Thursday, September 30, 2010

एक 'होता' कारसेवक...

म टा च्या सौजन्याने


30 Sep 2010, 0000 hrs IST
- विनय उपासनी


दहावी पास होऊन नुकताच कॉलेजविश्वात प्रवेश केला होता. डोंबिवली सोडून नाशिकला शिफ्ट झाल्यानं तसं मित्रांचं वर्तुळ फारसं नव्हतंच. त्यामुळे मग घरानजीकच्या संघशाखेवर नियमित जाणं सुरू झालं. अकरावीचा प्रवेश, संघशाखेवर होणारी बौद्धिकं, त्या माध्यमातून होणारी चर्चा, अभाविपच्या कार्यकर्त्यांशी होणारी ओळख, कॉलेजातील मित्रांमधील चर्चा, घरात चालणारी चर्चा, देशातलं एकंदर वातावरण, मंदिर-मशीद वाद... या सर्वांतून मत तयार होत होतं. आणि त्याच सुमारास अभाविपच्या कार्यकर्त्यांची कारसेवेला जाण्याची तयारी सुरू होती. तू येशील का ? आमच्या संघशाखेवरच्या गुरुजींनी अचानक प्रश्न विचारला. अर्थात घरच्यांना विचारून सांगतो असं उत्तर. घरच्यांचा प्रथम विरोध होता, मात्र थोरल्या बंधूंनी पाठिंबा दिला. झालं, जाण्याचं नक्की ठरलं.

३० नोव्हेंबर १९९२ रोजी दुपारी अभाविपतर्फे आमचे ३० जणांचे पथक पवन एक्स्प्रेसने अयोध्येला रवाना झालं. पथकात सर्वात लहान म्हणून आम्हा दोघा-तिघांचं जरा अतिकौतुक आणि काळजीची हमी. त्यामुळे निर्धास्त होतो. अयोध्येला जाऊन नेमकं काय करायचंय याचा काही पत्ता नव्हता. मात्र, प्रवासात हरिभाऊंनी (आमचे गटप्रमुख) आपल्या जाण्यामागची भूमिका विशद केली. रामाच्याच जन्मभूमीत अर्थात अयोध्येत राम कसा वनवास भोगतोय, आपण काय करायला हवं, प्रवासात प्रत्येक ठिकाणी दिसणारं-जाणवणारं वातावरण, त्यामुळे एकीकडे पक्कं मत तयार होत होतं. सौगंध राम की खाते है..., एक धक्का और दो..., ये तो एक झाँकी है..., अयोध्या की माटी..., अब तो नगारा बज ही गया है... या व अशा घोषणांनी वातावरण अंगात भिनत होतं. गाणी-घोषणा-बौद्धिकं मध्य प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश या प्रांतातून गाडीत चढणारी कारसवेकांची पथकं, ओळखी-पाळखी, पुन्हा चर्चा असं करत करत २ डिसेंबरच्या पहाटे अयोध्येला आम्ही पोहोचलो.

देशाच्या कानाकोप-यातून कारसेवक जमायला सुरुवात झाली होती. आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली उत्तरेकडील राज्ये अशी विविध ठिकाणांहून लाखो कारसेवक अयोध्यानगरीत पोहोचले होते-पोहोचत होते. आमची व्यवस्था रामनगरी नावाच्या एका मंडपात केली होती. शरयूतिरावरच राहण्याची व्यवस्था, थंडी प्रचंड, मात्र अंगात उत्साह. पथकात बहुतेकजण तरुणच. त्यामुळे दोनच दिवसांत प्रत्येकाशी चांगलीच गट्टी-भट्टी जमली. त्यामुळे आपण परक्या ठिकाणी आलोय असं वाटतंच नव्हतं. ३ डिसेंबरपासून सकाळी उठून शरयूत आंघोळ. विविध प्रांतातून आलेल्या कारसेवकांच्या ओळखी. मग कारसेवकांसाठी सुरू केलेल्या अन्नछत्रालयांत जाऊन खाणं-पिणं झालं की दिवसभर अयोध्येची भ्रमंती असा दिनक्रम सुरू झाला. दुपारपर्यंत भटकणं आणि मग सायंकाळी प्रत्यक्ष वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर सुरू असलेल्या साधुसंतांच्या आखाड्यात जाऊन बसायचं. त्या ठिकाणी दिवसभर कोणाची ना कोणाची भाषणं सुरूच असायची. मग त्यात साध्वी ऋतंभरा, आचार्य गिरिराज किशोर, विनय कटियार, उमा भारती या धार्मिक ( ? ) नेत्यांचा समावेश असायचा. शेकडो वर्षांपासून रामाची जन्मभूमी कशी परकीयांच्या जोखडात अडकली आहे, समोर उभी असलेली वास्तू म्हणजे मूर्तिमंत कलंक, ती पाडून त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करणं कसं समस्त हिंदूंचं परमकर्तव्य आहे, त्यासाठी आपण इथे जमलो आहोत... अशा आशयाची ती भाषणं. मग त्यात आतापर्यंतच्या सर्व सरकारांचा उद्धार, हिंदुत्त्ववादी सरकार सत्तेत आल्यास रामराज्य कसं अवतरणार याची स्वप्न दाखवणं अशा सर्व मुद्यांचा या नेत्यांच्या भाषणात समावेश असायचा.

