येथून वाहण्यास सुरुवात होणार आहे. प्रबळ विरोधी पक्ष म्हणून आतापर्यंत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने युतीचा मित्र म्हणण्यापेक्षा पोटातला पक्ष म्हणून भूमिका निभावली. विकासकामांची पुरती वाट लावली. या खाबूगिरीला मनसेच्या आगमनाने नक्कीच वेसण लागणार आहे. जोडतोड करून सत्तेत जाऊन बसण्यापेक्षा विरोधी बाकावर बसून सत्ताधाऱ्यांच्या उरावर बसून विकासकामे करून दाखवू, हा मनसेचा आता तरी बाणा आहे. त्यामुळे एक दूरदृष्टी घेऊन मनसे पालिकेत सक्रीय झाला आहे. पाहूया त्यांची विकासाची दूरदृष्टी जनतेला काय आणि किती देते.
    आयुक्त, महापौर आणि मनसे असे हे विकासाचे तीन मानबिंदू, पारदर्शक चेहरे जनतेसमोर आहेत. अर्थात या तिन्हींचे केंद्रबिंदू तीन ठिकाणी आहेत. शहर विकासासाठी हे तिन्ही केंद्रबिंदू एकमेकांना कोणत्या परीघ रेषेतून जोडले जातात ते आता पाहात बसायचे.

    Monday, November 8, 2010

    कडोंमपाःमनसे विरोधी पक्षच राहील!

    म टा च्या सौजन्याने


    महापौर मनसेचाच होईल अशी निवडणुक पूर्व सभांमध्ये गर्जना करणा-या राज ठाकरे यांनी मतदारांच्या त्रिशंकू प्रतिसादानंतर मात्र विरोधी पक्ष म्हणूनच काम करण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे शिवसेनेचा महापौर होण्याची शक्यता वाढली आहे.

    बहुचर्चित कल्याण-डोंबिवली महानगर पालिका निवडणुकीत मनसे पूर्ण शक्तीनिशी मैदानात उतरली होती. या निवडणुकीत मनसेने जोरदार मुसंडी मारत २७ जागांवर कब्जा केला. शिवसेनेला सर्वाधिक ३१ जागा मिळाल्या तर भाजपला केवळ ९ जागांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेसला १५ तर राष्ट्रवादी काँग्रेसला १४ जागा मिळाल्या आहेत.

    मतदारांनी दिलेल्या निर्णयाचा मी आदर करतो. महापौर मनसेचा व्हावा असं मला जरूर वाटत होतं पण सध्याच्या समीकरणानुसार ते शक्य नाही. केवळ आमचा महापौर व्हावा यासाठी कोणालाही पाठिंबा देणार नाही. त्याऐवजी आम्ही विरोधी बाकांवर बसणे पसंत करू हे स्पष्ट करताना राज ठाकरे यांनी ,मी सत्तापिपासू नाही असे सांगितले. ही निवडणूक शेवटची नाही असंही त्यांनी पुढे सांगितलं.

    मनसेचा महापौर आता होणार नसल्याने तुम्ही कोणाला पाठिंबा देणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, तो माझा मुद्दा नाही. आम्ही विरोधी पक्ष म्हणून काम करणार असल्याने कोणालाही पाठिंबा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आता महापौर कोणत्याही पक्षाचे होऊ दे, असे राज म्हणाले.

    मतदारांनी दिलेल्या प्रतिसादानंतर समोर आलेली आकडेवारी कुणी बदलू शकतं का ?असा सवालही त्यांनी केला. पण विरोधी पक्ष म्हणून माझा अंकुश असेल, शहराच्या विकासासाठी मी शहरात येत राहिन, शहराच्या विकासाच्या दृष्टीने मी कायम प्रयत्नशील असेल असं त्यांनी सांगितलं.

    दरम्यान निवडणुकीत अपक्ष म्हणून विजयी झालेले प्रकाश भोईर मनसेत दाखल झाल्याने, मनसेच्या नगरसेवकांची संख्या २८ झाली आहे.

    Thursday, November 4, 2010

    दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

    मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा तर्फे सर्वाना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ...........

    विनोद

    Wednesday, November 3, 2010

    कल्याण डोम्बिवली करांचे हार्दिक आभार

    कल्याण डोम्बिवली महापालिका निवडणुकीत आपण मनसे ला जे भरघोस मतदान केले त्याबद्दल आपले हार्दिक आभार .............. मनसे दिलेल्या शब्दाला जागेल व कल्याण डोम्बिवली करांना दिलेल्या वचनपूर्तीसाठी ह्यापुढे आपले काम करेल ह्याबद्दल आम्हाला खात्री आहे .... आपण असेच मनसे च्या मागे खंबीर पणे उभे राहाल अशी आशा बाळगतो .....

    तुम्हा सर्वांकरिता खाली मतांचे विश्लेषण देत आहे,

    वैध मतांची संख्या - ४३६७१७

    मनसे ला मिळालेल्या मतांची संख्या - १२५४३९ (२८.७२%)
    शिवसेनेला मिळालेल्या मतांची संख्या - ८३४०३ (१९.०९%)
    भारतीय जनता पार्टी ला मिळालेल्या मतांची संख्या - ४६९४३ (१०.७४%)
    कॉंग्रेस ला मिळालेल्या मतांची संख्या - ४९०४२ (११.२२%)
    राष्ट्रवादी कॉंग्रेस ला मिळालेल्या मतांची संख्या - ४६७६९ (१०.७०%)
    अपक्षांना मिळालेल्या मतांची संख्या - ६८८७० (१५.७६%)


    जय हिंद जय महाराष्ट्र

    आपला

    विनोद