अयोध्येत फिरतानाही पोलिसही कोणाला हटकत नव्हते. त्यामुळेच अरे बघता काय, सामील व्हा... अशा घोषणा त्यांच्यासमोर तारस्वरात देणं जमत होतं. प्रत्यक्ष कारसेवेची तारीख जसजशी जवळ आली तसतसं अयोध्येतलं वातावरण तापू लागलं होतं. आमच्या फिरण्यावर बंधन घातली जात होती. आमच्याबरोबर सातत्याने कोणीतरी वरिष्ठ राहील याची काळजी घेतली जात होती. सूचना, कोणी कुठे कसं जायचं, हरवलं तर कुणाशी कसा संपर्क साधायचा, गटातील प्रत्येकाला दिलेला संकेतांक, निरनिराळ्या प्रांतातील कारसेवकांशी चर्चा, वादग्रस्त जागेभोवती पोलिसांचे, सुरक्षा दलांचे वाढत जाणारे सुरक्षाकवच, नेत्यांच्या भाषणात येऊ लागलेला आक्रमकपणा सारंसारं हे एका अघटिताची जाणीव करून देत होतं. मात्र, त्यावेळी कट्टरपणा एवढा अंगात भिनला होता की जे होतंय, जे होणार आहे ते देशहिताचंच आहे हा ठाम विश्वास बनत चालला होता. आक्रमक नेत्यांची भाषणं अधिकाधिक आक्रमक होत चालली होती, कारसेवकांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, मंदिर वही बनाएंगे..चा जयघोष टिपेला पोहोचू पाहत होता, सर्व शासकीय यंत्रणा मात्र हातावर हात ठेवून पहात होती, त्यामुळे सर्वजणच निश्चिंत होते.

५ डिसेंबरची अख्खी रात्र वादग्रस्त जागेनजीकच काढली. ६ डिसेंबरला पहाटे आमच्या निवासात (म्हणजे उघडा मंडपच तो) परतलो. मात्र, सकाळी हरिभाऊंनी आम्हाला सर्वांना लवकरच उठवलं. आन्हिकं आटोपून चर्चासत्राला (म्हणजे मीटिंगला) हजर राहण्याचं ठरलं. सर्वजण सकाळी साडेआठला चर्चासत्राला जमले. कोणी कुठे थांबायचं, कोणी कुठे जायचं, कोणाशी संपर्क साधायचा, कोणी मागे थांबायचं सारी व्यूहरचना झाली. सकाळी दहापासूनच सर्वांनी वादग्रस्त जागेच्या (ते आमच्या ठिकाणापासून किमान दोन-तीन किमी अंतरावर होतं) परिसरात जायचं ठरलं. त्या ठिकाणी गेल्यानंतर वातावरणातला उन्माद जाणवत होता. समोरच्या दुमजली इमारतीच्या गच्चीवर अडवाणी, वाजपेयी, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, विहिंपचे नेते अशोक सिंघल आदी रथी-महारथी नेते जमले होते. सर्वांची भाषणे सुरू होती. एकीकडे रामनामाचा जप, रामाचा जयघोष, मंदिर वही बनाएंगे, एक धक्का और दो... या घोषणांना जोर चढत होता. दुपारपर्यंत सर्व नेत्यांची भाषणं झाली. दुपारच्या जेवणासाठी आम्हा कार्यकर्त्यांना मंडपात जाण्यास सांगण्यात आले आणि पुढची सूचना येईपर्यंत तिथेच थांबायचे आदेशही...

दुपारी तीन-चारच्या दरम्यान मंडपात गोंधळाला सुरुवात झाली. गुम्बत गिरा दिया... कारसेवकोंने मस्जिदपर धावा बोल दिया... बोलो सियावर रामचंद्र की जय... बाबरी ध्वस्त हो गई... रामजी की सेना चली... अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. आम्हीही मुठी आवळून घोषणाबाजी करत प्रत्यक्ष घटनेच्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न केला, मात्र वरिष्ठांनी अडवलं. समोर पोलीस बंदोबस्तही वाढल्याचं दिसत होतं. सायंकाळी उशिरा अखेरीस आम्हाला वादग्रस्त ठिकाणी वरिष्ठांनी नेलं. सगळीकडे धुळीचं साम्राज्य, वादग्रस्त जागेभोवतालची सर्व बॅरिकेड्स तोडून कारसेवक आत घुसल्याचं स्पष्ट होतं, पाडलेल्या वास्तूवर घाव घालण्याचं काम सुरूच होतं, वाहत्या गंगेत आम्हीही हात धुवून घेतले. पराक्रमाचं प्रतीक म्हणून दोन विटा घेऊन तिथून बाहेर पडलो. जीवनाचं सार्थक झाल्याचं त्या क्षणी तरी वाटलं. वातावरण अनुभवण्यासाठी अयोध्येत फिरायचं होतं. मात्र कर्फ्यु असल्याने मंडपाकडे परतावं लागलं. काम फत्ते झालंय, नाशिकला परतण्याचं ठरलं. पोलिसांच्या गराड्यात कारसेवकांचे जत्थे अयोध्या स्टेशनकडे परतत होते. मिळेल त्या गाडीने फैजाबाद गाठण्याची, पर्यायाने घरी परतण्याची प्रत्येकाची घाई चालली होती. घोषणांनी अयोध्या दुमदुमत होती. तिकडे देशात काय परिस्थिती उद्भवली होती किंवा उद्भवणार आहे, आणि आपण नेमकं काय केलंय हे समजायला बराच उशीर लागला...


अयोध्येतून परततानाच त्याची प्रचिती आली. फैजाबादमध्ये आमच्या गाडीवर दगडफेक झाली तेव्हा परिस्थितीची जाणीव झाली. मात्र, गांभीर्य कळलं नाही... घरी फोन करून ख्यालीखुशाली कळवली होतीच. घरचे चिंताक्रांत, नाशकात कर्फ्यू लागल्याचं समजलं. कर्फ्यू तोडून विजयसभा झाल्याचंही कळलं. ८ डिसेंबरला घरी परतलो त्यावेळी आपण काय केलंय त्याची जाणीव झाली. बाबरीच्या पतनानंतर देशातलं वातावरण ढवळून निघालं होतं. पुढचा सारा इतिहास ज्ञात आहेच...

....

आज १८ वर्षांनंतर कारसेवकाच्या आपल्या भूमिकेकडे त्रयस्थपणे पाहताना मन निराश होतंय. तो उन्माद, तो जोश, तो कट्टरपणा, तो साहसवाद... सारंसारं गळून पडलंय. अर्थात ही मनोवस्था एका रात्रीत बदललेली नाही. बाबरी पतनानंतर देशात, मुंबईत उसळलेली दंगल, मुंबईतली बॉम्बस्फोट मालिका, गुजरातची दंगल, ते आणि आपण यात रुंदावलेली दरी, हजारो निरपराधांचे बळी, दुभंगलेली मने, राजकारण्यांचा स्वार्थीपणा, देश म्हणून झालेलं नुकसान, हाती काल लागलं याची कॅलक्युलेशन या सर्वाची टोटल एकच झाली, जे झालं, जे केलं ते नक्कीच कौतुकास्पद नव्हतं. काय मिळालं असं करून हाच एक प्रश्न मनात उरलाय, उरतोय. धर्म, जात, धर्माभिमान, जाज्ज्वल्य हिंदुत्त्ववाद, हे सारं एका ठिकाणी आणि मानवता, देश, धार्मिक सहनशीलता, सहजीवन, देशाचा विकास, तरुणांच्या समस्या हे दुस-या बाजूला. दोन्ही एका तराजूत मोजलं तर दुस-या बाजूचे पारडे जड राहील हे नक्की.

मग काय मिळवलं असं करून हा प्रश्न अद्याप निरुत्तर आहेच. त्यांचं आणि आपलं सहजीवन अपरिहार्य आहे याची खात्री पटत चालली आणि पूर्णपणे पटली आहे. मग काय मिळतं असं करून. पाण्यात काठी मारल्याने ते दुभंगणार नाही हे माहीत असूनही का मारायची काठी. वरच्या तरंगांसाठी ? , मंदिर-मशीद नाही बनली तर सर्वसामान्यांचं कुठे अडलंय, गेल्या अठरा वर्षांत कोणाचं अडलं नाही आणि यापुढेही अडणार नाही. का म्हणून पुन्हा तेच वातावरण तयार करायचं, कोणासाठी, वाढती बेरोजगारी, दहशतवाद, शेजारी राष्ट्रांच्या वाढलेल्या भारतविरोधी कारवाया ही संकटं कमी आहेत का ? उद्या अयोध्येचा निकाल काहीही लागला तरी सौगंध राम की खाते है पुन्हा म्हणावसं वाटेल असं वाटत नाही. झालं ते पुरे झालं. अर्थात हा विचार दोन्ही बाजूने होणं महत्त्वाचं आहेच. तसा होतही आहे. दोन दशकाच्या अनुभवातून आपण एवढे तरी शिकलो हे समाधानाचं. देश म्हणून उभं राहण्यासाठी सहजीवन, धार्मिक सहनशीलता हेच महत्त्वाचं आहे याची खात्री पटलीय. धर्माचा अभिमान बाळगावा परंतु तो एका विशिष्ट चौकटीत राहून बाळगायला हवा याची समज खूप आधीच आली आहे. तसाच तो इतर धर्मांचा आदर बाळगावा हे मतही पक्कं झालंय. त्यातच आपल्या देशाचं हित सामावलंय...

जय श्रीराम !!!

देव देव्हाऱ्यात नाही .....


देव देव्हार्‍यात नाही, देव नाही देवालयी 
देव चोरुन नेईल, अशी कोणाची पुण्याई  

देव अंतरात नांदे, देव दाही दिशी कोंदे 
देव आभाळी सागरी, देव आहे चराचरी 
देव शोधूनिया पाही, देव सर्वाभूतां ठायी  

देव मुठीत ना मावे, तीथर्क्षेत्रात ना दावे 
देव आपणात आहे, शीर झुकवोनिया पाहे 
तुझ्या माझ्या जड देही देव भरुनिया राही  

देव स्वये जगन्नाथ, देव अगाध अनंत 
देव सगुण, निर्गुण, देव विश्वाचे कारण 
काळ येई, काळ जाई, देव आहे तैसा राही
- ग दि मा 

Tuesday, September 28, 2010

मनसेचे मिशन केडीएमसी!

सर्व कल्याण आणि डोम्बिवली करांना आवाहन आहे कि त्यांनी आपले वोट राज साहेबांच्याच (मनसे च्या) पारड्यात टाकावे ......

खालील बातमी महाराष्ट्र टाईम्स मधून घेतली आहे .....

म. टा. प्रतिनिधी

कोणत्याही परिस्थितीत कल्याण-डोंबिवलीची सत्ता मिळवायचीच, या जिद्दीने निवडणुकीच्या मैदानात उतरलेले मनसे प्रमुख राज ठाकरे जाहीर सभा घेऊन कल्याण-डोंबिवली पिंजून काढणार आहेत. ठाकरेंची तोफ कल्याण व डोंबिवलीत तब्बल ४ सभांमधून धडाडणार असल्याने मनसैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे. त्याच वेळी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या कार्यर्कत्यांच्या मुलाखतींना मंगळवारपासून प्रारंभ होत आहे.

मागील ५ वर्षांत कल्याण-डोंबिवलीकरांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी व शिवसेना-भाजप युती अशा सर्वच प्रमुख पक्षांची राजवट अनुभवली. या दोन्ही राजवटींत कल्याण-डोंबिवलीची पुरती वाट लागली व एकाही पक्षाची कामगिरी सर्वसामान्यांना दिलासादायक ठरली नाही. या पार्श्वभूमीवर मनसेकडून मतदारांना बऱ्याच अपेक्षा आहेत.

विधानसभा निवडणुकीत मनसेला नाशिकपाठोपाठ सर्वाधिक यश कल्याण पट्ट्यात मिळाले. कल्याण पश्चिम व कल्याण ग्रामीण मतदारसंघातून पक्षाचे दोन उमेदवार विजयी झाले. विधानसभेपाठोपाठ महापालिकेतील सत्ता काबीज करण्याची नामी संधी मनसेला यंदा चालून आली आहे. त्यामुळे निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय राज ठाकरे यांनी घेतला असून पक्षाच्या प्रचाराची धुरा स्वत: राज ठाकरे यांच्या खांद्यावर असेल.

निवडणुकीची रणनीती ठरवण्यासंदर्भात सोमवारी मुंबईतील राजगड कार्यालयात राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक झाली. बैठकीतील निर्णयानुसार मंगळवारपासून शुक्रवारपर्यंत मनसेची निवडणूक समिती इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेणार आहे. आमदार बाळा नांदगावकर यांच्या नेतृत्वाखालील या समितीमध्ये शिशिर शिंदे, नितीन सरदेसाई, प्रवीण दरेकर, मनोज चव्हाण, शालिनी ठाकरे, यांच्यासह स्थानिक आमदार प्रकाश भोईर व रमेश पाटील यांचा समावेश आहे. ही समिती मंगळवारपासून प्रभागनिहाय मुलाखती घेईल. समितीने निवडलेल्या इच्छुकांमधून पक्षाचा अधिकृत उमेदवार राज ठाकरे निवडणार आहेत. त्यासाठी ठाकरे ३ ते ५ ऑक्टोबरदरम्यान डोंबिवली-कल्याणमध्ये तळ ठोकतील असे समजते.

निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी मुख्य समितीसह केदार आंेबाळकर यांच्यासह विनय भोईटे, राजन गावंड आणि मनोहर चुगदरे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत मनसेचे उमेदवार निश्चित झाल्यावर प्रचारावर लक्ष केंदित केले जाणार आहे. राज ठाकरे कल्याण व डोंबिवलीत पूर्व आणि पश्चिमेला प्रत्येकी १ अशा ४ सभा घेणार असल्याचे समजते. ठाकरे यांच्या सभांना कल्याण-डोंबिवलीत उसळणारी गदीर् पाहता या रणनीतीमुळे शिवसेना-भाजपच्या गोटात चिंतेचे वातावरण पसरले आहे.

Monday, September 27, 2010

मुनगंटीवार काय हे, उचलली जीभ लावली टाळ्याला?

काल भारतीय जनता पार्टी च्या कार्यकर्त्या मेळाव्यात प्रदेशाधक्ष्य मुनगंटीवार ह्यांनी काय अकलेचे तारे तोडले ते वाचा .... ते म्हणतात राज साहेब ह्यांना कल्याण डोंबिवलीतील खड्डेच दिसतात काय? पावसामुळे सर्वच ठिकाणी खड्डे पडले आहेत .... अरे लाज वाटली पाहिजे असली वक्तव्य करायला ..... आम्ही कल्याणकर आणि डोंबिवलीकर जाणतो सध्याची रस्त्याची अवस्था ..... आता पाऊस थांबून पंधरा दिवस झाले पण रस्त्याच्या स्थितीत काही सुधारणा नाही .... तुमचे नगरसेवक / महापौर / उपमहापौर काय झोपले आहेत काय ??? आधी खडकपाडा / मुरबाड रोड येथे जाऊन रस्त्याची पहाणी केली असती तर त्यांनी असली वक्तव्य करणे टाळले असते .......

अजून पुढे ते म्हणतात ... मनसे ला वोट म्हणजे कॉंग्रेस ला वोट (ही युतीची जुनीच खोड आहे, त्यामुळे आम्ही ह्यांच्याकडे लक्ष देत नाही ) ... मग बदलापूर मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस बरोबर सध्या कोणाची युती / आघाडी आहे ??? जर प्रदेशाधाक्ष्याना माहित नसेल तर सांगतो ... भारतीय जनता पार्टी सध्या बदलापूर मध्ये ७ नगरसेवकाच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या पाठीवर सत्तेवर आहे .... मग आम्ही म्हणू काय .... बी जे पी ला वोट म्हणजे .... राष्ट्रवादी ला वोट ........ युतीने आता कल्याण डोम्बिवली मधून आपला गाशा गुंडाळावा ........

आपला विनोद

खालील बातमी लोकसत्ता च्या सौजन्याने ........



मुनगंटीवार यांचा आरोप
डोंबिवली, २६ सप्टेंबर/प्रतिनिधी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला शरद पवारांनी जन्माला घातले आहे. राज ठाकरे यांना केवळ कल्याण-डोंबिवलीतील खड्डे दिसतात का? राज्यात सर्वच ठिकाणी पावसामुळे खड्डे पडले आहेत ते त्यांना दिसत नाहीत, कारण मनसे म्हणजे शरद पवारांची टेस्ट टय़ूब बेबी आहे, अशी घणाघाती टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेना भाजपा युतीच्या मेळाव्यात केली. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर युतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे खा. मनोहर जोशी, भाजपाचे सरचिटणीस आ. विनोद तावडे, खा. आनंद परांजपे, ठाणे जिल्हा संपर्कमंत्री आ. एकनाथ शिंदे, आ. संजय केळकर, आ. रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, ठाणे विभागाचे भाजपाचे अध्यक्ष सुरेश टावरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अपक्ष नगरसेविका मंगला सुळे यांनी भाजपात प्रवेश केला. युतीचे राजकारण समाजहिताचे असून, काँग्रेस आघाडीने पैशाच्या जोरावर सत्ता प्रस्थापित करण्याचे आरंभिले आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा स्वाभिमान मुख्यमंत्र्यांच्या खिशात आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची हुजरेगिरी करत विधान परिषद निवडणुकीत मनसेने कोणाच्या पारडय़ात मत टाकले आहे हे आपण पाहिलेच आहे. मनसेला मत म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीला मत हे गणित सर्वांनी लक्षात घ्यायला हवे, अशी टीका मुनगंटीवार यांनी केली. येत्या निवडणुकीत युतीशी गद्दारी करणार नाही, अशी प्रतिज्ञा दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आत्ताच करा, असे आवाहनही त्यांनी केले. डोंबिवली-कल्याण महापालिकेची निवडणूक म्हणजे आगामी विधानसभेची रंगीत तालीम आहे, असेही ते म्हणाले. शिवसेना नेते मनोहर जोशी यांचेही यावेळी भाषण झाले.

Friday, September 24, 2010

राज ठाकरे यांची ग्रंथनिवड आणि सही रे सही.

लोकसत्ता च्या सौजन्याने ..........................


मराठीसाठी कायम आक्रमक पवित्र्यात राहणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे अलीकडेच दादरच्या शिवाजी मंदिर वास्तुतील मॅजेस्टिक ग्रंथदालनात काही काळ शांतपणे ग्रंथ निवडताना तेथे उपस्थित असलेल्या वाचकरसिकांना दिसले आणि भुवया उंचावलेल्या या वाचकांनी त्यांच्या सह्या घेण्याचा, मोबाईलच्या माध्यमातून त्यांचे छायाचित्र टिपण्याचा सपाटा लावला.
कांदिवली पूर्व येथील ठाकूर व्हिलेजमधील प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते २६ सप्टेंबर रोजी होणार आहे. मनसेचे स्थानिक आमदार प्रवीण दरेकर यांच्या पुढाकाराने साकारणाऱ्या या ग्रंथालयासाठी काही पुस्तकांची नावे सुचवावीत, अशी विनंती दरेकर यांनी राज यांना केली होती. मात्र मी पुस्तकांची यादी देण्याऐवजी स्वत: पुस्तके निवडून देईन, असे राज यांनी दरेकर यांना सांगितले आणि त्यांनी दरेकर यांना घेऊन शिवाजी मंदिर वास्तुतील मॅजेस्टिकचे ग्रंथदालन गाठले.
दुपारच्या सुमारास ग्रंथदालनात प्रवेश करणाऱ्या राज यांनी तब्बल दोन तास असंख्य पुस्तके चाळली आणि प्रबोधनकार ठाकरे ग्रंथालयासाठी निवडली. श्रीराम लागू यांचे आत्मकथन ‘लमाण’, अरुण टिकेकर यांचे ‘अस्वस्थ महाराष्ट्र’ अशा काही पुस्तकांसह पु. ल. देशपांडे, रणजित देसाई, ग्रेस, अरुण साधू, गो. नि. दांडेकर अशा प्रसिद्ध साहित्यिकांची वाचकप्रिय पुस्तके राज यांनी निवडली. या दरम्यान अनेक वाचकांनी राज यांना सही देण्यासाठी विनंती केली. मात्र अनेकांना सह्या दिल्यानंतर मात्र त्यांनी आपण येथे पुस्तके घेण्यासाठी आलो आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे अनेक जणांनी राज यांची पुस्तक खरेदी होईपर्यंत ग्रंथदालनाबाहेर वाट पाहिली आणि राज यांची सही मिळवली.

    Wednesday, September 22, 2010

    कल्याण-डोंबिवलीत ३८३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी

    म टा च्या सौजन्याने ..........................

    कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील विकासकामांसाठी राज्य सरकारने ३८३ कोटी रूपये मंजूर केले असून, उड्डाणपूल, रस्ते, पाणी पुरवठा आणि हॉस्पिटल या विकासकामांसाठी आणखी २९९ कोटी मंजूर करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी दिली. कल्याण पश्चिम येथे ५७ कोटी रूपये, तर कल्याण पूर्व येथे १० कोटी रुपये खर्च करुन स्कायवॉक, कल्याण डोंबिवली येथे दोन ठिकाणी भाडेतत्वावरील ३६ हजार घरांचा प्रकल्प, एमएमआरडीएमार्फत ८५ कोटी रुपये खर्च करून तीन ठिकाणी ३ हजार ४०१ घरांचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ४० हजार कुटुंबांना परवडणारी घरे मिळतील.

    निर्मल अभियानामार्फत ६८ कोटी रुपये खर्च करुन सार्वजनिक शौचालये उभारली जातील. संपूर्ण निधी राज्य सरकार देणार आहे. ४० कोटी रूपये खर्च करून उड्डाण पूल, निवाळी येथे ६२ कोटी खर्च करुन विकास केंद, ५५ कोटी रूपये खर्च करुन हॉस्पिटल बांधले जाणार आहेत. राजणोली नाका येथे ३२ कोटी, माणकोली नाका येथे ३० कोटी, मुंब्रा येथे ३० कोटी आणि शिळफाटा येथे ३५ कोटी रुपये खर्च करुन चार उड्डाणपूल, अंबरनाथ ते कल्याण या रस्त्यासाठीही १५ कोटी खर्च होतील. यांव्यतिरिक्त २९९ कोटींची कामे मंजूर करण्यात येतील.

    Tuesday, September 21, 2010

    एक बाप्पामय रात्र ......

    रात्री साधारणता ८.३० ची वेळ, आमदार साहेबांच्या ऑफिस मधून फोने आला कि रात्री साडे अकरा ला लालबाग च्या राज्याच्या दर्शनाला जायचेय. लगेच फोनाफोनी झाली आणि निवडक दहा – बारा कार्यकर्ते जमले. साहेब बाहेर मीटिंग ला गेले होते म्हणून साडे बाराच्या दरम्यान आम्ही सगळे निघालो. सायन सर्कल ला पोहोचल्यावर असं वाटतच नव्हतं कि रात्रीचे २ वाजलेत. जिकडे बघावे तिकडे लोकच लोकं... लहान, थोर, तरुण, तरुणी ... कोणालाही वेळेचं भान नव्हतं.

    मनसे चिन्ह असलेल्या आमदारांची गाडी बघून लोकांच्या नजरा उछुक्तेने आमच्या गाड्यांकडे वळत होत्या. कोणीतरी ओरडलं ... “अरे बघ मनसे च्या आमदारांची गाडी चाललीय”. त्या नजरा बघून जाणवलं कि लोकांच्या किती अपेक्षा आहेत मनसे आणि राज साहेबांकडून, मन भरून आलं पण आपसूक त्या अपेक्षांचे दडपण डोक्यावर जाणवू लागलं. एका गोष्टीची जाणीव झाली कि, हि मराठी जनता मोठ्या अपेक्षेने आमच्या पक्षाकडे पाहते आणि आम्हाला त्यांच्या कसोटीला उतरावच लागेल, दुसरा कोणताही पर्याय आमच्या समोर नाही.

    वी आय पी गाडी असल्याकारणाने आम्हाला आतपर्यंत प्रवेश मिळाला. गाड्या पटकन पार्क करून आम्ही निघालो बाप्पाच्या दर्शनाला. तेथील बरेच कार्यकर्ते मनसे चे होते आणि वी आय पी सोबत असल्याकारणाने पटकन प्रवेश मिळाला. थोड्या वेळातच आम्ही सर्व जन बाप्पाच्या समोर होतो. ती अतिभव्य मूर्ती जणू खरी असल्याचाच भास होत होता, आपसूक सर्वांचे मस्तक बाप्पाच्या चरणी लीन झाले.

    मी बऱ्याच वर्षानंतर लालबाग ला गेलो, माटुंग्याला कॉलेज मध्ये असताना आमचा एक मित्र लालबाग ला राहत होता तेव्हा त्यांनी आम्हाला गणपती ला नेलं होतं. त्यावेळेस आम्ही गेलो आणि लगेच दर्शन झालं आता मात्र चित्र पूर्ण वेगळं आहे. नवसाची रांग बघून तर मला चक्करच आली, वीस तास लोकं रांगेत होते हे ऐकून तर डोकं गरगरायला लागलं. बाप्पा पण मनातल्या मनात भक्ताना म्हणत असेल कि नको बाबा एवढे कष्ट घेऊ. असो थोडं विषयांतर झालं.

    बाप्पाचा दर्शन घेऊन सर्वजण दिग्मूढ झाले होते, कोणाच्या तोंडातून थोडावेळ शब्दच निघत नव्हता, मला वाटतं तो त्या वातावरणाचा परिणाम असावा. बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही कॉटन ग्रीन च्या राजाचे दर्शन घेतले व गाड्या सिद्धिविनायकाच्या काकड आरती साठी रवाना झाल्या.

    Monday, September 20, 2010

    नेत्यांची 'संस्कृती', लोकांचा 'संघर्ष'

    खालील लेख हा महाराष्ट्र टाईम्स मधून घेतला आहे ..........

    प्रश्न सोडवायचे नाही पण कामाची प्रसिद्धी घेण्या करिता धावायचे हीच नेत्यांची प्रवृत्ती, अजून काय?



    20 Sep 2010, 0056 hrs IST
    संदीप शिंदे


    टोल नाक्यावरील आंदोलनात एकमेकांवर कुरघोडी करण्याचा जो संघर्ष रविवारी उडाला तो ठाण्यातील नेत्यांच्या प्रतिमेला साजेसाच होता. सवंग प्रसिद्धी आणि एकमेकांवर कुरघोडीचे भूत येथील नेत्यांच्या मानगुटीवर स्वार असल्याची प्रचीती पुन्हा एकदा आली. ठाण्यातील जवळपास सर्वच नेत्यांमध्ये सवंग प्रसिद्धीची 'संस्कृती' घट्ट रुजू लागलेली आहे. प्रसिध्दीच्या या झोतामुळे सर्वसामान्यांच्या जीवन मरणाशी निगडित असलेले असंख्य प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत, याचा विसर इथल्या नेत्यांना पडलाय. लोकांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबाबत एखादे पत्रक काढले आणि आंदोलने केली म्हणजे आपले काम संपले, अशीच भावना शहरातील बहुसंख्य नेत्यांमध्ये रुजली आहे. शहराच्या प्रगतीसाठी लोकप्रतिनिधी कोणतेही ठोस प्रयत्न करत नसल्याने सर्वसामान्यांना छोट्या छोट्या प्रश्नांसाठी 'संघर्ष' करावा लागतोय, हे या शहराचे दुदेर्व आहे.

    महिन्याभरापूवीर् मुंबई विद्यापीठाच्या उपकेंदाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर गडकरी रंगायतन येथे झालेल्या एका कार्यक्रमात या उपकेंदाचे श्रेय लाटण्याची स्पर्धा आ. एकनाथ शिंदे, राजन विचारे, जितेंद आव्हाड, संजय केळकर आदी राजकीय नेत्यांमध्ये रंगली होती. ठाण्यात उपकेंद असावे ही मागणी सर्वप्रथम १९९९ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर भूमिपूजनासाठी अकरा वषेर् लोटली. एवढ्या छोट्या कामासाठी तब्बल अकरा वर्षांची प्रतीक्षा हा इथल्या राजकीय नेतृत्वाला आपला पराभव वाटत नाही. मध्यंतरी कळव्यातील झीरो लोडशेडिंगचा मुद्दा असाच गाजला. १ जुलैपासून कळव्यात लोडशेडिंग होणार नाही, असे एमईआरसीने जाहीर केल्यानंतर आ. जितेंद आव्हाड यांनी 'कळवा लोडशेडिंग मुक्त झाला', असे होडिर्ंग झळकवले. मात्र, दोन महिने लोटले तरी ही घोषणा प्रत्यक्षात आलेली नाही. एमएमआरडीए ठाण्यात मोनो आणि मेट्रो रेल्वे सुरू करणार, अशी बातमी वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली होती. त्यानंतर लगेचच एका प्रतिष्ठानने आ. प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांना यश अशा आशयाचे होडिर्ंग घोडबंदर रोडवर झळकवले होते. त्यामागे कुणाची 'प्रेरणा' होती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. ठाण्यातील प्रस्तावित शॅलो वॉटर पार्क असो किंवा शाई धरण असो... प्रत्येकाचे श्रेय लाटण्याची स्पर्धाच इथे पहायला मिळते,

    एखाद्या नवीन योजनेचे बिगुल वाजले की ती योजना माझ्याच प्रयत्नाने कशी सुरू झाली आहे, हे सांगण्यासाठी नेत्यांची चढाओढ लागते. मात्र, रखडलेली कामे मागीर् लावण्यासाठी कुणीही ठोस प्रयत्न करत नाही. एखादी समस्या खूप चिघळली की त्याबाबतचे एक निवेदन मुख्यमंत्र्यांना किंवा संंबधित अधिकाऱ्यांना पाठवायचे किंवा छोटेमोठे आंदोलन करून मोकळे व्हायचे, असाच पवित्रा येथील बहुसंख्य नेते घेतात. आपण लोकप्रतिनिधी आहोत. इथल्या लोकांच्या भेडसावणाऱ्या समस्या दूर करण्यासाठी लोकांनी आपल्याला निवडून दिले आहे, याची जाणीव या नेत्यांना आहे का, हा देखील संशोधनाचा विषय ठरू शकतो. नागरिकरणामुळे निर्माण होणारे अनेक प्रश्न आज ठाण्यात आ वासून उभे आहेत आणि लोकप्रतिनिधी या नात्याने त्यांची सोडवणूक करून, शहराच्या विकासाला ठाम दिशा देऊन लोकांचे दुवा घेण्याची सुवर्णसंधी नेत्यांना आहे. त्यामुळे प्रसिद्धीसाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची जेवढी धडपड हे नेते करतात, तेवढीच धडपड शहराच्या विकासासाठी त्यांनी दाखवावी अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

    रेल्वेने प्रवास करणाऱ्या सुमारे चार लाख प्रवाशांची अपुऱ्या पुलांमुळे रोज घुसमट होते. घोडबंदरच्या सव्हिर्स रोड अभावी अनेकांचे जीव जात आहेत. कोपरी आणि विटाव्याच्या पुलांमुळे हजारो ठाणेकरांचे हाल होतात. रस्ते खड्ड्यात गेले आहेत. रस्त्यारस्त्यावर कचऱ्याचे ढीग साचलेत. पाकिर्ंग प्लाझा नसल्याने प्रत्येक रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. टीएमटीची अंत्ययात्रा काढून नेत्यांनी प्रसिद्धी लाटली. मात्र, या टीएमटीला नवसंजीवनी देण्यासाठी ठोस प्रयत्न होत नाहीत. एकात्मिक नाले विकास योजना, बेसिक सव्हिर्सेस फॉर अर्बन पुअर (बीएसयूपी), मलनि:सारण योजनांसाठी केंद सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी आला. त्यालाही भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याने या कामांच्या दर्जा खालावला आहे. ही कामे योग्य पध्दतीने व्हावीत, यासाठी कुठलाही नेता कधीही भांडताना दिसत नाही. ठाणे शहरातील विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये वारंवार सिद्ध केली आहे. मात्र, या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी दजेर्दार शाळा आणि कॉलेज शहरात उभारण्याची गरज एकाही नेत्याला वाटत नाही.

    एकट्या ठाणे शहरात विधानसभेचे चार आणि विधान परिषदेचे दोन असे सहा आमदार आहेत. त्यापैकी वसंत डावखरे हे गेल्या अनेक वर्षांपासून विधान परिषद उपासभपती या महत्त्वाच्या पदावर कार्यरत आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दबदबा आहे. जितेंद आव्हाड तर थेट शरद पवारांचे 'ब्लू आईड बॉय' म्हणून ओळखले जातात. प्रताप सरनाईक यांची सर्वपक्षीय आणि विशेषत: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांशी जवळचे संबंध आहेत. स्वत:चे प्रस्थ निर्माण करणाऱ्या या नेत्यांना शहराच्या विकासाला मात्र ठोस 'व्हिजन' देता आलेली नाही.

    शहराच्या विकासाचे नियोजन करण्यात लोकप्रतिनिधींची महत्त्वाची जबाबदारी असते. त्यामुळे नेत्यांनी आपला दृष्टीकोन आता तरी बदलायला हवा. लोकप्रतिनिधी खमका असेल तर त्या परिसराचा सर्वांगीण विकास होतो, हे पश्चिम महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांनी दाखवून दिले आहे. त्या नेत्यांचा आदर्श ठाण्यातील नेत्यांनीही ठेवायला हवा. त्यासाठी मुळात विकासाची 'व्हिजन' आणि तळमळ आपल्याला आहे, हे नेत्यांना दाखवून द्यावं लागेल. लाखो रुपयांची उधळण करणाऱ्या हंड्या उभारून नेते सॉलिड हिट झाले. शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देत ते 'सुपर हिट' व्हावेत, अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा आहे. विघ्नर्हत्याने तेवढी सुबुध्दी या नेत्यांना द्यावी, एवढीच प्रामाणिक प्रार्थना.

    Friday, September 17, 2010

    नाशिक महानगर : लुटालूट !

    खालील लेख हा लोकसत्ता मधून घेतला आहे ....
    दिनांक - १७/०९/२०१०

    महानगर पालिकेतील सत्ताधारी जनतेच्या पैश्याची कशी लूट करतात ते वाचा ........



    जयप्रकाश पवार ,शुक्रवार, १७ सप्टेंबर २०१०

    शिवकालीन सुरतेच्या लुटीचा संदर्भ नेहमी दिला जातो, पण तो चांगल्या अर्थाने. कारण सुरतेच्या लुटीमध्ये हाती लागलेला सर्वच माल रयतेच्या भल्यासाठी वापरला गेला होता. कदाचित, त्यामुळेच लुटीसारखी घटना लौकीकार्थाने वाईट असली तरी केवळ त्यामागच्या तत्कालीन शुद्ध हेतूमुळे त्याकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहिले गेले असावे. ती घटना आजही आदर्शवत म्हणून ओळखली जाते. परंतु त्याच आदर्श शिवशाहीचे पाईक असल्याचा दावा करणाऱ्या नाशिक महापालिकेतील शिवसेनेच्या कारभाऱ्यांचा कारभार मात्र शिवशाहीला बट्टा लावणारा ठरतो आहे. कारण येथे तर पालिकेतच लुटालूट सुरु असून रयतेला दिलासा देण्याऐवजी रयतेच्या तिजोरीवरच कारभारी अन् अधिकारी संगनमताने दिवसाढवळ्या दरोडा घालत आहे, असे शोचनिय चित्र आहे. रयतेच्या तिजोरीवर घाला घालून त्यातील रक्कम ठेकेदारांकडे वळविण्याचा निलाजरा प्रकार होवू लागल्याने रयतेमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
    गत सिंहस्थ कुंभमेळ्यात तीर्थक्षेत्री येणाऱ्या सर्व भाषिक भाविकांना नाशिकचे दिशादर्शन व्हावे म्हणून गावभर कमानी उभारणे व त्यावर माहिती फलक लावण्याचा ठेका दिला गेला होता. ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ तत्वावरचा हा ठेका त्यावेळच्या आयुक्तांनी सरकारी बिरादरीतील पूर्वसूरींना शरण न येता, ठेकेदार निविदेतील अटी-शर्तीनुसार काम करीत नसल्याचा ठपका ठेवून रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. आयुक्तांच्या निर्णयाविरुद्ध ठेकेदार न्यायालयात गेला. त्यानंतर लवाद नियुक्त करण्याचा निर्णय झाला. लवादामध्ये ठेकेदाराच्या बाजुने निर्णय होवून नुकसान भरपाईपोटी ठराविक रक्कम अदा करण्याचे आदेश दिले गेले. पालिका आणि ठेकेदार यांच्यातील नातेसंबंध जगजाहीर आहेत. पालिकेकरवी कोणत्याही प्रकारचे काम ठेकेदाराला देताना कागदोपत्री ज्या अटी-शर्ती नमूद केल्या जातात त्या प्रामुख्याने पालिकेच्या पर्यायाने जनहिताचा विचार करूनच केल्या जातात. समजा, एखाद्या ठेकेदाराने बदमाशी केली, काम मध्येच सोडून पळ काढला तर त्याचा भुर्दंड पालिकेवर पडणार नाही, लोकांची फसवणूक होणार नाही याची पूरेपूर काळजी प्रशासनाने घ्यावी असे संकेत आहेत. त्यामुळे समजा ठेकेदार जिल्हा न्यायालयात यशस्वी ठरला तरी उच्च न्यायालयात अन् तेथेही अपयश पदरी आले तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिकेचे प्रथम कर्तव्य ठरते. पालिका प्रशासनाला नेमके या कर्तव्याचे सोयीने विस्मरण झाल्यामुळे म्हणा की अन्य काही भावनिक कारणास्तव म्हणा, अधिक भानगडीत न पडता ठेकेदाराला सुमारे तीन कोटी रुपये देवून टाकण्याची मनोमन तयारी करून टाकली. वास्तविकत: सिंहस्थ काळातील कमानीचा ठेका असो की शहर बस वाहतुकीसाठी बस थांबे उभारण्याचा विषय असो या दोन्ही प्रकरणांत तत्कालीन महसूल आयुक्त वा माजी जिल्हाधिकाऱ्यांच्या मुलांचा थेट संबंध होता हे उघड सत्य आहे. त्यातच ठेकेदारापैकी एक जण माजी राज्यमंत्र्यांच्या नाजुक नाते संबंधातील. अशारितीने ठेका घेणारे अन् देणारे यांच्या संबंधावर लख्ख प्रकाश पडत असताना झाकली मूठ सव्वा लाखाची अशी गत सध्या या वादग्रस्त विषयाची झाली आहे. कमान प्रकरण, पेलिकन पार्कचा वादग्रस्त करार आणि मलनि:स्सारण केंद्राशी संबंधीत ठेकेदाराला द्यावयाचे पैसे या केवळ तीन प्रकरणात नाशिक पालिकेला वीसहून अधिक कोटींच्या रक्कमेचा भरुदड सोसावा लागणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, शासन प्रतिनिधी म्हणून आयुक्तांनी पालिकेच्या कारभारावर अंकुश ठेवायचा तर तेच महोदय या कामी पुढे आहेत अशी उघडउघड चर्चा आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ नाशिक जिल्ह्य़ाचेही पालकमंत्री आहेत, त्यामुळे शासनाचा प्रतिनिधी अंकुश राखण्यात कुचराई करीत असेल तर त्याला जाब विचारण्याचे दायित्व पालकमंत्र्यांकडे आपसूकच जाते. मुंबई पालिकेचे महापौर म्हणून भुजबळांनी काम पाहिले असल्यामुळे ज्येष्ठाच्या नात्याने त्यांच्या पालकत्वाखालील नाशिक पालिकेला दोन खडे बोल सुनावण्याचे काम होताना दिसत नाही.
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विधीमंडळातील उपगटनेते आ. वसंत गिते यांनी या प्रकरणाबाबत नगरविकास खात्याच्या सचिवांकडे तक्रार केल्यावर त्याची गंभीर दखल घेतली गेली. किमान वरकरणी तरी या प्रकरणाने गंभीर वळण घेतल्याचे दिसत असले तरी शेवटी हे खाते नाशिकच्या महाविद्यालयात व्यवस्थापन शास्त्राचे धडे गिरविलेल्या मुख्यमंत्र्यांच्या प्रभावाखाली आहे. अशारितीने नाशकात चाललेल्या लुटालुटीकडे सांप्रतकाळातील शिवशाहीचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ वा अन्य जबाबदार लोकप्रतिनिधींकरवी कानाडोळा व्हावा याचाच अर्थ कुठे ना कुठे पाणी मुरते आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.



    Thursday, September 9, 2010

    निवडणुका .....

    परवा शिवसेना कार्यकारी प्रमुखांच्या हस्ते पादचारी पुलाचे (भाग १, अजून बाकीच काम शिल्लक आहे, खड्डया सहित) उद्घाटन झाले ... त्यावेळी ते म्हणाले

    रस्ते आहेत तर खड्डे हे होणारच .......

    बरोबर आहे आणि त्याला जोड युतीच्या भ्रष्टाचाराची ............

    आम्हाला निवडणुकीची चिंता नाही ....

    मागील चार वर्षात तुम्ही आणि तुमचे जिल्हा प्रमुख मिळून जेव्हढ्या वेळेला कल्याण मध्ये आलात त्याच्या पेक्षा जास्त वेळेला मागील ३ महिन्यात आलात. हे कशाचं लक्षण आहे? आम्हाला तुम्ही लोकं काय दुधखुळे समझतात कि काय?


    Friday, September 3, 2010

    सलाम

    निधड्या छातीच्या गोविंदांना आम्हा सर्वांचा सलाम.